Thursday, April 23

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

तरुणाईचा उद्रेक

वर्तमानाचे कालचक्र अत्यंत वेगाने बदलत आहे. जग एक ग्लोबल खेडे बनू पाहत असताना तरुणाईचा भारत देश तरुणाला उध्वस्त करत आहे. तरुणाईच्या क्रांतीने देशाने अभूतपूर्व अशी क्रांती केली आहे. त्या तरुणाला धार्मिक व जातीय वातावरणात मशगूल ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आज दिसत आहे. तरुण हा देशाचा कर्णधार असतो. तरुणाच्या ओठावरील गीतांमधून देशाचे भविष्य उमलत असते.पण हाच तरुण आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काही तरुण हे धर्माधिष्ठित व जातीधिष्ठित दिसत असले, तरी अनेक तरुण हे भारताचे खरे शिलेदार आहेत. आपल्या ज्ञानक्रांतीतून ते देशाला शिखरावर घेऊन जात आहेत. मात्र आज शिक्षण घेणारे अनेक तरुण बेरोजगार आहेत . त्यांना योग्य रोजगार सरकार उपलब्ध देऊ शकत नाही.सरकारी सेवा क्षेत्रात अघोषित नोकरीबंदी करून त्यांच्या जीवन मेटाकुटीला आणले आहे. एखादी जाहिरात निघाली तर तिचा निकाल योग्यप्रकारे लागत नाही. अनेक परीक्षांम...
Article

भारत विद्वानांचा देश ; परंतू दखल शुन्य..!

* डिसलेसारखे बरेच गुणवंत भारतात; मात्र कदर नाहीच सध्या जिल्हा परीषद शाळेत शिक्षक असलेले डिसले हे शिक्षणविभागात चर्चेचा विषय झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील संशोधन. त्यांना ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळाला. त्यामुळं ते चर्चेत आले. त्याहूनही चर्चेत आले ते अमेरिकेतील मिळत असलेल्या शिष्यवृत्तीमुळं. अमेरिकेने त्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यांनी ही शिष्यवृत्ती देण्यामागे म्हणणं मांडलं की डिसलेंनी संशोधन करण्यासाठी अाणखी शिकावं. जेणेकरुन आणखी ब-याच मोठ्या प्रमाणात संशोधन करता येईल. परंतू या अमेरिकेत जाण्याला सोलापूर येथील शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांचा विरोध होता. तो सध्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे मावळला आहे.   डिसले हे सोलापूरमध्ये जिल्हा परीषदेच्या शाळेत लागलेले जिल्हा परीषद शिक्षक आहेत. ते संशोधन करीत होते. त्यातच त्यांच्या संशोधनाची विदेशी लोका...
अंगापेक्षा बोंगा जड.!
Story

अंगापेक्षा बोंगा जड.!

रावसाहेबांच्या घरी आज धावपळ चालली होती व त्याला कारण आज त्यांच्या मुलीला, संध्याला बघायला नवरा मुलगा येणार होता. रावसाहेब भल्या मोठ्या वाडवडिलांच्या घरात राहत. एकेकाळी उच्च श्रीमंत होते पण सध्या तशी परिस्थिती नव्हती. तरी ते खोट्या श्रीमंतीचा डौल दाखवत. मुलीला बघण्याच्या कार्यक्रमाचा पण एवढा दिखावा की मुलाकडच्या माणसांना त्यांची श्रीमंती दिसावी. मुला मुलीने एकमेकांना पसंत केले. साखरपुड्याची तारीख ठरवली व रावसाहेबांनी लगेच तो करून ही टाकला. साखरपुडा खूपच दिमाखात साजरा केला. मुलाला हिऱ्याची अंगठी व भारीतले कपडे घेतले. सगळ्या नातलगांना बोलवून, राजेशाही खानपान वगैरे देऊन, थाटामाटात साजरा केला. लगेच पुढच्या महिन्यात लग्न ही ठरवले. त्याकरता मोठा ए.सी वाला महागडा हॉल,भारी सजावट व उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे खान पान ठेवले होते. मुलीचे दागदागिने, कपडे लत्ते, देणे घेणे सगळे लोकांच्या नजरेत येण्या सारखे...
Gerenal

स्थूलपणा कमी करण्यासाठी..

लट्ठपणा विविध व्याधींना निमंत्रण देतो. आयुर्वेदात स्थूलपणावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. संतुलत आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घातली तर आयुर्वेदिक उपायांनी बरेच लाभ होऊ शकतात. शरीरात आमामुळे स्थूलपणा वाढतो. चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि अन्नपचन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शरीरात आम या विषारी घटकाची निर्मिती होते. आमामुळे शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी आमाचं निर्मूलन करण्यावर आयुर्वेदाचा भर असतो. शरीरात आम असताना वजन कमी करणं जवळपास अशक्य होऊन बसतं, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच आहारावर नियंत्रण आणूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. त्यामुळे आमाचं प्रमाण कमी केल्यानंतरच वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी.   काही आयुर्वेदिक औषधी आमावर प्रभावी ठरतात. त्यात हळद, त्रिकातू, दारूहळद (बार्बेरी), त्रिपबला आणि गुग्गुळ यांचा समावेश करावा लागे...
Article

संवेदनशील भावनांची शब्दरूपी साठवण :पिवशी

कवयित्री शितल राऊत यांच्या नुकताच 'पिवशी' हा पहिला काव्यसंग्रह गौरव प्रकाशन, अमरावती द्वारा प्रकाशित झाला. मुळात 'पिवशी' हे शीर्षक वाचताक्षणी डोळ्यांपुढे बालपणीचा काळ तरळतो. प्रत्येकाच्या आजीच्या कमरेला मोठ्या दिमाखात विराजमान झालेली ती पिवशी आठवते. त्या पिवशीमध्ये ठेवलेल्या वस्तूचे जसे प्रचंड आकर्षण प्रत्येकाला होते अगदी तसेच या कविता संग्रहातील प्रत्येक कविता वाचतांना वैविध्यपूर्ण विषयाच्या आशयघन कविता वाचकाच्या अंतर्मनाला सुखाणाऱ्या आहेत.   महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा युवा कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे यांची लाभलेली प्रस्तावना व राठोड सरांनी तयार केलेले सुबक व सुंदर मुखपृष्ठाने पिवशीला सोन्याची झालर चढविण्याचे काम केले आहे.   कवयित्री शितल राऊत ह्या व्यवसायाने शिक्षक आहेत. गेले दहा वर्ष त्या आपल्या पेशा सांभाळून साहित्यक्षेत्राची निष्ठेने सेवा करत आहेत. अगदी याच...
Article

” आरसा गमावलेली माणसं ! “

कवयित्री विद्या जाधव यांचा आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कवयत्री विद्या जाधव या पेशाने शिक्षिका आहे. समाजामध्ये दररोज वेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, अनेक प्रसंग पाहायला मिळतात या सगळ्याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं आहे.समाजाचं, निसर्गाचं,मानवाचं, मानवी संबंधांचे बारकाईने निरीक्षण केले आहे.त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या कवितांमधून पाहायला मिळतं आहे.मानवी जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनामधील अनेक नाती अगदी सोप्या शब्दात त्यांनी उलगडून दाखवली आहेत. समाजातल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून व्यक्त होत आहे. अनेक असणाऱ्या ज्वलंत समस्या आणि त्यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे.मुळातच कवयत्री शिक्षिका असल्यामुळे त्यांचं मन संवेदनशील आहे. या संवेदनशील मनातून अनेक संवेदनशील कवितांची ...
Gerenal

तीळगुळ घ्या आणि चांगले बोला

मकरसंक्रांत दरवर्षी येते.आनंद घेवुन.तीळगुळ देवुन तीळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत आपण तिचं स्वागत करीत असतो.नव्हे तर हा आनंदाचा पर्वही साजरा करीत असतो.पण काही उचाट मंडळी या तीळसंक्रातीला गालबोट लावुन तीळसंक्रात फलाण्या गोष्टीवर आली असे उगाच बडबडत असतात. तीळसंक्रात आनंदाचा पर्व आहे.या दिवशी लोक आपल्या अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करीत असतात.तसेच जेवणासाठी जे ही पदार्थ बनवतात.त्या सर्व पदार्थात तीळ टाकतात.याचा अर्थ असा आहे की या तीळ टाकल्याने रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच.शिवाय तीळामुळे शरीरातील थंडीने निर्माण झालेली उर्जा भरुन निघते.मृत्यु हे आपल्या जीवनातील अंतिम सत्य आहे.या मृत्युने प्राणीपक्षी,व वृक्षलता यांनाही सोडलेले नाही.जर माणुस मेलाच नाही तर नवीन जीव जन्माला कसा येणार? मग तो तीळसंक्रातीचा दिवस का असेना......माणसाने गावात सकाळी एखादा जीव मेलेला पाहिला रे पाहिला की ...
Gerenal

दातांवर डाग पडताहेत?

पांढरेशुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात, काळपट दिसू लागतात. यामुळे आपण फार अस्वस्थ होतो. योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर परिणाम होऊ लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असं होऊ शकतं. अनेक कारणांमुळे दात पिवळे पडतात. अशाच काही कारणांविषयी जाणून घेऊन आपण दातांचं आरोग्य टिकवून ठेऊ शकतो.सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे दातांच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होतो. या पदार्थांमुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.तोंड आणि दातांशी संबंधित विकारांमुळे आणि त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्‍या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो. रेडिएशन, केमोसारख्या उपचारांमुळे दातांच्या रंगावर परिणाम होतो. दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दातांची, तोंडाची योग्य ती काळजी घ्या...
Gerenal

उपयुक्त ऑटो रिप्लाय अँप्स

मैत्रिणींनो, तुमच्यापैकी कोणी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असेल तर ते धोक्याचं ठरू शकतं. फोन कॉल किंवा मेसेजला उत्तर देताना लक्ष विचलित झाल्याने अपघात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत वाहन चालवत असाल तर काही ऑटो रिप्लाय अँप्स कामी येतील. त्याविषयी जाणून घेऊ..'गुगलच्या 'अँड्रॉइड ऑटो अँप'मध्ये 'ऑटो रिस्पाँड' फिचर आहे. यात अँपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'ऑटो रिप्लाय' विभागात संदेश लिहायचा. मेसेज आल्यावर फक्त रिप्लायवर टॅप करायचं. तुम्ही ड्रायव्हिंग करत असल्याचं कळेल.'ऑटो रिप्लाय टेक्स्ट मेसेज' अँप डाउनलोड केल्यानंतर ड्रायव्हिंग करताना आलेल्या कॉल किंवा एसएमएसला ऑटो रिप्लाय करता येईल. यात कॉन्टॅक्ट लिस्ट करावी. मेसेज आल्यावर 'रिप्लाय' ऑप्शनवर टॅप केल्यावर समोरच्याला संदेश मिळेल.'ऑटो एसएमएस लाईट'मुळे आलेले एसएमएस तसंच मिस कॉल्सना ऑटो रिप्लाय पाठवता येईल. गाडी चालवताना '...
Article

“धम्मध्वज”

आपण दररोज धम्मध्वज पाहतो. या धम्मध्वजाचा इतिहास बौद्धांना माहिती असणे आवश्यक आहे.धम्मध्वज बुद्धाच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात नव्हता. त्रिपिटकातही त्याचा उल्लेख नाही. अशोकाच्या काळातही बौद्ध धाम्मध्वज नव्हता.   १९ व्या शतकात श्रीलंका येथे ब्रिटीशांची राजवट होती. तेथे ख्रिश्चन देशाचे साम्राज्य होते. त्याचकाळात दि. २६ व २७ आगस्त १८७३ रोजी कोलंबो येथे ख्रिश्चन धर्मगुरू आणि बौध्द भिक्खू यांच्यांमध्ये शास्त्रर्थावर चर्चा झाली. त्या चर्चेत सहभागी बौध्द प्रतिनिधी भदंत गुणानंद होते तर ख्रिश्चन धर्मगुरू सिल्वा पादरी होते. या चर्चेत बौध्द गुरु गुणानंद विजयी झाले. ही वार्ता त्यावेळच्या सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली.   ही बातमी वाचून अमेरिकेचे कर्नल हेन्री स्टील आलकाट, जान डेव्हिड, रशियाच्या श्रीमती ब्लावत्साकी सारखे विद्वान बौद्ध धर्माकडे प्रभावित झालेत. या सर्वांची इच्छा भदंत गुणानंद यां...