Tuesday, October 28

Article

Article

वऱ्हाडाचा कुबेर राघोजी महार

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसाहत करून असणारा आजचा *बौद्ध  व पूर्वीचा महार* गेली कित्येक हजार वर्षापासून दारिद्र्यात जीवन जगत होता. आधुनिक भारताच्या इतिहासात महारांच्या कहाण्या आपण ऐकले आहेत.पण विदर्भातील वाशिम जवळून १५ किलोमीटरच्या अंतरावर असणारे तोरणाळा गावचा* काही वेगळाच इतिहास आहे.या गावी  राघोजी नावाचा सावकार होऊन गेला ज्याच्या गोष्टी आजही लोकांच्या तोंडी एकाला मिळतात राघो महार यांचा जन्म 1839 मध्ये झाला राघो स्वभावाने जिद्दी आणि मेहनती होता. असे सांगतात की एकदा काम करत असताना त्याला सोन्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून त्याने मोह विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपल्या मेहनतीने व चिकाटीने तो मोहविक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला.  ज्याच्या हजारो पिढया गरीबीच्या अंधारात खितपत पडल्या होत्या त्या समाजात सावकार म्हणून त्याची ख्याती व्हायला वेळ लागला नव्हता. लोकांना आलेल्या छोट्या छोट्या आर्थिक ...
Article

कुटे गुरुजी…एक निरपेक्षवृत्तीचा -उपक्रमशील शिक्षक

नारायणराव गोविंदराव कुटे गुरुजी यांचा जन्म २६ जुलै १९४१ साली वरुडखेड येथे झाला. कुटे गुरूजी म्हटले की, चांगले साडे पाच फुटांपेक्षा उंच तसेच अंगापिंडाने भरलेले गौरवर्णी, थोडा लांब चेहरा, पांढरा शुभ्र पायजमा, त्यावर प्रेसचे शर्ट असे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व त्यांचॆ होते. ते स्वभावाने जरी कडक असले तरी तितकेच मनमिळावू होते. तसेच सद्वर्तनी आणि निष्कलंक चारित्र्याचे होते.मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डीएड केले आणि १७ जुलै १९६३ ला ते यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये माळेगाव येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. सेवारत असताना अचलपूर येथे इंग्रजी विषयाचा कोर्स पूर्ण केला, नंतर पांढुर्णा आणि करजगाव येथे १९६७ ला रूजू होऊन १९९७ पर्यंत करजगांवला ३० वर्ष कार्यरत होते, असा त्यांच्या सेवेचा प्रवास झाला.करजगावी असताना त्यांना सदाशिव गोविंदराव भोयर, सालपे गुरूजी, भालेराव गुरूजी, गायकवाड गुरूजी इत्याद...
नाट्यप्रेमी करजगाव…!
Article

नाट्यप्रेमी करजगाव…!

नाट्यप्रेमी करजगाव...! करजगावातील नागरिकांना आपली रोजची कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडून आलेला थकवा शिनभाग घालवण्यासाठी आणि आपले जीवन सुखी समाधानाने घालविण्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने होती. भजन , किर्तन, प्रवचन, रामलीला, कटपुतली , लोकगीते, लोकनृत्य, दंढार, कलापथक, जलसे, तमाशे याद्वारे गावातील प्रत्येक जण आपले मनोरंजन करून घेत असे त्याच प्रमाणे नाटक सुद्धा करजगावकरांचे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. नाटकाद्वारे समाजातील वाईट प्रथा, परंपरा ,सामाजिक प्रश्न याबाबत जनजागृती होऊन सामाजिक परिवर्तनाला मोलाची मदत झाली. मागील आठ दशकापासून करजगावला नाटकाची परंपरा लाभली. या काळात वेगवेगळ्या नाट्य मंडळाद्वारे प्र .के. अत्रे ,बाळ कोल्हटकर , मधुसूदन कालेलकर या सारख्या प्रसिद्ध नाटककारांच्या सामाजिक विषयावरील अनेक नाटकांचे प्रयोग येथे करण्यात आले.करजगावात नाटकाची सुरुवात 1950 पूर्वीचं झाल्याचे दिसून येत...
करजगावच्या तांड्यातील होळी
Article

