Sunday, October 26

Tag: #मराठी लेख

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश
Article

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेशदिवाळीत केवळ भौतिक दिवे न लावता प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम, करुणा आणि सौहार्दाची ज्योत पटवण्याचा हा सण आहे.दिवाळीचे खरे महत्त्व फक्त दिवे लावणे किंवा मिठाई खाणे एवढेच मर्यादित नाही. हा सण आपल्या जीवनात ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धी आणण्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये दिवाळीचे वर्णन अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा त्रिपक्षीय विजय म्हणून केले आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या मानसिक आणि सामाजिक जीवनात संतुलन आणि प्रेरणा आणणारा सण आहे. दिवाळीच्या वेळी आपल्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये दिसणारा तेज आणि उत्साह केवळ शारीरिक प्रकाश नसून आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि मानसिक प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे.या दिवाळीत "मानवतेची ज्योत पटवण्याचा" संकल्प करू या.हा स...
मराठीची उंची मोठी करूया!
Article

मराठीची उंची मोठी करूया!

मराठीची उंची मोठी करूया!मराठी भाषेकडे लक्ष द्या अशी विनंती करण्याची गरज आज आपल्या सर्वांवर आली आहे. मराठी भाषा मोठी आहे ही बाब सिद्ध करण्याची गरज नसताना आज मोठ्याने ठासून सांगावे लागत आहे की मराठी भाषेला समृद्ध करा. हे आपले किती मोठे दुर्दैव? आपलीच भाषा आज आपल्यासाठी परकी झाली आहे नव्हे ती आपणच परकी करून टाकली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कित्येक वर्ष करावी लागली. पुरावे सादर करावे लागले.मराठी भाषेची प्राचीनता व साहित्य समृद्ध असताना देखील राजकीय अनास्तेपायी व मराठी भाषिकांच्या अनास्थेपायी मराठी भाषेवर अवकळा आली आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ या संतांसह अनेक मराठी साहित्यिकांनी एवढे मोठे काम करून ठेवले आहे की ते साऱ्या जगाने पाहावे.मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा प्राकृत भाषेच्या...
लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग
Article

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जगप्रिये,"जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. बस. आराम कर. दमली असशील." चेहऱ्यावर हसू आणत त्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावले आणि पुढे बोलू लागला. "मागच्या वर्षी याच दिवशी तुला मी आश्वासन दिले होते. बघ ते पूर्ण केले कि नाही?" तो बोलत होता. त्याच्याकडे कान देत, त्रासिक आणि थकलेल्या भावनेने ती बाजूच्या खुर्चीवर बसली. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे न कळल्याने ती, तो नाराज होऊ नये म्हणून चेहऱ्यावर उसने हसू आणत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. खरेतर काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत ती नव्हती. तो पुढे बोलू लागला, "मी तुला बोललो होतो. तुझ्या मनात जे काही आहे, ती इच्छा तू पूर्ण करू शकते. तुला शिकायचे असेल, कुठे फिरायला जायचे असेल, काही खायचे असेल, जे काय ल्यायचे असेल, ते तू करू शकत...
चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख
Article

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख५ सप्टेंबर हा दिवस आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. राधाकृष्णन  हे उत्कृष्ट शिक्षकतज्ञ, तत्वज्ञानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्वान होते.ते शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. जेव्हा त्यांच्या काही शिष्यानी व मित्रांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परवानगी मागितली. त्यावर डॉ. राधाकृष्णन यांनी नम्रतेने सांगितले की, " माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी जर तुम्हाला माझा गौरव करायचाच असेल, तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा." त्या दिवसापासून म्हणजे ५ सप्टेंबर १९६२ पासून भारतात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.   आजही ५ सप्टेंबर हा दिवस आपल्य...
मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!
Article

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहे, त्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला 'फॉरेस्ट फायर' म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो.myupchar.com के डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो, शिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत.डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचारमोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस ...
अशी घ्या गरोदरपणात काळजी
Article

अशी घ्या गरोदरपणात काळजी

अशी घ्या गरोदरपणात काळजी कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे मुख्य कारण गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर योग्य ती काळजी घेतलेली नसणे तसेच जन्माअगोदर आणि जन्मानंतर बालकाचे स्वास्थ्य चांगले असण्यासाठी गरोदर मातेने आपल्या बाळाची काळजी गरोदर असल्यापासून घेणे आवश्यक असते. बाळाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी गरोदर मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणातील काळजी बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी 16 ते 18...
जत्रा.!
Article

जत्रा.!

जत्रा.!कार्तिक महिना उजाडला म्हणजे गावाकडं चांगली कडाक्याची थंडी पडायची.सगळीकडे गारठा जाणवायचा. लोकांची गहू हरभरा रब्बीची पेरणी सुरू व्हायची.कापसाचं शितादही पूजन करून, सगळीकडे दहीभाताचं बोणं शिंपडून चांगल्या पीकाची आशा केली जायची. वेचणाऱ्या बाया सांगुन पहिला नवा वेचा काढल्या जायचा. शेतकऱ्यांच्या या पहिल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत केल्या जायचं. शेतात खाण्या लायक अंबाडीची भाजी, बारीक टमाटी, वायकं,शेंगा, भेंडी,गवारांच्या शेंगा,बरबटीच्या शेंगा खायला व भाजीला भरपूर उपलब्ध असायचं.आमचे आबा शेतात गेली म्हणजे धोतराच्या घोयात भरपूर काकड्या,वायकं,बोरं,चिंचा काहीना काही खायला हमखास आणायचे. सग्या, सोयऱ्यांनाही उडीद, भुईमूग, सुर्यफुलाचे बिया नवं म्हणून पायली भर सोबत बांधून द्यायचे. आदानप्रदान संस्कृती होती. पोरीच्या घरी बाप रिकाम्या हातानं कधी जायचा नाही.नवीन निघालेले काही ना काही सोबत लेकीकड...
बुलबुलवाले  युसुफभाई.!
Article

बुलबुलवाले युसुफभाई.!

बुलबुलवाले युसुफभाई.!शहरात गतकाळात एक बँड ग्रुप चांगलाच फेमस होता. काळाच्या ओघात मागील दोन दशकांत लहान मोठे बँड मोठ्या संख्येत बंद पडले. यात कामाला असणाऱ्या कलाकारांपैकी अनेकांनी आपला व्यवसाय बदलला. त्यांना चरितार्थाची सोय जमली. मात्र ज्यांची उमर या पेशात ढळून गेली होती त्यांना परिवर्तन करण्याची संधी मिळाली नाही. मिळेल ते काम करत राहणे त्यांच्या नशिबी आलेलं. युसुफभाई त्यातलेच एक. ते अगदी उत्तमरित्या बुलबुल / बँजो वाजवत. काही वर्षापूर्वी त्यांचा बँड बंद पडला असला तरी त्यांची कला जिवंत होती. कुणीही बोलवलं तरी ते हजर होत! पैसे मिळाले नाही तरी चालेल मात्र आपला हात हलता राहिला पाहिजे ही त्या भल्या माणसाची विचारसरणी!कालांतराने ते सद्यकालिन संगीताच्या मागे पडत गेले. त्यांना ज्या ट्यून्स यायच्या त्याची फर्माईश कुणीच करत नसे. नव्या पिढीच्या झिंगंत नाचणाऱ्या पोरांना जी गाणी आवडत ती त्यांना बँजोव...
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले
Article

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले(राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.! त्यानिमित्ताने हा लेख 'भारताचे महानायक महानायिका' पुस्तकातून देत आहे.-  लेखक:रामेश्वर तिरमुखे,जालना 9420705653.- संपादक)महात्मा जोतीराव फुले हे महान क्रांतिकारक होते.जी क्रांती त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्रनिर्माण,जी क्रांती सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक सह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती.जोतीराव फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला.त्यांच्या आई चिमनाबाई तर वडील गोविंदराव होत. जोतीराव रांगत असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.सगुणाबाई क्षीरसागर या मावस बहिणीने जोतीराव यांचा सांभाळ करण्यासाठी मदत केली होती.गोविंदराव शेती आणि फुलांचा व्यवसाय करत होते. वयाच्या 7व्या वर्षी जोतीराव यांना...
पांगलेला गाव.!
Article

पांगलेला गाव.!

पांगलेला गाव.!नदी काठावरून दुरवर नजर जाईल जिकडे तिकडे हायब्रीडच हायब्रीड पेरलेली हिरवीगार शेतं.नदीकाठच्या डबक्या, डबक्यात साचलेल्या पाण्यावर ऑईल इंजिन बसवून वांग्याची ,टमाटयाची हिरवीगार डुंगे बहरलेली दिसायची.तयार होवून निंघालेली वांगी टमाटी विकायसाठी गावच्या आठवडी बजारात शेतकरी लोकं मांडायची.गावात पिक पाणी तसं चांगलं होतं.चांगली आबादानी होती. जो तो आपल्या मेहनतीत व्यस्त रहायचा. शेणपाणी आटपून रंगरावनं गोठ्यातील बैल मोकये सोडून त्याईच्या पाठीवर दोर टाकले. बैलांनी पाणी प्याले सरका नदीचा मार्ग धरले‌ला. बादशाहा भाईच्या नदीपल्याडच्या मईच्या वावरात आज हायब्रीडच्या वावरात डवऱ्याचा फेर होता.कायाभोर मईच्या वावरात कायभोर हायब्रीड चांगलं टोंग्या,मांड्या,बसलं होतं. वावरंही तसं ताकदचं म्हणजे हेल्याचं मस्तकच होतं.साजरं शेणखत व पुराच्या पाण्यामुळे येणारा सुपीक गायवटी भाग असल्यानं व घरच्याच दहा बारा बै...