Thursday, November 13

Article

Article

Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र

Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, अनेक संकटातून स्व कर्तुत्ववाने, शिक्षण पूर्ण करुन अहिक जीवन सुखासमाधानाने डाॅ. सुजय पाटील यांना जगता आले असते पण तेही एम. बी. बी. एस. ची वैद्यकीय पदवी पदरात असतांना. हा अवलीया सर्व सुखाला लाथाडून शेतकरी बांधवाविषयी सेवा करण्याचे वेड डोक्यात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा, जीवन जगण्यासाठी चैतन्य देणारा फकीरच. त्याच्या या कार्यास लाख लाख प्रणाम. दुस-याच्या विषयी मनात ममत्व निर्माण होणे तेही आजन्म कार्यरत राहणे ही साधी सोपी गोष्ट नाही. एवढी मोठी पदवी असतांना इतरासारखे पैशाच्या पाठी लागून मोठे इमले बांधून ऐटीत जीवन सहज जगला आले असते. ते झुगारून हा अवलीया कास्तकार कुटुबातील असून स्वप्रयत्नाने शिक्षण घेऊन परिश्रमाने स्वतःचा विकास करतांना कास्तकारबांधवांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा संकल्प करुन...
Article

नवीन वर्षाच्या औपचारिक सदिच्छा देतांना ….

काल मध्यरात्रीपासूनच आपले सर्वांचे फोन नवीन वर्षाच्या शुभेच्छांनी खणखणीत असतील. नवीन वर्षाच्या असंख्य संदेशांनी अनेकांचे फोन हँग झाले असतील. आपल्या जिव्हाळ्याच्या,आपुलकीच्या माणसांना सदिच्छा देऊन त्यांच्या आरोग्याची,समृद्धीची,सुखाची मनोकामना करणे काहीच गैर नाही. प्रत्येकाने तशा प्रकारच्या सदिच्छा एकमेकांना दिल्याच पाहिजेत.परंतु हे करत असताना नवीन वर्षात आपल्याला आणखी काय नवीन करायचे आहे,कोणत्या नवीन संकल्पना या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजवायच्या आहे याचाही विचार आम्ही सर्वांनी करणे आवश्यक आहे.नाहीतर नवीन वर्षाच्या सदिच्छा केवळ औपचारिकता म्हणून दरवर्षी सुरूच राहील व त्यातून फार काही साध्य होणार नाही.मित्रांनो,आमचा देश सध्या अतिशय भीषण परिस्थितीतून वाटचाल करत आहे.तरुणाईच्या डोक्यात जाती धर्माचे जहाल विष पेरणे दररोज सुरू आहे.सुशिक्षित वर्ग केवळ ऐकीव माहितीवर एकमेकांच्या धर्माचा द्वे...
Article

भारतातील पहिले आदर्श कृषीमंत्री डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

कृषी महर्षी-शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या दि.२७ डिसेंबर २०२२ ला असलेल्या१२४ व्या जयंतीनिमित्त लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा भाऊसाहेबांच्या क्रांतिकारी कृषी कार्यावरील लेख येथे प्रकाशित करीत आहोत. -संपादक -----------------------------रंजल्या गांजल्या कृषकांचे दैवत झालेले कृषीक्रांतीचे अग्रदूत,कृषी पंडित,शिक्षणाने केवळ उपजीविकेचे प्रश्न सुटत नाहीत तर जीवनातील जटिल प्रश्न सोडविण्यासाठी शक्ती प्राप्त होते अशी शिक्षणविषयक विचारधारा असल्यामुळे संपूर्ण समाजाला विद्येची दालनं मुक्त करणारे शिक्षण महर्षी, प्रशंसनीय व बहुजनांकरिता कार्य करणारे 'मी विदर्भातील एकच व्यक्ती ओळखतो ती म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख 'असे गौरवोदगार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्यांच्या विषयी काढले ते कर्मयोगी, वैदिक वाङ्मयात धर्माचा उगम व विकास या प्रबंधाचे लेखन करणारे थोर लेखक, अस्पृ...
Article

Gadgebaba : गाडगे बाबा आणि आजचे तरुण

सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभलें । करी धरियले गाडगे काठी ॥ डोई शुभ्र केस उडती वाऱ्याने चिंध्या प्रकाशाने चमकती ॥ कीर्तनाचे रंग डुलतो प्रेमाने । भजनानंद म्हणे डेबूजीचा ॥लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रध्देचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते आणि आजही ते आहेत अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय. त्याला आचार विचार त्यांच्या जीवकार्याचा अभ्यास करून ते अमलात आणणे ही आज काळाची गरज आहे, परंतु साधु संत महंतांची चरित्रे आजकालच्या पिढीला टाकावू वाटतात. हातातही धरणार नाहीत कोणी आणि ही गोष्ट उघड आहेत....
Article

महाराष्ट्राची भाग्यरेखा

संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहे. हा प्रकल्प आता लवकरच लोकार्पित होणार असून विदर्भ, मराठवाड्यापासून मुंबईचे अंतर यामुळे लक्षणीयरित्या कमी होणार आहे. यानिमित्त हा विशेष लेख...महाराष्ट्राचा औद्योगिक विकास प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक या भागात अधिक झाला आहे. कारण या ठिकाणी मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा, चांगल्या रस्त्यांचे जाळे. गुंतवणुकदारांनी मराठवाडा- विदर्भाकडे आगेकूच करण्यासाठी सुसाट वेगाची गरज असल्याचे लक्षात आले. त्यातून...
Article

खरे वारकरी…

वारकरी धर्म हा महाराष्ट्राच्या मातीतील अत्यंत लोकप्रिय धर्म आहे.आमच्या संतांनी वारकरी धर्माची पताका संपूर्ण देशभरात पोहचवली आहे.संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,सावता महाराज, संत गोरा महाराज,सेना महाराज,जगनाडे महाराज यासारख्या अनेक संतांनी १३ व्या शतकापासून तर आधुनिक काळामधे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व संतांनी वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे.या संतांनी आपापल्या कालखंडात आपल्या भजन,कीर्तन,प्रवचन आणि साहित्यातून लोकांचे खरे प्रबोधन केले.लोकांना भक्तीचा खरा मार्ग समजून सांगितला.देव कुठे आहे आणि खरी देवाची भक्ती कशात आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने आमच्या संतांनी येथील कष्टकरी,कामकरी, शेतकरी वर्गाला समजावून सांगितले. विठ्ठल हे समस्त बहुजन समाजाचे दैवत आहे.या विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून आमच्या अनेक संतांनी बहुजन समाजाची वैचारिकदृष्ट्या नांगरणी आणि वखरणी केल...
Article

काॅलेज जीवनातील किस्सा…

* परदेशी परदेशी जाना नही... जो वाचनार तो पोट धरून हसनारपरदेशी परदेशी जाना नही हे मी कॉलेजला असताना आमीर खान आणि करिष्मा कपूर यांच्या राजा हिंदुस्थानी या सिनेमातील प्रचंड गाजलेलं गाणं. आजही मी हे गाणं कुठं ऐकल्यावर गाण्यात मग्न होऊन जातो. अन् जेव्हा कधी हे गाणं ऐकेल त्यावेळी प्रचंड हसू येतं. मन काही क्षणात कॉलेजमध्ये वर्गात घेऊन जातं. या गाण्याबरोबर असलेली अनोखी आठवण/किस्सा तुमच्या समोर मांडतोय....आमच्या वर्गात स्नेहल परदेशी नावाची मुलगी होती, भिंगार वरून यायची. अतिशय सुंदर, सडपातळ, काळेभोर वाऱ्यासोबत हवेत लहरणारे केस, सरळ नाक आणि नाकासारखीच सरळ चालणारी, बोलके डोळे, कधी नजरानजर झालीच तर तिचे डोळे आपल्याशी बोलताय असा भास व्हायचा, एकंदरीत पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडेल असे सौंदर्य.. आम्ही सगळे मित्र सतत तिच्याकडे पाहत राहायचो, पण तिने जर कधी चुकुन आमच्याकडे पाहिले तर धन्य झाल्यासारखं व...
Article

इंग्रजीच फॅड….

नेहमी प्रमाणे मी आपला संध्याकाळी चालायला आमच्या इंथे असणाऱ्या राजीव गांधी क्रीडागणात गेलो. माझ्या अगोदर ही तिथे भलतेच नुमने रोज असतात. खर तर मी गेलो की पहिली नजर फिरवून घेतो. आहो तस काही नाही हो उगाच तुमच्या मनात काळ येत ,नजर ह्या साठी फिरवतो तिथे असणारी मंडळी आणि त्यांचा व्यायाम ,कधीच न पाहिलेला व्यायामाचा प्रकार रोज दिसतो म्हणजे दिसतो. कोण कसला व्यायाम करेल आणि कुठून आसन शोधून आणेल त्यांची त्यांना माहीत बिचाऱ्या रामदेव बाबांना ही माहीत नसतील अशी आसन इथं नजरेस पडतात.हा आता मी इतका ही नाकापुढे चालणारा नाही बर की जे आजूबाजूला सुंदर दिसत त्या कडे एक कटाक्ष ही टाकणार नाही.मी सुंदर दिसल की कटाक्ष टाकतो ,आणि मनात म्हणतो बर का व्हावं " काय सुंदर आहे. कधी तरी मात्र मी मनात म्हणतो काय सुंदर आहे राव आणि अचानक ती सुंदरी माझ्या कडे पहाते त्या वेळी वाटत हिला मनात बोललेलं समजत तर नाही ना! असो विष...
Article

साखरे ऐवजी गुळ का वापरावा…?

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे.* गुळ खाण्याचे हे आहेत फायदे :* हिमोग्लोबिन वाढवते-ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.* रक्तदाब नियंत्रित ठेवतो-गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.* पचनशक्ती सुधारते- ...
Article

प्रिय बाबासाहेब,

प्रिय बाबासाहेब, तुमच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या जगभरातील लोकांसाठी आजचा दिवस तसा दुःखाचा आहे. परंतु तुमच्या विचारांमुळे,संघर्षामुळे व बलिदानामुळेच आज कोट्यावधी लोक मानवी अवस्थेमध्ये आले आहेत.स्वतः दुःख सोसून तुम्ही असंख्य लोकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.हातात शस्त्र न घेता व रक्ताचा एक थेंबही न सांडवता एक व्यक्ती किती मोठी क्रांती करू शकतो याचे तुम्ही जगातील मोठे उदाहरण आहात. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्ही अजूनही तुम्हाला समजून घेऊ शकलो नाही.अजूनही आम्ही तुम्हाला जातीच्या बाहेर काढू शकलो नाही. अजूनही आम्ही तुमचे उपकार,तुमचे कार्य,तुमचे देशप्रेम समजून घ्यायला तयार नाही.या देशातील वर्चस्ववादी,विषमतावादी व्यवस्थेने आमच्या मनात आणि डोक्यात तुमच्याविषयी विष पेरून ठेवले आहे व आजही ते पेरण्याचे काम ताकदीने सुरू आहे.त्यामुळे तुमचा जीवघेणा संघर्ष अजूनही या देशातल्या लोकांना समजलेला नाही.ज...