करजगावच्या तांड्यातील होळी

तसं पाहिलं तर करजगाव ही बंजारा बहुल वस्ती आहे. येथे जवळपास 75टक्क्यापेक्षा जास्त बंजारा समाज असून मी लहान असताना येथे कसना नायक, खंडू नायक, प्रभु नायक, रामू नायक, भोजू नायक, सपावट तांडा, नंदु नायक असे सात तांडे होते. मुळातच बंजारा समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. त्यातल्या त्यात करजगावच्या तांड्यातील होळी हा एक सण म्हणून नाही तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जाई. होळीच्या एक दिड महिना अगोदरच तांड्यात लेंगिचे सूर ऐकायला मिळायचे. वसंत ऋतूची चाहूल लागताच चार चौघे सुरात सुर मिसळून होळी गिते गात त्यालाच 'लेंगी' म्हटले जाई. मागील पिढीकडून पुढिल पिढीकडे हस्तांतरित झालेली ही गिते मौखिक स्वरुपाची असायची. बंजारा समाजाचे प्रेरणास्थान जगत् गुरू संत सेवालाल महाराज यांच्या नामस्मरणाने लेंगी गीताची आणि न्रुत्याची सुरूवात होत असे. लेंगित डफडे वाजविणाराची भूमिका फारच महत्त्वाचीअसे. तोच लेंगी गिताचे संचलन ...
शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Article

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या तसेच जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असे स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनंत पैलूचे त्यांनी निरीक्षण केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांचे प्रेरणास्थान बनले आहे.शिक्षणाचे प्रेरणास्तंभ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानपुरुष ,निस्सीम ग्रंथप्रेमी,विचार स्वातंत्र्याचे खरे समर्थक,थोर समाज सुधारक,प्राख्यत अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंधाचे माहितगार,ऊर्जा व ज्ल संसाधनाचे नियोजक, अंधश्रद्धाचे कर्दनकाळ, सद्भावना सांप्रदायिक व सहिष्णुता प्रेरक, महिलाच्या समान हक्कासाठी संघर्षरत, शेतकरी/शेतमजूर व कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये,शांतता व अहिंसेचे समर्थक, बहुजन समाजाचे उद्धारक प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहे.गरीब वंचित,शोषित,पीडित, महिला, कामगार आणि सर...
आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज
Article

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरजभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापक नेते होते.विषमतावादी समाज रचना असलेल्या बहुजन समाजातील शोषित,पिडित,उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले महान कार्य अद्वितीय आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंज देत देश-परदेशात उच्च शिक्षण घेतले. अगाध बुद्धिमत्तेचा परिचय देत देश-विदेशातील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला. डॉ.आंबेडकर ज्ञानी होते.त्याची विद्वत्ता अद्वितीय होती.प्रखर देशभक्त,अंधश्रद्धेचे विरोधक,विज्ञाननिष्ठ, शिक्षणक्षेत्राचे प्रेरणास्रोत, संविधानाचे शिल्पकार,विचार स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते,बहुजन समाजाचे कैवारी, सांप्रदायिक सद्भावना,सहिष्णुतेचे प्रेरक, महिला सक्षमीकरणाचे कट्टर समर्थक, आर्थिक-सामाजिक व राजकीय विचारवंत,आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार, झुंजार पत्रकार,संपादक,लेखक लो...
स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
Article

स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..! बैठय़ा कामाचं वाढतं प्रमाण, व्यायामाचा अभाव तसंच आहारातील बदल या प्रमुख कारणांमुळे अलिकडेस्थूलतेची समस्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. खरं तर स्थूल असण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेक प्रकारचे कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रोल अशा अनेक विकारांचं मूळ स्थूलपणात आहे. भारताबद्दल बोलायचं तर सर्वच वयोगटात स्थूलतेचं प्रमाण वेगाने वाढतंय. जवळपास ३0 लाख भारतीय स्थूलतेने ग्रस्त आहेत. पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण दुपटीनं वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबत केलेल्या एका संशोधनात जगभरात दर वर्षी पाच लाख लोकांना स्थूलतेमुळे कॅन्सरची लागण होत असल्याचं आढळलं.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया संशोधनात १८४ देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २0१५ मध्ये तीन लाख ४५ हजार महिलांना स्थूलतेमुळे कॅन्सर झाला. पुरूषां...
नसाब एक परंपरा…!
Article

नसाब एक परंपरा…!

