Satyamev Jayate : सत्यमेव जयते
भारतीय राजकारणात हे फक्त स्वार्थी आणि ढोंगी नेत्यांचं मायाजाल झालं असून त्यांना भारतीय संविधानिक व्यवस्थिचं काही देणं घेणं नाही. आपली खुर्ची सांभाळणे व पक्षांच्या नेत्याचे पाय चाटणे अशीच वृत्ती सध्याच्या राजकारणात दिसून येत आहे महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यमेव जयते नावाचा जयजयकार करून," सत्य सर्वांचे आदी घर,। सर्व धर्माचे माहेर ।।" असे ठणकावून सांगितले असताना आमचे नेते असत्यमेव जयतेचा जयघोष करीत आहेत.काही नेत्यांचे इतके झटके यायला लागले आहेत की, ते काय बोलतात हे त्यांना समजत नाही .तसेच काही मंत्री हे तर उंटावरून शेळ्या हाकलणारे राखणदारच आहेत. कारण त्यांच्या वक्तव्यातून देशातील वातावरण दूषित होत असताना देशाचे चालक काहीच म्हणत नाहीत. त्यांना जाणून-बुजून तसे बोलण्याची ट्रेनिंगच दिलेली आहे काय असं वाटते.आज कोण धोक्यात आहेत हे माहीत आहे. पण बहुसंख्य समाजाला धर्माच्या ,जातीच्या नावाची गो...
