Thursday, November 13

कपाळावर कुंकू का लावतात?

विवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल, पण यामागील कारण काय? हे विचारल्यावर केवळ यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारणंदेखील आहेत.
 
कुंकाने ताण दूर होतो. कुंकात मक्युरी अर्थात पारा असतो. कुंकूमध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने ताण दूर होतो, आणि डोकं शांत राहतं. लग्नानंतर कुंकू लावण्यामागील कारण आहे की, याने रक्त संचार सुधारण्यासह यौन क्षमतादेखील वाढते.
 
* सौंदर्य वाढतं :
कुंकू लावल्याने महिलांचा सौंदर्यामध्ये अजून भर पडते. अर्थातच महिलांचे सौंदर्य खुलून उठते. कुंकू लावण्याने चेहर्‍यावर वेळेपूर्वी सुरकुत्या पडत नाहीत. तसेच कुंकू महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो. कुंकू लावताना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्रावर दाब दिला जातो. त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.
 
*एकाग्रता वाढते :
योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे. आज्ञा चक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते. जेव्हा आज्ञा चक्रावर दबाव पडतो, तेव्हा मन एकाग्र केले जाते. आज्ञा चक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते.
 
* वैज्ञानिक कारण :
भांगेत कुंकू लावणे, हे केवळ रूढी परंपरा आहे की त्या मागे काही वैज्ञानिक कारण आहे? जाणुया. ब्रम्हरंध आणि अध्मि नावाचे मर्मस्थानाचे बरोबर वरच स्त्रिया कुंकू लावतात. त्यालाच सामान्य भाषे मध्ये भांग असे बोलतात, पुरुषांपेक्षा स्त्रियांचा भांगाची जागा खूप कोमल असते.
 
संकलन : सदानंद पाटील, रत्नागिरी.,प्रविण सरवदे,कराड 
 
(स्त्रोत: आंतरजाल)

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply