Monday, December 8

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

झोळी आत्मकथन पर कादंबरीचे परीक्षण….. गणेश शेलार सरांच्या नजरेतून…

झोळी आत्मकथन.. मला स्वतः च्या मनाला चटका लावून गेले. साहित्य क्षेत्रात कार्यरत लेखक, साहित्यीक, कवी, समीक्षक, प्राध्यापक, वाचक ,विद्यार्थी यांची आकलन वेगवेगळे अर्थ काढून मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.सरांनी अत्यंत मार्मिक झोळी आत्मकथन पर कादंबरीला साजेशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. ती मला विशेष भावली आहे. ती आतून लिहलेली आहे त्यामुळे वास्तव दर्शन अधिक व्यापक अर्थाने विचार करून बघावा यासाठी मदत होते. सरांचे व्यापक आकलन वाचून दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना सरांनी लिहावी असे वाटते आहे.....झोळी आत्मकथन वाचकाला अंतर्मुख करणारे लेखन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना तळागाळातल्या समाजाला कितपत न्याय मिळाला असा प्रश्न उपस्थित होतो. पारंपारीक व्यवसायाप्रमाणे आपली उपजिविका भागविणारा नाथपंथी डवरी गोसावी समाज आजच्या काळात कुठल्या स्थितीत वावरतो आहे. याचं विदारक चित्र झोळी आत्मकथना...
Article

समाजातील विस्कटलेली नाती…

बदलती जीवनशैली, जगण्याचा अतिउच्च दर्जा, तसेच मनामध्ये असलेला एकमेकांविरुद्ध होणारा गैरसमज हा नुसता विचार बदलवत नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला माणसा पासून दूर नेण्याचा प्रत्यक्ष वां अप्रत्यक्ष रीत्या प्रयत्न करीत असतो. खर तर आज समाजात सगळी कडे विभक्त कुटुंब पद्धती दिसून येते आहे. या पद्धतीचा अवलंब होऊन नात्या मध्ये नुकताच खंड पडत नाही तर त्यामध्ये असलेल्या प्रेमाचा शेवट होतांना दिसतो आहे. मित्रांनो ही खरच खूप दुःखाची बाब आहे खर तर आपला भारत देश हा संस्कृतीने सजलेला आणि एकता निर्माण करणारा देश आहे परंतु आता मात्र या नात्याला नावच खोट वेष्टन लावलेलं दिसतंय.  आज दोन दिवसाचा लग्न करून आलेला मुलगा आपल्या बायको साठी स्वतःच्या जन्मदात्या आई बाबाला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो, धन संपत्ती साठी भावा भावाचे रक्ताचे नाते तुटताना दिसत आहे, तेवढंच नाही तर इस्टेट मिळवण्यासाठी एकमेका...
Article

जलनायक सुधाकरराव नाईक साहेब

आज 10 मे 2022 'जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब' यांचा स्मृतीदिन.बघता बघता सुधाकरभाऊनां जावुन 22 वर्ष झाले. सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या दु:खद निधनानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. बंजारा समाजाला नेता आहे. परंतु समाजात नेता असणे हयात फरक आहे. मा.मनोहरभाऊ नाईक, मा.हरिभाऊ राठोड, मा.संजयभाऊ राठोड, मा.अँड.निलयभाऊ नाईक, मा.प्रदीप नाईक, मा.इंद्रनील नाईक, मा.राजेश राठोड, मा. डॉ. तुषार राठोड, आजही नेतेमंडळी आहेत. परंतु सुधाकरभाऊ सारखी दुरदुष्टी जोपासणारी व्यक्ती मिळणे दुरापास्त आहे.. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते. राजकारणात सरंपच,सभापती, जिल्हा परीषद अध्यक्ष, ते मुख्य मंत्री,राज्यपाल व्हावे लागल्याने सुधाकरभाऊंच्या परिपक्वपणा,संस्कारातुन, अनुभवातून, आणि 'महानायक वसंतराव नाईकसाहेब' यांच...
Article

तथागत गौतम बुद्धाचा विज्ञानवादी धम्म

मानवी समाजाला नवे उन्नयपंख देण्याचे काम जगात फक्त आणि फक्त बुद्धाने केले आहे. जगातील सारे धर्म हे दैववादी या विचारसरणीचा भाव ठेवून माणसाला काल्पनिक जीवनाच्या अंधारगुहेत घेऊन जातात. पण तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म मानवाला जीवनातील सत्याचा शोध घेऊन मानवतावादाचे निखळ नंदनवन निर्माण करण्याचे काम करत आहे.   तथागत गौतम बुद्ध यांनी अत्यंत कठीण तपश्चर्या केली. विविध गुरूकडून जीवनाचे ध्येय काय,? माणूस दुःख मुक्त होण्याचे काय साधने आहेत ? यावर विचार मंथन केले. अनेक प्रश्न विचारले .पण कोणत्याही गुरुने त्यांच्या विवेकशील व तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरे दिली नाही. ही पृथ्वी एक दैवी शक्तीचा सानिध्यात आहे. त्यासाठी माणसाने दैवी शक्तीची उपासना करावी असे अनेक विचार त्या काळात थैमान घालत होते .भारतामध्ये सिंधू सभ्यता नंतर अंधकारमय वातावरण पसरले. आर्य लोकांच्या विकृत व्यवस्थेने येथील जेत्याला जिंकून दास केले...
Article

भारतमातेच्या हटवादी कुपुत्रांचा चेहरा उघड करणारा डॉ. युवराज सोनटक्के यांचा कवितासंग्रह: ‘ ‘प्रश्नांची मातृभाषा’..!

प्रश्नांची मातृभाषा'.. या कवितासंग्रहातील सगळ्याच कविता ताकतीच्या आहेत. ही ताकद पुरवणारे स्रोत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत आहेत. त्यांच्या विचारातून परिपक्व झालेला हा कवी या सर्व कवितेच्या माध्यमातून प्रश्नांची भूमी उभी करतो आहे. त्यावर उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून बाबासाहेबांना या कविता संग्रहामध्ये त्यांनी 'शिखर- पुरुष' म्हटलेले आहे. विज्ञानमातृक बुद्ध ही सांगितला आहे.   कवी इथल्या जहरी क्षितिजावर उभा असून वास्तवाच्या सागराला, त्याच्या प्रत्येक हालचालीला, प्रश्नवाचक संवादाने, उरातल्या पेटलेल्या आगीने, आपल्याला आलेल्या अनुभूती, जाणीवेतून, जागृत असलेल्या संवेदना घेऊन, दुष्काळग्रस्त प्रदेशातून, आपल्या सहचरी ला प्रमाण साक्षी सोबत घेऊन, जीवनाचे यथार्थ मूल्य जपण्यासाठी, इथल्या हटवादी, भारतमातेचे कुपुत्र, यांचा चेहरा आपल्या कवितेतून उघड करीत, आपल्या आतड्यातली भूक ज...
Article

दु:खीतांचे तिमीर जावो…

आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. येथील ७०% लोक खेड्यात राहतात. खेड्यातील बहुतांश लोक गरीबीचे, दारिद्र्याचे, हलाखीचे, कष्टमय, भटक्या स्वरूपाचे जीवन जगतात, जगत असतात. शहरांप्रमाणे खेड्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सार्वजनीक रस्ते, आरोग्यासाठी दवाखाने, वीज, शिक्षण घेण्यासाठी उच्च दर्जाच्या शाळा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सार्वजनीक गटारी, रोजगाराच्या सोयी-सुविधा अशा मूलभूत सुविधा नाहीत. यावरून असे लक्षात येते की, किंवा खरे पाहिले तर असे जाणवते की, गरीब, वंचित, दुर्लक्षित, शोषीत, पिडीत, अन्यायग्रस्त, दिन-दुबळे यांना आवाज निर्माण करणार्‍या म्हणजेच ध्वनी निर्माण करणार्‍या साधनांची अडचण, समस्या, अडथळे मुळीच नाही. खरी अडचण, समस्या, त्रास, अडथळे आहे ते म्हणजे श्रेष्ठ-कनिष्ठ, उच-निच, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य, जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्णभेद, व्यंग भेद, पोषाख भेद, भाषा भेद अ...
Article

प्रश्नांची मातृभाषा:मानवी सौंदर्याची सूर्यपौर्णिमा

"माणसं संभ्रमित झाले तर एकवेळ समजून घेता येईल पण कवीनं संभ्रमित होण्याची कोणतीही सोय कवी या शब्दात नाही. माणसं वीझली तर तेही एकवेळ समजून घेता येईल, पण कवीच विझणं कवि या शब्दालाच मान्य नाही. माणसं बेजबाबदार झाली तर एकवेळ समजून घेता येईल पण कवी या शब्दाच्या अर्थामध्ये कोणत्याही बेजबाबदारपणा बसतच नाही. त्यांन असंत्याच्याविरोधात आणि सत्याच्या बाजूने सतत बोलत राहिले पाहिजे. कवीचं हेच जन्म प्रयोजन आहे." कवी यशवंत मनोहर यांनी कवीच्या जीवनाचे नवोनम्षेशन समजून सांगितले आहे. नेमका कवी कोणत्या दिशेने आपला मार्ग धरतो यावर त्याच्या कवीचे यश अवलंबून असते.   कवी युवराज सोनटक्के यांच्या प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह मानवी मनाच्या भावविश्वाच्या तळाचा वेध घेत आहे. अग्नीशाळेच्या प्रगल्भ यशानंतर त्याचा हा दुसरा कवितासंग्रह प्रश्नांच्या उकलतेचे नवे क्रांतीसूत्र आहे. सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व सांस्कृत...
Article

कोरा कागद ; निळी शाई..!

पेन मध्ये 'शाई' भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची. ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला 'सहनशील' बनवलं. तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता.आमच्या पिढीने 'आई-बापाचा' कच्चून मार खाल्ला. भरीस भर एकत्र कुटुंबातील काका, काकी, मावशी, आत्या, मामा, मामी, आजी, आज्जा आणि उरला सुरला गल्लीतील मोठ्या माणसांचा. तरीही त्यात 'मजा' होती.   शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती. कान धर. कोंबडा हो.बेंचवर उभे रहा. अंगठे धर. वर्गाबाहेर उभे रहा. अशा सगळ्या 'शिक्षा' निमूटपणे सहन केल्या. शिक्षकांच्या सपासप 'छड्या' खाल्ल्या. यातूनही 'सहनशीलता' वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी न्यारीच होती जुन्या कपड्यांची शिउन घेतलेली 'दप्तराच...
Article

धोका वाढत्या तापमानाचा…

* वाढत्या उष्णतेचा आरोग्य, शेती, अर्थकारणा वर परिणाम गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या वाढत्या उन्हाच्या झळा ह्या दुपारनंतरच नाही तर दिवसा उजाडताच सुरु होत आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून सध्या सूर्य उजाडताच आग ओकतोय अशी अवस्था झाली आहे. १२१ वर्षात यंदाचा मार्च महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला आहे. शिवाय मे महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे   हवामानात वेगाने होत असलेले हे बदल म्हणजे जलवायू परिवर्तनाचा परिणाम आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. धोका आपल्या अगदी जवळ आल्याचे संकेत परिस्थिती आपल्याला देतेय. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या द़ृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.    मार्च महिन्यातल्या उकाड्याने १२१ वर्षांचा विक्...
Article

मध्ययुगातील समाजवादी अर्थतज्ञ : महात्मा बसवेश्वर

मध्ययुगात (बाराव्या शतकात) भारतातील सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या विविध समाज सुधारकांमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.मानवतावादी समाजाची उभारणी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. समाजातील अनिष्ट प्रथा,रूढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता.प्रस्थापितांच्या विरोधातील हेच बंड तद्दनंतरच्या काळातील समाज सुधारकासाठी प्रेरणास्त्रोत आणि पथदर्शक ठरले आहे.अगदी बालपणापासून सुधारणेचा वसा आणि परिवर्तनाची कास उराशी बाळगणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी अक्षयतृतीयेच्या दिवशी झाला आहे.मादलांबीका आणि मादीराज हे त्यांचे माता-पिता.वडील मुळातच श्रीमंत अन अग्रहाराचे प्रमुख असल्याने गरिबाचे जिने त्यांच्या वाट्याला फारसे आल...