नसाब एक परंपरा...!चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील बंजारा समाजातील आदर्श परंपरा म्हणजेच ‘नसाब’ होय. यवतमाळ जिल्ह्याला नक्षलग्रस्त, आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या याच यवतमाळ जिल्ह्याने याच जिल्ह्यातील बंजारा समाजाने महाराष्ट्राला दोन माजी मुख्यमंत्री म्हणून हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब, कै. सुधाकररावजी नाईक साहेब, राज्यपाल म्हणून कै. सुधाकररावजी नाईक, मा. मनोहरराव नाईक अन्न व शिक्षण मंत्री, संजयभाऊ राठोड वनमंत्री, इत्यादी मंत्री दिलेत याचा आम्हास आज गौरव वाटतो.हे वाचा – आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?बंजारा समाजातील तांड्यातील नायक, कारभारी, असामी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांचा जमलेला एक प्रकारचा समन्वय म्हणजेच ‘नसाब’..! आपल्या तांड्यात कोणत्याही प्रकारचे छोटे...
Article

प्राधान्यक्रम महिला व बालकांच्याविकासाला…

- ॲड. यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकासमहाराष्ट्राने सामाजिक, आर्थिक, राजकीय आदी क्षेत्रातील सुधारणांद्वारे देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या विभागाची मंत्री म्हणून पदभार घेतानाच महिला आणि बालकांचा विकास हा विषय जिल्हास्तरावरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक विभागाच्या प्राधान्यक्रमावर आणणे हे उद्दीष्ट मी बाळगले आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध कामही सुरू आहे. ‘सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र’ या संकल्पाच्या पूर्तीसाठी राज्यातील सर्वच घटकांच्या सहकार्याने राज्य शासन म्हणून आम्ही ठळक असे काम निश्चितच करुन दाखवू. कोविडच्या रुपाने एक मोठे संकट आपल्या समोर उभे असताना आपण सर्वचजण त्याला धैर्याने तोंड देत आहोत. राज्य शासनाने या कालावधीत जनतेचीआरोग्य सुरक्षा तसेच विविध समाजघटकांना दिलासा देण्याच्यादृष्टीनेवेळोवेळी आढावा घेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्य...
Article

सिकलसेल एक अनुवंशिक आजार : नियं‍‍त्रित करण्यास तरुणांचे सहकार्य अपेक्षित

 सिकल सेल या आजाराचा शोध अमेरिकेच्या जेम्स बी हेरीक यांनी 1910 साली लावला. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून पूर्व विदर्भात या आजाराचे लक्षणीय प्रमाण आहे. हा आजार आई-वडिलांपासून मुलांना होतो. आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो. महाराष्ट्रात अनुसुचित जाती आणि जमातीच्या लोकांमध्ये या आजाराचे लक्षणीय प्रमाण आहे. रक्तातील लाल रक्तपेशी गोल आकाराच्या असतात. जेव्हा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबीन मधील ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड येतो, तेव्हा गोलाकार रक्तपेशीचा आकार बदलून वक्राकार किंवा विळ्यासारखा आकार तयार होतो. विळ्यालाच इंग्रजी भाषेत “ सिकल ” असे म्हणतात आणि “सेल“ म्हणजे पेशी त्यामुळे उद्भवणाऱ्या रोगाला “सिकलसेल ”  आजार असे म्हणतात.सिकलसेल आजाराच्या विशिष्ट जाती आणि धर्माशी संबंध नाही गर्भधारणेच्या माध्यमातून सिक...