Monday, December 1

Article

Article

खांद्याच्या दुखण्यावर करा घरगुती उपाय…

खांद्याच्या दुखण्यामागे बरीच कारणे असू शकतात. दुखापत, सातत्याने होणारी हालचाल, वजनदार वस्तू उचलणे, अपघात, खेळणे किंवा वाढते वय या कारणांमुळे खांद्यांचे दुखणे उद्भवू शकते. खांद्याच्या दुखण्यामुळे हातांच्या हालचालींवर र्मयादा येतात. खांद्यांमध्ये तीन महत्त्वाची हाडे असतात. ही हाडे खांद्यांच्या सांध्यांशी जोडलेली असतात. खांद्याच्या कोणत्याही भागात या वेदना जाणवू शकतात.व्यायामाने या वेदनांवर नियंत्रण मिळवता येते. इतकंच नाही तर, या व्यायामाचे दीर्घकालीन लाभही आहेत. व्यायामामुळे स्नायू लवचिक व्हायला मदत होते. खांदे मागून पुढे फिरवणे, बालासन, खांद्यांचे स्नायू ताणणे, डंबेल्स उचलणे अशा व्यायामांमुळे लाभ होऊ शकतात. हे सर्व व्यायाम अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. शिवाय ते तुम्ही कुठेही करू शकता. हे व्यायाम नियमित केल्यामुळे वेदना बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात.खांदा बराच काळ दुखत असेल तर त्य...
Article

करजगावची पाणीटंचाई : एक शाप ..!

सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पृथ्वीवर म्हणायला 71% पाणी आणि 29% जमीन आहे. पृथ्वीवरील पाण्यात 97 टक्के समुद्राचं खारं पाणी आहे. उरलेल्या तीन टक्के गोड्या पाण्यात दोन टक्के ध्रुवीय प्रदेशात आणि हिम शिखरावर गोठलेल्या स्वरुपात आहे आणि जेमतेम एक टक्का पाणी विहिरी, बोअरवेल, तलाव, नदी, नाल्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. जर नियोजन न करता पाणी काटकसरीने वापरले नाही तर 2030 पर्यंत देशात पाणीटंचाई उद्भवणार असून 2050 पर्यंत ही समस्या भीषण स्वरूप धारण करणार आहे. खरं म्हणजे पाणीटंचाईची समस्या नैसर्गिक नसून मानव निर्मित समस्या आहे.वाढती लोकसंख्या ,बेसुमार जंगलतोड ,पावसाचा लहरीपणा, हवामानातील बदल आणि नियोजनाचा अभाव अशा अनेक कारणामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली खाली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मग त्याला माझं करजगाव तरी कसे...
Article

स्मार्ट टिप्स: तुमचा स्मार्टफोन गरम होतोय? मग काय काळजी घ्याल, वाचा..

स्मार्टफोन्समध्ये गेमिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग किंवा उन्हामुळंही स्मार्टफोन्स गरम व्हायला लागतात. त्यामुळं आपल्याला मोबाईलच्या अधिक गरम होण्याने त्रास सहन करावा लागतो. मग मोबाईलची गरम होण्याची कारणं आणि त्यासाठी आपण त्याची काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊया..   * सॉफ्टवेयर अपडेट्सचा प्रॉब्लेम, जास्त स्पेस शिल्लक नसल्याने, मोबाईलवर कोणतेही अ‍ॅप पूर्णपणे क्लोज नाही केले तर ते बॅकग्राउंडला मिनीमाईज होऊन चालू राहते आणि मोबाईल गरम होतो. साधारणत: स्मार्टफोन्समध्ये अनेक जुने आणि आऊटडेटेड अ‍ॅप्स असतील तर ते नेहमी अपडेट ठेवा.   * तुमच्या स्मार्टफोनची रॅम कमी असणे आणि इंटर्नल मेमरी कमी असली तर ती तुम्ही खूप फाईल्सने भरून ठेवतात. मग लोड आल्याने मोबाईल हँग होतो आणि गरमदेखील होतो. म्हणून अनावश्यक फाईल्स डिलीट करत जाव्यात.   * तुमच्या मोबाईलची रॅम कमी असताना तुम्ही जास्त मेमरी असलेले किंवा काही खास सपोर्ट...
Article

जयभीम च्या निमित्ताने…

तब्बल साडे पाच वर्षांनी आज चित्रपट बघितला. गेली दहा वर्ष झालीत माझे टी.व्ही.चे खूळ सुटून, मालिका अन सिनेमे तर कब के बहुत पिछेछुट चुके है! नाही म्हणायला टॉकीजला जाऊन ‘नटसम्राट’ अन त्यानंतर मे २०१६ ला ‘सैराट’ हा शेवटचा बघितलेला चित्रपट. भूल पाडू शकेल वा ‘हा चित्रपट बघितलाच पाहिजे!’ अशी अलीकडे पार आतून उत्कंठा ,आकर्षण, जिज्ञासा वगैरे अजिबात वाटत नाही किंवा एका ठिकाणी बसून २-३ तास द्यावे हेही बरेचदा बहुअंगी व्यापामुळे परवडण्यासारखे नसते पण ‘जयभीम’ पाहायचाच आणि सहकुटुंब पाहायचा! हे समाजमाध्यमातील ‘जयभीम’ वरील अभिप्राय, प्रतिक्रिया यामुळे प्रकर्षाने वाटत होते. शिवाय आज सकाळीच साम टीव्हीच्या फेसबुक पेजवर प्रसन्ना जोशी यांच्या ‘लक्ष असतं माझं’ मध्ये ‘बॉलिवूडला जयभीम करणं का जमत नाही?’ हे लाईव्ह ऐकून सारी कामं बाजूस सारून आज दुपारी दोन्ही मुलं आणि आम्ही नवराबायको अशा चौघांनी ‘जयभीम’ बघितला.   अफाट,...
Article

‘झोळी’ : शोषित आणि दबलेल्या समाजातील दुःखाचे दर्शन देणारी साहित्यकृती..!

डॉ. कालिदास शिंदे यांची 'झोळी' हे आत्मकथन अलीकडेच (मे २०२१) प्रसिद्ध झाले आहे. यात भटक्या 'डवरी गोसावी' (नाथपंथी) जमातीचा कुलवृत्तांत विस्तृतपणे आला आहे.   शोषित आणि दबलेल्या समाजातील दुःखाचे दर्शन देणारी साहित्यकृती ही प्रस्थापित साहित्यासमोर नेहमीच आव्हान/आव्हाने उपस्थित करणारी असते. ती प्रस्थापित साहित्याचे भाषिक, राजकीय आणि सांस्कृतिक आयाम विरचित (deconstruct) करते. साहित्याचे आणि साहित्यव्यवहारांचे आरोग्य सशक्त होण्यासाठी हे आवश्यक असते. दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड (काही उल्लेखनीय पुरुष आत्मकथने) तसेच बेबी कांबळे, उर्मिला पवार (स्त्री आत्मकथने) यांनी ही भूमिका बजावली आहे. 'झोळी' हे पुरुषआत्मकथन आणि सुनिता भोसले यांचे 'विंचवाचं तेल' (पारधी समाजातील स्त्रीचे आत्मकथन) ही अलीकडची यासंदर्भातील दोन महत्त्वाची उदाहरणे आहेत.   'काळी' आणि 'पांढरी' अशा दोन संज्ञा कृषीसंस्कृतीच्या सं...
Article

डॉ.कालिदास शिंदे यांचे ‘झोळी’ आत्मकथन प्रातिनिधिक विमुक्त व भटक्या जमातींच्या आत्मसन्मानाचा निखारा

भारतामध्ये अठरापगड जाती जमातीचे लोक राहतात. यामध्ये अनुसूचित जाती ,जमाती, भटके, विमुक्त ,ग्रामीण ,आदिवासी, इत्यादी जाती-जमाती दलित वर्गामध्ये मोडतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ,शूद्र या चार वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र हे दलित, पददलित म्हणून ओळखले जातात .या जातीय उतरंडीमध्ये शूद्र हलके, कमी प्रतीचे व्यवसाय करत राहिले ,म्हणजेच वरील तीन वर्गांची सेवा करत राहिले .या दलित पददलित वर्गावर अन्याय अत्याचार होताना दिसतात. ओबीसी ,एससी या वर्गातील जाती स्थायिक स्वरुपाच्या आढळून येतात .तर भटके-विमुक्त जमाती स्थानिक स्वरूपाच्या नसतात .नाथपंथी डवरी गोसावी त्यापैकीच एक जमात आहे .दलित साहित्यामध्ये अनेक आत्मचरित्रे गाजली नाथपंथी डवरी गोसावी जमातीतील डॉ.कालिदास शिंदे यांनी लिहिलेले आत्मचरित्र झोळी नुकतेच माझ्या वाचनात आले.    डॉ.कालिदास शिंदे लिखित झोळी आत्मकथन समिक्षा पब्लिकेशन प्रकाशक श्री.प्रवीण अनिलराव भाक...
Article

चौकातले सुरमा भूपाली…!

सत्तरच्या दशकात 1975 मध्ये शोले चित्रपट आला होता.हा चित्रपट 70 एम.एम.च्या पडद्यासाठी बनवला गेला होता .त्या अगोदर 35 एम.एम.चे पडदे असायचे. या चित्रपटात,खूपच रंजक गोष्टी होत्या.यात,मैत्री होती, प्रेम होते,संघर्ष होता,गाणे होते, मनोरंजन होते,दरोडे होते असूया होती,नौटंकी होती.अशा अनेक गोष्टी एकच चित्रपटात बघायला मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे याचे डायलॉग खूप छान होते, डायलॉग त्या काळातल्या प्रेक्षकांना मुखोद्गत होते,प्रेक्षकांचे एकदा चित्रपट बघून मन भरत नव्हते ,प्रेक्षकांनी अनेकदा चित्रपट पाहिला,आजही पाहतात.मुंबईतील मिनर्वा टॉकीज इथे साधारणपणे पाच वर्षे हा चित्रपट रोज मॅटीनी शो ला होता तरीही प्रेक्षक मिळायचे.एकदा पाहून कोणाचे समाधान होत नव्हते, वारंवार पाहिला जायचा.इतके गारुड या चित्रपटाचे प्रेक्षकांवर होते. आजही आहे.या चित्रपटाने अमिताभ बच्चनला,धर्मेंद्र ला महानायक बनवले.तर गब्बरच्या भूमिकेत अ...
Article

विश्वशांती साठी बुध्द तत्वज्ञानाची गरज

बुध्द पुष्प मानवतेच्या झाडावर फुललेले हे पुष्प अपरिमित वर्षानंतर एकदाच जन्माला येते पण जेव्हा उमलते तेव्हा या संपूर्ण जगाला प्रज्ञा,आणि करूणेचा मधुर रस देऊन जाते.धम्मचक्र परीवर्तन बुध्दाने केले भुतो न भविष्य असे तत्त्वज्ञान या सृष्टीतील सम्यक ज्ञान जगाला दिले तो दिवस म्हणजे धम्म चक्रपरिवर्तन म्हणून प्रसिद्ध पावला ..माणसाने माणसासोबत माणुसकीने वागावे हाच बुध्द जीवनाचा पाया आहे.जगाला बुध्दाच्या विचाराची अत्यंत गरज आहे.जेवढी गरज माणसाला भाकरीची आहे त्या पेक्षा अधिक माणसाला बुध्दाची गरज आहे..असे डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुध्द म्हणजे सर्वज्ञ ह्याचा अर्थ सृष्टीतील सर्व चराचर गोष्टीचे सम्यक ज्ञान ,जे जगातील सर्व विषयासमधी प्राप्त झालेले ज्ञान असते त्याला सम्यक समंबुध्द असे म्हणतात. बुध्द म्हणजे क्रांतिकारक लढा,अन्यायकारक गोष्टीचा ,अन दुःखाचा मुळापासून शोध घेणे म्हणजे बुध्द होय ऋषिपतनाच्या मृ...
बौद्ध संस्कृती आणि संस्कार
Article

बौद्ध संस्कृती आणि संस्कार

बौद्ध संस्कृती आणि संस्कार बौद्ध धर्म उदयास आल्या पासून बौद्ध संस्कृतीचे संस्कार उदयास आले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत पायी फिरून बुद्धांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. बुद्धाच्या जीवन काळामध्ये धम्म वेगाने वाढून पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे अधिक भरभराटीस आला. अनेक राज्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे प्रजाही बौद्ध बनली होती. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ही अनेक राजाद्वारे बुद्धाच्या अस्थींच्या रूपाने स्तुपांची निर्मिती करण्यात आली. बुद्धाची प्रतिमा तयार करण्यात आली. श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पालि गाथांची निर्मिती करण्यात आली. बुद्धांचा उपदेश ताडपत्र्यावर, झाडांच्या सालीवर, पुढे पाषाणावर कोरण्यात आलेले होता व त्यानुसार बुद्धाचे अनुयायी आचरण करीत असे. सम्राट अशोकाच्या काळात तर बुद्ध धर्माला फारच भरभराटीचे दिवस आले होते. बुद्धाच्या अस्तिवर चौर्‍याऐंशी हजार स्तूप निर्माण करून...
Article

‘घालीन लोटांगण’ या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?

घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ? कोणतीही आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये : १. प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. २. ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. ३. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. ४. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. ५. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. ६. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे ...