Thursday, November 13

Article

फुलं रंगीबेरंगी का असतात ?
Article

फुलं रंगीबेरंगी का असतात ?

अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार. ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा.प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता...
मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?
Article

मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?

माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था ३ ते ४ तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो.   स्नायूंमध्ये मायोसीन आणि ॲक्टिन नावाचे तंतू असतात, त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व ॲक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅर्टीस असे म्हणतात.   भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर २ ते ३ तासांनी सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे १२ तास लागतात. त्यानंतर १२ तासांत शरी...
मी अनुभवलेला माणसातील देवमाणूस : डॉ. सुजय पाटील
Article

मी अनुभवलेला माणसातील देवमाणूस : डॉ. सुजय पाटील

अकोला शहर असो की जिल्ह्यातील परिसर असो वा तमाम महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सर्वांचे परिचित असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सुजय पाटिल सर आहेत... अकोला मध्ये स्थित पाटील हॉस्पिटल नसून त्याला त्यांनी एक मंदिरच बनवलं आहे, जस की, मंदिरात प्रत्येक भक्त आशेने विश्वासाने जातो व खाली हात कधीच येत नाही अगदी त्याचप्रमाणे...शहरी असो वा ग्रामीण भाग, मध्यमवर्गीय, गोरगरीब,  शेतकरी अथवा शेतमजूर वर्ग यांचे मसीहाच जणू डॉ.सुजय पाटील साहेब आहेत...उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरकी क्षेत्रात उच्च पदवी ग्रहण केली पण इतर डॉक्टर्सच्या तुलनेत आपल्याकडे नाही. निव्वळ नाही सारखी अशी फी यांनी ठेवली हे आश्र्चर्यचकित करून सोडणार वास्तव आहे...अतिशय माफक नाममात्र दरात अत्यन्त कमी शुल्क, अत्यन्त कमी औषध खर्च...व आपुलकी अशी की माया, प्रेम माणुसकीची परिभाषाच तिथून जन्म घेते....मी अनुभलेले माणसातील देव माणू...
खरेदी सोन्याची..!
Article

खरेदी सोन्याची..!

हिवाळ्याचे दिवस होते. डोंगराचं पोट चिरुन सूर्य हळूहळू वर येत होतं. हिरानगर जाग झालेलं होतं . सोनेरी सूर्य किरणे आकाशाला झाकत होती. गुलाबी लालसर रंग पांघरुन आकाश पशुपक्षांना खुणवत होतं. चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होता. बरेच पक्षी थंडीमध्ये गुपचूप बसलेले होते. वातावरण शांत होतं;पण मध्येच टिटवी टीव टिव टिटी टिवचा सुर धरलेली होती.हिरानगर गावात बाईगड्याचा वावर सुरू झालेला होता. थंडी अंगाला झोबत होती.हातपाय गार पडत होते. म्हातारीकोत्तारी, लहान शेंबडी मुलं शेंबूड ओढत, खोकलत शेकोटया जवळ बसली होती.गावातील तरुणमंडळी शेताकडे निघाली होती. कोणाच्या हातात कोयता होता. तर कोणाच्या हातात कत्ती होती. कंठीरामदादाही शेताकडे निघाला होता. हातात विळा, अंगाला गोधडी लपेटलेली. थंडीने दातांचा कुडकुड आवाज येत होता. शेत गावाच्या वरलाकडे होतं.कंठीरामदादा शेतात पोहचलं. शेताच्या जवळच...
आई : सृष्टीनिर्माती?
Article

आई : सृष्टीनिर्माती?

 हा निसर्ग. हा निसर्ग रमणीय आहे. या निसर्गात प्रत्येक व्यक्ती वा सर्व प्रकारचे निसर्गातील जीवजंतू जन्म घेत असतात. तसा सर्वांना जन्म घेण्याचा अधिकार आहेच. जर या निसर्गात अशा जीवजंतूचा जन्म झाला नसता तर या निसर्गात दुस-या भाषेत सांगायचं झाल्यास जीवसृष्टी राहिली नसती.          निसर्ग हा रमणीय आहे.  या निसर्गात प्रत्येक सजीव जसा जन्म घेतो, तसाच तो मरतोदेखील आणि जेव्हा तो जन्म घेतो, तेव्हा अविरत आनंद असतो आणि जेव्हा मरतो, तेव्हा साहजीकच दुःख होतं. या दुःख प्रसंगी काही जीवजंतू शोक व्यक्त करतात तर काही तसा शोक व्यक्त करीत नाही. तसंच ज्यावेळेस प्रत्येक जीवजंतूचा जन्म होतो, त्याचवेळेस त्याचं मरणही ठरलेलं असतं. मग कितीही औषधोपचार केला तरी.          जन्म........प्रत्येक जीवाच्या जन्माचा कालावधी हा ठरलेला आहे. काही काही प्राणी आपल्या आईच्या गर्भात एका सेकंदापेक्षा कमी काय राहतात तर काही प्राणी अने...
डॉक्टर साहेब, जेनेरिक (स्वस्त) औषधी लिहा !
Article

डॉक्टर साहेब, जेनेरिक (स्वस्त) औषधी लिहा !

वो दर्द भी देते है, वो दवा भी बेचते हैं, सुना हैं हमने वो तो डॉक्टरी के पेशे मे हैं।              भारतात महागड्या औषधींचा बाजार खूप मोठा असून सतत वाढत आहे. प्रत्येक घरात कमी-जास्त प्रमाणात कोणती न कोणती औषधी लागतेच. तर औषधींच्या किंमती अनेक वेळा सर्वसामान्यांना परवडणार्‍या नसतात, त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडते. तेव्हा जेनेरिक (स्वस्त) औषधी हाच एकमेव मार्ग असतांना, ह्या स्वस्त औषधी डॉक्टर लिहून देत नाही, म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जेनेरिक (स्वस्त) औषधी न लिहिणार्‍या डॉक्टरांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश जारी केल्याचे वृत्त गुरुवारी एका वृत्तवाहिनीने दिले आहे. तर रुग्णांनीच डॉक्टर साहेबांना जेनेरिक (स्वस्त औषधी) लिहून मागाव्यात आणि डॉक्टर लिहून देत नसल्यास ‘मोदीजी ने बोला है, जेनेरिक दवाई लिखीए’ असे सांगण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.          केंद्र सरकारच्या रिपोर्टनुसार भारता...
Article

सार्वजनिक स्वच्छतागृह आणि आपली जबाबदारी.!

अनेक ठिकाणी स्वच्छतागृह आणि स्वच्छता यांचा  प्रश्न ऐरणीवर  असताना या विषयावर लिहिण्याचा विचार  काही ठिकाणी गेल्यावर लक्षात  आला...अनेक सार्वजनिक ठिकाणे  पाहता  स्वच्छता, साफसफाई  बाबतीत बदनाम  आहे.की कर्मचारी  साफसफाई  करत  नाहीत. परंतु  किती प्रमाणात आपण त्यांना दोषी  ठरविणार... परवाच  एका सार्वजनिक ठिकाणी  वॉशरूममध्ये किळसवाना  प्रकार, घाण, कचरा पाहवयास मिळाले. सुशिक्षित आपणास समजून  ही तरुण  पिढी  कसे  वागतात.खेड्याचे  येडे म्हणणे  सोपे पण  ही शहरातील  डिजिटल पिढी पाहता कोणाला शिक्षित  म्हणावे... टॉयलेट आणि बाथरूममध्ये पडलेले घाणेरडे  सॅनिटरी  नॅपकिन बापरे काय सांगावे? घरी  असे करतो  का आपण? आपले पॅड्स   घरात कुठेही  फेकतो का खरं तर  ही गोष्ट महिला असो की मुली त्यांना सांगायची गरज नाहीच तरी आज  या विषयावर  लिहावेसे वाटले..प्रत्येक अर्थात बस स्टॅन्ड, बागबगीचे, शॉपिंग मॉल्स,दवाखाने चि...
म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद करत नाहीत..!
Article

म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद करत नाहीत..!

