Saturday, March 7

Article

पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?
Article

पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?

वास्तविक पाहता पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ, विठाई इत्यादि नांव असणारा हा पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का? कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात उल्लेख नाही. स्मृती - श्रृती, वेद पुराण, - उपनिषद - अरण्यक- मनूस्मृती या तमाम ब्राम्हणी वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही. तसेच विठ्ठल हे नांव रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही. विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही म्हणजे वैदिक धर्माचे स्वरूप जानणाऱ्या वेदांच्या सर्वश्रेष्ठ ब्राम्हणी ग्रंथात जर विठ्ठलाचे कोठे ही नांव नाही. तर ह्या सर्व पुराव्या वरुन हेच सिद्ध होते की पंढरपूरचा विठ्ठल हा देव नसून तो एक महामानव आहे.विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतात कि, विठ्ठलाचे डोळे, त्याचे खांद्यावर रुळण...
Article

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ – शाहू महाराज

शैक्षणिक, सांस्कृतिक, अर्थिक सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जुन हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक झाला. व छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. दिनदुबळ्या समाजाचे लोकराजा झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले.सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे त्यांना मार्गदर्शक मिळाले.त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अधिक भर दिला आहे.त्यासाठी त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. व समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यांनी शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले.विविध जाती ध...
बहुजनांचे राजे राजर्षी  छत्रपती शाहू महाराज
Article

बहुजनांचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र वंदन .राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दि.26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यामध्ये झाला.त्यांचे मूळ नाव यशवंत होते.त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब ) तर आईचे नाव राधाबाई होते.छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.       कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दि.17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे " शाहू " हे नाव ठेवण्यात आले.सन1889 ते 1893 या चार वर्षाच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला.शिक्षण सुरू असतानाच दि.1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षाचे होते  आणि ...
Article

पंढरीची वारी ऐक्याचे प्रतीक…

पंढरीची वारी ऐक्याचे प्रतीक पाऊले चालती पंढरीची वाट | सुखी संसाराची तोडुनिया गाठ| पाऊले चालती पंढरीची वाट ||असं म्हणत वारकरी आषाढी एकादशीच्या वारीला निघतात. विठ्ठल रुक्माई ,विठोबा रुक्माईचा गजर आसमंतात दुमदुमतो. लाखोंच्या संख्येने येणारा वारकरीमेळा देशाच्या अनेकविध प्रांतातून एकत्र येत असतो. ना कुठले आमंत्रण, ना रुसवा फुगवा, ना मोठेपणाचा डौल, ना जातीपातीचा भेदभाव, ना गरिबीची लाज, ना लहान थोरांचा मानपान, ना जेवणाचा शाही थाट, एवढेच नव्हे तर श्रीमंतातील श्रीमंत देखील दिंडीत असताना स्वतःचे वैभव विसरून जाईल, तरीही पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेले प्रत्येक पाऊल श्रद्धेने, भक्तीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले असते. मजल दर मजल करत एकमेकांना सोबत घेऊन भजनात तल्लीन होऊन हा मेळा वाऱ्याच्या वेगाने पंढरपूरकडे झेपावतो. वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांना आपल्या पदस्पर्शाने पुनीत करित वारकरी संप्र...
ग्रेट मिलेट – ज्वारी – ग्रेट फूड
Article

ग्रेट मिलेट – ज्वारी – ग्रेट फूड

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३   ज्वारी हे भारतीय अन्न म्हणून ओळखले जाते. ज्वारीच्या उत्पादनात आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर ज्वारी उत्पादनात नायजेरियाचा प्रथम क्रमांक असून दुसऱ्या स्थानी अमेरिका आहे.   सर्वांच्या आवडीत समाविष्ट असणारे राज्यातील अव्वल भरडधान्य म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रात ज्वारी न खाणारे खूपच कमी असतील. ज्वारी हे मध्य महाराष्ट्राचे आणि मराठवाड्याचे मुख्य अन्न म्हटले जाते. हल्ली कॅशक्रॉप अर्थात नगदी पीक म्हणून साखर कारखानदारी वाढविणाऱ्यांनी ऊस शेतीस प्रोत्साहन दिले आणि शेतकरी देखील तिकडे वळला असला तरी ज्वारीचे महत्व कमी झालेले नाही.   मराठवाड्यात तर केवळ सणाला आणि पाहुणे आल्यास गव्हाची पोळी असा प्रकार जवळपास सर्वच घरात होता. आता गव्हाची उपलब्धता वाढल्याने फरक पडला असला तरी युवा पिढी वगळता सर्वांना आवडणारे भरडधान्य म्हणून ज्वारीची ओळख आहे. इंग्रजीत या...
फुलं रंगीबेरंगी का असतात ?
Article

फुलं रंगीबेरंगी का असतात ?

अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार. ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा.प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता...
मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?
Article

मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?

माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था ३ ते ४ तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो.   स्नायूंमध्ये मायोसीन आणि ॲक्टिन नावाचे तंतू असतात, त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व ॲक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅर्टीस असे म्हणतात.   भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर २ ते ३ तासांनी सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे १२ तास लागतात. त्यानंतर १२ तासांत शरी...
मी अनुभवलेला माणसातील देवमाणूस : डॉ. सुजय पाटील
Article

मी अनुभवलेला माणसातील देवमाणूस : डॉ. सुजय पाटील

अकोला शहर असो की जिल्ह्यातील परिसर असो वा तमाम महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सर्वांचे परिचित असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सुजय पाटिल सर आहेत... अकोला मध्ये स्थित पाटील हॉस्पिटल नसून त्याला त्यांनी एक मंदिरच बनवलं आहे, जस की, मंदिरात प्रत्येक भक्त आशेने विश्वासाने जातो व खाली हात कधीच येत नाही अगदी त्याचप्रमाणे...शहरी असो वा ग्रामीण भाग, मध्यमवर्गीय, गोरगरीब,  शेतकरी अथवा शेतमजूर वर्ग यांचे मसीहाच जणू डॉ.सुजय पाटील साहेब आहेत...उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरकी क्षेत्रात उच्च पदवी ग्रहण केली पण इतर डॉक्टर्सच्या तुलनेत आपल्याकडे नाही. निव्वळ नाही सारखी अशी फी यांनी ठेवली हे आश्र्चर्यचकित करून सोडणार वास्तव आहे...अतिशय माफक नाममात्र दरात अत्यन्त कमी शुल्क, अत्यन्त कमी औषध खर्च...व आपुलकी अशी की माया, प्रेम माणुसकीची परिभाषाच तिथून जन्म घेते....मी अनुभलेले माणसातील देव माणू...
खरेदी सोन्याची..!
Article

खरेदी सोन्याची..!

हिवाळ्याचे दिवस होते. डोंगराचं पोट चिरुन सूर्य हळूहळू वर येत होतं. हिरानगर जाग झालेलं होतं . सोनेरी सूर्य किरणे आकाशाला झाकत होती. गुलाबी लालसर रंग पांघरुन आकाश पशुपक्षांना खुणवत होतं. चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होता. बरेच पक्षी थंडीमध्ये गुपचूप बसलेले होते. वातावरण शांत होतं;पण मध्येच टिटवी टीव टिव टिटी टिवचा सुर धरलेली होती.हिरानगर गावात बाईगड्याचा वावर सुरू झालेला होता. थंडी अंगाला झोबत होती.हातपाय गार पडत होते. म्हातारीकोत्तारी, लहान शेंबडी मुलं शेंबूड ओढत, खोकलत शेकोटया जवळ बसली होती.गावातील तरुणमंडळी शेताकडे निघाली होती. कोणाच्या हातात कोयता होता. तर कोणाच्या हातात कत्ती होती. कंठीरामदादाही शेताकडे निघाला होता. हातात विळा, अंगाला गोधडी लपेटलेली. थंडीने दातांचा कुडकुड आवाज येत होता. शेत गावाच्या वरलाकडे होतं.कंठीरामदादा शेतात पोहचलं. शेताच्या जवळच...
आई : सृष्टीनिर्माती?
Article

आई : सृष्टीनिर्माती?

 हा निसर्ग. हा निसर्ग रमणीय आहे. या निसर्गात प्रत्येक व्यक्ती वा सर्व प्रकारचे निसर्गातील जीवजंतू जन्म घेत असतात. तसा सर्वांना जन्म घेण्याचा अधिकार आहेच. जर या निसर्गात अशा जीवजंतूचा जन्म झाला नसता तर या निसर्गात दुस-या भाषेत सांगायचं झाल्यास जीवसृष्टी राहिली नसती.          निसर्ग हा रमणीय आहे.  या निसर्गात प्रत्येक सजीव जसा जन्म घेतो, तसाच तो मरतोदेखील आणि जेव्हा तो जन्म घेतो, तेव्हा अविरत आनंद असतो आणि जेव्हा मरतो, तेव्हा साहजीकच दुःख होतं. या दुःख प्रसंगी काही जीवजंतू शोक व्यक्त करतात तर काही तसा शोक व्यक्त करीत नाही. तसंच ज्यावेळेस प्रत्येक जीवजंतूचा जन्म होतो, त्याचवेळेस त्याचं मरणही ठरलेलं असतं. मग कितीही औषधोपचार केला तरी.          जन्म........प्रत्येक जीवाच्या जन्माचा कालावधी हा ठरलेला आहे. काही काही प्राणी आपल्या आईच्या गर्भात एका सेकंदापेक्षा कमी काय राहतात तर काही प्राणी अने...