Thursday, November 13

Article

Article

‘इन्स्टंट लोन’ ॲपचा मायाजाल..!

  आजकाल, सोशल मीडिया आणि सर्व ऑनलाइन माध्यमांवर झटपट कर्जाच्या जाहिराती खूप दिसतात. झटपट कर्जे ही वैयक्तिक कर्जे असतात आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. कर्ज मंजूर झाल्यानंतर दोन तासांत तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. त्वरित कर्जांतर्गत 5 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही कागदपत्रांशिवाय उपलब्ध आहे.मात्र इन्स्टंट लोनचे अमिष दाखवून लुबाडण्याचा गोरखधंदा गुन्हेगारांनी चालविला आहे.     अॅप्सद्वारे लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय झटपट कर्ज दिले जात आहे. त्याच वेळी, कर्ज घेतल्यानंतर, रिकव्हरी कॉल्स येऊ लागतात, ज्यामध्ये वापरकर्त्याला कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम परत करण्यास सांगितले जाते. असे करण्यास नकार दिल्यावर, सायबर गुन्हेगार वापरकर्त्याचा स्मार्टफोन संपर्क आणि फोटो चुकीच्या पद्धतीने वापरून त्रास देतात. अशा कर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याज असते आणि जे कर...
Article

कन्यादान…

  " पहिली बेटी घी की रोटी अन् पहिला बेटा भिकार चोट्या" असं म्हणतात तर ज्या मुलीला आपण तुपाची भाकर म्हणतो तिला तेवढ्या प्रेमाने, आपुलकीने वाढवतो त्याच मुलीला मोठं झाल्यावर तिचं कन्यादान करायचं? कन्यादान म्हणजे ज्या मुलीला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलो. तिला काही झालं तर डोळ्याला डोळा लागत नसे मग ती मोठं झाल्यानंतर तिला कोणाला तरी दान करायचं?     हा निसर्गाचा जगावेगळा खेळ आहे. स्वतःपेक्षा जास्ती जीव लावतो, आनंदाने प्रेमाने वाढवतो आपल्या काळजाचा तुकडा तिला करतो मग तिलाच का जावं लागतं सासरी? मुलापेक्षा मुलीला आईवडिलांची जास्ती काळजी असते. घरी पाहुणे आले अन् मुलाला म्हंटलं जा! दुध घेऊन ये तेव्हा मुलगा गलासात पैसे टाकून पाहुण्यांसमोर वाजवत जातो. अन् त्याच जागी मुलगी असेल तर ती आपल्या आईवडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून ओढणीत झाकून ग्लास घेऊन जाते.     अहो! इज्जत धुळीवर आणणारा मुलगा श्रेष्ठ की, आपल...
Article

उत्तर महाराष्ट्राला खानदेश का म्हणतात ?

महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्हे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा तालुके आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हानपुर ह्या प्रदेशास खानदेश म्हणतात. हा सर्व प्रदेश ब्रिटिश काळात बाॅम्बे प्रेसिडेन्सी या राज्यातील एक जिल्हा होता.    नंतर ब्रिटिश सरकारने १९०६ मध्ये प्रशासनिक सोईसाठी या जिल्ह्याचे विभाजन करून पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे बनवले. उर्वरित भागाचा नाशिक जिल्ह्यात समावेश आहे. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी होऊ लागली. यामुळे १९६० मध्ये बाॅम्बे प्रेसिडेन्सीचे महाराष्ट्र व गुजरात राज्यात विभाजन झाले. बुऱ्हानपुर वगळता उर्वरित खानदेशचा सर्व भाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला. बुऱ्हानपुरला मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्रात सरकारने १९६०-६५ मध्ये खानदेश नाव असलेल्या जिल्ह्यांचे नामकरण केले. या न...
Article

अतिसार व्यवस्थापन आणि उपचार

  उन्हाळ्याच्या असह्य काहिलीनंतर पावसाचा गारवा आणि ताजी हवा उत्साही वातावरण निर्माण करते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात बरेचदा सूर्याचे दर्शन होत नाही. आणि सततच्या ढगाळी वातावरणामुळे बुरशीजन्य तसेच संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होते. पावसाळ्यातील आर्द्रतेमध्ये विविध प्रकारचे विषाणू वाढीस लागतात. या काळात रोगप्रतिकारक शक्तीही मंदावते. यामुळे अशा वातावरणात आरोग्यविषयक दक्षता पाळणे आवश्यक आहे.   पावसाळ्यात नदीला ओढे, नाल्यांमार्फत नवीन पाणी येते. हे पाणी पठारावरुन तसेच विविध भागातून वाहून आल्यामुळे त्यात विविध प्रकारचा कचरा, घाण यांचा समावेश असतो. असे दुषित पाणी पिण्यात आल्यास अतिसाराची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. अतिसारात जुलाब होऊन पोटात तीव्र वेदना होतात. अस्वस्थता वाढते. तसेच पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात पिण्यात येते. यामुळे डी-हायड्रेशन होऊन शरीरात निस्तेजता येऊन प्रतिकार शक्तीही कमी होते. य...
Article

आठवणीतली आषाढी वारी…

  मला आठवते आजपासून बरोबर वीस वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष 2002 साली मी 'परिवर्तनाचा साथी' हे त्रैमासिक चालवीत असताना पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी 'जगद्गुरू तुकोबाराय विशेषांक' प्रकाशित केला होता. या अंकासाठी अतिथी संपादक म्हणून पंढरपूरचे अमरजित पाटील होते. अमरजीत हे पंढरपुरचे माजी आमदार दिवंगत औदुंबर पाटील यांचे नातू. मासाहेब जिजाऊंची बदनामी करणाऱ्या भांडारकर संस्थेवर सौम्य कारवाई करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या ७२ छाव्यांमध्ये ते होते.   अमरजीत म्हणजे फर्डा वक्ता. डेडिकेटेड कार्यकर्ता. 'परिवर्तनाचा साथी' साठी पंढरपूर तालुक्यातील 'असे झाले गादेगाव भटमुक्त' अशी स्टोरी त्यांनी आणि मी प्रत्यक्ष गादेगावला भेट देऊन तयार केली होती. ती खूप गाजली होती. त्यामूळेच त्यांची आणि माझी जवळीक होती. अमरजीत यांनीच माझी ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी यांच्याशी भेट घडवून आणली होती. एकदा तर मी आणि जैमिनी कडूसर कै...
Article

सेक्सटिंग हे ऑनलाईन जगताचं भीषण वास्तव..!

  * काहीतरी थ्रिल म्हणून सुरु झालेल्या खेळाचं विकृत रुप तुम्ही कधी ऐकलं आहे का सेक्सटिंग बद्दल..? सेक्सटिंग किंवा असं म्हणूया की, सेक्स टेक्सटिंग ज्याचा अर्थ आहे की, सेक्स किंवा तशा आशयाचे मेसेजेस आपल्या मोबाईलवरून दुस-या व्यक्तीला पाठवणे. आजकालच्या डिजीटल युगात सगळं शक्य आहे. अगदी आपल्या पार्टनरसोबत डिजीटल उपकरणांच्या मदतीने सेक्शुअल गप्पा मारणेही... सेक्सटिंगला खरंतर व्हर्च्युअल सेक्सक्रीडा असं म्हणण्यास हरकत नाही. अगदी कामातून वेळ काढूनही लोक सेक्सटिंग करायला विसरत नाहीत. आजकालच्या युवापिढीत सेक्सटिंगच चलन वाढत आहे.   मोबाईल फोन, कॉम्प्युटर, टॅबलेट किंवा अन्य कोणत्याही डिजीटल डिव्हाईसने आपल्या पार्टनरशी केलेला सेक्स मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओ पाठवणे किंवा मिळवण्याला सेक्सटिंग असं म्हणतात. जसं याच्या नावावरून स्पष्ट होतं की, सेक्सटिंग हा दोन शब्द म्हणजे सेक्स आणि टेक्स्ट मिळून तयार झालेला...
Article