तुम्हालाहा हा प्रश्न पडला असेल कि रेल्वेचे इंजिन का बंद करत नाहीत, कारण त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. तरीही रेल्वे इंजिन बंद करण्यात का येत नसेल? तुम्ही कोणत्याही रेल्वे स्थानकावर जा तिथे कितीही वेळ रेल्वे थांबली तरी त्या रेल्वेचे इंजिन कधीच बंद करण्यात येत नाही. जर काही तांत्रिक बिघाड झाला तरच रेल्वेचे इंजिन बंद करण्यात येते, तर यामागे डिझेलचे इंजिन ही खरी समस्या आहे.डिझेल इंजिन बंद केल्यास लोको पायलट आणि प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो. डिझेल इंजिनची तांत्रिक बाजू किचकट असते. यामुळे लोको पायलट ते बंद करण्याऐवजी ते सुरुच ठेवतात. त्यामुळे पुन्हा डिझेल इंजिन सुरु करण्याच्या कटकटीतून वाचता येते. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर थांबते, त्यावेळी रेल्वेचा इंजिन ब्रेक दबाव सहन करु शकत नाही, दबाव तयार करण्यासाठी रेल्वेला मोठा वेळ लागतो. ट्रेन थांबल्यानंतर शिटीसारखा एक आवाज येतो. हा रेल्वेवरील...
आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!
Article

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार, पण ती सुरूवातीची दोनेक वर्षे मला तिचं कमालीचं आकर्षण होतं. म्हणजे पहिल्यांदा तिला पाहिलं ना, तेव्हा मनात काय काय फिलिंग्स आल्या होत्या, हे सांगायला शब्द पण नाहीत. म्हणजे अगदी ती भेटायच्या अगोदर किती तरी वेळा तिचा माझ्या मोबाईल मध्ये असलेला फोटो मी पुन्हा पुन्हा बघायचो. भेट झाल्यावर तेव्हा आमचा सहवासही खूप होता.   तिच्याबरोबर कुठे आणि काय काय धमाल केली हे लिहायचं ठरवलं तर, एखादी दीर्घकथाच तयार होईल. ती सोबत असली की मला अगदी परिपूर्ण असल्याचं फिलिंग येत असे. कारण ती होतीच तशी.                   मला ती कायमच हवीहवीशी वाटायची. तिची सोबत खूप आनंद द्यायची. ती सोबत असली की, चारचौघांत रूबाबदारपणा यायचा. पण पुढे तिने स्वतःहून संबंध कमी केले. तिनं का असं केलं, समजलं नाही. माझ्यावर ती का नाराज झाली, कळले नाही. दर दिवसाआड होणारी आमची भेट महिना-दोन महिन्यात...
अपस्मार किंवा फिट येणे – Epilepsy
Article

अपस्मार किंवा फिट येणे – Epilepsy

आपण अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहतो की एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. या विकारास फिट येणे, फेफरे येणे, मिर्गी किंवा एपिलेप्सी (Epilepsy) असेही म्हणतात.   अपस्मार हा चेतासंस्थेचा (मेंदूसंबंधी) आजार आहे. रुग्णास वरचेवर असे अपस्माराचे झटके येत असतात. जन्मतःच मेंदूत असणारा एखादा दोष किंवा डोक्याला अपघातामुळे झालेली इजा यांमुळे अशा प्रकारचे फेफरे किंवा झटके येतात. अपस्मार हा कोणत्याही वयातील लोकांमध्ये आढळतो, अनेकदा लहान मुलांमध्ये असणारा अपस्माराचा त्रास हा वयानुसार वाढत जातो. या आजारात येणाऱ्या फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते.   *अपस्मार आजाराची लक्षणे - Epilepsy symptoms : ◆रुग्णाचा अचानकपणे शरीराचा सं...