Monday, December 8

News

UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णय
News

UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णय

UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णयनवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी लोक दैनंदिन व्यवहारांसाठी यूपीआय (UPI) चा वापर करतात. किराणा सामान घेणे असो वा ऑनलाईन शॉपिंग करणे, मोबाईलमधून फक्त काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होतात. मात्र, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आता ग्राहकांना बदल अनुभवावा लागणार आहे.1 ऑक्टोबर 2025 पासून UPI वरील P2P (पिअर-टू-पिअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा पूर्णपणे बंद केली जाणार आहे.काय आहे कलेक्ट रिक्वेस्ट सुविधा?UPI अॅप्स (PhonePe, Google Pay, Paytm इ.) द्वारे एखाद्या व्यक्तीकडून थेट पैसे मागण्यासाठी ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ पाठवता येत होती.उदाहरणार्थ, ₹500 मागायचे असल्यास रिक्वेस्ट पाठवली जात असे आणि समोरच्या व्यक्तीने UPI पिन टाकून ती मंजूर केली की पैसे खात्यात जमा ...
यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेत
News

यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेत

यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेतयवतमाळ, ढाणकी: यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी गावात धक्कादायक घटना घडली आहे. गुंडेकर कोचिंग क्लासेसचा शिक्षक संदेश गुंडेकर (वय 27) याने आपल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली.अत्याचार आणि गर्भधारणा लपवण्यासाठी आरोपी शिक्षकाने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, मात्र गोळ्यांचा डोस जास्त असल्यामुळे मुलीला प्रचंड रक्तस्त्राव झाला. गंभीर अवस्थेत तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर बिटरगाव पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला ...
अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
News

अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमखर्दा गावात रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे. गावातील नागरिकांना मागील दोन वर्षांपासून उखडलेल्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अक्षय साबळे या तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी थेट साडी नेसून गांधीगिरी आंदोलन करत अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.दोन वर्षांपासून अपूर्ण पाइपलाइनचे कामगावामध्ये ईगल इन्फ्रा कंपनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम करत आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी आजतागायत पूर्ण झालेले नाही. पाइपलाइन घालण्यासाठी खोदलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखल, घसरगुंडी आणि वाहतुकीची अडचण भोगावी लागत आहे.ग्रामस्थांची दैन्यावस्...
कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
News

कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न

कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्नअमरावती (प्रतिनिधी) : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 18 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कैदी कैलास (वय 40) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी ती ड्युटीवर असताना शौचालयात गेली होती. त्याचवेळी आरोपी कैद्याने शौचालयाचा दरवाजा ढकलून जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याने चुकीच्या नजरेने पाहत कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरो...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन
News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, भात, भाजीपाला आणि फळबागांसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले श्रम वाया गेले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसध्या राज्यभरातून १०० टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही, तर शेतकऱ...
दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार
News

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ ज...
नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा
News

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारामुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच आकाशही रंगतदार होणार आहे. २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण राहणार आहे.हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि विदर्भ-मराठवाड्यासह अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार सरींची शक्यता आहे.महामुंबई परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या सरींची नोंद झाली.ढगाळ वातावरण आणि उकाडानवरात्र व दुर्गापूजा दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाड...
जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा
News

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षावणी तालुक्यातील घटनेवर केळापूर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णयगौरव प्रकाशन वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेवर केळापूर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. स्वतःच्या जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या 26 वर्षीय नराधम पुत्राला गुरुवार, दि. 18 सप्टेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा किती प्रभावी आहे याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.घटनेचा आढावाजुलै 2021 मध्ये वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 19 जुलै रोजी पीडिता वणी येथे मुलीकडे गेली होती. याच कारणावरून तिच्या मुलाने दोन-तीन दिवस सतत मारहाण केली. अखेर 23 जुलैच्या रात्री दारूच्या नशेत आरोपीने आईवर लोखंडी पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर ...
‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’
News

‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’

गौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी): पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उद्योजक संतोष पवार यांनी कै. प्रवीण पवार व कै. सुजित पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाजहिताचा उपक्रम राबवत शेतकरी व विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी समाजहिताच्या या उपक्रमाचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या. “मी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलो आहे. हजारो रुपये खर्च करून वक्ते बोलावण्यापेक्षा गावातील गरजू शेतकरी व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. संतोष पवार यांनी दाखवलेला हा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरेल,” असे दाते यांनी सांगितले.या कार्यक्रमाला तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंद...
20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा
News

20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा

नवी दिल्ली : वीस वर्षे जुनी गाडी रस्त्यावर ठेवण्यासाठी आता वाहनमालकांना काही महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेल्या नव्या नियमांनुसार 20 वर्षे पूर्ण केलेल्या वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण आणि फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागणार असून स्वतंत्र फिटनेस तपासणीही होणार आहे. इंजिन, ब्रेक, टायर, लाईट यासह वाहनाच्या प्रत्येक भागाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रदूषण उत्सर्जन (PUC) निर्धारित निकषांनुसार आहे का हे तपासले जाणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहन रस्त्यावर धावू शकेल.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!खासगी वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क जास्त असणार आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी आणखी कडक अटी लागू होणार आहेत. शहरी भागात वाढत्या प्रदूषणामुळे हे नियम कडकपणे राबवल...