Thursday, March 5

News

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभव
News

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभव

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभवपालघर : रविवार दुपारी डहाणू रोड स्थानकाजवळ मुंबई-अमृतसर एक्स्प्रेसमध्ये घडलेली घटना प्रवाशांसाठी अक्षरशः थरारक ठरली. दुपारी साडेदीडच्या सुमारास ही गाडी डहाणू स्थानक ओलांडून थोड्याच अंतरावर गेली असता अचानक कपलिंग तुटले आणि गाडीचे दोन डबे मागे राहिले. इंजिनासह अठरा डबे वेगाने पुढे धावू लागले. क्षणभर प्रवाशांना काहीच कळेना; गाडी दोन भागांत विभागल्याचे लक्षात आल्यानंतर डब्यांमध्ये आरडाओरड सुरू झाली. भीतीपोटी काही प्रवाशांनी थेट खाली उड्या मारल्या.सुदैवाने त्या वेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे गाडी काही अंतरावर थांबवण्यात आली. परंतु तोपर्यंत प्रवाशांचा जीव अक्षरशः अडकल्यासारखा झाला होता. काही क्षणांसाठी डहाणू परिसरात रेल्वे अपघात झाल्याचीच चर्चा रंगली....
सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदान
News

सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदान

सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदानअमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात स्वयंसेविकांसाठी उद्बोधन कार्यक्रम तसेच विकसित भारत २०४७ या उपक्रमांतर्गत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पुनम चौधरी (कार्यकारिणी सदस्य, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी) व मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय काळे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा अढाऊ यांनीही विद्यार्थिनींन...
कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची हृदयद्रावक आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी, पतीने गळफास
News

कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची हृदयद्रावक आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी, पतीने गळफास

छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री) – राज्यातील शेतकरीवर्गावर वाढत असलेल्या कर्जाच्या दबावामुळे शेतकरी दांपत्याने हृदयद्रावक आत्महत्या केली. फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील 43 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी विलास रामभाऊ जमधडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवले.कर्जाचा ताण आणि शेतीतून अपुर्या उत्पन्नामुळे विलास आणि रमाबाई यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून साधत होते, मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावर बचत गटाचेही कर्ज असल्याचे स्पष्ट झाले.शुक्रवारी रमाबाई यांनी शेतातील विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलं आणि नातेवाईक घरी परतले. परंतु सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमधडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर शेतात जाऊन व्हॉट्सअॅप ग्रुपवर “कर्जबाज...
आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार
News

आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. हा विजय ऐतिहासिक ठरला असला तरी सामन्यानंतरचा प्रसंग अधिक गाजला. कारण भारतीय संघाने विजेत्यांची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.प्रेमदासा स्टेडियमवर सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ जवळपास तासभर उशिरा सुरू झाला. या विलंबामुळे मैदानावर गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते द्यायची होती. नक्वी हे भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जात असल्याने भारतीय संघाने सामूहिकरित्या व्यासपीठावर जाण्यास नकार दिला.सूत्रसंचालक सायमन डुल यांनी समारंभ थांबवताना जाहीर केले की, “भारतीय संघ आज रात्री पारितोषिकं स्वीकारणार नाही.” परिणामी संघाचा सामूहिक फोटो घेण्यात आला नाह...
मुलींच्या आरोग्याचा जागर – इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात रूबेला लसीकरण शिबिर
News

मुलींच्या आरोग्याचा जागर – इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात रूबेला लसीकरण शिबिर

गौरव प्रकाशन अमरावती : विकसित भारत 2047 या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थिनींसाठी मोफत रूबेला लसीकरण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथक आणि भावना कॅन्सर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या उपक्रमात महाविद्यालयातील 43 विद्यार्थिनींनी लसीकरण करून घेतले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या स्त्रीरोग व कॅन्सर तज्ञ डॉ. भावना सोनटक्के मॅडम यांनी विद्यार्थिनींना रूबेला लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच किशोरवयीन मुलींसाठी आहार, योग व व्यायाम यांचा निरोगी आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. ...
मी आंबेडकरी, RSS च्या विजयादशमीला जाणार नाही–कमलताई गवईंचे स्पष्ट स्पष्टीकरण
News

मी आंबेडकरी, RSS च्या विजयादशमीला जाणार नाही–कमलताई गवईंचे स्पष्ट स्पष्टीकरण

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यास आपण मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची बातमी ही धांदात खोटी असून आपण निमंत्रण स्वीकारलेलेच नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्पष्ट केले आहे. कमलताई गवई यांनी समाजमाध्यमावर स्वहस्ताक्षरी पत्र प्रसारित करत आपली भूमिका स्पष्ट केली. "मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक आहे. मला विश्वासात न घेता वा लेखी संमती न घेता अशा बातम्या प्रसारित करणे हे RSS चे षड्यंत्र आहे," असे त्यांनी पत्रात नमूद केले.पत्रातील ठळक मुद्देआरएसएसच्या अमरावतीतील विजयादशमी सोहळ्यास मी जाणार नाही.ही बातमी पूर्णतः खोटी असून अपप्रचार आहे.दादासाहेब गवई चॅरिटी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझे घराणे आंबेडकरी विचाराशी निष्ठावान आहे.आमच्यासाठी विजयादशमीपेक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिन अधिक...
राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा
News

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारामुंबई, : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषत: मराठवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यास आज रेड अलर्ट देण्यात आला असून, पुणे शहरात सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल...
१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा
News

१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा

RBI Rule for Digital Payment : मुंबई : डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ने डिजिटल पेमेंट नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गुरुवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रमाणीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला.डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२६ पासून द्वि-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) अनिवार्य करणार आहे.याअंतर्गत ग्राहकांना फक्त SMS OTP वर अवलंबून राहावे लागणार नाही. व्यवहार ओळखण्यासाठी आता पासवर्ड, फिंगरप्रिंट, फेस आयडी, बायोमेट्रिक्स अशा अनेक अतिरिक्त पद्धतींचा वापर करता येणार आ...
वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय
News

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोयवर्धा : नैसर्गिक आपत्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालं. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि धावत्या दुचाकीवरच वीज कोसळली. या भीषण घटनेत काका आणि पुतण्या जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला.भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपल्या १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे जात होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आकाशात विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर पोहोचताच त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या प्रचंड आघाताने अनिल ठाकरे आणि त्यांचा पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झ...
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी
News

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टीमुंबई : मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 27 सप्टेंबर रोजी लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या तीनही जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तातडीचा निर्णय घेत सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, खासगी व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांनाही सुट्टी दिली आहे.दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी कालच ऑरेंज अलर...