Monday, December 1

Article

करजगावचे  संघर्षशील  व्यक्तिमत्व : सतीश दवणे
Article

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे "अच्छे ने अच्छा, और बुरे ने बुरा जाना मुझे, क्योंकी जिसकी जितनी जरुरत थी, उसने उतनाही पहचाना मुझे"ओल्या रांजणाचा काठ कुंभार जितक्या सहजतेने वळवू शकतो, मातीच्या ओल्या गोळ्याला जसा आकार देवू शकतो तेवढ्याच सहजतेने परिस्थितीवर स्वामित्व ठेवून तो ती बदलू शकतो, हवी तशी अनकुल करुन घेऊ शकतो हे सर्व तो त्यांच्या सुप्त व प्रकट सामर्थ्यांच्या, चारित्र्य संपन्नतेच्या, विचाराच्या, सत्कर्माच्या आणि पुरूषार्थाच्या जोरावर साध्य करतो. त्याच्या मनात असणाऱ्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या साध्यास साध्य, सिद्ध करू शकतो. गरींबी, अवहेलना व अपमान, अवतीभवतीची स्थिती, घरच्या पिंजलेल्या भूकेभोवती पिंगा घातलेल्या यातना यातून मनात जिद्द, इच्छाशक्ती पेटून ऊठते व जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी कष्टाची तयारी मनात ठेवून जो वाटचाल करतो तो आपल्या ध्येयसिध्दीपर्यंत पोहचतो ह...
Article

ख्रिश्चन धर्म;प्रेमाचं प्रतिक

२५ डिसेंबर सर्व ख्रिश्चन बांधव हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा करतात.ज्याप्रमाणे हिंदू बांधव दिवाळीला आपले घर सजवतात.मुस्लिम बांधव ईदला घर सजवतात.बौद्ध मंडळी १४ एप्रिलला घर सजवतात.तसेच ख्रिश्चन बांधवही या दिवशी घर सजवतात. या दिवसासाठी अगदी घराला रंग देण्यापासून तर फटाके फोडण्यापर्यंत लोकं मजल मारतात.हा दिवस हा येशूचा मृत्यू दिवस जरी असला तरी ते मृत्यूलाच पवित्र मानून हा दिवस साजरा करतात.तर जाणून घेवूया प्रभू येशूंविषयी.........*प्रभू येशू कोण होते? प्रभू येशूबाबत सांगायचं झाल्यास प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे असं ते मानतात आणि इश्वराबाबत सांगायचं झाल्यास त्यांचा ईश्वर हा कधीच जन्म घेत नसून तो पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी आपल्या पुत्रांना पाठवतो असे ते मानतात.प्रभू येशूला देव मानण्याचे कारणही ते सांगतात की प्रत्यक्ष परमेश्वर जरी या पृथ्वी वर जन्म घेत नसला तरी प्रभू येशू हा देवाचा पुत्र...
Article

प्रा. सुरेश पुरी यांचे अनोखे समाजकार्य

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे निव्रुत्त प्रा. सुरेश पुरी यांचे नाव मराठवाडा प्रांतात सर्वदूर परिचित आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, भटक्या विमुक्तांची चळवळ, प्राध्यापकांची मुटा चळवळ आणि सरांनी गोरगरीब विद्यार्थी वर्गासाठी केलेले प्रचंड कार्य यामुळे सरांचे नाव घराघरात पोहोचले आहे. समाजकार्याचा नवा आदर्श त्यांनी उभा केलेला आहे. जाणून घेऊया त्यांच्या या कामाविषयी ..   आयुष्य छोटे आहे आणि आपण पृथ्वी नावाच्या उपग्रहावरील पाहुणे आहोत. जे आज आपले आहे ते काल आपले नव्हते. आपल्या अस्तित्वाने आपण जग सुंदर करणार आहोत की या जगाला खराब करणार आहोत याचा ज्याचा त्याने नक्की विचार करावा. जगात स्वर्ग नाही. मृत्यु नाही आणि पुनर्जन्मही नाही. जे आहे ते आज आहे. आता तर या कोरोना काळात आपण सर्वजण अक्षरश: मृत्यूच्या दाढेत आहोत. असं असलं तरी माणसाची हाव आ...
Article

उर्मिला गझल संग्रह परिचय

गझल मंथन समुहाच्या सतत गझल कार्यशाळा घेणाऱ्या, ज्या सध्या त्यांच्या १९ व्या कार्यशाळेत गझलकार व गझलकारा तयार करत आहेत, त्या आदरणीय गुरूवर्या, आमच्या आ. माई, म्हणजेच उर्मिला बांदिवडेकर ह्या होय. त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला गझल संगह उर्मिला गझल संग्रहाविषयी लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे.'उर्मिला' हा आ.माईंचा पहिला वहिला गझल संग्रह. उर्मिला नावाप्रमाणेच त्यांचा त्याग, निःस्वार्थी साहित्याची सेवा, तसेच ह्या वयात ही तरुणाईला लाजवेल असा गझल शिकवण्याचा गोडवा व उत्साह बघून तोंडात बोटे घालावी लागतात. "गझलकार/गझलकारा घडवणे हा त्यांचा गुण, आणि 'गझल मंथन' हा एक मोठा परिवार. "गझल मंथन हा वृक्षच मुळात माईंच्या रुपानं अनेकांचा आधारवड ठरलाय", असे त्यांच्याच कार्यशाळेत घडलेले गझलकार विष्णू जोंधळेसर म्हणतात, ते अगदी खरेच आहे.माईच्या उर्मिला गझल संग्रहात एकूण एकशे एक गझला विविध रंग, ढंग, कला कौशल...
Article

नवसमाज निर्मितीसाठी : अलर्ट

नव्वदोत्तरीतील एक व्यासंगी,अभ्यासू चिकित्सक आणि उत्कृष्ट लेखक,समीक्षक म्हणून साहित्यक्षेत्रात ज्यांचा गौरवाने नामोल्लेख केला जातो असे कविवर्य प्रशांत नामदेवराव ढोले (देवळी) यांचा "अलर्ट" हा काव्यसंग्रह नुकताच प्राप्त झाला आणि अवलोकन केला.त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असून सुधीर प्रकाशन वर्धा द्वारे प्रकाशित करण्यात आला.तत्पूर्वी सखोल अवलोकन आणि सूक्ष्म निरीक्षणातून "आंबेडकरी जाणीवाचा अक्षरप्रकाश" हा समीक्षाग्रंथ वाचकांच्या सेवेत दाखल झाला आहे.एक शिक्षक म्हणून सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याची जबाबदारी पेलताना समाजमनही तितक्याच आत्मीयतेने अभ्यासले.कुठलाही आव न आणता किंवा कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात अकारण उभे न करता जे दृष्टीस पडले,अनुभवले तेच त्यांनी "अलर्ट" मध्ये मांडले. वर्तमानातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कायम असलेली आर्थिक-सामाजिक विषमतेची चौकट मोडीत काढण्यासाठी समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्...
Article

प्रेम म्हणजे जीवन बरबाद करणं नव्हे.!

  युवक-युवतींचे प्रेम हे केवळ शारीरिक आकर्षण असते. प्रेम करण्यासाठी पोक्तपणा यावा लागतो.तो केवळ स्वाध्यायाने प्राप्त होतो.खलनायक व हिरो दोघेही मुलींना छेडण्याचेच काम करतात. दोहोंमध्ये मला भेद दिसत नाही. मुली शक्यतो लफंग्यांवर प्रेम करतात कारण तेच त्यांच्या मागे लागून त्यांना छेडत असतात. सरळमार्गी मुले ही कधी मुलींच्या पसंतीस पडत नसतात. मुलींना व्हिलनच आवडतात.   अलिकडे प्रेम वाढलं आहे. पण हे वाढलेले प्रेम हे स्वार्थासाठी असून ते प्रेम हे काही खरं प्रेम नाही. परंतू आपल्याला ते माहित नसल्यानं आपण त्याच प्रेमाच्या पाठीमागं धावत असतो. आपल्याला हे माहित नसतं की हे प्रेम कोणत्या थराला नेवून सोडेल.प्रेमाच्या परीभाषेत महाविद्यालय जीवनाचा विचार केल्यास एक तरुण एका आपल्याच महाविद्यालयातील करुणा प्रेम करतो. तिही त्या तरुणावर विश्वास ठेवून त्या तरुणाच्या जाळ्यात पडते आणि हे तिला जाळ्यात ओढून घेत असतांन...
Article

समाजभान जपणारी कविता : वेस

ठाण्याचे कवी सुधीर शेरे यांचा 'वेस' हा पहिलाच काव्यसंग्रह. काव्यसंग्रह पहिला जरी असला तरी त्यातील कविता अनुभवताना पहिलेपणाच्या खुणा कुठेच जाणवत नाहीत, हे विशेष! या काव्यसंग्रहात एकंदर ३९ कविता आहेत. या सर्वच कविता त्यांच्या जीवनाबद्दलच्या वैचारिक आणि भावनिक जाणिवांतून आकाराला आल्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या परिसरात कवीचा जन्म झाल्याने आणि नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाल्याने या दोन्ही ठिकाणचे जीवनानुभव त्यांच्या कवितेतून चित्रित होतात. शिक्षक म्हणून जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या संवेदनशील मनाला जे जाणवले त्या संवेदनांना काव्यमय रुप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अर्थात, त्यांचा हा प्रयत्न निश्चितच काव्यप्रांताची वेस ओलांडणारा आहे. यमक आणि मुक्तछंद या काव्यप्रकारात आविष्कृत झालेली, समतेचे गीत गाणारी ,मानुसकीचे मूल्य जपणारी, देशप्रेमाने ओथंबलेली आणि मराठी भाषेचा अभिम...
Article

राजकारणातील चाणक्य: मा. शरद पवार

आले किती गेले किती संपले नि परतले भरारा तुमच्या नामाचा शरदराव राजकारणात भारी दराराराजकारणातील धोरणी आणि चाणक्य मानले गेलेल्या मा. शरद पवार साहेबांचा जन्म १२ डिसेंबर १९४० सालचा. पुर्ण नसानसांत राजकारण ठासून भरलेला असा हा नेता आजही नेटाने राजकारणात पाय रोवून उभा आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची आदर्श व्यक्तिमत्व आहेत. सुरुवातीला ते नीरा कॅनाल सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी होते. नंतर बँकेचे व्यवस्थापक झाले .सुशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले शरदराव पवार १९५६ साली शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झाले आणि त्यांच्या राजकीय जीवनाला इथूनच सुरुवात झाली. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले गेले. चव्हाण यांच्या भाषणामुळे ते अ...
Article

मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या…!

कोरोना विषाणूमुळे मास्क घालणं आयुष्याच भाग बनून गेलं आहे. न्यू नॉर्मल असं म्हणत आपण मास्क स्वीकारलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आवश्यक असलं तरी याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. बराच वेळ मास्क घालणार्‍यांना त्वचेशी संबंधित आजार होतात. इतकंच नाही तर आता मास्कमुळे डोळ्यांशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. बराच काळ मास्क घातल्यानंतर डोळ्यांमध्ये होणारी जळजळ ही सर्वसामान्य बाब बनून गेली आहे. चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मास्क चुकीच्या पद्धतीने घातल्यास किंवा नाक उघडं राहिल्यास उच्छवासावाटे बाहेर पडणारी उष्ण हवा डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात. या हवेमुळे नैसर्गिक अर्शू वाळून डोळ्यांचा दाह होतो. मास्क बराच काळ घातल्यानंतर पापण्यांलगतचा जंतूसंसर्ग, बुब्बुळांचं होणारं नुकसान, मास्कवर राहिलेल्या साबणाच्या कणां...
Article

निळ्या पाखरांची अणुउर्जा : चैत्यभूमी

निळ्या क्रांतीपाखरांना नव्या जगाची आशा दिली. क्रांतिवीर आहोत आम्ही अशी नवी महाऊर्जा दिली. काळोखाच्या गर्भावर समतेचा क्रांतीसूर्य निर्माण झाला आणि हजारो वर्षाच्या कुनियतीवर ज्ञानवंताने  जगाला नवसंजीवनी दिली. ज्यांनी सर्व हयातभर स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांनी जीवन तयार केले आणि तसेच जगले म्हणून ते या जगाचे महामानव ठरले.  भारताच्या राजकीय ,सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे आपल्या ज्ञान विद्वत्तेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांनाहीही पुनीत करणारे .भारताचे तपोनिधी व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी  निद्राअवस्थेतच महापरिनिर्वाण गुरुवार ता. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता आढळून आले. ही दुःखद वार्ता कानी पडताच सारा भारत विव्हळला.हा दिवस भारतीय बहुजनाला अत्यंत मोठा शोक दिवस ठरला. सर्वांचे बाबा गेले...