शाळेतली मज्जा…

  शाळेत जाण्याची मजा काही वेगळीच होती. त्यातून वर्गात एन्ट्री करण्याची पद्धत तर खूप भारी. जीवाला जीव लावणार्या मैत्रिणी भेटल्या. आधी शाळा नको वाटायची पण नाही माहित कशी गोडी लागली. आता आठवतेय ती सर्व मज्जा मस्ती आणि छोट्याशा कारणासाठी केलेलं भांडण. सारखं रागवायचे आणि आपला हक्क गाजवायचे वर्ग प्रतिनिधी म्हणून सगळ्यांना समजून ही घ्यायचे शेवटी सर्वांची लाडकी जी होते. पण तेव्हा हे कळत नव्हतं की ही मज्जा मस्ती पुन्हा नाही अनुभवता येईल अशा मैत्रिणी जीवनात पुन्हा नाही भेटणार.   जेवताना घासातला घास काडून दिलो तर नविन वर्ष, दिवाळी या क्षणी एकमेकींना घास भरविलो. लहान होतो त्यामुळं कळत नव्हतं या मैत्रीची किंमत पण आता मोठे झालो आणि कळलं की मैत्री हा मौल्यवान मोती आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो पण तो किती जपून ठेवायचा हे आपल्या हातात असतं भांडण तर खूप केलो. रडलो, हसलो, खेळलो पुन्हा एकत्र आलो आणि ...
Article

आषाढी/कार्तिकी वारी ऐक्याचे प्रतीक

  पाऊले चालती पंढरीची वाट| सुखी संसाराची तोडुनिया गाठ| पाऊले चालती पंढरीची वाट|| असं म्हणत वारकरी आषाढी एकादशीच्या वारीला निघतात. विठ्ठल रुक्माई ,विठोबा रुक्माईचा गजर आसमंतात दुमदुमतो. लाखोंच्या संख्येने येणारा वारकरी मेळा देशाच्या अनेकविध प्रांतातून एकत्र येत असतो. ना कुठले आमंत्रण, ना रुसवा फुगवा, ना मोठेपणाचा डौल, ना जातीपातीचा भेदभाव, ना गरिबीची लाज, ना लहान थोरांचा मानपान, ना जेवणाचा शाही थाट. तरीही पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेले प्रत्येक पाऊल श्रद्धेने, भक्तीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले असते. मजल दर मजल करत एकमेकांना सोबत घेऊन भजनात तल्लीन होऊन हा मेळा वाऱ्याच्या वेगाने पंढरपूरकडे झेपावतो. वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांना आपल्या पदस्पर्शाने पुनीत करित वारकरी संप्रदाय संतांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो.     माझ्या गावातून जाणारी नामदेवांची पालखी, मुक्ताईची पालखी...
Article

सकाळी दूध पिणे मधुमेहींसाठी उपकारक

  न्याहारीच्या वेळेस दूध प्यायल्याने मधुमेहींमधील रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होत असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे. कॅनडामधील टोरंटो विद्यापीठ आणि गिलेफ विद्यापीठातील संशोधकांना न्याहारीत बदल केल्यास मधुमेहींना अनेक फायदे होत असल्याचे आढळले. न्याहारी करताना दूध प्यायल्याने जेवणानंतर रक्तात होणार्‍या शर्करेतील वाढ कमी होते. त्याचप्रमाणे दिवसभर भूक कमी लागते असे आढळले.     जगभरात चयापचयासंबंधित विकाराचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह या आरोग्याच्या मुख्य समस्या आहेत, असे गिलेफ विद्यापीठातील डगलस गोफ यांनी म्हटले. त्यामुळे वैयक्तिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मधुमेह, लठ्ठपणा या समस्येवर उपाय म्हणून आहारविषयक धोरण तयार करणे आवश्यक आहे, असे गोफ यांनी सांगितले. संशोधकांनी न्याहारीसोबत प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यानंतर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी दुधातील व्हे प्रथिनांचे...
Article

आला पावसाळा, तब्बेत सांभाळा

  पावसाळी आजाराला प्रतिबंधसाठी उपाययोजना पावसाळा हा ऋतु बालंकापासुन वृद्धांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटतो. या काळात स्वच्छता व आरोग्याची निगा राखणे महत्त्वाचे असते. संसंर्गजन्य आजारही पावसाळ्यात उद्भवतात. त्याच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सांगताहेत अमरावतीचे उदरविकार तज्ज्ञ डॉ. पंकज इंगळे.     पावसाळ्यात विविध संसंर्गजन्य आजारांपासुन रक्षण करण्यासाठी आणि निरोगी राहुन पावसाचा आनंद घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती पावसाळ्यात होणाऱ्या आजारांच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा आजार वाढून त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आजार वा संसर्ग अंगावर काढू नका. डॉक्टरी सल्ल्यांशिवाय केलेले घरगुती उपचार जीवावर बेतू शकतात त्यामुळे तातडीने डॉक्टरांची मदत घ्या. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याची समस्या उद्भवते आणि त्या...