Tuesday, December 9

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

धोका वाढत्या तापमानाचा…

* वाढत्या उष्णतेचा आरोग्य, शेती, अर्थकारणा वर परिणाम गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या वाढत्या उन्हाच्या झळा ह्या दुपारनंतरच नाही तर दिवसा उजाडताच सुरु होत आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून सध्या सूर्य उजाडताच आग ओकतोय अशी अवस्था झाली आहे. १२१ वर्षात यंदाचा मार्च महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला आहे. शिवाय मे महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे   हवामानात वेगाने होत असलेले हे बदल म्हणजे जलवायू परिवर्तनाचा परिणाम आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. धोका आपल्या अगदी जवळ आल्याचे संकेत परिस्थिती आपल्याला देतेय. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या द़ृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.    मार्च महिन्यातल्या उकाड्याने १२१ वर्षांचा विक्...
Article

मध्ययुगातील समाजवादी अर्थतज्ञ : महात्मा बसवेश्वर

मध्ययुगात (बाराव्या शतकात) भारतातील सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या विविध समाज सुधारकांमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.मानवतावादी समाजाची उभारणी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. समाजातील अनिष्ट प्रथा,रूढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता.प्रस्थापितांच्या विरोधातील हेच बंड तद्दनंतरच्या काळातील समाज सुधारकासाठी प्रेरणास्त्रोत आणि पथदर्शक ठरले आहे.अगदी बालपणापासून सुधारणेचा वसा आणि परिवर्तनाची कास उराशी बाळगणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी अक्षयतृतीयेच्या दिवशी झाला आहे.मादलांबीका आणि मादीराज हे त्यांचे माता-पिता.वडील मुळातच श्रीमंत अन अग्रहाराचे प्रमुख असल्याने गरिबाचे जिने त्यांच्या वाट्याला फारसे आल...
Article

अक्षय तृतीया;केवळ पुजापाठ नको,कर्तृत्वही हवं..!

अक्षय तृतीया भारतात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण आहे.हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करतात.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा आहे.या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा खालीलप्रमाणे या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जातो.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व आहे.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व आहे.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जातो.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जातात.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास प्रारंभ केली.याच दिवशी युधीष्ठरा...
Article

महाराष्ट्रातल्या ‘हुनर’बाज महिला उद्योजक

निर्जीव वस्तूंमध्ये जिवंतपणा आणण्याची किमया जर कोणी करू शकत असेल तर तो म्हणजे एक कलाकार!आपल्या कलेच्या परिसस्पर्शाने हा कलाकार कधी एका निर्जीव कागदावर रेखाटलेल्या चित्रालाही बोलतं करतो.. तर कधी मातीतून घडवलेल्या शिल्पालाही आपलंसं करतो..तर कधी एका साध्या दगडातही जीव आणतो...अशाच एकापेक्षा एक सरस किमया, लीलया साकारल्या आहेत आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कलाकारांनी! आणि या कलाकारांची ही कला पाहण्याची संधी जिथे मिळाली, जिथे या कलाकारांचं हुनर बघता आलं, ते ठिकाण म्हणजे 'हुनर हाट'!  आपल्या देशातल्या या अस्सल कलाकारांची ही हुनर जगासमोर यावी, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेले हे एक उत्तम व्यासपीठ!केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने मुंबईत यंदाचं 40 वं हुनर हाट प्रदर्शन आयोजित करण्यात ...
Article

भारतीय कामगार चळवळ…

भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले.यांचे एक हुशार, निष्ठावान, तरुण तडफदार, कर्तृत्ववान सहकारी, दीनबंधू पत्र यशस्वी, समर्थपणे चालवणारे, संपादक, झुंजार पत्रकार, स्वतःच्या जीवनातील सुखाची पर्वा न करता, कामगारांसाठी झिजणारे, कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे.१९ व्या शतकात प्रथम सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे. मुंब‌ईतील मांडवी भागात नारायण लोखंडे हे एका कापड गिरणी मध्ये भांडारपाल म्हणून काम करत होते. तिथे त्यांना १३ - १४ तास काम करावं लागत होतं. काम करत तेथील दहशतीला कंटाळून त्यांनी कापड गिरणीतील नोकरी सोडून दिली.आणि स्वतःस कामगार चळवळीत वाहुन घेतले. २३ सप्टेंबर १८८४ रोजी ' बाॅबे मिल हॅंडस् असोशिएशन् ' ही‌ गिरणी कामगार संघटना स्थापन केली. आणि येथुनच खऱ्या अर्थाने भारतीय कामगार चळवळीस सुरुवात झाली.कोणतीही चळवळ ही एका अर...
सौरऊर्जा काळाची गरज…!
Article

सौरऊर्जा काळाची गरज…!

सौरऊर्जा म्हणजे सुर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सुर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीने वाढली आहे.ऊर्जा निर्मिती चे पारंपरिक स्रोत आता संपण्याच्या मार्गावर आहेत…सरपण, शेणाच्या गोवर्‍या, पेंढा हे पारंपारिक इंधन वर्षानुवर्षे वापरले जात आहे. याशिवाय कोळसा, खनिज तेल, जल ऊर्जा, अणुऊर्जा इत्यादींचा पारंपारिक ऊर्जा संसाधनांत समावेश होतो. सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात...
Article

लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती

वाचाल तर वाचाल, हे माझे बाबा सांगायचे. माझे आई बाबा वाचनाचे मोठे भोक्ते होते व त्याचमुळे लहानपणापासून आम्हाला ही वाचनाची गोडी लागली. अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीची पुस्तके घालून वाचत होतो व त्या करता ओरडा ही खाल्ला होता. चांदोबा, गोड गोड गोष्टी, परी कथा, श्यामचीआई, दिवाळी अंक, कांदबऱ्या इत्यादी गुपचूप शाळेत असताना वाचत होतो. इंग्रजी शाळेत होतो, घरी कोंकणी बोलत होतो. मराठी थोडी मोडकी तोडकी येत होती. पण एक मात्र नक्की की मराठी भाषे बद्द्ल आपुलकी वाटत होती. मातृभाषा म्हणून मराठी लावत होतो ना, त्यामुळे असेल.  लहानपणी मैत्रिणींकडे पुस्तकांची देवाण घेवाण करत होतो, आताही करतो. माझी आवड माझ्या दोन्ही मुलींनी ही घेतली. एखाद्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'चि. .......यांस, वाढदिवसा निमित्त सप्रेम भेट व पुढे लिहिलेली तारीख हे वाचायला किती छान वाटत  होतं. खूप वर्षांनी ते पुस्तक हाती आलं की, ते दिलेली ...
Article

स्वत:च्या डोक्याचा वापर करा…!

शेती करणारा शेतकरी आज अडचणीत असला, तरी।शेतीसाठीचे पुरवठादार आणि सल्लागार लखोपती, करोडपती आहेत. खत, बी-बियाणे, कीटकनाशके पुरवणारे कृषि सेवा केंद्रवाले असोत की, शेतीत उत्पादन कसं वाढवायचं, कोणती पिकं घ्यायची, याचं मार्गदर्शन करणारे सल्लागार असोत, त्यांचंही छान चाललयं. यांनाही शेतीतील जोखमीचा फटका बसत नाही. फटका बसतो तो फक्त शेतकऱ्यांना. हा जमाना प्रसिद्धीचा, खऱ्या खोट्या प्रचाराचा, मार्केटिंगचा आहे. त्यात भलं-बुरं दोन्ही खपवलं जातं. हे मार्केटिंग शेतकऱ्यांना चक्रावून सोडणारं असतं.   कोणी म्हणतं, आंबा लावा, डाळिंब लावा; कोणी द्राक्ष, कोणी शेवगा लावा म्हणतं; तर कोणी बांबू लावा, चंदन लावा म्हणतं. कोणी भाजीपाला लावायला सांगतं, तर कोणी फुलशेती करा म्हणतं. एक नाही, शेकडो सल्ले. डोळे फिरवणाऱ्या अनेक यशकथा. कोणी कोथिंबीर विकून कसा लखोपती झाला हे सांगतं, तर एक एकर आंब्यात २५ लाखाचं उत्पन्न झाल्याचं...
Article

आई-वडिलांची नि:स्वार्थ वारसदार म्हणजे कन्या…!

*उपकार विसरलेला पुत्र फक्त दावेदार एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला होता. तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणा-यांपैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला. मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुपये देणे आहे. त्यामुळे जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत मिळणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करू देणार नाही असा पवित्रा त्याने घेतलेला...जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले.   तेवढ्यात मृत व्यक्तीची मुले बोलू लागली की, आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबतीत सांगितले नाही. त्यामुळे आम्ही हे कर्ज देणार नाही. तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की, मुले जबाबदारी घेत नाही तर आम्ही पण देऊ शकत नाही. आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत पोहोचली होती.   ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच...
Article

थोर समाजसुधारक – महात्मा ज्योतिबा फुले

भारतमाता ही शुरविर नररत्नाची खाण आहे. महाराष्ट्राला महापुरुषांची उणीव कधीच भासली नाही. एकोणिसाव्या शतकातील भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते, संशोधक, विचारवंत, लेखक, प्रख्यात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले.सामाजिक , शैक्षणिक सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झिजणारे, माणसाच्या मनामध्ये समतेच्या क्रांतीची विचारधारा प्रेरित करणारे मानवमुक्तीसाठी समतेची चळवळ उभारणारे समतेचे खंदे पुरस्कर्ते सत्यशोधक ज्योतिबा फुले.   भारतातील अनिष्ट रूढी, परंपरा ब्राम्हणांच्या वर्चस्वाविरुध्द् बंड करुन शेतकरी, कष्टकरी, दीन दुबळ्या समाजासाठी चळवळ उभारुन तिचे खंमकं नेतृत्व केले. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतील स्त्री शिक्षणाचे पहिले प्रणेते होते हे विसरता कामा नये.त्यांनी आयुष्यभर स्त्रीयांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलें यांनी केला आहे.व...