Thursday, November 13

Article

Article

शिवबा तुम्ही आजही हवे होते.!

आज महाराष्ट्रातील तमाम जनता व संपूर्ण देश शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा करत आहे.. उर आनंदाने भरून आलाय. शिवबा, तुमच्या बद्दल असलेला जिव्हाळा थोरांपासून लहान पोरांमध्ये ही आढळतो. खूप खूप बरे वाटते. पण शिवबा तुम्हाला जाऊन तीनशे वर्षाहुन अधिक काळ लोटला. त्याकाळची जनता (तुमची रयत) व आजची जनता ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राजे तुम्ही 'जाणते राजे' होता. स्वतः सर्व कायदे पाळत होता व त्याच प्रमाणे जनतेला ही तसे वागण्यास लावत होता. शिवबा आता फारच बदल झालाय. राजेशाही गेली व नेतागिरी आली. आज जनता नेत्याच्या आश्वासनाला बळी पडून नेता निवडतात. पण त्या नेत्याला तुमच्या नखाची सुध्दा सर नसते. सर्व स्वार्थापोटी मतदाराला भूल देतात व सामान्य जनता फसते. स्वतः नेताच काळे धंदे व भ्रष्टाचाराने माखलेला असतो. (अपवाद सोडून) तो जनतेचे हित न पाहता स्वतःचाच उत्कर्ष व अफाट पैसा कमावण्याच्या फंदात पडतो. तुमच...
Article

तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार)

-महाशिवरात्री विशेष-शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेत...
Article

व्हॅलेंटाईन डे

आज तरुणाई अगदी भटकल्यासारखी दिसते. त्यांना दिशा माहीत नसल्याने ती मंडळी या तरुणाईत तरुणाईला सर्वस्व मानून हवी तशी वागत असते. त्यामुळे तरुणाईत ही मंडळी नेहमीच फसतात. पुर्वी हॅलेंटाईनचा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून लोकं साजरा करायचे. भारतात ही प्रथा नव्हती. ती इंग्रजांपासून आली. हा दिवस साजरा करतांना तरुण तरुणीला लाल गुलाब बक्षीस द्यायचा. त्यानंतर तीही राग न मानता तो गुलाब स्विकार करायची आणि आपल्या केसात माळायची. प्रेमाचा इजहार करण्याचा तो प्रकार.....हॅलेंटाईन डे म्हणून प्रसिद्ध झाला.आज व्हँलेंटाईन डे लोकांच्या मनामनात शिरला आहे. लहानगी मुलेही व्हॅलेंटाईन डेला आपल्या लहानशा प्रेयसीला फुल देतात. हसतात. ती हसली की समजायचं तिनं प्रेमाचा स्विकार केला. असा हा डे सर्वानाच प्रिय ठरत आहे. पण व्हॅलेंटाईन साजरा करतांना थोडा विचार नक्कीच करावा. व्हॅलेंटाईन हा सैनिक होता. तो रोमला राहात होता...
Article

तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या..!

१. तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या. त्यानंतर त्यापासून मुक्ती कशी मिळवता येईल, याचा विचार करा. २. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो. ३. जास्त शत्रू निर्माण करू नका. जय-पराजयाच्या भावना फार तीव्र नकोत. ४. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या. ५. आपल्या गरजा कमी करा. ६. आकस्मिक घडणार्‍या घटनांकडे शांत चित्ताने पहा. ७. आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. ८. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा. ९. आपण सतत चिडत तर नाही ना? हे पहा. मग त्यानुसार तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. १०. आधी आपल्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. त्यानुसार तणाव कमी करा. ११. आपल्या मनाला सल्ला द्या. समजवा. एखादी स्थिती तुमच्यामुळे उत्पन्न झाली की दुसर्‍यांमुळे...
Article

अस्वस्थतेचा धगधगता आलेख: अस्वस्थ तांडा

प्रा. डॉ.विजय जाधव लिखित 'अस्वस्थ तांडा' या कथासंग्रहाचे साहित्य जगताने जंगी स्वागत केले. हाच कथासंग्रह माझ्याही हातात पडला जसे इतरांच्या हातात. ज्यांच्या ज्यांच्या हातात हे पुस्तक पडले त्यांनी त्यांनी त्यावर भरभरून लिहिले, भरभरून स्तुती सुमने उधळली लिहिले;पण मला लिहावयाला बराच उशीर झाला हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो आहे;तरी परंतु उशिराने का होईना भरगच्च पुरस्कारांनी साहित्य जगताने सन्मानित झाल्यानंतर रहावले नाही म्हणून हा प्रपंच...असो स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही तांड्या तांड्यात,वाड्या वस्तीत पूर्वी ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत. दुःख, व्यथा, वेदना, प्रश्न, अडीअडचणी, समस्या थोड्याफार फरकाने जशापूर्वी होत्या तशाच आजही आहेत. अनेक लेखकांनी इतर समाजातील समस्या वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तांडे, वाड्या, वस्तीतील समस्येकडे डॉ. विजय जाधव यांनी जसे लक्ष वेधून घेतले तसे ...
Article

जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी साहित्य

"शोषण विहीन मानवाचा विश्व समाज हे आंबेडकरवादी साहित्याचे ध्येय आहे. पुन्हा देवाच्या नावाने कुण्या धर्माच्या नावाने,आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. असे प्रयत्न हे शोषण विहीन मानवाच्या विश्व समाजाच्या निर्मितीमध्ये केवळ अडथळे ठरू शकतात. जागतिक पातळीवरही भांडवली जागतिकीकरणाची बाजू घेणारे लोक आणि भांडवली जागतिकीकरणारा विरोध करणारे लोक आता एका सुरात बोलायला लागले आहेत. समाजवादाच्या आश्र्याला दुनियेला जावेच लागेल. भांडवली जागतिकीकरणाची एकच एक जागतिक बाजारपेठ जगातील प्रादेशिक संस्कृती आणि त्याच्या बाजारपेठा मान्य करणार नाहीत. या दृष्टीने जगात काही घडामोडी घडू लागल्या आहेत आणि या घडामोडीचा परिणाम असा होईल की या संस्कृती आणि त्याचा प्रादेशिक बाजारपेठा भांडवली जागतिकीकरणाची दादागिरी मान्य करणार नाहीत. जागतिककरणाला या प्रक्रियेतून नमाज समाजवादी चेहरा प्राप्त होईल आणि जगाच्या जगण्याला एक पूर्ण नवा ...
Article

संत रविदास : एक मानवतावादी संंत

मानवतावादी संत म्हणून सुविख्यात असलेले व ज्यांची गिणती संतांमध्ये येते असे संत शिरोमणी संंत रविदास. या संत रविदासाची जयंंती दि. ५ सप्टेेंबरला आहे. या निमीत्याने या लोकप्रिय संताचा घेतलेला आढावासंत रविदासाचा जन्म १३७७ मध्ये गोवर्धनपुरला झाला. कोणी म्हणतात की मंडूरला झाला. पर्यायानं सांगायचं झाल्यास जन्माबाबत संभ्रम आहे. संत रविदास हे बालपणापासूनच चिकीत्सक बुद्धीमत्तेचे होेते.समाजात दोन समुदाय आहेत. एक समुदाय असा आहे की तो चमत्कार मानतो व दुसरा समुदाय असा आहे की जो चमत्कार मानत नाही. कोणी म्हणतात की त्यांनी चमत्कार केले. ते चमत्कार त्यांच्या जन्मापुर्वीपासूनच झाले. जसे. त्याच्या बाळंतपणाच्या वेळी त्याचं बाळतंपण करणा-या दाईच्या डोळ्याला स्पष्ट दिसणे. गंगा अवतरणे वैगेरे. पुढे ते मोठे होत असतांना त्यांच्या हातून साापाचा दंश उतरणे, ब्राम्हण भोजाच्या वेळी प्रत्येक पंगतीतच रविदास दिसणे एवढं...
Article

निखळ मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यांवर मात करून अशक्य गोष्ट सिध्द करणारे श्री. अमायी महालिंगा नाईक

केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता.पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा...मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला अस...
Article

भारतीय संविधानाला सशक्त बनवायचं असेल तर….

प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा अधिकार भारतीय संविधानात आहे. भारतीय संविधान सशक्त अशी प्रणाली आहे. त्या संविधानात राजकीय सहिंता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्वे, नागरीकांची कर्तव्ये यांचा समावेश आहे. हे संविधान लिहिण्याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. कारण त्यांनी अपार मेहनत करुन भारतीय संविधान लिहिलं. त्यातच थोडंसं श्रेय त्यांची पत्नी सविता आंबेडकर हिलाही जाते. तिनंही त्या काळात त्यांची प्रकृती सांभाळली. तसंच ती ते जी तत्वं मांडत होते संसदेत, त्यावर आपलं मतही सांगत होती बाबासाहेबांना. हे विसरता येत नाही. भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ ला बनले व ते २६ जानेवारी १९५० ला लागू झाले. ते सव्वीस जानेवारीला लागू झाले, म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.या संविधानाची रचना अशी की या संविधानानुसार शासन एका माणसाच्या हाती केंद्रीत नाही. पुर्वी हे ...
Article

बंजारा कुंभमेळा आहे तरी काय ?

आतापर्यंत कधीच कुंभमेळा बंजारा,लभाना, नायकडा म्हणजेच बंजारा समाजाच्या इतिहासात कुंभमेळा झालेला नाही. पण दिनांक २५ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यात काय ठरणार ? मानवजात जशी जशी विकसित होत गेली तस तशी मानवजातीत हेवा देवा,द्वेष, मत्सर,तूझं माझं वाढत गेलं आजही वाढत आहे. मानव बुध्दीने प्रगल्भ होत राहीला होत आहे; पण मानवजातीत भेदभाव करण्यात ही पटाईत होत गेला.धर्म, पंथ, जात, वंश यावरून आज मानव रक्तरंजीत खेळ करण्यात मग्न झालेला आहे.नेते लोक सुदधा मु मे राम बगल मे छुरी असे वागत आहेत. समाजात फुट पाडून स्वार्थ साधून घेत आहेत.धर्माच्या जातीच्या, वंशाच्या,पंथाच्या नावाखाली सामान्य गणाची राखरांगोळी होत आहे.विशिष्ट बोटावर मोजण्याइतके लोक धनवान होत आहेत तर बहुसंख्य लोक दारिद्रयाच्या खाईत लोटले जात आहेत. सगळ्याच पक्षाचे नेते ढोंगीपणाने घसा कोरडा होईपर्यंत ओरडून सांगत आहेत सबका साथ सबका वि...