Wednesday, December 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

संवेदनशील भावनांची शब्दरूपी साठवण :पिवशी

कवयित्री शितल राऊत यांच्या नुकताच 'पिवशी' हा पहिला काव्यसंग्रह गौरव प्रकाशन, अमरावती द्वारा प्रकाशित झाला. मुळात 'पिवशी' हे शीर्षक वाचताक्षणी डोळ्यांपुढे बालपणीचा काळ तरळतो. प्रत्येकाच्या आजीच्या कमरेला मोठ्या दिमाखात विराजमान झालेली ती पिवशी आठवते. त्या पिवशीमध्ये ठेवलेल्या वस्तूचे जसे प्रचंड आकर्षण प्रत्येकाला होते अगदी तसेच या कविता संग्रहातील प्रत्येक कविता वाचतांना वैविध्यपूर्ण विषयाच्या आशयघन कविता वाचकाच्या अंतर्मनाला सुखाणाऱ्या आहेत.   महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा युवा कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे यांची लाभलेली प्रस्तावना व राठोड सरांनी तयार केलेले सुबक व सुंदर मुखपृष्ठाने पिवशीला सोन्याची झालर चढविण्याचे काम केले आहे.   कवयित्री शितल राऊत ह्या व्यवसायाने शिक्षक आहेत. गेले दहा वर्ष त्या आपल्या पेशा सांभाळून साहित्यक्षेत्राची निष्ठेने सेवा करत आहेत. अगदी याच...
Article

” आरसा गमावलेली माणसं ! “

कवयित्री विद्या जाधव यांचा आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कवयत्री विद्या जाधव या पेशाने शिक्षिका आहे. समाजामध्ये दररोज वेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, अनेक प्रसंग पाहायला मिळतात या सगळ्याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं आहे.समाजाचं, निसर्गाचं,मानवाचं, मानवी संबंधांचे बारकाईने निरीक्षण केले आहे.त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या कवितांमधून पाहायला मिळतं आहे.मानवी जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनामधील अनेक नाती अगदी सोप्या शब्दात त्यांनी उलगडून दाखवली आहेत. समाजातल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून व्यक्त होत आहे. अनेक असणाऱ्या ज्वलंत समस्या आणि त्यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे.मुळातच कवयत्री शिक्षिका असल्यामुळे त्यांचं मन संवेदनशील आहे. या संवेदनशील मनातून अनेक संवेदनशील कवितांची ...
Gerenal

तीळगुळ घ्या आणि चांगले बोला

मकरसंक्रांत दरवर्षी येते.आनंद घेवुन.तीळगुळ देवुन तीळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत आपण तिचं स्वागत करीत असतो.नव्हे तर हा आनंदाचा पर्वही साजरा करीत असतो.पण काही उचाट मंडळी या तीळसंक्रातीला गालबोट लावुन तीळसंक्रात फलाण्या गोष्टीवर आली असे उगाच बडबडत असतात. तीळसंक्रात आनंदाचा पर्व आहे.या दिवशी लोक आपल्या अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करीत असतात.तसेच जेवणासाठी जे ही पदार्थ बनवतात.त्या सर्व पदार्थात तीळ टाकतात.याचा अर्थ असा आहे की या तीळ टाकल्याने रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच.शिवाय तीळामुळे शरीरातील थंडीने निर्माण झालेली उर्जा भरुन निघते.मृत्यु हे आपल्या जीवनातील अंतिम सत्य आहे.या मृत्युने प्राणीपक्षी,व वृक्षलता यांनाही सोडलेले नाही.जर माणुस मेलाच नाही तर नवीन जीव जन्माला कसा येणार? मग तो तीळसंक्रातीचा दिवस का असेना......माणसाने गावात सकाळी एखादा जीव मेलेला पाहिला रे पाहिला की ...
Gerenal

दातांवर डाग पडताहेत?

पांढरेशुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात, काळपट दिसू लागतात. यामुळे आपण फार अस्वस्थ होतो. योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर परिणाम होऊ लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असं होऊ शकतं. अनेक कारणांमुळे दात पिवळे पडतात. अशाच काही कारणांविषयी जाणून घेऊन आपण दातांचं आरोग्य टिकवून ठेऊ शकतो.सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे दातांच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होतो. या पदार्थांमुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.तोंड आणि दातांशी संबंधित विकारांमुळे आणि त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्‍या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो. रेडिएशन, केमोसारख्या उपचारांमुळे दातांच्या रंगावर परिणाम होतो. दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दातांची, तोंडाची योग्य ती काळजी घ्या...
Gerenal

उपयुक्त ऑटो रिप्लाय अँप्स

मैत्रिणींनो, तुमच्यापैकी कोणी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असेल तर ते धोक्याचं ठरू शकतं. फोन कॉल किंवा मेसेजला उत्तर देताना लक्ष विचलित झाल्याने अपघात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत वाहन चालवत असाल तर काही ऑटो रिप्लाय अँप्स कामी येतील. त्याविषयी जाणून घेऊ..'गुगलच्या 'अँड्रॉइड ऑटो अँप'मध्ये 'ऑटो रिस्पाँड' फिचर आहे. यात अँपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'ऑटो रिप्लाय' विभागात संदेश लिहायचा. मेसेज आल्यावर फक्त रिप्लायवर टॅप करायचं. तुम्ही ड्रायव्हिंग करत असल्याचं कळेल.'ऑटो रिप्लाय टेक्स्ट मेसेज' अँप डाउनलोड केल्यानंतर ड्रायव्हिंग करताना आलेल्या कॉल किंवा एसएमएसला ऑटो रिप्लाय करता येईल. यात कॉन्टॅक्ट लिस्ट करावी. मेसेज आल्यावर 'रिप्लाय' ऑप्शनवर टॅप केल्यावर समोरच्याला संदेश मिळेल.'ऑटो एसएमएस लाईट'मुळे आलेले एसएमएस तसंच मिस कॉल्सना ऑटो रिप्लाय पाठवता येईल. गाडी चालवताना '...
Article

“धम्मध्वज”

आपण दररोज धम्मध्वज पाहतो. या धम्मध्वजाचा इतिहास बौद्धांना माहिती असणे आवश्यक आहे.धम्मध्वज बुद्धाच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात नव्हता. त्रिपिटकातही त्याचा उल्लेख नाही. अशोकाच्या काळातही बौद्ध धाम्मध्वज नव्हता.   १९ व्या शतकात श्रीलंका येथे ब्रिटीशांची राजवट होती. तेथे ख्रिश्चन देशाचे साम्राज्य होते. त्याचकाळात दि. २६ व २७ आगस्त १८७३ रोजी कोलंबो येथे ख्रिश्चन धर्मगुरू आणि बौध्द भिक्खू यांच्यांमध्ये शास्त्रर्थावर चर्चा झाली. त्या चर्चेत सहभागी बौध्द प्रतिनिधी भदंत गुणानंद होते तर ख्रिश्चन धर्मगुरू सिल्वा पादरी होते. या चर्चेत बौध्द गुरु गुणानंद विजयी झाले. ही वार्ता त्यावेळच्या सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली.   ही बातमी वाचून अमेरिकेचे कर्नल हेन्री स्टील आलकाट, जान डेव्हिड, रशियाच्या श्रीमती ब्लावत्साकी सारखे विद्वान बौद्ध धर्माकडे प्रभावित झालेत. या सर्वांची इच्छा भदंत गुणानंद यां...
Article

छोट्या माणसांची मोठी सावली

सत्यवादी माणसाजवळ नैतिक शुचिता असते.त्याचे विचार सामर्थ्य विशेष प्रभावी आणि शक्तीशाली असून तो क्रोधावर मोठ्या तपस्येने विजय मिळवल्यामुळे त्याचे विचार सामर्थ्य प्रचंडच असते. हे सामर्थ्य इतके विलक्षण असते की ,जेथे इतर जनांच्या शेकडो शब्दांनी काम होणार नाही तेथे प्रचंड विचारसामर्थ्य असलेल्या योगीजनांचा एकच शब्द पुरा पडतो.श्रेष्ठ योगी मितभाषीपणे एकच शब्द बोलतो आणि ऐकणारांच्या मनावर त्याचा विलक्षण मोठा प्रभाव निश्चित पडतो. सत्यवचनी, उद्योगशीलता,दृढनिश्चय, चिकाटी हे सद्गुणांची गंगोत्रीच असते.   माणसाला ज्ञान, शहाणपणा आणि अमरत्वाकडे जाताना दोन चैतन्यमय वाटा असतात एक आत्मिक तर दुसरी देहनिष्ठ.आत्मिकता प्रसन्नता,चित्ताची एकाग्रता इंद्रियमनाने आत्मज्ञानी झाला तर त्यासाठी कृती करण्यास शारीरिक बळ असावेच लागते तरच मन तेजस्वी तारा होऊन मनाच्या किरणशलाका अस्ताव्यस्त, इतस्ततः न भटकताना तेजस्वी कार्य सिध्द ...
Article

सिंधूताई सपकाळ;एक चिरंतन व्यक्तीमत्व

सिंधूताई सपकाळ. एक गणमान्य नाव. अनाथांची आई नावानं ओळख असलेली एक सर्वसाधारण महिला. तिला पदमश्रीही प्राप्त झाली. कारण तिनं त्या लेकरांना दत्तक घेतलं. ज्या लेकरांना मायबाप नव्हते. ज्यांचे मायबाप मरण पावले होते. अंदाजे तीनचार वर्षापुर्वीची गोष्ट. सिंधूताई नागपूरला आल्या होत्या एका कार्यक्रमाबद्दल. त्यापुर्वीही त्या नागपूरात येवून गेल्या. माझी मुलाखतही झाली. परंतू मी काही तेवढा सिंधूताईला ओळखत नव्हतो. परंतू ज्यावेळी रेशीमबागच्या सुरेश भट सभागृहात आल्या. तेव्हापासून चांगला ओळखायला लागलो.   कार्यक्रम होता पुरस्कार वितरण सोहळ्याचा. कोणत्यातरी सीमा राऊत नावाच्या तिच्या लेकीनं सिंधूताईच्या संस्थेला मदत व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजीत केला होता आणि त्या कार्यक्रमात माझे नगरचे मित्र रज्जाक शेख उपस्थीत राहिल्यानं त्यांना भेटण्यासाठी मी गेलो आणि तिथे मी सिंधूताईला पाहिले.मी कार्यक्रमात गेलो तेव्हा सभ...
Gerenal

सूर्यनमस्कार का घालावेत?

आपल्या पोटात जठर, यकृत, प्लहा, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे. निसर्गाने एवढय़ाशा जागेत एवढे अवयव आणि २२ फूटाचे आतडे कसे बसवले असेल? अन्नाचा घास येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो आणि घास पुढे गेला की ते पुन्हा अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवश्यक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.सूर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा...
Article

सज्ज स्वागतासाठी

काहीच तासांवर नववर्ष सुरू होण्याचे बाकी आहे.प्रत्येकजण नव्या संकल्पना घेऊन नव्या योजना, आखण्या करत नववर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कुणाला करियर करायचे तर कोणाला छंद जोपासायचे असतात. मनसुबे रचत हरेकजण नव्या सालाचे स्वागत करतो.पण मनाला प्रश्न पडतो की प्रत्येकाचे इप्सित साध्य होते का? त्या दृष्टीने ते किती प्रयत्नशील असतात.तर अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोक संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतात.इतरजण नववर्ष आले नि गेले याची पर्वाच करत नाहीत.   नववर्षाच्या संकल्पना मनात ठेवून जीवनाचा आराखडा तयार करण्यात गैर नाही पण आळशी वृत्तीने काहीच काम होत नाही. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर लाथ मारीन तिथे पाणी काढता येते.नव्या पिढीला न मागताच सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे या समाजात राहताना समाजाशी आपणही काही देणं लागतो याचे सामाजिक भान नसते.तसेच सर्व गोष्टी सहज मिळाल्याने आपण काहीतरी करू...