Friday, May 1

Blog

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह
Article

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रहव्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्...
‘लघवीची सुटी’ आणि हरवलेलं बालपण.!
Editorial

‘लघवीची सुटी’ आणि हरवलेलं बालपण.!

लहानपणी शाळेचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास होता. त्या काळात प्रत्येक गोष्ट नवीन, निरागस आणि गंमतीशीर वाटायची. त्यातलीच एक मजेशीर आठवण म्हणजे “लघवीची सुटी”. ही सुटी खूपच छोटी असायची मधल्या सुटीच्या आधी काही मिनिटांची. पण आमच्यासाठी ती मोठी घटना असायची. त्या वेळी शाळांमध्ये शौचालयं नव्हती. शिक्षक वर्गात सांगायचे, “लघवीची सुटी झाली!” आणि सगळी मुलं धावत सुटायची. कुणी झाडामागे, कुणी शाळेच्या कुंपणाबाहेर. आम्ही मुलं त्यातही मजा शोधायचो. कुणी म्हणायचं, “पहा माझी लघवी किती लांब गेली!” तर कुणी तिचा रंग बघून टिप्पणी करायचं. त्या क्षणांत कोणतंही दडपण नव्हतं, लाज नव्हती, फक्त खेळ आणि कुतूहल होतं.लहानपणी प्रत्येक गोष्ट आम्हाला उत्सुकतेनं बघायला भाग पाडायची. आपण कसे जन्मलो, वडिलांना दाढी-मिशा आहेत पण आईला का नाहीत, आई-वडिलांच्या लग्नात आपण का नव्हतो असे प्रश्न सतत मनात यायचे. तेव्हा कोणी हसत हसत...
GPS तुमच्यावर ठेवतोय पाळत ! IIT दिल्लीचा खुलासा.!
News

GPS तुमच्यावर ठेवतोय पाळत ! IIT दिल्लीचा खुलासा.!

मुंबई : तुमचा मोबाईल तुम्हाला फक्त लोकेशन दाखवत नाही, तर तुम्ही उभे आहात की झोपलेले, हे सुद्धा सांगतोय! IIT दिल्लीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, स्मार्टफोनमधील GPS (Global Positioning System) तंत्रज्ञान तुमच्या हालचाली ८७ टक्के अचूकतेने ओळखू शकते.प्रा. डॉ. स्मृती आर. सारंगी यांनी सांगितले की, तुम्ही जेव्हा एखादं ॲप डाउनलोड करून लोकेशन ‘Allow’ करता, तेव्हा GPS केवळ ठिकाणच नाही, तर तुम्ही मोठ्या घरात राहता की छोट्या, तुम्ही रेल्वे स्टेशनवर आहात की एअरपोर्टवर, इतकंच नव्हे तर तुमच्यासोबत किती लोक आहेत, हेही सांगू शकतो.GPS सिग्नल 10-12 सॅटेलाइट्सकडून मिळतो आणि त्यातून 32 पॅरामीटर्सवर आधारित मॅपिंग तयार होतं. यामुळे ॲप्स तुमच्या घराचा लेआऊट, हालचाली, व्यवहार आणि वैयक्तिक माहिती सहज ओळखू शकतात.डिजिटल पाळत टाळण्यासाठी IIT दि...
आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!
Article

आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!

डिजिटल माणसाचं भावनिक हँग होणं ,आजचा माणूस डिजिटल जगात सर्वाधिक ‘कनेक्टेड’ आहे, पण भावनिकदृष्ट्या सर्वाधिक ‘डिस्कनेक्टेड’.स्मार्टफोन हातात असला तरी, मनाचं नेटवर्क वारंवार ‘नो सिग्नल’ दाखवतं. बाहेरून तो स्मार्ट, स्टायलिश आणि ‘अपडेटेड’ दिसतो, पण आतून त्याचं मन मंदावलेलं, थकलंलेलं, हँग झालेलं असतं.असं का?कारण आयुष्याच्या फोल्डरमध्ये नकोशा फाईल्स साचल्या आहेत. तक्रारी, कटुता, ईर्षा, अपयशाच्या आठवणी, तुटलेल्या नात्यांचे स्क्रीनशॉट्स.या सगळ्या फाईल्सचा भार मनाच्या रॅमवर पडतो आणि आत्म्याची सिस्टीम संथ होते.माणूस स्वतःचा यूजर राहिलेला नाही, तर स्वतःच्या विचारांचा बळी झालेला आहे.अशा वेळी आवश्यक असतं  “मनाचा क्लीनअप आणि जीवनाचा रिस्टार्ट!” कर्म नियतीच्या सर्व्हरवरील खरी ओळख“कुणी बघत नाही म्हणून मनाप्रमाणे वागावं”  हा विचार मोहक आहे, पण त्यात विनाश लपलेला आहे.कारण नियतीचा सर्व्हर नेहमी ऑ...
संवाद हरवलेला आहे!
Article

संवाद हरवलेला आहे!

आज आपल्याला दिसतंय की सर्वच लोकं मोबाईलवर व्यस्त दिसतात. घरादारात हीच परिस्थिती आहे व लोकांचा घरादारातील हा व्यवहार पाहून असं वाटायला लागलं आहे की आज संवाद घराघरातून हरवत चालला की काय? यावर बरेच लोकं चिंताही व्यक्त करीत आहेत व वर्तमानपत्रातून त्यास्वरुपाच्या बातम्याही छापून येत आहेत.           संवाद...... संवाद हरवला आहे. तो घरातून कुठे निघून गेला ते कळत नाही. शेजारी जावून बसला असेल असं वाटल्यानं तिथंही दिसला नाही. वस्तीत शोधलं संवादाला. तिथंही सापडला नाही. मग गेलो गावात. तिथंही नव्हताच. त्यानंतर तालुक्यात, शहरात, राज्यात, देशात व जगात संवादाला शोधलं. तरीही संवाद आढळलेलाच नाही. मग टिव्हीवर एक बातमी रुपानं त्याचा एक अवयव दिसला. व्हाट्सअपवर एक अवयव दिसला. फेसबुकवर व इंन्ट्राग्रामवर एक अवयव दिसला. यु ट्यूबवर एक अवयव दिसला. तेव्हा जाणवलं की...
तुळशी विवाह का केला जातो?
Article

तुळशी विवाह का केला जातो?

तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहे, जो दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच देवुथनी एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू (शालिग्राम) आणि आई तुळशी यांचा विवाह होतो. असे मानले जाते की या दिवशी तुळशीशी लग्न केल्याने आनंद, समृद्धी, सौभाग्य आणि वैवाहिक स्थिरता येते. या प्रसंगी तुळशी मातेला वधूप्रमाणे सजवले जाते, नवीन स्कार्फ, फुले, दागिने आणि पारंपारिक मेकअपने सजवले जाते. हे अलंकार केवळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक नाही तर देवी लक्ष्मीचे स्वागत देखील करते, कारण तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार म्हटले जाते. हा तुलसी विवाह सोहळा केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर कुटुंबातील एकता, प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे.तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि देवी तुळशी यांच्या विवाहाचा उत्सव आहे, जो भक्त आणि देव यांच्यातील प्रेम, विश्वास आणि भक्त...
राहुल गांधींचा जलमय प्रचार! मच्छिमारांसोबत उतरले तळ्यात, बिहारमध्ये ‘देसी अंदाज’ चर्चेत
News

राहुल गांधींचा जलमय प्रचार! मच्छिमारांसोबत उतरले तळ्यात, बिहारमध्ये ‘देसी अंदाज’ चर्चेत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असून, प्रमुख नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी बेगुसराय येथे प्रचारासाठी दाखल झाले. नेहमीप्रमाणे भाषणांमधून केंद्र व राज्य सरकारवर टीका करण्याबरोबरच, यावेळी त्यांनी एक वेगळा प्रयोग केला थेट लोकांमध्ये उतरून त्यांचा जीवनानुभव जाणून घेण्याचा.सभेपूर्वी राहुल गांधी स्थानिक मच्छिमार बांधवांना भेटण्यासाठी बेगुसरायमधील एका तळ्याकाठी पोहोचले. पारंपरिक पोशाखात त्यांनी अचानक तळ्यात उडी घेतली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत मासेमारी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या "देसी अंदाजाचा" व्हिडिओ काँग्रेस पक्षाने आपल्या 'एक्स' (पूर्वीच्या ट्विटर) अकाऊंटवर शेअर करताच काही तासांतच तो व्हायरल झाला.या जलमय अनुभवातून राहुल गांधींनी मच्छिमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन संघर्षांब...
भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!
News

भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!

मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने अभूतपूर्व पराक्रम साधला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला ५३ धावांनी पराभूत करत महिला वनडे विश्वचषक 2025 आपल्या नावे केला. भारताने प्रथम फलंदाजी करत २९९ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवरच कोसळला. या विजयानंतर देशभरातून महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, बीसीसीआयनेही ऐतिहासिक निर्णय घेत ५१ कोटी रुपयांचं भव्य बक्षीस जाहीर केलं आहे.बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितलं की, या पुरस्कारात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांनी या विजयाचं श्रेय आयसीसी चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीला दिलं. शाह यांच्या प्रयत्नांमुळे महिला क्रिकेटमधील पुरस्कार रक्कमेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ करण्य...
अमर्त्य सेन : भारतरत्न व नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, मानवी विकासाचे जागतिक विचारवंत
Article

अमर्त्य सेन : भारतरत्न व नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, मानवी विकासाचे जागतिक विचारवंत

अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत.त्यांचा जन्म सन : १९३३ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला झाला. आज दि.३ नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या त्यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ठचिंतन॥नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'अमर्त्य' अर्थात अमर हे नाव दिले होते. अमर्त्य सेन यांचे माध्यमिक शिक्षण ढाक्का येथील सेंट ग्रेगरी हायस्कूलमध्ये झाले आणि नंतर त्यांनी विश्वभारती आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले.सन : १९५३ मध्ये त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमधून सन : १९५९ मध्ये त्यांनी एम.ए.आणि पी.एच.डी. पदव्या प्राप्त केल्या.अवघ्या २३ व्या वर्षी सेन जादवप...
आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!
Article

आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!

आंदोलना  दरम्यान "रस्ता रोको" (नाकाबंदी) आंदोलन चुकीचे आहे की नाही हे एखाद्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. काहींचा असा विश्वास आहे की यामुळे सामान्य लोकांना गैरसोय आणि त्रास होतो, तर काहींचा असा युक्तिवाद आहे की ते एखाद्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक आवश्यक आणि प्रभावी माध्यम आहे. आंदोलनादरम्यान हिंसा  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी  रस्ता रोको आंदोलने करू नये.अनेक आंदोलनाला हिंसेचे स्वरूप मिळाले.रस्ता रोको मुळे अनेकांचे प्राण गेले. आंदोलन कोणत्याही प्रकारचे का असेना  त्या आंदोलकांना रस्त्याची नाकाबंदी करू देऊ नये.सुरक्षित प्रवास हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे.रस्तावर जनतेची कोंडी होत असेल तर हा प्रकार मानवी अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे.आपल्या मागण्या प्रभावीपणे  शासनापर्यंत  मांडण्यासाठी वापरली आंदोलक  रस्ता रोको आंदोलन करत...