Thursday, March 5

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

तापाची समस्या..!

ऋतूबदल तसंच अन्य कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तापाची समस्या निर्माण होते. यावर काही घरगुती उपचारांसोबत डॉक्टरांचा सल्लाही घेतला जातो. परंतु ताप हा आजार नसून आजाराचं लक्षण आहे हे समजून घ्यायला हवं. आजारावर इलाज झाल्याशिवाय ताप बरा होत नाही. त्यामुळेच अंगावर ताप काढण्याची सवय योग्य नाही.    नवजात बालकांच्या शरीराचं तापमान १00 डिग्रीपेक्षा जास्त आणि पाच ते सहा वयोगटातील मुलांच्या शरीराचं तापमान १0१ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर ताप आहे असं समजलं जातं. बरेचदा स्पर्शाच्या आधारे शरीराच्या वाढलेल्या तापमानाचा अंदाज घेऊन ताप आहे अथवा नाही हे ठरवलं जातं. पण ही चुकीची पद्धत आहे. ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचाच वापर करावा. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या काखेत तीन ते पाच मिनिटे थर्मामीटर ठेवून वाढलेल्या तापमानाची नोंद घ्यावी. पाच वर्षांपुढील मुलांच्या तोंडात थर्मामीटर ठेवून तापमानाची नोंद घ्यावी.   ताप आल्य...
Gerenal

गोल्ड फेशियलची चमक आता घरीच मिळवा.!

गोल्ड फेशियल करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे, असं काही नाही. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल, तर ३ गोष्टी वापरा आणि घरीच गोल्ड फेशियलची चमक मिळवा.फेशियल करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पर्ल फेशियल, गोल्ड फेशियल असे काही प्रकार एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी किंवा काही खास प्रसंगी केले जातात. फेशियलच्या इतर प्रकारांपेक्षा हे दोन प्रकार जरा जास्त महागडेही असतात. त्यातही पर्ल फेशियलपेक्षा गोल्ड फेशिअल करणे तर खूपच महाग जाते. म्हणून पार्लरमध्ये जाऊन गोल्ड फेशियल करण्यावर पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल आणि तेवढा वेळही नसेल, तर घरच्या घरी गोल्ड फेशियलचा लूक तुम्हाला निश्‍चितच मिळू शकतो.गोल्ड फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे केस पुर्णपणे मागे घ्या आणि बेल्टने बांधून टाका.यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.आता फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे चेहर्‍याचं क्लिंझिंग करणे.यासाठी तुमच्याकडे...
देवदासी….
Story

देवदासी….

सुनंदा व मी शाळेतल्या मैत्रिणी. एके दिवशी शाळा सुटल्यावर तिला घेऊन मी माझ्या घरी आले. पण ती आमच्याकडे आलेली माझ्या घरच्यांना आवडले नाही. ती घरी गेल्यावर आई मला म्हणाली, "क्षमा, त्या सुनंदाशी जास्त मैत्री नको करू हं". "का गं आई? तिचं गणित खूप चांगलं आहे आणि ती नेहमी मला मदत करते". "सांगीतलं ना, जास्त जवळीक नको."मी हो म्हटले, पण आईचे म्हणणे मनावर घेतले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी तिच्या घरी गेलो. तिथे ओट्यावर एक साडी नेसलेली बाई बसली होती. सुनंदाने 'ही माझी ताई' अशी ओळख करून दिली. आमचा आवाज ऐकुन सुनंदाची आई बाहेर आली. मला पाहून तिला फार आनंद झाला नाही आणि इशाऱ्याने तिने सुनंदाला आत बोलावून घेतले. मी मात्र वेंधळ्यासारखी तिच्या ताईकडे पाहतच राहिले.ओठावर लिपस्टिक, लांबलचक केसांवर माळलेले गजरे, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि डोळ्यात घातलेले काजळ ह्यामुळे तिची ताई फारच सुंदर दिसत होती. कुणाची तर...
Gerenal

लट्ठपणा कमी करण्यासाठी..

लट्ठपणा विविध व्याधींना निमंत्रण देतो. आयुर्वेदात स्थूलपणावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. संतुलत आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घातली तर आयुर्वेदिक उपायांनी बरेच लाभ होऊ शकतात.शरीरात आमामुळे स्थूलपणा वाढतो. चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि अन्नपचन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शरीरात आम या विषारी घटकाची निर्मिती होते. आमामुळे शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी आमाचं निर्मूलन करण्यावर आयुर्वेदाचा भर असतो. शरीरात आम असताना वजन कमी करणं जवळपास अशक्य होऊन बसतं, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच आहारावर नियंत्रण आणूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. त्यामुळे आमाचं प्रमाण कमी केल्यानंतरच वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी.काही आयुर्वेदिक औषधी आमावर प्रभावी ठरतात. त्यात हळद, त्रिकातू, दारूहळद (बार्बेरी), त्रिपबला आणि गुग्गुळ यांचा समावेश करावा लागे...
Gerenal

गरोदरपणात त्वचा जपा

गरोदरपणातले नऊ महिने हा महिलांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. आई होण्याचा आनंद अनुभवत असतानाच स्त्रियांना विविध शारीरिक बदलांनाही सामोरं जावं लागतं. गरोदरपणात शारीरिक बदल होतातच शिवाय महिलांच्या त्वचेवरही परिणाम होतो. जवळपास ९0 टक्के महिलांना बाळंतपणानंतर त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. नवा जीव जन्माला घालणं कोणत्याही महिलेसाठी सोपं नसतं. तिला बरीच भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतरं अनुभवावी लागतात. या काळात काही महिलांचं वजन वाढतं. काही गुंतागुंत निर्माण होते. त्यातही गरोदरपणात आणि त्यानंतर त्वचा तसंच केसांच्या संरचनेत बरेच बदल झाल्याचं दिसून येतं.बाळंतपणानंतर त्वचेचा पोत टिकवून ठेवणं खूप आव्हानात्मक असलं तरी हे बदल कायमस्वरुपी टिकणारे नसतात, ही त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल. थोडी काळजी आणि उपायांनी तुम्ही पुन्हा उजळ त्वचा प्राप्त करू शकता. गरोद...
Gerenal

महिलांना फायब्रोमायल्जयाचा धोका

फायब्रोमायल्जया नावाचा एक विकार आहे. हा विकार पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक प्रमाणात होतो. ३0 ते ५0 या वयोगटातल्या महिलांना हा विकार जडण्याचा धोका बराच जास्त असतो. ब्रिटनमधल्या एका संशोधनानुसार २५ पैकी एक व्यक्तीला हा विकार होऊ शकतो. ब्रिटनमध्ये १५ ते २0 लाख लोकांना हा विकार झाल्याचं एका आकडेवारीवरून समोर आलं आहे. या विकाराविषयी जाणून घेऊ.    फायब्रोमायल्जया या विकारात स्नायूंमध्ये प्रचंड वेदना जाणवतात. या अस वेदनांमुळे माणूस अक्षरश कळवळतो. आपल्या मानसिक स्थितीवर याचा परिणाम होतो. या विकारामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. दुखापत, शस्त्रक्रिया, जंतूसंसर्ग आणि नैराश्यामुळेही ही व्याधी जडू शकते. या विकारात रुग्ण स्वत:वरचं नियंत्रण हरवून बसतो. त्यामुळे अत्यंत धोकादायक असा हा विकार आहे. ही व्याधी पूर्ण बरी होऊ शकत नसली तरी त्यावर औषधांद्वारे नियंत्रण मिळवता येतं.  ...
Article

थंडीतली स्टाईल

आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. साहजिक ऊबदार कपड्यांची तयारी सुरू करावी लागेल. सर्वसाधारणपणे थंडीत स्वेटर, ज्ॉकेट कॅरी केले जातात. प्रसंगी शालीला पसंती असते. पण प्रत्येक वेळी शाल गुंडाळणं, स्वेटर घालणं शक्य नसतं. वेगळं ट्राय करायचं तर पोंचोचा पर्याय आहे. हा कॅज्युअल, पार्टी वेअर म्हणून कॅरी करू शकता.'टी शर्ट, स्वेट शर्टवर केप स्टाईल पोंचो घालता येईल. गाऊ न किंवा लाँग स्कर्टवर हा प्रकार शोभून दिसेल. फ्लोरल, प्लेन, चेक्स, स्ट्राईप्स या प्रकारांमधून तुम्ही केप स्टाईल पोंचोची निवड करू शकता. ' जीन्स किंवा एथनिक्सवर फुल लेंथ किंवा फ्लोअर लेंथ पोंचो वापरावा. ' आवड आणि गरजेनुसार व्ही, राउंड किंवा हाय नेकवाले पोंचो घेता येतील. ' समारंभासाठी लोकरीवर थ्रेड, मरर वर्क तसंच नक्षीकाम केलेले पोंचो खरेदी करू शकता. ' आजकाल फेदर किंवा फिं्रज पोंचोचा ट्रेंड आहे. ही स्टाईलही छान दिसते. ' नेहमीच्या हुडीपेक्षा...
Article

महात्मा फुले ; क्रांतीचे आधारस्तंभ

सध्या आम्हाला सर्वत्र सुधारणा झालेली दिसते.महिलाही शिक्षणात आघाडीवर गेलेल्या दिसतात.दलितही सुधारलेले दिसतात.विधवाही ब-याच पुढे गेलेल्या दिसतात.केशवेपन प्रथा राहिलेली नाही.सतीप्रथा तर नाहीच नाही.सतीप्रथेचा कायदा लार्ड विल्यम बेंटिकने बनवुन सतीप्रथेला तिलींजली दिली होती.ही सती प्रथा राजा राममोहन रायच्या प्रयत्नातुन बंद झाली होती.लार्ड विल्यम बेंटिकच नाही तर पुर्ण इंग्रज अधिकारी वर्गाच्या लक्षात सतीप्रथा वाईट गोष्ट आहे,हे राजा राममोहन रायने लक्षात आणुन दिले होते.सतीप्रथा बंद झाली असली तरी समाजात बाकी सा-याच प्रथा जोमात सुरु होत्या.विधवा झाल्यानंतर तिचा श्रुंगार नष्ट करुन तिने पांढरी साडी घालावी.तसेच तिला पुन्हा विवाह करण्याचा हक्क नसुन तिच्याकडे कोणी पाहु नये म्हणुन तिचा चेहरा विद्रुप केला जात असे.अँसीड टाकुन नाही तर तिच्या डोक्यावरचे केस काढुन.त्या स्रियांनी आवाज उठवु नये,त्या स्रियांना य...
Story

भय

सुरेश रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेहून एक महिन्यासाठी आलेला. अगोदर तो तेथे शिकायला गेला होता. तेथल्या कंपनिने त्याला तेथेच नोकरी दिली होती. रावसाहेबांना आणि मम्मीना त्याच्या लग्नाची घाई होती. त्याला कारण ही होते. शैला रावसाहेबांच्या मित्राची मुलगी तिला त्यांनी लहानपणीच सून म्हणून मानले होते. सुरेशची ही ती बालमैत्रीण होती. दोघं ही एकमेकाला आवडत होती. पण रावसाहेबांना भिती वाटत होती. पोरग अमेरिकेला जॉब करणार मग तेथलीच कोण पकडली तर मग शैलाचे कसं होणार? तेव्हा लवकरात लवकर लग्न केलं की आपण दिलेल्या वचनातून मुक्त होऊ. म्हणून चहा घेताना त्यांनी सरळ सुरेशला सांगितले"आता सुट्टीवर आलायं तर तुझं आणि शैलाचे लग्न उरकून घेऊ" "कां घाई करतात मला सेटल होऊ द्या ना?" "त्यात काय लग्न कर आणि शैलाला ही बरोबर घेऊन जा."हो नाही करता शेवटी सुरेश तयार झाला. लगेच पुढच्या आठवढ्याचा मुहुर्त ही काढला...
मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!
Article

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..! महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतवासीयांना मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ -संविधान हा आपल्या खडतर प्रवास आणि प्रदीर्घ लेखणीतून बहाल केला आहे* सन 2015 सालापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो. ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. हा मानवी जीवन कल्याणाचा दिवस आहे. भारतात हजारो ग्रंथ असताना दीन-दलित, भटके विमुक्त, आदिवासी दीनदुबळे लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान होय. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी होऊन त्यामध्ये आठ महत्त्वाच्या समित्या बनवल्या. त्यामध्ये *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समिती देण्यात आली.* 29 ऑगस्ट 1947 रोजी समिती गठित करण्यात आली. मसुदा समितीकडे आलेल्या सर्व दस्तऐवजाचा डॉक्टर बा...