Saturday, December 13

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

महात्मा फुले ; क्रांतीचे आधारस्तंभ

सध्या आम्हाला सर्वत्र सुधारणा झालेली दिसते.महिलाही शिक्षणात आघाडीवर गेलेल्या दिसतात.दलितही सुधारलेले दिसतात.विधवाही ब-याच पुढे गेलेल्या दिसतात.केशवेपन प्रथा राहिलेली नाही.सतीप्रथा तर नाहीच नाही.सतीप्रथेचा कायदा लार्ड विल्यम बेंटिकने बनवुन सतीप्रथेला तिलींजली दिली होती.ही सती प्रथा राजा राममोहन रायच्या प्रयत्नातुन बंद झाली होती.लार्ड विल्यम बेंटिकच नाही तर पुर्ण इंग्रज अधिकारी वर्गाच्या लक्षात सतीप्रथा वाईट गोष्ट आहे,हे राजा राममोहन रायने लक्षात आणुन दिले होते.सतीप्रथा बंद झाली असली तरी समाजात बाकी सा-याच प्रथा जोमात सुरु होत्या.विधवा झाल्यानंतर तिचा श्रुंगार नष्ट करुन तिने पांढरी साडी घालावी.तसेच तिला पुन्हा विवाह करण्याचा हक्क नसुन तिच्याकडे कोणी पाहु नये म्हणुन तिचा चेहरा विद्रुप केला जात असे.अँसीड टाकुन नाही तर तिच्या डोक्यावरचे केस काढुन.त्या स्रियांनी आवाज उठवु नये,त्या स्रियांना य...
Story

भय

सुरेश रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेहून एक महिन्यासाठी आलेला. अगोदर तो तेथे शिकायला गेला होता. तेथल्या कंपनिने त्याला तेथेच नोकरी दिली होती. रावसाहेबांना आणि मम्मीना त्याच्या लग्नाची घाई होती. त्याला कारण ही होते. शैला रावसाहेबांच्या मित्राची मुलगी तिला त्यांनी लहानपणीच सून म्हणून मानले होते. सुरेशची ही ती बालमैत्रीण होती. दोघं ही एकमेकाला आवडत होती. पण रावसाहेबांना भिती वाटत होती. पोरग अमेरिकेला जॉब करणार मग तेथलीच कोण पकडली तर मग शैलाचे कसं होणार? तेव्हा लवकरात लवकर लग्न केलं की आपण दिलेल्या वचनातून मुक्त होऊ. म्हणून चहा घेताना त्यांनी सरळ सुरेशला सांगितले"आता सुट्टीवर आलायं तर तुझं आणि शैलाचे लग्न उरकून घेऊ" "कां घाई करतात मला सेटल होऊ द्या ना?" "त्यात काय लग्न कर आणि शैलाला ही बरोबर घेऊन जा."हो नाही करता शेवटी सुरेश तयार झाला. लगेच पुढच्या आठवढ्याचा मुहुर्त ही काढला...
मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!
Article

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..! महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतवासीयांना मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ -संविधान हा आपल्या खडतर प्रवास आणि प्रदीर्घ लेखणीतून बहाल केला आहे* सन 2015 सालापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो. ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. हा मानवी जीवन कल्याणाचा दिवस आहे. भारतात हजारो ग्रंथ असताना दीन-दलित, भटके विमुक्त, आदिवासी दीनदुबळे लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान होय. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी होऊन त्यामध्ये आठ महत्त्वाच्या समित्या बनवल्या. त्यामध्ये *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समिती देण्यात आली.* 29 ऑगस्ट 1947 रोजी समिती गठित करण्यात आली. मसुदा समितीकडे आलेल्या सर्व दस्तऐवजाचा डॉक्टर बा...
Article

धडा बापाचा

येक पोट्ट रमेश नावाचं लाडात वाढलं. माय बाप साधारन कुटुंबातलं व्हतं. बाप खाजगी नोकरीत व्हता. पोरग चांगलं व्हावं, चांगलं शिकावं  परतेकमाय बापाले वाटते. अन आपल्या पोट्यासाटी वाट्टेल  थे मेहनत करतेत. तसं रमेश च्या माय बापानं केलंत. पन पोट्ट्याले काई कदर नाई.  मस्त आपल्याच मस्तीत राये. शान शौकीन ,दंगा मस्ती , पैसा उडवे, माय बाप परेशान. येकटच पोट्ट त्याईले वाटे कां मोठं झाल्यावर आधार भेटन जराकसा. पन कायचा आधार नसता डोक्साले ताप. देवाले नवस करुन झाले. उपास तापास झाले. पन कायबी फरक नाई. आखीर बापानं पोट्ट्याचा नाद सोडला. पन मन काई मानेना.... येक दिस बापाच्या मनात ईचार आला. अन त्यानं पोट्याले धडा शिकवाचा ठरुवलं. बापानं रमेश ले लई दूर नेला. येक उची भिंत व्हती . रमेश मने बापु  येथ कायले आनल. बाप गुपचुप व्हता. त्यान रमेश ले भितीवर (दिवाल) चढासाटी सांगतलं पोट्ट पयले नाई मने. आखीर कसा बसा चढला त्याच्या...
Article

मातृभाषेला लागलेली उतरती कळा..!

भारतीय परंपरा जपणारी, भारतीय संस्कृतीचे जाण असलेली माय मवाळ मराठी भाषा. मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात,   "माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृताते ही पैजेसी जिंके॥' पूर्वी सर्व मुले मराठी भाषेतून शिकत होती व त्यानेच ती मोठी नामवंत झाली. ब्रिटिश काळात इंग्रजी भाषा आली. त्या ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्याकरता तिला भारतात स्थान दिले. पण भारतीय हळुहळू एवढे भाळले की त्यांना तिची गोडी लागली. पूर्वी मोजक्याच इंग्रजी शाळा होत्या पण सध्या मराठी  शाळांची स्थिती एवढी खालावलीय की सरसकट सगळेच इंग्रजीच्या आहारी गेलेत. रोष इंग्रजी भाषेवर नाही. भाषा वेगवेगळ्या जाणून शिकून घ्याव्याच पण मराठीकडे एवढे दुर्लक्ष नको ना! अरे मुलांना जरी इंग्रजी माध्यमात घातलं तरी मातृभाषा का दुरावता. घरी तरी ती बोली भाषा जागृत ठेवा ना! आज भाषेची सर्वांनी मिसळ केली आहे. मराठी बोलतांना बहुतांश शब्द त...
Article

आदिवासी आपले शत्रू नाहीत

दूर डोंगराळ भागात राहणारी आदिवासी जमात. बिचारे किडे, मुंग्या खावून उदरनिर्वाह करीत असतात. त्यांना औषधीचं पुरेपूर ज्ञान आहे. तसेच ही मंडळी सापासारखे विषारी प्राणीसुद्धा अत्यंत शितापीनं पकडत असतात. त्यातच जंगलातील कंदमुळं, झाडपाला खावून तसेच मिळेल त्या अन्नावर आजही पोट भरत असतात. त्यातच ही मंडळी स्वाभीमानी असतात. चोर नसतातच. चोर जर असती तर ते अगदी समृद्ध जीवन जगत राहिली असती अगदी चो-या करुन.   ती मंडळी जंगलातील लाकडं गोळा करतात. डिंक, राळ औषध्या गोळा करतात. चारं, बोरं गोळा करतात. त्या वस्तू शहरात विकतात आणि स्वतःचं पोट भागवतात. परंतू आज हीच शहरातील मंडळी त्यांची शत्रू बनत चालली आहे. त्यांना चोर ठरवू लागली आहे. त्यामुळं त्यांच्यात व शहरातील जनमाणसात एक खोल दरी निर्माण होत चाललेली आहे.चोर..........चोर कुठं नाहीत. ते श्रीमंतांच्या घरी सुद्धा जन्माला येत असतात. परंतू श्रीमंतांच्या घरचं मुसळ खपतं...
Article

खांद्याच्या दुखण्यावर करा घरगुती उपाय…

खांद्याच्या दुखण्यामागे बरीच कारणे असू शकतात. दुखापत, सातत्याने होणारी हालचाल, वजनदार वस्तू उचलणे, अपघात, खेळणे किंवा वाढते वय या कारणांमुळे खांद्यांचे दुखणे उद्भवू शकते. खांद्याच्या दुखण्यामुळे हातांच्या हालचालींवर र्मयादा येतात. खांद्यांमध्ये तीन महत्त्वाची हाडे असतात. ही हाडे खांद्यांच्या सांध्यांशी जोडलेली असतात. खांद्याच्या कोणत्याही भागात या वेदना जाणवू शकतात.व्यायामाने या वेदनांवर नियंत्रण मिळवता येते. इतकंच नाही तर, या व्यायामाचे दीर्घकालीन लाभही आहेत. व्यायामामुळे स्नायू लवचिक व्हायला मदत होते. खांदे मागून पुढे फिरवणे, बालासन, खांद्यांचे स्नायू ताणणे, डंबेल्स उचलणे अशा व्यायामांमुळे लाभ होऊ शकतात. हे सर्व व्यायाम अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. शिवाय ते तुम्ही कुठेही करू शकता. हे व्यायाम नियमित केल्यामुळे वेदना बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात.खांदा बराच काळ दुखत असेल तर त्य...
Article

करजगावची पाणीटंचाई : एक शाप ..!

सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पृथ्वीवर म्हणायला 71% पाणी आणि 29% जमीन आहे. पृथ्वीवरील पाण्यात 97 टक्के समुद्राचं खारं पाणी आहे. उरलेल्या तीन टक्के गोड्या पाण्यात दोन टक्के ध्रुवीय प्रदेशात आणि हिम शिखरावर गोठलेल्या स्वरुपात आहे आणि जेमतेम एक टक्का पाणी विहिरी, बोअरवेल, तलाव, नदी, नाल्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. जर नियोजन न करता पाणी काटकसरीने वापरले नाही तर 2030 पर्यंत देशात पाणीटंचाई उद्भवणार असून 2050 पर्यंत ही समस्या भीषण स्वरूप धारण करणार आहे. खरं म्हणजे पाणीटंचाईची समस्या नैसर्गिक नसून मानव निर्मित समस्या आहे.वाढती लोकसंख्या ,बेसुमार जंगलतोड ,पावसाचा लहरीपणा, हवामानातील बदल आणि नियोजनाचा अभाव अशा अनेक कारणामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली खाली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मग त्याला माझं करजगाव तरी कसे...
Gerenal

महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या.!

मुंबई : कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरीबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे. गरीबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मत: कुपोषणाची शिकार ठरणार्‍या बालकांचे प्रमाण मोठे आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन ही परिस्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या महाराष्ट्रात आहे.    एका वृत्तानुसार, माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात महिला आणि बालविकास कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ३३ लाखांहून अधिक कुपोषित बालकं असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुलं अतिकुपोषित आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असून, यात महाराष्ट्र ...
Article

स्मार्ट टिप्स: तुमचा स्मार्टफोन गरम होतोय? मग काय काळजी घ्याल, वाचा..

स्मार्टफोन्समध्ये गेमिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग किंवा उन्हामुळंही स्मार्टफोन्स गरम व्हायला लागतात. त्यामुळं आपल्याला मोबाईलच्या अधिक गरम होण्याने त्रास सहन करावा लागतो. मग मोबाईलची गरम होण्याची कारणं आणि त्यासाठी आपण त्याची काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊया..   * सॉफ्टवेयर अपडेट्सचा प्रॉब्लेम, जास्त स्पेस शिल्लक नसल्याने, मोबाईलवर कोणतेही अ‍ॅप पूर्णपणे क्लोज नाही केले तर ते बॅकग्राउंडला मिनीमाईज होऊन चालू राहते आणि मोबाईल गरम होतो. साधारणत: स्मार्टफोन्समध्ये अनेक जुने आणि आऊटडेटेड अ‍ॅप्स असतील तर ते नेहमी अपडेट ठेवा.   * तुमच्या स्मार्टफोनची रॅम कमी असणे आणि इंटर्नल मेमरी कमी असली तर ती तुम्ही खूप फाईल्सने भरून ठेवतात. मग लोड आल्याने मोबाईल हँग होतो आणि गरमदेखील होतो. म्हणून अनावश्यक फाईल्स डिलीट करत जाव्यात.   * तुमच्या मोबाईलची रॅम कमी असताना तुम्ही जास्त मेमरी असलेले किंवा काही खास सपोर्ट...