Sunday, October 26

Tag: #वंचित बहुजन आघाडी

फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!
News

फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!

फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सभेसाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. स्नेहल सोहनी यांना एका हॉटेलमध्ये ‘जात’ आणि ‘पक्षीय चिन्ह’ पाहून रूम देण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नेमके काय घडले?वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेसाठी डॉ. स्नेहल सोहनी या मुंबईतून अकोल्यात दाखल झाल्या होत्या. मुक्कामासाठी त्यांनी रायझिंगसन हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांना हॉटेलमध्ये रूम दाखवण्यात आली. मात्र, त्यांचे सामान उघडल्य...
प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?
News

प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?

प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या जागतिक ‘विश्वगुरू’ भूमिकेविरुद्ध तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, “जागतिक पातळीवरील अनेक देश पंतप्रधानांना मित्र मानत नाहीत, उलट भारतीयांची हकालपट्टी केली जाते. हा सर्व प्रयत्न दाखवण्यासाठी केला जातो की भारत ‘विश्वगुरू’ आहे की फक्त चपराशी?”भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवातील धम्म मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. जी. वानखडे उपस्थित होते. यावेळी वंचित आघाडीच्या प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी आमदार नातिकोद्दिन खतिब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.ॲड. प्रकाश आंबेडकर म्ह...
ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल
News

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्नआंबेडकर म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी...