Sunday, October 26

Tag: #मराठी साहित्य

तळेगावची धग…
Article

तळेगावची धग…

तळेगावची धग...मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ' धग ' कादंबरी माझ्या हातात पडली. खरं तर पाच वर्षांपासून मी ह्या पुस्तकाच्या शोधत होतो. पण सापडत नव्हते. त्याला कारणही तसेच होते. काय झाले की एकदा आई वडिलांचे खूप भांडण झाले. अधूनमधून ते व्हायचेच. असे भांडण झाले की वडील रागे भरत. मग त्यांचे जेवण बंद, म्हणजे उपोषण. अशी उपोषणं आणि सत्याग्रह घराघरातून सुरू असतातच. नवराबायकोचे भांडण झाले की दोघांपैकी एक रुसतो आणि दुसरा समजावत राहतो.वडील उपोषणाला बसले की त्यांना समजावण्याची जबाबदारी माझ्याकडे असे. खूप प्रयत्नानंतर ते उपोषण सोडायला राजी होत. आधी आईची खूप निंदा करत , मी हो ला हो लावत ऐकून घेई. मत प्रदर्शन मात्र करत नसे. कारण आईची बाजू घेतली तर त्यांचा राग अजूनच वाढण्याची भीती. आईच्या निंदेत सहभागी झालो तरीही पंचाईत. कारण आई स्वयंपाक खोलीच्या दाराआड बसून सारे ...
मराठीची उंची मोठी करूया!
Article

मराठीची उंची मोठी करूया!

मराठीची उंची मोठी करूया!मराठी भाषेकडे लक्ष द्या अशी विनंती करण्याची गरज आज आपल्या सर्वांवर आली आहे. मराठी भाषा मोठी आहे ही बाब सिद्ध करण्याची गरज नसताना आज मोठ्याने ठासून सांगावे लागत आहे की मराठी भाषेला समृद्ध करा. हे आपले किती मोठे दुर्दैव? आपलीच भाषा आज आपल्यासाठी परकी झाली आहे नव्हे ती आपणच परकी करून टाकली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कित्येक वर्ष करावी लागली. पुरावे सादर करावे लागले.मराठी भाषेची प्राचीनता व साहित्य समृद्ध असताना देखील राजकीय अनास्तेपायी व मराठी भाषिकांच्या अनास्थेपायी मराठी भाषेवर अवकळा आली आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ या संतांसह अनेक मराठी साहित्यिकांनी एवढे मोठे काम करून ठेवले आहे की ते साऱ्या जगाने पाहावे.मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा प्राकृत भाषेच्या...
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
Article

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेखसध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या  घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला. एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम  नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि.  अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल का...
मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!
Article

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात आज निधन झाले. जांभळढव्हपासून बिरडं पर्यंतचा प्रवास आज थांबला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव येथील ते रहिवासी होते.मराठवाड्याच्या तहानलेल्या मातीला, दुष्काळाने होरपळलेल्या शिवारांना आणि उपाशीपोटीही मुले शिकवणाऱ्या ग्रामीण आईच्या जगण्याला शब्द देणारा सशक्त आवाज आज कायमचा थांबला आहे. ख्यातनाम कथाकार भास्कर तात्याबा चंदनशिव यांच्या निधनाने मराठी साहित्य सजीव कथनकलेचे एक तेज गमावून बसले आहे. त्यांच्या कथांनी केवळ ग्रामीण समाजाचेच नव्हे, तर जातीय, स्त्रीवादी आणि दलित जीवनाचे दु:ख, आशा, संघर्ष आणि मूक करुणा आपल्या समोर उभी केली.१२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगावात जन्मलेल्या संवेदनशील या बालकाने पुढे मराठी साहित्याला कथाकार भास्कर चंदन...
कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक
Article

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिककला ही आत्माविष्काराची पहिली पायरी आहे, प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी कला असावी. माणसाला कधीही उपाशी ठेवत नाही. कला निराशामय काळोखातील एक प्रकाशमान बिंदू आहे, जो माणसाला वादळातील पणतीप्रमाणे सतत संघर्ष करत जगण्याची प्रेरणा देतो. अशा सुंदर लालित्यपूर्ण लेखन करणाऱ्या पुसद जि यवतमाळ येथील लेखिका निशा डांगे यांची कपाळ गोंदण ही ललितलेख असलेली साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. लेखिकेने स्त्री जीवनातील अनेक सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरील आलेले अनुभव या कलाकृतींमधून मांडले आहेत.कपाळ गोंदण या कलाकृतीतील ललित साहित्याच्या अनुषंगाने मुखपृष्ठावर साकारलेल्या भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रातिनिधिक चित्राने स्त्री जीवनातील अनेक गोष्टींना अधोरेखित केले आहे. ही कलाकृती स्त्री जीवनाला केंद्रस्थानी ठेवून तिच्या भोवती ...
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह
Article

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रहअरुण विघ्ने सर  संवेदनशील,आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या विचारचा जबरदस्त पगडा असणारा व त्यांच्या  विचाराचा सुगंध,परिमळ सर्वदूर आपल्या गझलेतून,कवितेतून फैलवणारा निर्मळ मनाचा साहित्यिक. 'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' अशी कळकळीची आस असणारा गझलकार, समीक्षक,स्फुट लेखक,व्यक्तीविशेष असा चौफेर लेखन करुन आपल्या वेगळ्या लेखन शैलीचा ठसा उमटविणारा साहित्यिक मित्र.निळ्या पाखरांनी नभाला गवसणी घालत नवे गीत गावे. नव्याचा स्विकार करत असतांना प्रसंगी उपाशी राहून समजदार होत स्वकमाई करुन आपल्या कमाईचा हिस्सा आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी खर्च करावा.स्वाभिमानाने भीमाच्या विचार रथाचे सारथ्य करावे ,आपल्या लेखनीच्या द्वारे जनाचा उद्धार करावा.कारण भीमाचे उपकार आपण कदापी विसरू नये.स्वतः लोकसेवक होऊन बुध्द वचनास जागवावे.हा विचार. रुजवता...
ती खूप बदलली आहे
Poem

ती खूप बदलली आहे

ती खूप बदलली आहेसमांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचेमहत्व वाढले आहे..ती अबला नव्हेआता सबला झाली आहे..हो, ती खरोखरच आता धीट झाली आहे.दर गुरूवारी धावपळ करते..नारळ आणते..साखर आणते..आरतीसाठी पुढे सरते...सर्वांना हिंमतीने प्रसाद वाटते..आता ती खूप बदलली आहे,कुंकूवाच्या जागी टिकली लावते.तिला कळालेय कपड्यांचे मोल,म्हणूनच ती सुंदर पेहराव करते,मॅचिंगवर दक्षअसते.वाचनातही ती मागे नाही,ती वाचते प्रवासातहीवैभवलक्ष्मीची पोथी...दानातही ती कमी नाही,म्हणूनच ती संक्रांतीच्या वानात वाटतेश्रद्धेने व्रताच्या पोथ्या...हजारो वर्षाची लेखन बंदी झुगारुनती लिहू लागलीय आता२१ हजार वेळा गायत्रीमंत्रतिच्या नोटबूकात...तिला चांगला आवाज लाभलाय,म्हणूनच तर ती सत्संगात जाते,सुरेल आवाजात गाते...एवढेच...
गोष्ट मोक्षाची
Poem

गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाचीनको मले खीर पूरीनको देऊ भजा वळागोष्ट मोक्षाचिच सांगेदारी एकाक्ष कावळा !!दारी एकाक्ष कावळाकसा काव काव बोलेमानवाचे कटू सत्यपट अंतरीचे खोले !!पट अंतरीचे खोलेएकाक्ष बहुजनांततुमचाच बाप कैसायेतो पित्तरपाठात !!येतो पित्तरपाठातआत्मा हा स्वर्गातूनीआत्म्याचा प्रवास सांगापाहिला काय रे कुणी ?पाहिला काय रे कुणी ?रस्ता स्वर्ग नरकाचासारा कल्पना विलासधंदा धनाचा पोटाचा !!धंदा धनाचा पोटाचाभट शास्त्री पंडिताचाकधी कळेल रे तुलाखेळ डोळस श्रद्धेचा !!खेळं डोळस श्रद्धेचाखेळ होऊन माणूसमायबापाच्या मुखातघाल जित्तेपणी घासं !!घाल जित्तेपणी घासंनको वृद्धाश्रम गळानको करू रे साजराअंधश्रद्धेचा सोहळा !!अंधश्रद्धेचा सोहळाभीती धर्माची ग्रहाचीआत्म मोक्षासाठी फक्तभीती असावी कर्माची !!भीती असावी कर्माचीकर्म सोडीना कुणालासांगे मोक्षाचिच गोठदारी एकाक्ष कावळा !!-वासुदेव महादेवर...
आकांत
Poem

आकांत

आकांतकोण ति-हाईतजणू ऋणाईतबैसला दारात…कुणास सांगावेउपेक्षित गावेदुख-या स्वरात…क्षीण छताखालीअश्रुंच्या पखालीधडकी ऊरात…कष्टतो सर्वदाभोगतो आपदाभोळा अंधारात…ऊन रखरखदावते ओळखजीव अंकुरात…कल्लोळ गणांचापूर भावनांचाढुसे दिनरात…प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'५२-ब, साईनगर, गणेश अपार्टमेन्टजवळ,दिघोरी नाका, नागपूर- 440034(मो. 9421803498)हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आकांत !…https://youtu.be/PRon0zORAkY?si=vYcXXOjhzldNhUDK...