Monday, December 8

News

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा
News

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारामुंबई, : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषत: मराठवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यास आज रेड अलर्ट देण्यात आला असून, पुणे शहरात सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल...
१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा
News

१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा

RBI Rule for Digital Payment : मुंबई : डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ने डिजिटल पेमेंट नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गुरुवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रमाणीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला.डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२६ पासून द्वि-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) अनिवार्य करणार आहे.याअंतर्गत ग्राहकांना फक्त SMS OTP वर अवलंबून राहावे लागणार नाही. व्यवहार ओळखण्यासाठी आता पासवर्ड, फिंगरप्रिंट, फेस आयडी, बायोमेट्रिक्स अशा अनेक अतिरिक्त पद्धतींचा वापर करता येणार आ...
वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय
News

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोयवर्धा : नैसर्गिक आपत्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालं. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि धावत्या दुचाकीवरच वीज कोसळली. या भीषण घटनेत काका आणि पुतण्या जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला.भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपल्या १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे जात होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आकाशात विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर पोहोचताच त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या प्रचंड आघाताने अनिल ठाकरे आणि त्यांचा पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झ...
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी
News

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टीमुंबई : मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 27 सप्टेंबर रोजी लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या तीनही जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तातडीचा निर्णय घेत सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, खासगी व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांनाही सुट्टी दिली आहे.दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी कालच ऑरेंज अलर...
शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’
News

शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’

शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या गौरम्मा या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आईने आपल्या चारही मुलींना मोठं करून दाखवलं आहे. आर्थिक अडचणी, गरीबी, कष्ट यांना तोंड देत गौरम्मांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलं आणि आज त्याच मुलींनी सरकारी नोकरी मिळवून आईचं स्वप्न साकारलं आहे.गौरम्मांच्या दोन मुली सध्या पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत, तर उर्वरित दोन मुली शिक्षिका झाल्या आहेत. गावातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ही यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.“पुढचा जन्म असेल तर पुन्हा हीच आई मिळावी,” असं कौतुकाने सांगणाऱ्या गौरम्मांच्या मुली आपल्या यशाचं श्रेय पूर्णपणे आईला देतात. “आईने न थकता आयुष्यभर मेहनत केली, शिक्षणासा...
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ
News

बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ

बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळबीड : शहरात काल रात्री (गुरुवारी, ता. २५) एका तरुणाची हत्या झाली. मृतक यश देवेंद्र ढाका (वय २२) हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. माने कॉम्प्लेक्स परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.माहिती नुसार, यश आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात वाढदिवस साजरा करताना वाद निर्माण झाला होता. महिन्याभरापूर्वी देखील यश आणि सूरज यांच्यात भांडण झाल्याची नोंद आहे. या भांडणामुळे दोघांमध्ये वैर निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात वाद पुन्हा उफाळून आला.वाद इतका तीव्र झाला की सूरजने सोबत असलेला धारदार शस्त्र बाहेर काढून थेट यशच्या छातीत दोन आरपार वार केले. या वारांमुळे यश लगेचच रक्तबंबाळ झाला आणि कोसळला. जखमी अवस्थेत त्याला तातडी...
शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल
News

शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल

धाराशिव: मराठवाड्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकं, घरं आणि जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक कुटुंबं उघड्यावर पडली आहेत, तर शेतकरी घरदार सांभाळण्यासाठी धडपडत आहेत.अशा वेळी नागरिकांना प्रशासनाची मदत अपेक्षित असताना, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ समोर आला. हा कार्यक्रम तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी फक्त उपस्थिती लावली नाही, तर गाण्यांवर ठेका धरतानाही दिसल्या, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.घटस्थापनेच्या रात्री आणि त्यानंतरच्या दिवसांत आलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पुराचे दृश्य दिसत होते. शेतकरी पिके, जनावरं आणि घरं पाण्यात बुडत होती, पण त्याच दि...
14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका
News

14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका

माढा (प्रतिनिधी) : माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे केवड गावात एक थरारक प्रसंग उभा राहिला. येथील ज्येष्ठ नागरिक कुबेर नामदेव धर्मे हे तब्बल १४ तास झाडावर बसून जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत राहिले. शेवटी मंगळवारी मध्यरात्री ११:५० वाजता रेस्क्यू टीमने ७५ किलोमीटरचा प्रवास करून त्यांची सुखरूप सुटका केली.सकाळपासून अडकलेले संकटातमंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून कुबेर धर्मे हे पूरग्रस्त भागात अडकून पडले. वाढत्या पाण्यामुळे त्यांनी जवळच्या झाडावर आश्रय घेतला. नदीच्या पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की गावकऱ्यांना त्यांना मदत करणे शक्यच झाले नाही.मोबाईल आणि ड्रोनच्या मदतीने शोधधर्मे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून काही लोकांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ड्रोन कॅमेराचा वापर करून त्यांचा शोध घेतला. झाडावर अडकलेले असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच रेस्क्यू टीमला खबर देण्या...
बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार
News

बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी कोणतीही ठोस दखल घेतली नाही, असा आरोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत आगळीवेगळी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला कोणी न्याय देणार, असा प्रश्न या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतक्रारीनंतर सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले :"शासनाचा वेळ आल्यावर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो...
मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यता
News

मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यता

मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यतासोलापूर :ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ४६ महसूल मंडलांमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर असलेली कर्जवसुली थांबवून शेतीकर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. उद्या (बुधवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येत असून, या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्यातील तब्बल १६ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी फक्त सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांकडेच २,७०० कोटींची थकबाकी असल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.पू...