Wednesday, December 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

समतेचे खंदे पुरस्कर्ते – प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते समतेचे खंदे पुरस्कर्ते, तुम्हां आम्हाला सर्व भारतवासीयांना देशभक्ती अन् राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांची आज १३१ वी जयंती जगभरात साजरी होत आहे.आभाळ होतं फाटलेलं..! दु:खाच्या अश्रुंनी दाटलेलं..!! उजेडास नव्हता कधी थारा..! अंधार झाला होता मानवात सारा..!!कवीच्या कवितेतील काव्यपंक्ती प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माआधी साऱ्या समाजाची अशी अवस्था झाली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाल्यावर ...!'उध्दरली कोटी कोटी कुळे,भीमा जन्मामुळे..!खरंच एका कवीच्या या कवितेच्या ओळीमध्ये किती अर्थ दडलेला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला बाहेर काढुन त्यांना स्वाभिमानाचं जीवन दिलं आहे. हजारो वर्षांपासून मृताचं जीव...
Article

डॉ. बाबासाहेब यांची निर्भीड पत्रकारिता

समाज जागृती व समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र .लोकांवर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे व जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांमुळे ज्ञान, माहिती, रंजन व प्रबोधन होते. ते लोकशाहीचा चौथा खांब आहे.कोणत्याही चळवळीमध्ये वर्तमानपत्रे खूप महत्त्वाची भूमिका फार पाडीत असतात.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या निश्चित भुमिकेतूनच पत्रकारितेकडे वळले होते. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ”पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्...
Article

प्रत्येक नागरिकांपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोहचवून, डॉ. आंबेडकर जयंती साजरी करूया…

नुकताच नागराज पोपटराव मंजुळे यांचा झुंड प्रकाशित झाला आणि परत एकदा जयभीमचा नारा दुमदुमला व डॉ भारतरत्न डॉ. बाबासाहेब सर्व नागरिकांन पर्यंत पोहचले.आपण किती कोत्या मनाचे आहोत की, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जयभीमवाल्यांचेच. जयभीमवाल्यांनीच डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करायची काय तर डॉ आंबेडकरांचे कार्य हे फक्त जयभीम वाल्यांसाठीच होते.अश्या बऱ्याच गैरसमजुतीतून आपण जात असतो. परंतु वास्तविक बघता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच होते व त्यांनी सर्वांसाठीच कार्य केले आहे व ते सर्वांचेच आहेत. त्यांना आपणाला ओळखता आले नाही किंवा त्यांना सर्वांपर्यंत पोहचवू देण्यात आले नाही. त्यांच्या कार्याची महती ही विश्वंभरात आहे. एव्हढेच नाही तर हा देश डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचा आहे असे सुद्धा म्हटले जाते.   ज्या महामानवाची महती व कार्य विश्वातओळखल्या जाते परंतु आपल्या देशात मात्र ह्या महामानवाला जसे ओळखल्या जायल...
Article

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी क्षेत्रातील योगदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या तसेच जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असे स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनंत पैलूचे त्यांनी निरीक्षण केले आहे.त्याच्या कार्यकर्तृत्वाने ते अनेकांचे प्रेरणास्थान बनले आहे.शिक्षणाचे प्रेरणास्तंभ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानपुरुष ,निस्सीम ग्रंथप्रेमी,विचार स्वातंत्र्याचे खरे समर्थक,थोर समाज सुधारक,प्राख्यत अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंधाचे माहितगार,ऊर्जा व जल संसाधनाचे नियोजक, अंधश्रद्धेचे कर्दनकाळ, सद्भावना,सांप्रदायिक व सहिष्णुता प्रेरक, महिलाच्या समान हक्कासाठी संघर्षरत, शेतकरी/शेतमजूर व कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये,शांतता व अहिंसेचे समर्थक, बहुजन समाजाचे उद्धारक प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत.गोरगरीब वंचित,शोषित,पीडित, महिला, कामगार आणि सर्वच स्तरातील घटकांना न्याय, हक्क व अधि...
Article

भारतीय ज्ञानक्रांतीचे जनक : राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले

महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म ११एप्रिल १८२७ ला सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.गोविंदरावांना उदरनिर्वाहासाठी अहोरात्र झगडावे लागेल. त्यांनी पुण्याला येऊन भाजीपाल्याचा व फुलांचा व्यवसाय केला .त्यांचे उपनाव गो-हे होते. पण फुलांचा व्यवसाय मुळे लोक त्यांना फुले म्हणू लागले.    तो काळ अतिशय धकाधकीचा होता. परकीय सत्ता भारतात राज्य करीत होती. तसेच भारतातील समाजव्यवस्था विषमतेने बरबटली होती. सारीकडे अन्यायाचा आगडोब भरला होता. अशा कठीण परिस्थितीत गोविंदरावांनी मुलाला १८४१ला एका स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत घातले तेव्हा. ते चौदा वर्षांचे होते. या शाळेत खऱ्या अर्थाने ज्योतिरावांना मानवतावादाचे शिक्षण मिळाले.   समाजव्यवस्थेचे दहाक चित्र समजले अस्पृश्यतेच्या हाल-अपेष्टा शुद्राचे कष्ट...
Article

पातूरच्या गिन्न्यांची गोष्ट ….!

तो दिवस होता 31मे 1974 चा. दिवस उजाडला नेहमीप्रमाणेच पण काहीतरी वेगळं घेऊन.पहाटे शेतात फेरी मारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला नदीपात्रात जे दिसलं ते बघून त्याला हर्षवायू झाला नाही हेच नवल! समोरील दृश्य बघून सुर्य उगवेपर्यंत ''सुर्य -भानावरच " आला नाही. काय काय नेऊ ....किती किती नेऊ ....आणि कसं कसं नेऊ ...या संभ्रमात असतानाच त्याने आपल्या सदऱ्याभोवती कंबरेला दोरी बांधली; आणि हाती लागतील तितक्या सोन्याच्या गिन्न्या त्यात भरल्या आणि घराकडे निघाला. हळूहळू ही वार्ता शेजाऱ्यांमधे पसरली. बघता बघता सारा पातूर गाव नदीपात्रात उलटला. ज्याला जे नेता येईल , जितकं नेता येईल तितकं तो वाट्टेल तसा नेऊ लागला. मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात गावकरी दसऱ्याच्या सोन्यासारखं खरंखुरं सोनं लुटत होते. प्रत्येक घरात एक अलीबाबा तयार झाला होता.   हळूहळू बातमी वाऱ्यासारखी पोलीस स्टेशन पर्यंत गेली. त्यावेळी पातूरचे ठाणेद...
Article

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (भारतीय समाजसुधारक)

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (भारतीय समाजसुधारक)       *जन्म : ११ एप्रिल १८२७*         (खानवडी, पुणे,महाराष्ट्र)      *मृत्यू : २८ नोव्हेंबर  १८९०*               (पुणे, महाराष्ट्र)   टोपणनाव : जोतीबा, महात्मा संघटना : सत्यशोधक समाज प्रमुख स्मारके : भिडे वाडा,                         गंज पेठ ,पुणे धर्म : हिंदु प्रभाव : शिवाजी महाराज,थॉमस पेन प्रभावित : डॉ. बाबासाहेब आंबेडकर , नारायण मेघाजी लोखंडे , केशव सीताराम ठाकरे वडील : गोविंदराव फुले आई : चिमणाबाई फुले पत्नी : सावित्रीबाई फुले अपत्ये : यशवंत   प्रस्तावना:-  आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे.या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले व त्यांचा वारसा आजपर्यंत ग्रंथालयात पुस्तकं द्वारे ग्रंथांद्वारे काव्या द्वारे ते सम...
Article

प्रिय क्रांतीबा आजोबा,

रोज असता तुम्ही विचारात,जाणीवेत, कृतीतही , असलाच पाहिजे तुमच्यामुळेच तर आहे हा सारा आत्मविश्वासाचा वावर. आज देशातील समग्र महिलावर्गास लाभलेली सारी सुखं, स्वावलंबन, दृष्टी-दृष्टिकोन आणि विचार तुम्हीच दिलेत! तुम्हीच केल्यात विकसित आमच्या विचार आणि ज्ञानकक्षा...        क्रांतीबा आजोबा, त्या प्रतिकूल सनातन काळ्या करंट्या काळात कैक वर्ष पुढे बघण्याचे द्रष्टेपण, इथल्या मूलभूत प्रश्नाला भिडण्याचे, समतेसाठी ठाम उभे राहण्याचे, विचार कृतीत आणण्याचे, व्यवस्थेला हादरे देण्याचे, सारे सोसूनही मागे न हटण्याचे, घरापासून बदलाची सुरुवात करण्याचे, पुरुष असून मातृह्र्दयी पुरुष होण्याचे, काळाला आणि दुष्टांना झुकवण्याचे, अक्षर ओळख करून अवघ्या स्त्री वर्गाचा उद्धार करण्याचे, दांभिकाना पुरून उरण्याचे, असत्याचा मुखवटा टराटरा फाडण्याचे, सनातन वर्चस्वाला घाम फोडण्याचे, पुरुषसत्ताक अव्यवस्थेला बदलवण्याचे, पारंपरिक ...
Article

कौटुंबिक छळात पुरुषही पीडित…!

गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचाराबाबत आपल्या समाजातला एक वर्ग संवेदनशील झाला आहे. काही माध्यमेही या बाबत जागरूक झाली आहेत. त्यामुळे एखाद्या कुटुंबात विवाहित महिलेचा छळ होत असेल तर तिथे हे संवेदनशील लोकही धावून जातात आणि माध्यमेही अशा अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर छापून त्यांंना वाचा फोडतात.पत्नीच्या छळाला कंटाळून पुरुषांनी आत्महत्या केली तर माध्यमे व समाज उलटसुलट प्रतिक्रिया देतात.छळ स्त्रियांचाच होतो असं नसून अनेक कुटुंबात पत्नी नवऱ्याला मोठ्या प्रमाणात छळतात.काही प्रकरणे समोर येत असली तरी पत्नी पीडित पुरुषांना न्याय मिळेलच याची शास्वती नसते,अशा परिस्थितीत काही संवेदनशील पत्नी पीडित पुरुष आत्महत्या करून स्वतःला संपवून घेतात.    अशीच एक घटना नागपूर ला घडली.पत्नी व सासरच्या लोकांना कंटाळून एका डॉक्टरने चक्क स्वतःला भूल चे इंजेक्शन लावून घेत स्वतःला संपविले.पत्नी व सासरच्या लो...
Article

होय, जगातील सर्वांत मोठा न्यायी आणि प्रजाहीत दक्ष राजा म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोकाच…!

आजकाल बऱ्याच राजांना, महाराजांना, सम्राटांना चक्रवर्ती म्हणण्याची प्रथा पडली आहे. मात्र, अशोका हा जगातील खरा खुरा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे आणि खरं चक्रवर्ती पद हे फक्त अशोकाच्याच चरणावर विराजमान होते हे अनेक देशी विदेशी लेखकांनी मान्य केलेल्या पुराव्यावरून सिध्द करता येते. मि. व्हिन्सेंट स्मिथ सारख्या पाश्चात्य इतिहासकार सुध्दा अशोका बद्दल लिहितात की, "His (Asoka's) domination were far more extensive than British India of today, excluding Burma." (Ref.V.Smith's Asoka,3rd edition,Pg.81).अर्थात,आज ब्रिटीश भारत हे नाव ब्रम्हदेश वगळून जेवढ्या प्रदेशांना देण्यात येते, त्याहीपेक्षा जास्त विस्तृत प्रदेश अशोकाच्या सत्तेखाली होता.कारण अफगाणिस्तान व बलुचिस्तान हे ब्रिटीश भारतात मोडत नव्हते, पण अशोकाच्या वेळी ते अशोकाच्याच सार्वभौमत्वाखाली होते. त्यावेळी कॉल, पांड्य, योन, गांधार, पितनिक, आंध्र, कलि...