Thursday, November 13

Article

Article

अतिसामान्य कुटुंबातील प्रा. रमेश वरघट सर यांचे बहुरंगी कार्य

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात डोंगराळ भागातील करजगाव अत्यंत गरीब कुटुंबात प्रा. रमेश वरघट सरांचा जन्म झाला. आई बाबा दोघेही निरक्षर होते. पण आपला मुलगा शिकावा, चांगला मोठा व्हावा. असं राधा-कृष्ण या जोडप्याला मनातून वाटे. म्हणून राबराब राबून त्यांनी मुलाला शाळेत घातलं. त्यांचं सातवीपर्यंतचे शिक्षण अत्यंत हलाखीत गावातच झालं. हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल दारव्हा येथे पूर्ण केले. त्यावेळी ते कोरे वसतिगृहात राहायचे. नववी पास झाल्यानंतर काही काळ त्यांच्या शिक्षणात खंड सुद्धा पडला होता. पण श्री एन. के. निमकर सर तसेच त्यांचा बालमित्र विष्णू तवकार यांच्यामुळे पुन्हा त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि ते मॅट्रिक द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झालं .महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अनेकदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. घरची गरिबी व अत्यल्...
Article

प्रेमविवाहानंतर विभक्त होण्याच्या आकडेवारीत वाढ..!

 * एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती म्हणजे सुखी संसाराचे रहस्य  पती-पत्नीमध्ये प्रेम आणि आदर असेल तरंच कुटुंबात आनंद नांदतो. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम आणि आदर अत्यंत महत्त्वाचा असतो. पण कुटुंब सुखी, सुसंस्कृत आणि समृद्ध करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. घरातील स्त्रीमध्ये काही विशेष गोष्टी असतील तर घर स्वर्गासारखे बनते, म्हणून पत्नीला लक्ष्मीचे रूप म्हटले जाते. चाणक्य नीतीमध्ये स्त्रीची अशी काही वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे पतीचं आयुष्य फुलून जातं. पण यामध्ये पतीची देखील साथ अत्यंत गरजेची असते. स्त्री सुशिक्षित, सुसंस्कृत असेल तर संपूर्ण कुटुंब चांगल्या वातावरणात तयार होतं. अशा कुटुंबातील नवीन पिढी सुसंस्कृत आणि चांगली होते. सुसंस्कृत स्त्रीच आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकते. स्त्री जर धार्मिक असेल, तर अत्यंत उत्तम.    प्रत्येक व्यक्तीने रागावणे आणि भांडणे टाळले पाह...
Article

रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना

  राज्यातील शेतीला पूरक उद्योगाची जोड देणे अतिशय आवश्‍यक आहे. शेतीच्या उत्पादनावर आधारित आणि हमखास उत्पन्न देणारा शेळीपालन पूरक उद्योग रुजला आहे .या उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी समूह योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेबाबत..   राज्यामध्ये अंदाजे बहूसंख्य कुटुंबांना शेळी पालनामधून अर्थार्जन होत आहे. हा व्यवसाय प्रामुख्याने अवर्षणप्रवण, दुष्काळी आणि निमदुष्काळी भागामध्ये केला जातो. कोरडे हवामान शेळ्यांना पोषक असते. अन्य कोणतेही पशुधन पाळण्यास मर्यादा येतात, तेथे शेळी पालन उत्तम पर्याय आहे. अत्यंत कमी चाऱ्यावर, कठीण परिस्थितीतसुद्धा शेळ्या तग धरु शकतात. त्यांची वातावरणातील बदलाशी त्वरीत जुळवून घेण्याची क्षमता असते. अत्यंत कमी भांडवलातही व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, बे...
Article

तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या..!

  अन्नातून शरीरात जाणार्या0 प्रथिनांचे विघटन करणे हे बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झाल्यास बॅक्टेरियांच्या कामात अडथळे येतात. ते योग्य पद्धतीने प्रथिनांचे विघटन करू शकत नाहीत. यामुळे तोंडाला एक प्रकारचा वास येऊ लागतो. तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या असते. त्यावर उपाय म्हणून आपण एखादी मिंटची गोळी चघळतो किंवा दात घासतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी तात्पुरती कमी होते. पण, तोंडाच्या दुर्गंधीचा संबंध एखाद्या आरोग्यविषयक समस्येशीही असू शकतो. त्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीकडे एक साधीशी समस्या म्हणून दुर्लक्ष करता कामा नये.     तोंडाच्या दुर्गंधीचे कारण काही प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे तोंडाला दुर्गंधी येते. हे बॅक्टेरिया जीभ, घसा आणि टॉन्सिल्सच्या मागच्या भागात असतात. अन्नातून शरीरात जाणार्याब प्रथिनांचे विघटन करणे हे या बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झ...
Article

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ शाहू महाराज

  शैक्षणिक, सांस्कृतिक, अर्थिक सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जुन हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक झाला. व छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. दिनदुबळ्या समाजाचे लोकराजा झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले.     सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे त्यांना मार्गदर्शक मिळाले. त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अधिक भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. व समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यांनी शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले.वि...
Article

डॉक्टरकीच्या स्वप्नातील विद्यार्थ्यांचे पाऊल आयुर्वेद व होमिओपॅथीकडे…

  * आता आयुर्वेदालाच प्रचंड मागणी राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ पडली आहे. एमबीबीएस नंतर आयुर्वेदालाच विद्यार्थ्यांची पसंती, तर होमिओपॅथीकडेही कल वाढत चालला आहे. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती. मात्र, आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. बारावीनंतर निट युजी परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी निट ची तयारी करत असतात. मात्र सर्वांनाच एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.   गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेद क्षेत्रामध्ये येणा-या कंपन्या आणि या क्षेत्राला...
Article

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

  बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ...
Article

कुत्रा पाळायचाय…नियमही पाळा..!

कुत्रा हा इमान राखणारा प्राणी. ग्रामीण भागात कुत्र्याला शेतक-याचा मित्र मानले जाते. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात भटके कुत्रे नाहीत, असा भाग नाही. नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये भटक्या कुत्र्याने पाच वर्षीय बालकावर हल्ला केल्याचे प्रकरण घडल्यानंतर भटक्या कुत्र्यांची दहशत समोर आली.सकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला. त्याच्यावर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. कुत्र्यांच्या कळपाने पाच वर्षीय चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा रोज सकाळी मोठ्या बहिणीसोबत फिरायला जायचा. सकाळी तो घरातून बाहेर पडला. रस्त्याने जात असतानाच मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरले. कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केल्यानंतर बहीण जोरजोरात आरडाओरडा करत राहिली. लोक येतान...
Article

खापरखेडातील जादुई एटीएम मशीन ; खुल जा सिम सिमचा प्रकार

  एटीएम ला ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात अँटोमँटिक ट्रेनी मशीन असं म्हटल्या जाते. त्याला अशा प्रकारे ट्रेन केल्या जाते म्हणजे त्याची सिस्टम बनवल्या जाते की, तुम्हाला जेवढे पैसे काढायचे असते, तेवढ्याचा आकडा टाकल्यानंतर तो तुम्हाला तेवढेच पैसे देत असतो. पण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपूरातून समोर आला आहे. तिथे एटीएम मधून ५०० रुपये काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुप्पट, तिप्पट नाही तर चक्क पाचपट पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. एटीएम मधून ५०० रुपये विड्रॉल केल्यावर २५०० रुपये निघत असल्याचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.   काय आहे नेमकं प्रकरण? नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील एका एटीएम मधून ५०० रुपये विड्राल टाकल्यावर एटीएम मशीन मधून चक्क २ हजार ५०० रुपये ...
Article

अस्तित्व गमावलेली माणसे : नवी उमेदाची ऊर्जा देणारी कविता

  महेंद्र गायकवाड हे दोन दशकापासून आंबेडकरी कवितेच्या प्रांतात नित्यनेमाने कविता लिहित आहेत. त्यांची राहणी साधी असली तरी कवितेचे शब्द क्रांतीध्वज उंचावणारी आहेत. नुकताच त्यांचा अस्तित्व गमावलेली माणसे हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...! आंबेडकरी कविता ही क्रांतीच्या ठिणग्या निर्माण करणारी आहे. ही कविता शोषणाच्या सार्‍या मुळांना उघडून फेकते.आंबेडकरी कवी आपल्या मर्म चिंतनातून समाजाचा वेध घेत असतो. कविता ही समाजाला नवे वास्तव सांगत असते. आपले हित व अहीत यांची चर्चा करते. आंबेडकरी कवितेत काही कवी सोडले तर बाकीचे कवी हे आपले निरंतरतत्व सोडून बसले आहेत .पण काही कवी अजूनही सूर्यदीपत्वाची नवी ऊर्जा पेरत आहेत. त्यात महेंद्र गायकवाड हे सातत्याने समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या दारिद्र्याला ते गोंजारत नाही. आपली समस्याने ते मोडत नाही. तर ते समूह मनाची व्य...