Monday, December 8

News

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन
News

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहनगौरव प्रकाशन अमरावती | १6 जून २०२५नाशिक येथे १५ जून २०२५२०२५ रोजी पार पडलेला आकाश गायगवळी (जळका, शहापूर – अमरावती) आणि मेनका वाघ (नाशिक) यांचा विवाह समाजातील पारंपरिक रूढी व अंधश्रद्धांना छेद देणारा ठरला. लग्नानंतर १६ जून रोजी शहापूर तालुक्यातील जळका गावात आयोजित स्वागत समारंभात डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी या विवाहाचे कौतुक करत स्पष्टपणे आवाहन केले – "लग्नातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा नष्ट करा!"या विवाहात पारंपरिक ‘हळदी समारंभ’ घेण्यात आला नाही. विवाहपत्रिकेतच याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय, वधू मेनका वाघ यांनी परंपरेतील काळे मणी नसलेले मंगळसूत्र परिधान करत सामाजिक संकेतांना आव्हान दिले.डॉ. मुन्द्रे म्हणाले, "काळे मणी न घालता देखील मंगळसूत्र पूर्ण असू शकते, हे या दोघा...
‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!
News

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!पुणे, १४ जून: निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी भेट ठरलेले पुस्तक — ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ — नुकतेच पुण्यातील वनभवन येथे प्रकाशित करण्यात आले. सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. रामदास पुजारी यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचा उद्देश स्पष्ट आहे – वसुंधरेच्या रक्षणासाठी जनजागृती आणि प्रेरणा!"रामदास स्वामींनी जसे ‘मनाचे श्लोक’ दिले, तसेच हे ‘वनांचे श्लोक’ वाचकांना पर्यावरण जपण्याची साद घालतात,” असे स्पष्ट उद्गार डॉ. शेषराव पाटील (सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक) यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आणि कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर. प्रविण होते. त्यांनी या पुस्तकातील घोषवाक्यांची सादर केलेली शैली, त्यांची परिणामकारकता आणि समाजात पोहोचण्याच...
शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळा
News

शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळा

शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळागौरव प्रकाशन पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक (प्रतिनिधी) | 4 जून 2025महाराष्ट्रातील साहित्य संस्कृतीचा ठसा उमठवणारा एक भव्य आणि प्रतिष्ठित सोहळा नुकताच नाशिक जिल्ह्यात संपन्न झाला. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल यांच्या वतीने आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा 2025 हे राज्यातील साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.📚 राज्यभरातून १४६ साहित्यकृतींचा गौरवया पुरस्कारासाठी कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन या प्रकारांतून साहित्यिकांकडून १४६ कलाकृती प्राप्त झाल्या. नामवंत परीक्षकांच्या परीक्षणानंतर निवड करण्यात आलेल्या साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटक कैलास दौंड व इत्...
येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड
News

येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड

"येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड"गौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, तर उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ यांनी पत्रकाद्वारे दिली.४ जून २०२५ रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रभरातील निवडक साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार १ मे रोजी जाहीर करण्यात आले होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या डॉ. माहेश्वरी गावित या सध्या अहिल्यानगर येथील पेमर...
कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम
News

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रमगौरव प्रकाशन ठाणे, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिमेन्स वर्कर्स युनियनतर्फे एक विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिमेन्स वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष मनोज बोडके, उपाध्यक्ष जयंतीलाल गुप्ता, सहचिटणीस भास्कर कोतवाल, सेक्रेटरी महादेव गेजगे, सांस्कृतिक विंगचे अध्यक्ष राकेश मांजरेकर, युनिट सेक्रेटरी शिनोज नायर, विश्वनाथ शिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ठाणे विभागाचे प्रमुख नितीन पाटील, उल्हासनगर केंद्र प्रमुख वीणा तरेकर, शहाड केंद्र संचालक गजेंद्र आहेर, वर्तक नगर (ठाणे) केंद्र प्रमुख प्रवीण सकट, पनवेल केंद्र प्रमुख दयानंद कदम आणि गुणवंत कामगार अरविंद मोरे हेही उपस्थित होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
News

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीरगौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) – पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार २०२५ चे निकाल कामगार दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी ही माहिती दिली.या चौथ्या वर्षीच्या पुरस्कार स्पर्धेसाठी राज्यभरातून साहित्यिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १४३ साहित्य कलाकृती स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये कवितासंग्रह – ७८, कथासंग्रह – २२, कादंबरी – १६, ललित लेखसंग्रह – २२ तसेच इतर ५ प्रकारांचा समावेश होता. परीक्षकांच्या परीक्षणानंतर प्रत्येक प्रकारातील एक उत्कृष्ट कलाकृती निवडून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा
News

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरागौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 25 एप्रिल 2025 जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मलेरिया विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मलेरिया हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, तसेच त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी लागते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी हिवताप प्रतिबंधासाठी "गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा" तसेच "क्लोरोकिनची गोळी, करी हिवतापाची होळी" अशी आकर्षक घोषवाक्य फलकांवर लावण्यात आली.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!यावर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाचे घोषवाक्य होते — “चला हिवताप संपवूया - पुनर्विचार करा, योगदान द्या, पुन्हा सक्रिय व्हा.”कार्यक्रमाच्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके मॅड...
जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!
News

जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!

गौरव प्रकाशन खंडाळा (जि. यवतमाळ) : खंडाळा येथे झालेल्या एका सामाजिक जागृती कार्यक्रमात सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी जिल्हा परिषद शाळांचे संरक्षण, शिक्षणातील बाजारीकरण आणि गावगाड्याच्या शैक्षणिक शोषणाविरोधात परखड मत व्यक्त केले.गावातच शिक्षण देणं म्हणजे संस्कार टिकवणं - ढाले"शेठजी, भटजी, बनिया यांनी शिक्षणाचा बाजार मांडणं समजून घेता येईल, पण ज्या शिक्षकांची संपूर्ण कारकीर्द जिल्हा परिषद शाळांमुळे घडली, त्यांनीच निवृत्तीनंतर कॉन्व्हेंट शाळा सुरू करून शिक्षणावर व्यापार करणं, हे दुर्दैवी आहे," असे ढाले यांनी ठासून सांगितले.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाशासकीय शाळा बंद करण्यामागे पद्धतशीर षड्यंत्रढाले यांनी आरोप केला की, शाळा दत्तक योजना, शाळा समायोजन धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील नव्या तथाकथित सुधारणा या गावातील शासकीय शिक्षण नष्ट करण्याचे...
साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रे
News

साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रे

साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रेगौरव प्रकाशन हिवरा बु. (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सहाव्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी साहित्याचे समाजघडणीतले महत्त्व अधोरेखित केले.ते म्हणाले, "साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते आणि साहित्यिक हे विकसनशील समाजाचे आधारस्तंभ असतात. साहित्याचे जतन आणि सृजन केल्याशिवाय कोणताही समाज विकसित होऊ शकत नाही." त्यांनी साहित्याची प्रगल्भता काळानुसार वाढण्याची गरजही व्यक्त केली.क्रांती आणि साहित्याचा संबंधइतिहासातील विविध क्रांतींमध्ये साहित्याचा मोलाचा वाटा राहिल्याचे सांगत त्यांनी व्हॉल्टेअर, रुसो, मार्क्स, गॉर्की यांसारख्या लेखकांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी बौद्ध साहित्य, ...
शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन
News

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधनगौरव प्रकाशन मुर्तिजापूर (प्रतिनिधी): चिखली कादवी मुर्तिजापूर येथील येथील प्रतिष्ठित नागरिक शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रकलाबाई, मुलगा पवन, स्नुषा सौ.जयश्री, नातवंडं असा आप्त परिवार आहे.काल स्थानिक स्मशानभूमी येथे त्यांचेवर प्रा. नारायण राऊत, राजू तायडे, व मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....