हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा ? : अग्निज्वालांचे आक्रंदन..!
डॉ. प्रकाश राठोड यांचा 'हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा?' हा मुलाखतींचा आणि वैचारिक लेखांचा संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. हा ग्रंथ निखळ परिवर्तनवादी आशयाचा व विचारअन्वयनयुक्त ग्रंथ आहे. हा ग्रंथ गोर बंजारा समाजाच्या मर्मबंधातील फसव्या विचारांची समीक्षा करणारा आहे. गोर बंजारा समाज हा उजेडलाटांचा महासूर्य कवेत न घेता, शोषणकारी राजतंत्राच्या व्यवस्थेचे गुलाम होत आहे आणि ही गुलाम होण्याची प्रक्रिया निरंतर चालू आहे. या गुलाम होण्याच्या प्रक्रियेला लगाम लावण्याचे आणि या समाजाला स्वतंत्र आणि स्वयंदीप करण्याचे काम डॉ. प्रकाश राठोड करीत आहेत. अग्निज्वाला
त्यांच्या संशोधनपर वैचारिक लेखनाने आणि चिंतनशील स्वरूपाच्या मुलाखतीने गोर बंजारा समाजाला नव्या सत्वशील मूल्यजाणिवांचा परिचय करून देऊन तमाम अभावग्रस्तांच्या मनाच्या क्षितिजातून हरितक्रांतीचा सूर्योदय त्यांनी घडवून आणलेला आहे. या ग्रंथातील ध्येय...