Saturday, March 7

Article

Article

भरडधान्यांचे महत्व आणि कृषी महोत्सव

खाद्यसंस्कृती प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार ज्वारी, बाजरी, तांदुळाची किंवा नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात असे.कष्टकरी माणसांचा भाकरी हा हक्काचा आहार होता. नंतर गव्हाचा समावेश झाला. त्यात बेकरी पदार्थ वाढले. केबल टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून निरनिराळ्या पदार्थांचा आहारात समावेश झाला. चायनीजच्या गाड्या खेडोपाडीही सुरू झाल्या. जंक फूडच्या चटकेपोटी आरोग्य बिघडत असल्याचे दिसू लागले. हे असे असताना पुन्हा एकदा भरडधान...
Article

आज ही शिवाजी महाराज हवे हवेसे का वाटतात ?

खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाज रचना आहे. शिवाजी राजे हे सुध्दा सरंजामी राजे होते. आपण राजेशाही नाकारली आणि त्या जागी लोकशाही स्वीकारली शिवाजी महाराजा नंतर जे राजे महाराजे आपण बघितले राजे राजवाडे बघितले त्यांच्या अन्यायकारक आणि जुलमी राजवटीला आपण कंटाळलो. म्हणूनच ती समाजव्यवस्था आपण नाकारली. भांडवशाही ब्रिटिशाविरुद्ध भारतातील सरंजामशाही राज्ये तग धरू शकली नाही. या वरून सरंजामशाही व राजेशाही समाजव्यवस्था टाकाऊ होती हे सिद्ध होते. आपण लोकशाही स्वीकारली आणि ती स्वीकारल्यानंतर सुध्दा सरंजामशाही व राजेशाहीतला राजा आपल्या चेतना आणि स्पूर्ती का देतोय? का आपण त्यांचा जय जयकार का करतो? शिवाजी महाराज यांच्या आधीही आणि नंतर ही अनेक राजे महाराजे होऊन गेले तरी फक्त शिवाजी महाराज यांचीच जयंती साजरी का करतात? त्यांचेच स्मरण त्यांचीच जयंतीला आपल्याला एवढं स्पूर्तिदाई का वाट...
Article

स्वातंत्र्यलढ्यांचा प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज

'दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक भारताला स्वातंत्र्यासाठी लढताना प्रेरणादायी ठरतो आहे, आज शिवछत्रपती हे दमनकारी साम्राज्यशाहीविरुद्धच्या राष्ट्रवादी लढ्याचे प्रतीक ठरले आहेत,’ हे उद्गार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे. एकदा नोबेल पारितोषिक प्राप्त थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांना जपानी लोकांनी विचारले की, ‘तुमच्या भारताची खरी ओळख काय?’ तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी व्यवस्था ही भारताची खरी ओळख आहे.बंगालच्या फाळणीनंतर वंगभंगाची चळवळ उभी राहिली. या चळवळीची प्रेरणा होते छत्रपती शिवाजी महाराज. रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेली 'शिवाजी उत्सव'. ही कविता वंगभंग चळवळीचे स्फूर्तीगान ठरली. आपल्या या कवितेत रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार, या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आ...
Article

शिवजयंतीचे खरे प्रणेते – महात्मा ज्योतिबा फुले

मराठी अस्मितेचा मानबिंदू, महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान, बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा ३९३ वी जयंती आपण १९ फेब्रुवारीला साजरी करित आहोत. तर, या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधुन काढली ? जगातील पहिली शिवजयंती कोणी साजरी केली ? छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक कोणी लिहिले ? या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे शिवजयंती मागील खरा इतिहास जाणून घेणे होय.महाराष्ट्राच्या जाणता राजाची शिवरायांची समाधी शोधून काढणारे होते.महात्मा ज्योतिबा फुले. जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे होते, महात्मा ज्योतिबा फुले.छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक लिहिणारे होते महात्मा ज्योतिबा फुले.मात्र षडयंत्री मनुवादी लेखकांनी शिवरायांचा पराक्रमी, गौरवशाली इतिहास दडपुन षडयंत्री खोटा इतिहास समाज...
Article

प्राचीनकालीन हेमाडपंथी शिव मंदिर धामंत्री

महाशिवरात्री विशेषतिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अने...
Article

शिवबा तुम्ही आजही हवे होते.!

आज महाराष्ट्रातील तमाम जनता व संपूर्ण देश शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा करत आहे.. उर आनंदाने भरून आलाय. शिवबा, तुमच्या बद्दल असलेला जिव्हाळा थोरांपासून लहान पोरांमध्ये ही आढळतो. खूप खूप बरे वाटते. पण शिवबा तुम्हाला जाऊन तीनशे वर्षाहुन अधिक काळ लोटला. त्याकाळची जनता (तुमची रयत) व आजची जनता ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राजे तुम्ही 'जाणते राजे' होता. स्वतः सर्व कायदे पाळत होता व त्याच प्रमाणे जनतेला ही तसे वागण्यास लावत होता. शिवबा आता फारच बदल झालाय. राजेशाही गेली व नेतागिरी आली. आज जनता नेत्याच्या आश्वासनाला बळी पडून नेता निवडतात. पण त्या नेत्याला तुमच्या नखाची सुध्दा सर नसते. सर्व स्वार्थापोटी मतदाराला भूल देतात व सामान्य जनता फसते. स्वतः नेताच काळे धंदे व भ्रष्टाचाराने माखलेला असतो. (अपवाद सोडून) तो जनतेचे हित न पाहता स्वतःचाच उत्कर्ष व अफाट पैसा कमावण्याच्या फंदात पडतो. तुमच...
Article

तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार)

-महाशिवरात्री विशेष-शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेत...
Article

व्हॅलेंटाईन डे

आज तरुणाई अगदी भटकल्यासारखी दिसते. त्यांना दिशा माहीत नसल्याने ती मंडळी या तरुणाईत तरुणाईला सर्वस्व मानून हवी तशी वागत असते. त्यामुळे तरुणाईत ही मंडळी नेहमीच फसतात. पुर्वी हॅलेंटाईनचा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून लोकं साजरा करायचे. भारतात ही प्रथा नव्हती. ती इंग्रजांपासून आली. हा दिवस साजरा करतांना तरुण तरुणीला लाल गुलाब बक्षीस द्यायचा. त्यानंतर तीही राग न मानता तो गुलाब स्विकार करायची आणि आपल्या केसात माळायची. प्रेमाचा इजहार करण्याचा तो प्रकार.....हॅलेंटाईन डे म्हणून प्रसिद्ध झाला.आज व्हँलेंटाईन डे लोकांच्या मनामनात शिरला आहे. लहानगी मुलेही व्हॅलेंटाईन डेला आपल्या लहानशा प्रेयसीला फुल देतात. हसतात. ती हसली की समजायचं तिनं प्रेमाचा स्विकार केला. असा हा डे सर्वानाच प्रिय ठरत आहे. पण व्हॅलेंटाईन साजरा करतांना थोडा विचार नक्कीच करावा. व्हॅलेंटाईन हा सैनिक होता. तो रोमला राहात होता...
Article

तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या..!

१. तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या. त्यानंतर त्यापासून मुक्ती कशी मिळवता येईल, याचा विचार करा. २. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो. ३. जास्त शत्रू निर्माण करू नका. जय-पराजयाच्या भावना फार तीव्र नकोत. ४. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या. ५. आपल्या गरजा कमी करा. ६. आकस्मिक घडणार्‍या घटनांकडे शांत चित्ताने पहा. ७. आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. ८. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा. ९. आपण सतत चिडत तर नाही ना? हे पहा. मग त्यानुसार तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. १०. आधी आपल्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. त्यानुसार तणाव कमी करा. ११. आपल्या मनाला सल्ला द्या. समजवा. एखादी स्थिती तुमच्यामुळे उत्पन्न झाली की दुसर्‍यांमुळे...
Article

अस्वस्थतेचा धगधगता आलेख: अस्वस्थ तांडा

प्रा. डॉ.विजय जाधव लिखित 'अस्वस्थ तांडा' या कथासंग्रहाचे साहित्य जगताने जंगी स्वागत केले. हाच कथासंग्रह माझ्याही हातात पडला जसे इतरांच्या हातात. ज्यांच्या ज्यांच्या हातात हे पुस्तक पडले त्यांनी त्यांनी त्यावर भरभरून लिहिले, भरभरून स्तुती सुमने उधळली लिहिले;पण मला लिहावयाला बराच उशीर झाला हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो आहे;तरी परंतु उशिराने का होईना भरगच्च पुरस्कारांनी साहित्य जगताने सन्मानित झाल्यानंतर रहावले नाही म्हणून हा प्रपंच...असो स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही तांड्या तांड्यात,वाड्या वस्तीत पूर्वी ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत. दुःख, व्यथा, वेदना, प्रश्न, अडीअडचणी, समस्या थोड्याफार फरकाने जशापूर्वी होत्या तशाच आजही आहेत. अनेक लेखकांनी इतर समाजातील समस्या वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तांडे, वाड्या, वस्तीतील समस्येकडे डॉ. विजय जाधव यांनी जसे लक्ष वेधून घेतले तसे ...