Tuesday, October 28

Article

Article

महाराष्ट्रातल्या ‘हुनर’बाज महिला उद्योजक

निर्जीव वस्तूंमध्ये जिवंतपणा आणण्याची किमया जर कोणी करू शकत असेल तर तो म्हणजे एक कलाकार!आपल्या कलेच्या परिसस्पर्शाने हा कलाकार कधी एका निर्जीव कागदावर रेखाटलेल्या चित्रालाही बोलतं करतो.. तर कधी मातीतून घडवलेल्या शिल्पालाही आपलंसं करतो..तर कधी एका साध्या दगडातही जीव आणतो...अशाच एकापेक्षा एक सरस किमया, लीलया साकारल्या आहेत आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कलाकारांनी! आणि या कलाकारांची ही कला पाहण्याची संधी जिथे मिळाली, जिथे या कलाकारांचं हुनर बघता आलं, ते ठिकाण म्हणजे 'हुनर हाट'!  आपल्या देशातल्या या अस्सल कलाकारांची ही हुनर जगासमोर यावी, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेले हे एक उत्तम व्यासपीठ!केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने मुंबईत यंदाचं 40 वं हुनर हाट प्रदर्शन आयोजित करण्यात ...
Article

भारतीय कामगार चळवळ…

भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले.यांचे एक हुशार, निष्ठावान, तरुण तडफदार, कर्तृत्ववान सहकारी, दीनबंधू पत्र यशस्वी, समर्थपणे चालवणारे, संपादक, झुंजार पत्रकार, स्वतःच्या जीवनातील सुखाची पर्वा न करता, कामगारांसाठी झिजणारे, कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे.१९ व्या शतकात प्रथम सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे. मुंब‌ईतील मांडवी भागात नारायण लोखंडे हे एका कापड गिरणी मध्ये भांडारपाल म्हणून काम करत होते. तिथे त्यांना १३ - १४ तास काम करावं लागत होतं. काम करत तेथील दहशतीला कंटाळून त्यांनी कापड गिरणीतील नोकरी सोडून दिली.आणि स्वतःस कामगार चळवळीत वाहुन घेतले. २३ सप्टेंबर १८८४ रोजी ' बाॅबे मिल हॅंडस् असोशिएशन् ' ही‌ गिरणी कामगार संघटना स्थापन केली. आणि येथुनच खऱ्या अर्थाने भारतीय कामगार चळवळीस सुरुवात झाली.कोणतीही चळवळ ही एका अर...
सौरऊर्जा काळाची गरज…!
Article

सौरऊर्जा काळाची गरज…!

सौरऊर्जा म्हणजे सुर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सुर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीने वाढली आहे.ऊर्जा निर्मिती चे पारंपरिक स्रोत आता संपण्याच्या मार्गावर आहेत…सरपण, शेणाच्या गोवर्‍या, पेंढा हे पारंपारिक इंधन वर्षानुवर्षे वापरले जात आहे. याशिवाय कोळसा, खनिज तेल, जल ऊर्जा, अणुऊर्जा इत्यादींचा पारंपारिक ऊर्जा संसाधनांत समावेश होतो. सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात...
Article

लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती

वाचाल तर वाचाल, हे माझे बाबा सांगायचे. माझे आई बाबा वाचनाचे मोठे भोक्ते होते व त्याचमुळे लहानपणापासून आम्हाला ही वाचनाची गोडी लागली. अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीची पुस्तके घालून वाचत होतो व त्या करता ओरडा ही खाल्ला होता. चांदोबा, गोड गोड गोष्टी, परी कथा, श्यामचीआई, दिवाळी अंक, कांदबऱ्या इत्यादी गुपचूप शाळेत असताना वाचत होतो. इंग्रजी शाळेत होतो, घरी कोंकणी बोलत होतो. मराठी थोडी मोडकी तोडकी येत होती. पण एक मात्र नक्की की मराठी भाषे बद्द्ल आपुलकी वाटत होती. मातृभाषा म्हणून मराठी लावत होतो ना, त्यामुळे असेल.  लहानपणी मैत्रिणींकडे पुस्तकांची देवाण घेवाण करत होतो, आताही करतो. माझी आवड माझ्या दोन्ही मुलींनी ही घेतली. एखाद्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'चि. .......यांस, वाढदिवसा निमित्त सप्रेम भेट व पुढे लिहिलेली तारीख हे वाचायला किती छान वाटत  होतं. खूप वर्षांनी ते पुस्तक हाती आलं की, ते दिलेली ...
Article

स्वत:च्या डोक्याचा वापर करा…!

शेती करणारा शेतकरी आज अडचणीत असला, तरी।शेतीसाठीचे पुरवठादार आणि सल्लागार लखोपती, करोडपती आहेत. खत, बी-बियाणे, कीटकनाशके पुरवणारे कृषि सेवा केंद्रवाले असोत की, शेतीत उत्पादन कसं वाढवायचं, कोणती पिकं घ्यायची, याचं मार्गदर्शन करणारे सल्लागार असोत, त्यांचंही छान चाललयं. यांनाही शेतीतील जोखमीचा फटका बसत नाही. फटका बसतो तो फक्त शेतकऱ्यांना. हा जमाना प्रसिद्धीचा, खऱ्या खोट्या प्रचाराचा, मार्केटिंगचा आहे. त्यात भलं-बुरं दोन्ही खपवलं जातं. हे मार्केटिंग शेतकऱ्यांना चक्रावून सोडणारं असतं.   कोणी म्हणतं, आंबा लावा, डाळिंब लावा; कोणी द्राक्ष, कोणी शेवगा लावा म्हणतं; तर कोणी बांबू लावा, चंदन लावा म्हणतं. कोणी भाजीपाला लावायला सांगतं, तर कोणी फुलशेती करा म्हणतं. एक नाही, शेकडो सल्ले. डोळे फिरवणाऱ्या अनेक यशकथा. कोणी कोथिंबीर विकून कसा लखोपती झाला हे सांगतं, तर एक एकर आंब्यात २५ लाखाचं उत्पन्न झाल्याचं...
Article

आई-वडिलांची नि:स्वार्थ वारसदार म्हणजे कन्या…!

*उपकार विसरलेला पुत्र फक्त दावेदार एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला होता. तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणा-यांपैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला. मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुपये देणे आहे. त्यामुळे जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत मिळणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करू देणार नाही असा पवित्रा त्याने घेतलेला...जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले.   तेवढ्यात मृत व्यक्तीची मुले बोलू लागली की, आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबतीत सांगितले नाही. त्यामुळे आम्ही हे कर्ज देणार नाही. तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की, मुले जबाबदारी घेत नाही तर आम्ही पण देऊ शकत नाही. आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत पोहोचली होती.   ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच...
Article

थोर समाजसुधारक – महात्मा ज्योतिबा फुले

भारतमाता ही शुरविर नररत्नाची खाण आहे. महाराष्ट्राला महापुरुषांची उणीव कधीच भासली नाही. एकोणिसाव्या शतकातील भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते, संशोधक, विचारवंत, लेखक, प्रख्यात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले.सामाजिक , शैक्षणिक सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झिजणारे, माणसाच्या मनामध्ये समतेच्या क्रांतीची विचारधारा प्रेरित करणारे मानवमुक्तीसाठी समतेची चळवळ उभारणारे समतेचे खंदे पुरस्कर्ते सत्यशोधक ज्योतिबा फुले.   भारतातील अनिष्ट रूढी, परंपरा ब्राम्हणांच्या वर्चस्वाविरुध्द् बंड करुन शेतकरी, कष्टकरी, दीन दुबळ्या समाजासाठी चळवळ उभारुन तिचे खंमकं नेतृत्व केले. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतील स्त्री शिक्षणाचे पहिले प्रणेते होते हे विसरता कामा नये.त्यांनी आयुष्यभर स्त्रीयांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलें यांनी केला आहे.व...
Article

समतेचे खंदे पुरस्कर्ते – प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते समतेचे खंदे पुरस्कर्ते, तुम्हां आम्हाला सर्व भारतवासीयांना देशभक्ती अन् राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांची आज १३१ वी जयंती जगभरात साजरी होत आहे.आभाळ होतं फाटलेलं..! दु:खाच्या अश्रुंनी दाटलेलं..!! उजेडास नव्हता कधी थारा..! अंधार झाला होता मानवात सारा..!!कवीच्या कवितेतील काव्यपंक्ती प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माआधी साऱ्या समाजाची अशी अवस्था झाली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाल्यावर ...!'उध्दरली कोटी कोटी कुळे,भीमा जन्मामुळे..!खरंच एका कवीच्या या कवितेच्या ओळीमध्ये किती अर्थ दडलेला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला बाहेर काढुन त्यांना स्वाभिमानाचं जीवन दिलं आहे. हजारो वर्षांपासून मृताचं जीव...
Article

डॉ. बाबासाहेब यांची निर्भीड पत्रकारिता

समाज जागृती व समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र .लोकांवर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे व जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांमुळे ज्ञान, माहिती, रंजन व प्रबोधन होते. ते लोकशाहीचा चौथा खांब आहे.कोणत्याही चळवळीमध्ये वर्तमानपत्रे खूप महत्त्वाची भूमिका फार पाडीत असतात.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या निश्चित भुमिकेतूनच पत्रकारितेकडे वळले होते. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ”पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्...
Article

प्रत्येक नागरिकांपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोहचवून, डॉ. आंबेडकर जयंती साजरी करूया…

नुकताच नागराज पोपटराव मंजुळे यांचा झुंड प्रकाशित झाला आणि परत एकदा जयभीमचा नारा दुमदुमला व डॉ भारतरत्न डॉ. बाबासाहेब सर्व नागरिकांन पर्यंत पोहचले.आपण किती कोत्या मनाचे आहोत की, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जयभीमवाल्यांचेच. जयभीमवाल्यांनीच डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करायची काय तर डॉ आंबेडकरांचे कार्य हे फक्त जयभीम वाल्यांसाठीच होते.अश्या बऱ्याच गैरसमजुतीतून आपण जात असतो. परंतु वास्तविक बघता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच होते व त्यांनी सर्वांसाठीच कार्य केले आहे व ते सर्वांचेच आहेत. त्यांना आपणाला ओळखता आले नाही किंवा त्यांना सर्वांपर्यंत पोहचवू देण्यात आले नाही. त्यांच्या कार्याची महती ही विश्वंभरात आहे. एव्हढेच नाही तर हा देश डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचा आहे असे सुद्धा म्हटले जाते.   ज्या महामानवाची महती व कार्य विश्वातओळखल्या जाते परंतु आपल्या देशात मात्र ह्या महामानवाला जसे ओळखल्या जायल...