Monday, October 27

Tag: झाला

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!
Article

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!बदल, आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला, माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात, ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात, त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात, जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल. काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय ते टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन् मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची अन् संडास वेगळे असायचे, आता दोघांना एकत्रित करून ते washroom झाले, केवढा हा बदल. हल्ली "संडास" शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो, त्या ऐवजी टॉयलेट / वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.शहरीकरण झाल्यानंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात पण एकंदरीत वाट पण लावून जातात असच म्हण...
गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?
Article

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा..? सांगणारी एक अप्रतिम कादंबरी ...वचपा.!प्रतिभावंत ज्येष्ठ साहित्यिक एम.आर.राठोड (से. नि. गटशिक्षणाधिकारी ) लिखित वचपा कादंबरी दमाळ प्रकाशन संस्थेमार्फत विकत घेऊन वाचून काढलो.सदर कादंबरी वीस भागात विभालेली असून एकूण 213 पृष्ठात सामावलेली आहे.सात दिवसांत कादंबरी वाचून काढली. कादंबरी संदर्भात दोन शब्द लिहावं अशी माझी इच्छा झाली. एम.आर.राठोड साहेबांना सुध्दा माझ्याकडून हीच अपेक्षा होती.खर तर साहित्य समृद्धीच्या अनुषंगाने साहित्याची समीक्षा होत राहण गरजेचे असते.साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांकडून समिक्षा झाली पाहिजे अशी बहुतांश लेखकाची इच्छा असते.माझं तर साहित्य क्षेत्रात आता कुठ पदार्पण आहे; तरी देखिल एम.आर.राठोड सरांनी मला कादंबरीविषयी दोन शब्द लिहशिल असं सांगणं खरोखरच माझ्या छोट्याशा साहित्य प्रवासातला हा एक प्रेरक तसेच आव्हानात्मक अनुभव आहे.आता...
तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!
Article

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा..'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची..आज या दोघांचा यशोगाथा पाहू.. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... तो यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय.घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी...
कुंभारकामाचा झाला असा प्रवास…
Article

कुंभारकामाचा झाला असा प्रवास…

कुंभारकामाचा झाला असा प्रवास...पाषाणांतुन जी संस्कृती उगवली तिला अश्मयुग असे म्हटले जाते. दगडाची हत्यारे, तासण्या, टोचण्या ते रंगीबेरंगी दगड-गारगोट्यांचे अलंकार या काळात बनवले जात होते. या काळात माणूस शिकारी व पशुपालक अवस्थेत होता. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना कल्पकतेने आणि कष्टाने जीवनोपयोगी बनवण्याची कला ही मानवी बुद्धीची एक झेपच होती. पण याच काळात माणूस केवळ पत्थर नव्हे तर मातीचाही कल्पकतेने उपयोग करायला शिकला. त्या कलेलाच आपण कुंभारकाम म्हणतो. आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी खापरे.भारतात या कलेची सुरुवात तीस हजार वर्षांपुर्वी झाली. सिंधुपुर्व कालापासुनचे कुंभारकामाचे नमुने आपलयाला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पीके याचीही माहिती मिळते. कुंभारकामाचा प्रवास हाताने घडवलेली मडकी व वस्तुंपास...