Sunday, October 26

Tag: Article

Article

‘अर्ल डिक्सन’ चा आज जन्मदिवस…

आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट सांगतोय.‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले. दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती. समस्या फार मोठी होती असं नव्हे, पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली की तिला जखम झालीच समजा.टोमॅटो कापला लागला चाकू, दार बंद करायला गेली लागला खिळा, दुध गरम करायला गेली बसला चटका. जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा ध...
जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!
Article

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

* आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते. * सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. * लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात. * ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. * शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते. * लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते. * ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे, पोटात वायू होणे, ढेकर येणे अशी ...
‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?
Article

‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?

'विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का? जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशी सज्जन आणि सभ्य लोकांची अस्वस्थता वाढतांना दिसते आहे. तिकडे मंबाजीच्या हालचालीही वाढत आहेत. मंबाजीची पिलावळ सर्वशक्तीनिशी कामाला लागली आहे. त्यांची भिस्त त्यांच्या स्वतःच्या कुटीलपणावर आहे. देशाच्या लुटीतून गोळा केलेल्या पैशावर आहे. द्वेष हा त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. चन्द्रभागेच्या पाण्यात विष मिसळण्याची धडपड ते जिवाच्या आकांताने करताना दिसत आहेत. पंढरीचे पावित्र्य अबाधित राखण्याची जशी शेवटची संधी वारकऱ्यांसाठी आहे, तशीच मंबाजीच्या पिलांसाठी देखील, पंढरपूर आणि संपूर्ण चंद्रभागा ताब्यात घेण्याची ती शेवटची संधी आहे. दोन्ही बाजुंनी ’करा अथवा मरा’ अशीच २०२४ची लढाई आहे. विमान विकलं, रेल्वे विकली, एलआयसी विकली, जंगलं विकली, समुद्र विकला, तसे पंढरपूर आणि चंद्रभागा अडाणी-अंबानीच्या नावाने करण्याच्या हालचाली स...
Article

Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र

Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, अनेक संकटातून स्व कर्तुत्ववाने, शिक्षण पूर्ण करुन अहिक जीवन सुखासमाधानाने डाॅ. सुजय पाटील यांना जगता आले असते पण तेही एम. बी. बी. एस. ची वैद्यकीय पदवी पदरात असतांना. हा अवलीया सर्व सुखाला लाथाडून शेतकरी बांधवाविषयी सेवा करण्याचे वेड डोक्यात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा, जीवन जगण्यासाठी चैतन्य देणारा फकीरच. त्याच्या या कार्यास लाख लाख प्रणाम. दुस-याच्या विषयी मनात ममत्व निर्माण होणे तेही आजन्म कार्यरत राहणे ही साधी सोपी गोष्ट नाही. एवढी मोठी पदवी असतांना इतरासारखे पैशाच्या पाठी लागून मोठे इमले बांधून ऐटीत जीवन सहज जगला आले असते. ते झुगारून हा अवलीया कास्तकार कुटुबातील असून स्वप्रयत्नाने शिक्षण घेऊन परिश्रमाने स्वतःचा विकास करतांना कास्तकारबांधवांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा संकल्प करुन...
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. आंबेडकर हे केवळ संविधानाचे निर्मातेच नव्हे तर ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञही होते.डॉ.भीमराव आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना बनवण्यात तर महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून देशाच्या उभारणीतही मोलाचे योगदान दिले.डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव येताच भारतीय संविधानाचा उल्लेख आपोआप येतो. संपूर्ण जग त्यांना एकतर भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून किंवा भेदभाव करणाऱ्या जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणारे योद्धा म्हणून स्मरण करतात .या दोन्ही प्रकारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय भूमिकेला कमी लेखता येणार नाही. पण एक दिग्गज अर्थतज्ञ म्हणूनही डॉ.आंबेडकरांनी देशाच्या आणि जगाच्या पटलावर अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.डॉ.आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे देशा...
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
Article

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा विद्येविना मति गेली |मतिविना निती गेली ||नितिविना गति गेली |गतिविना वित्त गेले ||वित्ताविना शुद्र खचले |इतके अनर्थ एका अविद्येने केले || या भुतलावर जन्मलेल्या माणसाजवळ जर शिक्षण नसेल, तर माणसाची काय अवस्था होते. याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा ज्योतीबांचा ध्यास होता.आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.महात्मा फुलेंचा हा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देऊन जात आहे. भारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालविलेल्या शाळा या काळात अस्तित्वात होत्या.पण बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करावी हे ध्येय मात्र त्यांचे नव्ह...
एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!
Article

एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका...!  एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक सवलती दिल्या जातात.एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अंध-अपंग, महिलांसाठी महामंडळ २९ प्रकारच्या विविध सवलती देण्यात येतात.मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून स्मार्ट कार्ड तयार सवलत घेण्यात येत असल्याने केले जात असून एस टी महामंडळाला लाखो रुपयांचा फ्टका. बसत असल्याचे समोर आले आहे. ● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ........ एस टी महामंडळाला सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे बसत आहे. बोगस कागदपत्रे सादर करून स्मार्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. कागदपत्रांची तपासणी न करता महामंडळ अनेकांना या योजनेचा लाभ मिळवून देत आहे. सवलतीचा लाभ मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक देखील बिनधास्...
संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
Article

संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ जगभरातील विविध देशाच्या संविधाना पैकी भारतीय संविधान हे लोकशाही प्रधान असलेले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.विविध जाती,धर्म,पंथ बोलीभाषा आणि रूढी,प्रथा,परंपरा असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशातील समस्त नागरिकांना एका धाग्यात गुंफण्याची किमया ही भारतीय संविधानाने करून दाखवीली आहे.सात दशकांचा कालावधी उलटूनही भारतीय संविधान अबाधित आहे. घटनाकारांची दूरदृष्टी यासाठी कारणीभूत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून आणि अहोरात्र कष्ट उपसून ही सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना लिहिली.भारतीयासाठी ही एकप्रकारची अनमोल अशी देणगीच म्हणावे लागेल. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा विधिग्राह्य आणि नियमानुसार सुव्यवस्थितरित्या चालावा यासाठी भारतीय संविधानाचा अंगीकार करण्यात आला.भारतीय संविधान सभेमध्ये एकूण २९६ सदस्य आणि मसुदा समि...
बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत
Article

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत प्रत्येक जीवा जीवाची भावना, आचारविचार आदानप्रदान करण्याची एक शैली असते तिलाच आपण भाषा असे म्हणतो. प्रत्येक पशुपक्षी, प्राण्यांची सुध्दा एक भाषा असते. भलेही त्यांची भाषा आपल्याला कळत नसेल; परंतु त्यांची भाषा त्यांना मात्र कळते कारण त्याद्वारे ते त्यांचा जीवन व्यवहार व्यतित करित असतात. जगात मानव जात ही सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान गणल्या गेली; याचे कारण म्हणजे मानवाला निसर्गाने प्रदान केलेले बुध्दी चातुर्य होय. मानवाने आपली स्वतःची एक भाषा विकसित केली. त्या माध्यमातून तो विचारांची आदानप्रदान करायला लागला. जगात आज अनेक भाषा बोलल्या जातात. त्यापैकीच एक आगळीवेगळी, स्वतंत्र असलेली भाषा म्हणजे बंजारा समाजाची मातृभाषा होय. पुरातन काळापासून हा समाज आपल्या मायड भाषाला (मातृभाषा) आजतागायत जीवापाड जपत आला आहे. मग भलेही आजपर्यंत कित्येक स्थित्यंतरे झाली असत...
Article

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

  बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ...