Sunday, October 26

Tag: #मराठी लेख

शाहिरी अभंग गाते.!
Article

शाहिरी अभंग गाते.!

शाहिरी अभंग गाते.!        छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली. स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे. त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला.                रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशा...
दिवस आपल्यासाठी उगवतोच.!
Article

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!     मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.तो आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.जणू पैलवानच.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.आणि पोरं त्याच्या गुडघ्याला.अंगाने दणकट असणारा नाना.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.     त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं.आणि त्याचा परिणा...
एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!
Article

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!या एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.मला आणि माझ्या कवितेला ही एस.टी.आमच्या आयुष्याला फार जवळची झाली आहे. महाराष्ट्रभर याच एस.टी.ने मी हिंडत असतो. प्रवासात सगळी सर्व सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. थोडंस सोशल मीडियामुळे मला बरीच सामान्य लोकं ओळखू लागल्यामुळे अनेकजण मी एस.टी.मध्ये किंवा स्टँडवर दिसलो की माझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात. कुणी चहा पाजतात. तर कुणी काहीतरी खायला हमखास देतात. याच एस.टी. मध्ये सामान्य लोकांची वेदना समजून घेता येते. मला वाटतं सगळ्या जाती धर्माची माणसं या एस.टी मध्ये भेटतात. पण, खरं सांगू का? या डब्यात फक्त आणि फक्त माणुसकीचा सुगंध दरवळत असतो. बसायला जागा भेटावी, भेटली तर खिडकीजवळ भेटावी या हट्टाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर इथं भांडण होत नाही.ज्याला आधी जागा भेटलेली असते नंतर तोच प्रवासी उभ्या ...
गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!
Article

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!बाप गेला, आई गेली. तरीही कष्ट करत, असेल त्यात हार न मानता जगत राहिला. सरळमार्गी स्वप्न बघत राहिला.. कधी कुणाच्या शेतात ओझी उचलत राहिला तर कधी स्वतःच स्वतःची पाहिलेली स्वप्न कुचलत राहिला.. जगण्याच्या आरुडात तो शोधत राहिला मनाला विरंगुळा.. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी.. कधी निवद नारळ खाऊन तर कधी फाटकं तुटकं लेऊन.. आहे त्या परिस्थितीत काहीतरी बदल होईल या आशेवर एकेक दिवस येत होता, जात होता.. तरीही खचला नाही.. ना कुणाच्या वळचणीला गेला, ना कुणाला काही त्रास दिला.. तो चार भिंतीच्या शाळेत कमी अन् भाकरीच्या शोधात जास्त शिकत राहिला.. बरं.. आई बाप गेल्यानंतर त्याचा आधार होता तो त्याच्या पाच बहिणी व आत्याचा.. त्याही रोज जगण्याची लढाई लढत बिकट परिस्थितीतून वाट काढत चाललेल्या.. फाटक्याला तुटक्याचा आधार असेच म्हणता येईल.. पण त्याचे भाचा व भाची त्याला काहीबाही सांगत होती.. शिक...
फेक कॉलपासून सावधान.!
Article

फेक कॉलपासून सावधान.!

फेक कॉलपासून सावधान.!जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फेक कॉल येत असतील तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण काही लोक तुम्हाला फेक कॉल करून फसवू शकतात आणि तुमचे बँक डिटेल्स घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. सायबर दरोडेखोराचा एक कॉल तुमचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला फेक कॉल येतो तेव्हा तुम्ही सावध राहावे. याच्या मदतीने तुम्ही सायबर फसवणूक टाळू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या फोनमध्ये 2G, 3G किंवा 4G सिम अपग्रेड करण्याचा कॉल येत असेल किंवा तुमची मुलगी,मुलगा सेक्स रॅकेट मद्ये फसला गेला आहे.. त्याला सोडायचे असेल तर लाखो रुपयांची मागणी करणारे कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. हा एक बनावट कॉल असू शकतो, ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात. किंवा एक कॉल च्य...
ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा
Article

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमाफार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत.त्यामुळे त्यांचे गावी येणे जाणे असे.ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत.तसेच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन कपड्याचे / अंगाचे साबण,...
पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!
Article

पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!

पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.! बारवाड, ता निपाणी जि बेळगाव कर्नाटक येथील मराठी भाषिक कवी रंगराव बन्ने , यांचा “आस तुझी रे लागली” हा पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तिरसात चिंब भिजलेला अभंग संग्रह नुकताच वाचनात आला. विविध अभंगातून त्यांनी भगवंताच्या प्रती आपली भक्ती व्यक्त केली आहे. “आस तुझी रे लागली” या अभंग कलाकृतीचे मुखपृष्ठ अतिशय सुबक आणि अर्थपूर्ण असून या मुखपृष्ठाला एक वैश्विक अर्थ प्राप्त झाला आहे. मानवी जीवनाचा व्यापक अर्थ या मुखपृष्ठावरून आपल्याला दिसून येतो. आज आपण या मुखपृष्ठावरील संदर्भाचा मानवी जीवनाशी कसा संबंध जोडला गेला याचा अभ्यास करणार आहोत.“आस तुझी रे लागली” या अभंग संग्रहाच्या मुखपृष्ठावर गगनाला भिडणारी पांडुरंगाची उंच मूर्ती दाखवली आहे, या पांडुरंगाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळावा रस्त्याने जातांना दाखवला आहे तर एक वयोवृद्ध म्हातारा काठी टेकवत, पाठीवर गाठोडे, का...
साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!
Article

साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!

साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!साहित्य ही बाब प्रत्येक वेळी सहज निर्माण होत नाही. त्यासाठी आपल्या मनातील भावना, वैचारिक पातळी, योगायोग या गोष्टींना फार महत्त्व आहे. आपण एखाद्या गोष्टीला जसे जाणून बुजून घडवून आणू शकत नाही. तसेच, चांगल्या साहित्याची निर्मिती केवळ खेचून ताणून निर्माण होऊ शकत नाही.एखादी कविता आपण लिहित असताना त्या कवितेमध्ये आशय गर्भता, हळुवारपणा, सहजता, चंचलता येण्यासाठी अनुभव, शब्दरचना, शब्दसंपदा, अलंकार यांची सुयोग्य निवड कवितेला मोकळे रान मिळवून देते. पण तरीही हा विचार अचानकपणे समोर आल्यावर तीच रचना अगदी साध्या भाषेत गोड वाटू लागते. साहित्य लिहिण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. तुम्ही कुणाला घाबरवून, भीती दाखवून साहित्य निर्मिती करू शकत नाही. तसे साहित्य निर्माण होईल पण, ते साहित्य मनाला स्पर्श करणार नाही. त्या साहित्यामध्ये जिवंतपणा नसेल. जसे आपण म्हणतो मूर्त...
पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम
Article

पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम

पोहरादेवी येथे 'बंजारा विरासत'-नंगारा म्युझियम* पोहरादेवी येथे 'बंजारा विरासत'-नंगारा म्युझियमचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा… * नंगारा म्युझियम विषयी सविस्तर माहिती * संत सेवालाल महाराजांची विख्यात भविष्यवाणी "मार पालेर खुटा मच रोपलीव'' _________________________________ आपण सर्वांना जय सेवालाल..🙏 दि. 03 डिसेंबर 2018 ला संत सेवालाल नंगारा वास्तू भूमिपूजन सोहळा प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमाची कायम नोंद लेखनीतुन व्हावी म्हणून "हुंमाळो नंगारारो" ही ISBN कृत स्मरणिका (Souvenir) संपादित करण्याचे भाग्य मला लाभले. श्री. तेजुसिंग पवार साहेब (अप्पर जिल्हाधिकारी) यांनी "नंगारा म्युझियम" अर्थात "संत सेवालाल सागर संग्रहालय " प्रकल्प अभ्यास अहवाल स्मरणिकेत प्रस्तुत केला. त्यातील उल्लेखनीय बाबी ह्या संपादित केलेल्या स्मरणिकेतील माहितीच्या आधारे बणजारा समुदायाची ऐतिहासिक व स...
बाप आहे म्हणून…..
Article

बाप आहे म्हणून…..

बाप आहे म्हणून…..काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते.तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते.एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता.मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “ मी म्हणलं, पुण्यात आहे. अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे. अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा पोटाला..? मी होय म्हणलं..अण्णांनी फोन ठेवला.. आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाल...