📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मान्सूनचा ब्रेक वाढला! विदर्भात ४२°C उष्णतेचा तडाखा; शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला.!

On: June 21, 2026 5:58 PM
आम्हाला फॉलो करा:
• Agriculture News Maharashtra • Akola weather • Amravati Weather • Buldhana Weather • El Nino Effect India • farmer advisory Maharashtra • IMD Weather Alert • Maharashtra Monsoon 2026 • Maharashtra Weather Update • Monsoon Delay Maharashtra • Monsoon News Marathi • Rain Forecast June 2026 • Vidarbha Heatwave • Vidarbha Rain Forecast • Yavatmal Rain Update

राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना मान्सूनची प्रगती पुन्हा एकदा मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या हरनई, सोलापूर आणि हैदराबाद परिसरातच थांबलेला असून त्या भागातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र, २३ जूननंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता असून मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते, असे संकेत मिळत आहेत.

विदर्भात उष्णतेची लाट कायम

२४ जूनपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. यवतमाळसह पूर्व विदर्भातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता असली तरी उष्णतेची लाट कायम राहू शकते.

हवामान तज्ज्ञांच्या मते, २५ जूननंतर पावसाच्या हालचालींना चालना मिळण्याची शक्यता असून काही भागांत चांगल्या पावसाची सुरुवात होऊ शकते.

101

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पेरणी करू नये, असा महत्त्वाचा सल्ला प्रा. बंड यांनी दिला आहे. धुळपेरणी टाळण्याचे आवाहन करत त्यांनी फळबागांना आवश्यक तेवढेच हलके ओलीत सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच शेतातील काडीकचरा किंवा धुरे जाळण्याऐवजी तो जमिनीतच ठेवावा, त्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी नियोजन करावे. सरी-वरंबा पद्धतीने पेरणी करणे, तसेच सेंद्रिय खत व शेणखताचा वापर वाढवणे फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

एल निनोचा वाढता प्रभाव चिंताजनक

यंदा एल निनोचा प्रभाव मान्सूनवर स्पष्टपणे दिसून येत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष दुष्काळाच्या छायेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या एल निनोची सुरुवात झाली असून त्याची तीव्रता पुढील काही महिन्यांत वाढू शकते.

दरम्यान, २३ जूननंतर मेडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) अनुकूल होण्याची शक्यता असल्याने २५ जूनपासून पावसाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

सौजन्य : भारतीय हवामान विभाग (IMD) व हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?

भाजपच्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्र सरकारवर वाढलेला राजकीय दबाव दर्शवणारे प्रतीकात्मक छायाचित्र

भाजपच्या वाचाळवीरांमुळे सरकार अडचणीत? वारंवारच्या वादांवर राजकीय चर्चांना उधाण