Thursday, December 11

Article

Article

आदर्श प्रेरणादायी व्यक्तीमत्व श्री.श्रीराम चव्हाण साहेब..!

साधी राहणी उच्च विचारसरणी तथा शांत स्वभावी,नागपूरचे विभागीय सहसचिव. आदरणीय श्री.श्रीराम चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनी मला लिहण्याची संधी मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजतो,चव्हाण साहेब म्हणजे साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण. हे कोणीही सांगू शकेल यात काही शंकाच नाही.कितीतरी वर्षापासून दिनविशेष, प्रेरणादायी सुविचार सकाळच्या रम्य प्रहरी न चुकता साहेब वॉट्सॲप च्या माध्यमातून आम्हा सर्वापर्यंत पोहोचवतात त्या प्रेरणादायी सुविचार मुळे आम्हाला एकप्रकारची ऊर्जा मिळते आमचा दिवस आनंदात जातो.साहेबांच्या या नित्य उपक्रमामुळे चांगले विचार आत्मसात करण्याची सवय आम्हाला जडली आहे.. जो व्यक्ती साहेबाच्या सानिध्यात आलेला आहे.तो व्यक्ती साहेबांच्या विचार सरणी आत्मसात करून यशो शिखरावर पोहचलेला आहे..त्या पैकी मी एक. साहेबांनी माझ्या अंतरंगातील कलेला ओळखून सृजनात्मक कलेच्या विशाल सागरात मला रममाण करून दिल्यामुळे आज मी...
Article

आता दहावीनंतर पुढे काय?

* पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र निवडावे आता थोड्याच दिवसात दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करिअर निवडीची...कोणते करिअर निवडावे? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करिअरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते, तर चुकीच्या करिअर निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्त्वाची वर्ष वाया जातात.   करिअरची निवड हा विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठीही अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच काळजीचा विषय आहे. योग्य वयात योग्य करिअरची निवड केली, तर ती लौकिकार्थाने यशस्वी आयुष्याची पहिली पायरी ठरते. करिअरमुळे उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठता येते. प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान असते, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षितता आणि उज्जवल भविष्य या गोष्...
Article

गनीम : शत्रूच्या छावण्या उध्वस्त करणारी कविता…

उत्तम अंभोरे हे एक संवेदनशील कवी आहेत. त्यांच्या सुक्ष्मतासुक्ष्म सेंद्रिय विचार प्रगल्भतेतून काव्याचा सुजन झरा वाहतो आहे. हा झरा फक्त शीतलतेची चांदणे देत नाही. तर क्रांतीचे नवे विद्रोही गीत गात आहे. त्यांची कविता समकालीन वर्तमानाचे आक्रंदन मानणारी आहे . त्यांचा गनीम हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला. माझे मित्र दीपक कुमार खोब्रागडे यांनी हा ग्रंथ मला भेट दिलेला आहे. गनीम कवितासंग्रहातील भाषा ही अत्यंत साधी , सोपी, सरळ व आंतरिक मनाला छेद देणारी आहे. बनावटीचे सारे क्षेत्र उध्वस्त करून आपला खरा मित्र कोण व खरा शत्रू कोण याची ओळख करून देणारा हा कवितासंग्रह आहे.   गनिम म्हणजे मानवमुक्तीच्या लढायाला खोडा घालणाऱ्या प्रवृत्ती होत. असे मत अर्जुन डांगळे यांनी यांनी मांडले आहे. पण मला गनीम म्हणजे अदृश्यजंताचा विकृत चेहरा होय असे वाटते .तर आपल्या सोबत राहून आपलाच पाडाव करणारा हा गनीम म्हणजेच लोकशाही...
Article

सोशल मिडियावर व्यक्त होताना जरा जपूनच.!

सोशल मीडिया ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लोकांचा संदेश आपल्याला आणि आपल्याकडून त्यांना क्षणात पोचू शकतो.त्यामुळेच या दुधारी शस्त्राचा वापर करताना जरा जपूनच करा अशी म्हणायची वेळ पुन्हा एकदा आली आहे.   सध्याच्या काळात प्रत्येकजण स्मार्ट व हुशारीपणा दाखवण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. त्यात इकडे-तिकडचे मेसेज फॉरवर्ड करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. त्यात धार्मिक, राजकीय, जातिय, देशविरोधी विषयांवर तर सेकंदात हे वापरकर्ते व्यक्त होतात. मात्र या मीडियाचा वापर दक्षता बाळगुन न केल्यास, व कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर आणि फॉरवर्ड केल्यास चांगलेच अंगलट येऊन 'करिअर खराब...
Article

बेरोजगार युवकांच्या हरवलेल्या स्वप्नांचे द्वार खुलणार !

* ३४ विभागातील ९० हजार रिक्त पदांची मेगाभरती देशाचे उद्याचे भविष्य असणारे युवक नैराश्याच्या गर्ततेत ओढवले जात आहे. प्रत्येक युवकाचं एक स्वप्न असतं. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो. परंतु त्याच्या मेहनतीवर आपले उदासिन सरकार पाणी फेरतं. त्यामुळे तो बदललेल्या मानसिकतेमुळे नको ते कार्य करायला लागतो. याला जबाबदार सर्वस्वी आपली शासनप्रणालीच आहे. कारण मागील ६ वर्षापासून मोठ्या पदभरतीला पूर्णत: पूर्णविराम दिला आहे. यामुळे आपला प्रत्येक युवक बेरोजगारीच्या शृंखलेत जखडला आहे.    सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये २ लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी किंवा निवडणू...
Article

मसण्याउद आणि माणूस…

मसण्याऊद हा एक जंगली प्राणी आहे. तो रात्रीच्या वेळी स्मशानात जातो आणि गाडलेले मुर्दे उकरून काढून खातो, अशी दंतकथा आहे. पण देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहयोगी संस्थांच्या कारवाया पाहिल्या तर हा देश मसण्याउदांचा आहे की माणसांचा.. याबाबत संशय निर्माण व्हावा, एवढी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जिकडे तिकडे नुसती खोदाखोद सुरु आहे. हजारो वर्षांपूर्वीचे गाडलेले मूर्दे खोदून बाहेर काढणे, हाच महत्त्वपूर्ण अजेंडा सरकारच्या लिस्ट मधे दिसत आहे. सध्याच्या राजकारण्यांची त्यावरच भिस्त आहे.   आज आपण २१ व्या शतकात उभे आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती, उद्योग, उच्च दर्जाचे शिक्षण, शुद्ध पाणी, चांगले आरोग्य, नवे संशोधन, शेतीच्या नव्या तंत्राचा शोध, वेळीच आणि स्वस्त दरात शेतीला कर्ज मिळण्याची व्यवस्था, शेतीवरील भार कमी करण्याचे उपाय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपायोजना, त्यांचे ज...
Article

लग्नासाठीच्या अनोख्या प्रपोजलची अनोखी लव्ह स्टोरी..!

हायवेवर 'उत्कर्षा मॅरी मी- सौरभ' असं होर्डिंग लावून लग्नाची मागणी संपूर्ण विश्वाची शक्ती संचारलेल्या अडीच अक्षरी शब्दामुळे प्रत्येकाचं अंग शहारलं जातं. एक हुरुप व नवचैतन्य निर्माण होतं. ती चाहूल न जाणता प्रत्येकाच्या मनाला हवीहवीशी वाटते. ती वेगळी दुनिया आपलीशी वाटायला लागते. त्यामुळे प्रेम या अडीच अक्षरी शब्दाच्या जाळ्यात कळत नकळत का होईना प्रत्येकजण कधी ना कधी गुंतत जातो. या जाळ्यातून सुटका करायची म्हटलं तर तारेवरची कसरतच असते. असंच काहीसं कोल्हापूरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील उत्कर्षा यांच्या बाबतीत घडलं.  कोल्हापूर येथे सगळेच विषय एकदम हार्ड असतात. मग, त्या शर्यती असो वा मारामारी. मग कोल्हापूरकर प्रेमात कसं मागं राहतील? लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पाहिल्या आहेत. मात्र कोल्हापुरातल्या एका तरुणाने भल्या मोठ्या होर्डिंगद्वारे त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आ...
Article

झोळी आत्मकथन पर कादंबरीचे परीक्षण….. गणेश शेलार सरांच्या नजरेतून…

झोळी आत्मकथन.. मला स्वतः च्या मनाला चटका लावून गेले. साहित्य क्षेत्रात कार्यरत लेखक, साहित्यीक, कवी, समीक्षक, प्राध्यापक, वाचक ,विद्यार्थी यांची आकलन वेगवेगळे अर्थ काढून मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.सरांनी अत्यंत मार्मिक झोळी आत्मकथन पर कादंबरीला साजेशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. ती मला विशेष भावली आहे. ती आतून लिहलेली आहे त्यामुळे वास्तव दर्शन अधिक व्यापक अर्थाने विचार करून बघावा यासाठी मदत होते. सरांचे व्यापक आकलन वाचून दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना सरांनी लिहावी असे वाटते आहे.....झोळी आत्मकथन वाचकाला अंतर्मुख करणारे लेखन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना तळागाळातल्या समाजाला कितपत न्याय मिळाला असा प्रश्न उपस्थित होतो. पारंपारीक व्यवसायाप्रमाणे आपली उपजिविका भागविणारा नाथपंथी डवरी गोसावी समाज आजच्या काळात कुठल्या स्थितीत वावरतो आहे. याचं विदारक चित्र झोळी आत्मकथना...
Article

समाजातील विस्कटलेली नाती…

बदलती जीवनशैली, जगण्याचा अतिउच्च दर्जा, तसेच मनामध्ये असलेला एकमेकांविरुद्ध होणारा गैरसमज हा नुसता विचार बदलवत नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला माणसा पासून दूर नेण्याचा प्रत्यक्ष वां अप्रत्यक्ष रीत्या प्रयत्न करीत असतो. खर तर आज समाजात सगळी कडे विभक्त कुटुंब पद्धती दिसून येते आहे. या पद्धतीचा अवलंब होऊन नात्या मध्ये नुकताच खंड पडत नाही तर त्यामध्ये असलेल्या प्रेमाचा शेवट होतांना दिसतो आहे. मित्रांनो ही खरच खूप दुःखाची बाब आहे खर तर आपला भारत देश हा संस्कृतीने सजलेला आणि एकता निर्माण करणारा देश आहे परंतु आता मात्र या नात्याला नावच खोट वेष्टन लावलेलं दिसतंय.  आज दोन दिवसाचा लग्न करून आलेला मुलगा आपल्या बायको साठी स्वतःच्या जन्मदात्या आई बाबाला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो, धन संपत्ती साठी भावा भावाचे रक्ताचे नाते तुटताना दिसत आहे, तेवढंच नाही तर इस्टेट मिळवण्यासाठी एकमेका...
Article

जलनायक सुधाकरराव नाईक साहेब

आज 10 मे 2022 'जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब' यांचा स्मृतीदिन.बघता बघता सुधाकरभाऊनां जावुन 22 वर्ष झाले. सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या दु:खद निधनानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. बंजारा समाजाला नेता आहे. परंतु समाजात नेता असणे हयात फरक आहे. मा.मनोहरभाऊ नाईक, मा.हरिभाऊ राठोड, मा.संजयभाऊ राठोड, मा.अँड.निलयभाऊ नाईक, मा.प्रदीप नाईक, मा.इंद्रनील नाईक, मा.राजेश राठोड, मा. डॉ. तुषार राठोड, आजही नेतेमंडळी आहेत. परंतु सुधाकरभाऊ सारखी दुरदुष्टी जोपासणारी व्यक्ती मिळणे दुरापास्त आहे.. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते. राजकारणात सरंपच,सभापती, जिल्हा परीषद अध्यक्ष, ते मुख्य मंत्री,राज्यपाल व्हावे लागल्याने सुधाकरभाऊंच्या परिपक्वपणा,संस्कारातुन, अनुभवातून, आणि 'महानायक वसंतराव नाईकसाहेब' यांच...