Monday, December 8

News

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!
News

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!मुंबई : मृत व्यक्तीला आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचा अजब प्रकार नुकताच समोर आला आहे. "मृताच्या नावे आयकर नोटीस पाठवली तर ती कायद्याने ग्राह्य धरता येत नाही" असा ठोस निर्वाळा बॉम्बे हायकोर्टाने देत ही नोटीस रद्द केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने आयकर विभागाच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवत विभागाला चपराक दिली.निनांच्या याचिकेतून उघडकीसया प्रकरणाची सुरुवात नीना शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेतून झाली. नीना शाह यांचे पती जतीन शाह यांचे 23 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी तत्काळ आयकर विभागाला अधिकृतपणे कळवून याची नोंद करून घेतली होती. मात्र, ही माहिती असूनही आयकर विभागाने 2013-14 या आर्थिक वर्षातील प्रकरणात 24 एप्रिल 2021 रोजी जतीन शाह यांच्या नावेच नोटीस पाठवली.त्या वेळीही नीना शाह यांनी मृ...
कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!
News

कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!

कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयात-निर्यात व्यवहारात क्रांती घडवून आणली आहे. आजपासून महाराष्ट्रात कागदी बॉंड बंद करून ई-बॉंडची सुरुवात झाली असून, या नव्या प्रणालीमुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.ई-बॉंड प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहाय्याने सुरू करण्यात आली आहे. आता आयातदार व निर्यातदार वेगवेगळ्या कागदी बॉंडची गरज न करता, एकाच इलेक्ट्रॉनिक बॉंडद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतील.या नव्या प्रणालीचे महत्वाचे फायदे:प्रोव्हिजनल असेसमेंट, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग व मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेससाठी ई-बॉंड वापरता येईल.सर...
रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट
News

रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण देशात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून रावण दहन केला जातो. मात्र यावर्षी (२ ऑक्टोबर)च्या दसऱ्यादिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालने केलेल्या सोशल मीडिया पोस्टने चांगलाच वाद पेटवला आहे.नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी सिमी ग्रेवालने तिच्या ‘X’ (माजी ट्विटर) हँडलवर रावणाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की,“प्रिय रावण, दरवर्षी या दिवशी आपण चांगल्याचा वाईटावर विजय झाल्याचा उत्सव साजरा करतो. पण तांत्रिकदृष्ट्या तुमच्या वर्तनाला ‘वाईट’ न म्हणता ‘थोडं खोडकर’ म्हणायला हवे. तुम्ही सीतेचे अपहरण केले होते, पण तिला सन्मान, निवारा, चांगले अन्न आणि अगदी महिला रक्षकही दिले होते. इतका सन्मान आजच्या समाजातही स्त्रियांना मिळत नाही.”सिमीने पुढे रावणाचे बुद्धिमत्तेचे कौतुक करत लिहिले की, “रावण अर्ध्या सं...
एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार
News

एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार

मुंबई : युपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता पदवी अभ्यासक्रमासोबतच तयारीची संधी मिळणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी झालेल्या ऐतिहासिक करारामुळे एफवायपासूनच विद्यार्थ्यांना युपीएससी अभ्यासक्रम शिकता येणार आहे.स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळणे आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित मिळत नसल्याने अपयश येते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने १९८७ मध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था स्थापन केली. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतले असून आता या संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे.या महत्त्वाच्या करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव य...
नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
News

नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : नागपूरची ऐतिहासिक दीक्षाभूमी पुन्हा एकदा लाखो अनुयायांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा होत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख अनुयायी दाखल होतात; मात्र यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे.विक्रमी गर्दीची शक्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून बौद्ध अनुयायांचा ओघ सुरू झाला असून, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी नागपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तगर्दी नियंत्रणासाठी नागपूर पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. १२०० पोलीस कर्मचारी व अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या, २ डीसीपी, ४ एसीपी आणि १०० अधिकारी या ठिकाणी...
पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई
News

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाईमुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी कौन बनेगा करोडपती (KBC) या कार्यक्रमात मोठा पराक्रम केला आहे. कैलास यांनी एकही लाईफलाईन न वापरता तब्बल ५० लाख रुपये जिंकले.सोमवारी प्रसारित झालेल्या भागात कैलास यांनी सलग १४ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत सर्वांना थक्क केले. शेवटी १ कोटी रुपयांसाठी १५ वा प्रश्न समोर आला. त्यांनी लाईफलाईन वापरूनही खात्री न पटल्याने ५० लाखांच्या रकमेसह गेम क्विट केला.कैलास हे व्यवसायाने शेतकरी असून महिन्याला फक्त ३-४ हजार रुपयांचीच कमाई होते. मात्र, त्यांच्या डोळ्यात क्रिकेटचं स्वप्न आहे. स्वतःला क्रिकेटपटू होण्याची संधी न मिळाल्याने आता आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.अमिताभ बच्...
ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
News

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...
ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल
News

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्नआंबेडकर म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अट
News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अटमुंबई : राज्यातील महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये सुरु झाली आणि अल्पावधीतच राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक महिलांनी तिचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत जमा केली जाते. गरजू महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा योजनेचा मुख्य हेतू आहे.मात्र, गेल्या काही दिवसांत या योजनेत अनेक गैरप्रकार उघड झाले. नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये तब्बल २६.३४ लाख अपात्र लाभार्थी या योजनेत असल्याचे आढळले. त्यात अनेक पुरुषांचाही समावेश आहे. महिलांसाठी असलेल्या या योजनेत काहींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याने शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत.नवी अपडेट : e-KYC अनिवार्यसरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनका...
चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५
News

चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५

चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५जळगाव : दिनांक २८ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस येथे सकाळी ११ वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रपूरचे ज्येष्ठ कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सोहळा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, प्रशासकीय व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित करते. या पार्श्वभूमीवर, कवी एम. ए. रहीम बंदी यांच्या साहित्य क्षेत्रातील उपक्रमशील आणि बहुआयामी कार्याची दखल घेत, त्यांना यंदाचा साहित्यभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.यापूर्वीही बंदी यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून, नुकताच दिनांक २७ जुलै २०२५ रोजी म...