Friday, January 16

News

अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला!
News

अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला!

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन (Dr. Manmohan Singh Passes Away) झालं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान ब...
निशा खापरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्काराने सन्मानित
Quiz, News

निशा खापरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्काराने सन्मानित

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : मदत सामाजिक संस्थेद्वारे निशा खापरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ येथील दालनात 24 डिसेंबर 2024 ला या संस्थेचे अध्यक्ष नील लाडे सचिव दिनेशभाऊ वाघमारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.निशा खापरे या गेली नऊ वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्या काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत या संस्थेच्या बॅनरखाली सात काव्य संमेलन आयोजित केलेली आहे. ज्या स्त्रियांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले त्यांच्या कार्याचा जागर व्हावा या उद्देशाने त्या दरवर्षी "स्त्री शक्तीचा जागर" ही नऊ दिवसीय स्पर्धा नवरात्रीत गेली चार वर्षापासून राबवत आहे. विविध उपक्रम राबवून त्या लिहित्या हातांना बळ देण्याचे कार्य सतत करीत असतात. साहित्यातून समाज प्रबोधनाचे काम करणे...
नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान योजना
News

नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान योजना

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन २०२५ या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.नवलेखकांनी दि. १ ते ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर  इमारत, मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत. या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना 2025 माहितीपत्रक व अर्ज' या शीर्षाखाली तसेच 'What's new' या अंतर्गत 'Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form' या शीर्षकाखाली तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अधिक ...
प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले, ‘लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न’
News

प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले, ‘लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न’

प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले, 'लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न'मुंबई : अमित शाह यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादळाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ घेत विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अन्याय केल्याचे आरोप करत पलटवार केला आहे.मोदी यांनी बाबासाहेबांचा निवडणुकीत दोन वेळा पराभव करण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या विषयावर काँग्रेसला दोष देण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्या पराभवासाठी काँग्रेसला जबाबदार धरता येणार नाही.प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर निशाणा साधताना सांगितले की, भाजप लोकांचे लक्ष...