Saturday, February 14

Article

Article

आठवणीतील होळी..!

*आला गं आला  सण होळीचा* *अहंम, स्वार्थ,भस्टाचार व महागाई* *ह्या सर्वांना घालून पेटवूया होळी* *देशात सुख समाधान येऊ द्या बाई.*वर्षामागून वर्षे सरली तरी बालपणच्या होळीची आठवण प्रत्येक वर्षाच्या होळीच्या वेळी हमखास होतेच. त्यावेळी मला वाटतं मी जवळपास सात आठ वर्षांची असेन. आमच्या गावी वाडे असत. आमचा 'मानस वाडा' होता. म्हणजे गोव्याला आमचं भलं मोठं घर व आजूबाजूला फडते, झलमी, गावडे इत्यादी लोकाची वस्ती असे. एका वाडीत चार पाच मोठी ब्राम्हणांची घरे व इतर लोकांची वस्ती. त्यामुळे मित्र मैत्रिणी सुध्दा ह्या लोकांतलीच होती. आम्ही मुल मुली एकत्रच खेळ खेळत होतो. आमच्यात थोडी मोठी मुले मुली ही होत्या. ती सांगायची त्या प्रमाणे आम्ही करत असू. होळी म्हणजे मोठी आग करणे व जोर जोरात ओरडणे एवढेच माहीत होते. गावी प्रत्येक घराच्या मागील बाजूला चूलीकरता लाकडं लागायची ती रचून ठेवत (तेव्हा गॅस नव्हता)  मा...
Article

‘होयी’ अन ‘धुयमाती’ खेळा..! पण जरा सांभाळूनच..!

होळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वसंत ऋतूमधील हा आनंद आणि उत्साहाचा तसेच निसर्गाची बदलनारी अवस्था सुचवणारा हा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण शिमगा या नावाने सुध्दा ओळखला जातो. होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना जाळून राख करावे या गोष्टीचे प्रतिक आहे. या सणाला पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते, तर दुसर्‍या दिवशी एकमेकांवर रंग उडवून धुलिवंदन केले जाते.   शहरात प्रत्येक मोहल्ल्यात तसेच खेड्यापाड्यात ह्या सणाच्या निमित्ताने मोठमोठ्या होळ्यांची चढाओढ दिसुन येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. पर्यायाने वृक्षतोड होते, बरेचदा हिरवी झाडे सुध्दा तोडली जातात. काही ठिकाणी जंगलाना आगिसुध्दा लावल्या जातात. त्यामुळे वनस्पती व वन्यजिवाचे नुकसान होते. हवा दुषित होते.   संत तुकारामांनी ४०० वर्षांपूर्वी वृक्षवल्ली आम्हा स...
Article

आमच्या प्रेरणास्थानातील अग्रस्थान – डॉ.श्रीकर परदेशी सर

* डॉ.श्रीकर परदेशी सरांसारखे पारदर्शक अधिकारी कुणी होणारच नाही..! डॉ. श्रीकर परदेशी सरांचा जन्म सांगली शहरात झाला. त्यांचे वडील सांगलीला नोकरीला असल्यामुळे त्यांचे बालपण सांगली शहरातच गेले. अभ्यासात लहानपणापासूनच ते अतिशय हुशार होते. त्यामुळे शिक्षणाकरीता ते पुणेला गेले व पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व एमडी पूर्ण केले. त्यादरम्यान यूपीएससीकडे वळले आणि पहिल्याच प्रयत्नात चांगली रॅंक घेत गृह केडर मिळवले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी ठिकाणी काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची छाप पडलेली आहे. आजही त्यांनी काम केलेल्या प्रत्येक जिल्ह्यात परदेशी साहेबांचं नाव घेतल्या जाते.   यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्य करतांना हजारो बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न त्यांनी पूर्...
Article

युद्ध : का ? कशासाठी ?

"आज जग भयान अंधारलेल्या गर्द डोहात आहे. जगात मूठभर धनिकांचे आर्थिक आणि राजकीय साम्राज्य आहे. मानवी जीवनाच्या सर्व यंत्रणा मुठभर वर्गाच्या ताब्यात आहेत. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात या वर्गाची दहशत आहे. सूचनांच्या कत्तलखान्यात आपण आजही जगत आहोत .दहशतवादाचे जागतिकीकरण झाले आहे. कित्येक राष्ट्र आजही गुलामीच्या उंबरठ्यावर आहेत. मानवी जीवनाचा केव्हा हिरोशिमा-नागासाकी होईल ते सांगता येत नाही. आपण युद्धाच्या रणांगणावर आजही उभे आहोत. आपण अणुबॉम्बच्या दहशतीत आजही मरण यातना भोगत आहोत. आपण पहिले महायुद्ध पाहिले. दुसरे महायुद्ध ही अनुभवले.आता तिसरे महायुद्ध आपल्यापुढे चक्रीवादळापेक्षाही भयंकर राहणार आहे आणि हे महायुद्ध खून, धमक्या, बलात्कार महामारी यांचे राहणार आहे. हे तिसरे महायुद्ध आजही धगधग पेटत आहे. हे महायुद्ध भाकर आणि धर्माच्या नावाने पुढे आणखी निखा-यासारखे ज्वालाग्रही होणार आहे ."- दीपककुमा...
Article

मला काही सांगायचयं..!

बाळांनो मला तुमच्याशी बोलायचे आहे. आता गप्प बसून चालणार नाही. माझं मन मला मोकळं करू द्या. मला आता सहन होत नाही. माझा प्राण कंठाशी आलाय. बोलल्या शिवाय गत्यांतर नाही. माझीच मुले माझी लक्तरे तोडतात. मला आता मूग गिळून बसता येत नाही. सध्याची पिढी माझी खूपच अवेहलना करते, ते खूपच क्लेशदायक आहे. माझी थोरवी आजच्या पिढीला माहीत नसेल पण तुम्हाला आईवडिलांना तर माहीत आहे ना? मग माझी अशी विटंबना का करता?   भारतीय परंपरा जपणारी, भारतीय संस्कृतीचे जाण असलेली माय मवाळ मी मराठी भाषा. जाणता ना माझा इतिहास? मग आजच्या पिढीला ही कळू द्या ना तो थोडासा! मी मराठी एक सुंदर भाषा आहे. मला काना, मात्रा, वेलांटी अशा विविध दागिन्यांनी मढवलेली आहे. मी घरंदाज भाषा आहे. पण बाळांनो, आजच्या तुमच्या मुलांना माझा थोडा इतिहास कथन करून तरी दाखवा.   हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळ्गोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली माझ...
Article

मराठी शब्दांचे महत्त्व…

आज दि.२७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या " मराठी भाषा गौरव दिना" निमित्त "मराठी शब्दांचे महत्त्व" हा कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. -संपादक     आज दि. २७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना" विनम्र अभिवादन " आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना "हार्दिक शुभेच्छा !" मराठी शब्दांचे महत्त्व अनेक संतांनी सांगितलेले आहे. शब्दांमध्ये जे सामर्थ्य आहे ते कशातच नाही असेही म्हटले जाते कारण शब्द जसे शास्त्रज्ञान सांगून जीवन आनंदित करू शकतात तसेच हेच शब्द शस्त्रांचेही कार्य करू शकतात. संत कबीर शब्दांचा परिणाम वर्णन करताना म्हणतात की,   शब्द शब्द सब को ये काहे । शब्द के हात न पाँव । एक शब्द औषध करे ॥ एक शब्द करे घाव ॥ संत शिरोमणी तुकाराम महाराज शब्दांची पूजा करायला सांगताना म्हणतात की,   आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांच...
Article

माय मराठी…

"माझा मराठीची बोलू कौतुकें। परी अम्रुतातेही पैजा जिंके। ऐसीं अक्षरे रसिकें मिळविन।" आज २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन. महाराष्ट्र व गोवा ही दोन्ही राज्ये आज ह्या मराठी भाषेचा दिवस साजरा करतात. २७ फेब्रुवारी हा अजरामर कविवर्य कुसुमाग्रज ह्यांचा जन्म दिवस. नाशिक मध्ये जन्मलेले विष्णू वामन शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकर) हे अग्रगण्य कवी, ज्ञानपीठ विजेते,(१९८७) महान नाटककार, कथाकार. असा महान पुरुष अनंत काल स्मरणात रहावा म्हणून त्यांचा जन्म दिवस हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून शासनाने जाहीर केला. कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता बरंच काही शिकवण देते.   "ओळखलंत का सर मला" "पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा" अशा अजरामर काव्य रचना केलेल्या थोर कविचे शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे ही सदिच्छा. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" सुरेश भटांची कविता. खरंच एकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, मी मराठी. आजचा ...
Article

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज

महिलांच्या वाढत्या अत्याचाराचे प्रमाण बघता महिलांच्या संरक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने विशेष महिला धोरण आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल विचार करताना देशातील महागाईचा विचार करण्यासह शालेय शिक्षणव्यवस्था त्यात होणारी मुलींची कुचंबना,ग्रामीण महिला, त्यांचे आरोग्य ,कामगार महिला,बांधकाम मजूर महिला,स्त्रियांचा होणारा मृत्यदर आणि त्यांच्या समस्यांवर वेळीच न मिळालेला तोडगा याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.    आजची सुशिक्षित स्त्री चूल व मूल या चाकोरीत न अडकता नोकरी आणि व्यवसायासाठी पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडत आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. तरीही महिलांवरील अत्याचारांविरुद्ध सक्षम कायदा बनत नाही. महिलांवरील अत्याचार बंद का होत नाहीत? आज घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षित नाही. नोकरदार म...
Article

कोशिश करने वालों की कभी हार नही होती..!

पन्नास मुलाखतीच्या अपयशानंतर यशाचं शिखर हस्तगत स्वप्न तर सगळेच बघतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार कमी लोकांमध्ये असते. स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी दररोज लाखो लोक मुलाखती देतात. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. तर काही जणांना खस्ता खाव्या लागतात. पण जर ध्येय निश्चित असेल आणि ते प्राप्त करण्याची जिद्द असेल तर काहीच कठिण नाही. ध्येय गाठताना तुम्ही कितीदा अडकलात? आणि तुमच्या पदरी अपयश आले, तरी त्याने काहीच फरक पडत नाही. पण हार न मानता सतत ध्येयाचा पाठपुरावा केला तर स्वप्न नक्कीच साकार होतात. मेहनत घेतल्यावर यश पदरी पडते. हे बिहारच्या पाटणा शहरातील एका 24 वर्षीय संप्रिती यादव या तरुणीच्या प्रवासावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ती म्हणाली, प्रत्येक प्रयत्न हा पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने करावा. तसेच मुलाखतीमध्ये अपयश येणे देखील महत्त्वाचे आहे. कारण अपयश हे व्यक्तीला अधिक मेहनत करण...
Article

शिवबा तुम्ही आजही हवे होते..!

आज महाराष्ट्रातील तमाम जनता व संपूर्ण देश शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा करत आहे.. उर आनंदाने भरून आलाय. तुमच्या बद्दल असलेला जिव्हाळा थोरांपासून लहान पोरांमध्ये ही आढळतो. खूप खूप बरे वाटते. पण शिवबा तुम्हाला जाऊन तीनशे वर्षाहुन अधिक काळ लोटला. त्याकाळची जनता (तुमची रयत) व आजची जनता ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राजे तुम्ही 'जाणते राजे' होता. स्वतः सर्व कायदे पाळत होता व त्याच प्रमाणे जनतेला ही तसे वागण्यास लावत होता.शिवबा आता फारच बदल झालाय. राजेशाही गेली व नेतागिरी आली. आज जनता नेत्याच्या आश्वासनाला बळी पडून नेता निवडतात. पण त्या नेत्याला तुमच्या नखाची सुध्दा सर नसते. सर्व स्वार्थापोटी मतदाराला भूल देतात व सामान्य जनता फसते. स्वतः नेताच काळे धंदे व भ्रष्टाचाराने माखलेला असतो. (अपवाद सोडून) तो जनतेचे हित न पाहता स्वतःचाच उत्कर्ष व अफाट पैसा कमावण्याच्या फंदात पडतो. तुमच्या काळासा...