Monday, December 1

Article

Article

तरुणाईचा उद्रेक

वर्तमानाचे कालचक्र अत्यंत वेगाने बदलत आहे. जग एक ग्लोबल खेडे बनू पाहत असताना तरुणाईचा भारत देश तरुणाला उध्वस्त करत आहे. तरुणाईच्या क्रांतीने देशाने अभूतपूर्व अशी क्रांती केली आहे. त्या तरुणाला धार्मिक व जातीय वातावरणात मशगूल ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आज दिसत आहे. तरुण हा देशाचा कर्णधार असतो. तरुणाच्या ओठावरील गीतांमधून देशाचे भविष्य उमलत असते.पण हाच तरुण आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काही तरुण हे धर्माधिष्ठित व जातीधिष्ठित दिसत असले, तरी अनेक तरुण हे भारताचे खरे शिलेदार आहेत. आपल्या ज्ञानक्रांतीतून ते देशाला शिखरावर घेऊन जात आहेत. मात्र आज शिक्षण घेणारे अनेक तरुण बेरोजगार आहेत . त्यांना योग्य रोजगार सरकार उपलब्ध देऊ शकत नाही.सरकारी सेवा क्षेत्रात अघोषित नोकरीबंदी करून त्यांच्या जीवन मेटाकुटीला आणले आहे. एखादी जाहिरात निघाली तर तिचा निकाल योग्यप्रकारे लागत नाही. अनेक परीक्षांम...
Article

भारत विद्वानांचा देश ; परंतू दखल शुन्य..!

* डिसलेसारखे बरेच गुणवंत भारतात; मात्र कदर नाहीच सध्या जिल्हा परीषद शाळेत शिक्षक असलेले डिसले हे शिक्षणविभागात चर्चेचा विषय झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील संशोधन. त्यांना ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळाला. त्यामुळं ते चर्चेत आले. त्याहूनही चर्चेत आले ते अमेरिकेतील मिळत असलेल्या शिष्यवृत्तीमुळं. अमेरिकेने त्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यांनी ही शिष्यवृत्ती देण्यामागे म्हणणं मांडलं की डिसलेंनी संशोधन करण्यासाठी अाणखी शिकावं. जेणेकरुन आणखी ब-याच मोठ्या प्रमाणात संशोधन करता येईल. परंतू या अमेरिकेत जाण्याला सोलापूर येथील शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांचा विरोध होता. तो सध्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे मावळला आहे.   डिसले हे सोलापूरमध्ये जिल्हा परीषदेच्या शाळेत लागलेले जिल्हा परीषद शिक्षक आहेत. ते संशोधन करीत होते. त्यातच त्यांच्या संशोधनाची विदेशी लोका...
Article

संवेदनशील भावनांची शब्दरूपी साठवण :पिवशी

कवयित्री शितल राऊत यांच्या नुकताच 'पिवशी' हा पहिला काव्यसंग्रह गौरव प्रकाशन, अमरावती द्वारा प्रकाशित झाला. मुळात 'पिवशी' हे शीर्षक वाचताक्षणी डोळ्यांपुढे बालपणीचा काळ तरळतो. प्रत्येकाच्या आजीच्या कमरेला मोठ्या दिमाखात विराजमान झालेली ती पिवशी आठवते. त्या पिवशीमध्ये ठेवलेल्या वस्तूचे जसे प्रचंड आकर्षण प्रत्येकाला होते अगदी तसेच या कविता संग्रहातील प्रत्येक कविता वाचतांना वैविध्यपूर्ण विषयाच्या आशयघन कविता वाचकाच्या अंतर्मनाला सुखाणाऱ्या आहेत.   महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा युवा कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे यांची लाभलेली प्रस्तावना व राठोड सरांनी तयार केलेले सुबक व सुंदर मुखपृष्ठाने पिवशीला सोन्याची झालर चढविण्याचे काम केले आहे.   कवयित्री शितल राऊत ह्या व्यवसायाने शिक्षक आहेत. गेले दहा वर्ष त्या आपल्या पेशा सांभाळून साहित्यक्षेत्राची निष्ठेने सेवा करत आहेत. अगदी याच...
Article

” आरसा गमावलेली माणसं ! “

कवयित्री विद्या जाधव यांचा आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कवयत्री विद्या जाधव या पेशाने शिक्षिका आहे. समाजामध्ये दररोज वेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, अनेक प्रसंग पाहायला मिळतात या सगळ्याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं आहे.समाजाचं, निसर्गाचं,मानवाचं, मानवी संबंधांचे बारकाईने निरीक्षण केले आहे.त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या कवितांमधून पाहायला मिळतं आहे.मानवी जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनामधील अनेक नाती अगदी सोप्या शब्दात त्यांनी उलगडून दाखवली आहेत. समाजातल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून व्यक्त होत आहे. अनेक असणाऱ्या ज्वलंत समस्या आणि त्यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे.मुळातच कवयत्री शिक्षिका असल्यामुळे त्यांचं मन संवेदनशील आहे. या संवेदनशील मनातून अनेक संवेदनशील कवितांची ...
Article

“धम्मध्वज”

आपण दररोज धम्मध्वज पाहतो. या धम्मध्वजाचा इतिहास बौद्धांना माहिती असणे आवश्यक आहे.धम्मध्वज बुद्धाच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात नव्हता. त्रिपिटकातही त्याचा उल्लेख नाही. अशोकाच्या काळातही बौद्ध धाम्मध्वज नव्हता.   १९ व्या शतकात श्रीलंका येथे ब्रिटीशांची राजवट होती. तेथे ख्रिश्चन देशाचे साम्राज्य होते. त्याचकाळात दि. २६ व २७ आगस्त १८७३ रोजी कोलंबो येथे ख्रिश्चन धर्मगुरू आणि बौध्द भिक्खू यांच्यांमध्ये शास्त्रर्थावर चर्चा झाली. त्या चर्चेत सहभागी बौध्द प्रतिनिधी भदंत गुणानंद होते तर ख्रिश्चन धर्मगुरू सिल्वा पादरी होते. या चर्चेत बौध्द गुरु गुणानंद विजयी झाले. ही वार्ता त्यावेळच्या सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली.   ही बातमी वाचून अमेरिकेचे कर्नल हेन्री स्टील आलकाट, जान डेव्हिड, रशियाच्या श्रीमती ब्लावत्साकी सारखे विद्वान बौद्ध धर्माकडे प्रभावित झालेत. या सर्वांची इच्छा भदंत गुणानंद यां...
Article

छोट्या माणसांची मोठी सावली

सत्यवादी माणसाजवळ नैतिक शुचिता असते.त्याचे विचार सामर्थ्य विशेष प्रभावी आणि शक्तीशाली असून तो क्रोधावर मोठ्या तपस्येने विजय मिळवल्यामुळे त्याचे विचार सामर्थ्य प्रचंडच असते. हे सामर्थ्य इतके विलक्षण असते की ,जेथे इतर जनांच्या शेकडो शब्दांनी काम होणार नाही तेथे प्रचंड विचारसामर्थ्य असलेल्या योगीजनांचा एकच शब्द पुरा पडतो.श्रेष्ठ योगी मितभाषीपणे एकच शब्द बोलतो आणि ऐकणारांच्या मनावर त्याचा विलक्षण मोठा प्रभाव निश्चित पडतो. सत्यवचनी, उद्योगशीलता,दृढनिश्चय, चिकाटी हे सद्गुणांची गंगोत्रीच असते.   माणसाला ज्ञान, शहाणपणा आणि अमरत्वाकडे जाताना दोन चैतन्यमय वाटा असतात एक आत्मिक तर दुसरी देहनिष्ठ.आत्मिकता प्रसन्नता,चित्ताची एकाग्रता इंद्रियमनाने आत्मज्ञानी झाला तर त्यासाठी कृती करण्यास शारीरिक बळ असावेच लागते तरच मन तेजस्वी तारा होऊन मनाच्या किरणशलाका अस्ताव्यस्त, इतस्ततः न भटकताना तेजस्वी कार्य सिध्द ...
Article

सिंधूताई सपकाळ;एक चिरंतन व्यक्तीमत्व

सिंधूताई सपकाळ. एक गणमान्य नाव. अनाथांची आई नावानं ओळख असलेली एक सर्वसाधारण महिला. तिला पदमश्रीही प्राप्त झाली. कारण तिनं त्या लेकरांना दत्तक घेतलं. ज्या लेकरांना मायबाप नव्हते. ज्यांचे मायबाप मरण पावले होते. अंदाजे तीनचार वर्षापुर्वीची गोष्ट. सिंधूताई नागपूरला आल्या होत्या एका कार्यक्रमाबद्दल. त्यापुर्वीही त्या नागपूरात येवून गेल्या. माझी मुलाखतही झाली. परंतू मी काही तेवढा सिंधूताईला ओळखत नव्हतो. परंतू ज्यावेळी रेशीमबागच्या सुरेश भट सभागृहात आल्या. तेव्हापासून चांगला ओळखायला लागलो.   कार्यक्रम होता पुरस्कार वितरण सोहळ्याचा. कोणत्यातरी सीमा राऊत नावाच्या तिच्या लेकीनं सिंधूताईच्या संस्थेला मदत व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजीत केला होता आणि त्या कार्यक्रमात माझे नगरचे मित्र रज्जाक शेख उपस्थीत राहिल्यानं त्यांना भेटण्यासाठी मी गेलो आणि तिथे मी सिंधूताईला पाहिले.मी कार्यक्रमात गेलो तेव्हा सभ...
Article

सज्ज स्वागतासाठी

काहीच तासांवर नववर्ष सुरू होण्याचे बाकी आहे.प्रत्येकजण नव्या संकल्पना घेऊन नव्या योजना, आखण्या करत नववर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कुणाला करियर करायचे तर कोणाला छंद जोपासायचे असतात. मनसुबे रचत हरेकजण नव्या सालाचे स्वागत करतो.पण मनाला प्रश्न पडतो की प्रत्येकाचे इप्सित साध्य होते का? त्या दृष्टीने ते किती प्रयत्नशील असतात.तर अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोक संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतात.इतरजण नववर्ष आले नि गेले याची पर्वाच करत नाहीत.   नववर्षाच्या संकल्पना मनात ठेवून जीवनाचा आराखडा तयार करण्यात गैर नाही पण आळशी वृत्तीने काहीच काम होत नाही. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर लाथ मारीन तिथे पाणी काढता येते.नव्या पिढीला न मागताच सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे या समाजात राहताना समाजाशी आपणही काही देणं लागतो याचे सामाजिक भान नसते.तसेच सर्व गोष्टी सहज मिळाल्याने आपण काहीतरी करू...
Article

शोध सुखाचा

उत्कर्ष विद्या मंदिरचे पटांगण पालकांनी व विद्यार्थ्यांनी गच्च भरलेले होते. त्याला कारणही तसेच होते. शाळेच्या वर्धापन दिनाचा सुर्वण महोत्सव होता. ह्या सोहळ्याला पंधरा वर्षांपुर्वी शाळेतून बोर्डाच्या परिक्षेत पहिली आलेली, तसेच शाळेतले अत्यंत आवडते शिक्षक देशपांडे सरांची मुलगी, आज एक प्रख्यात सर्जन होऊन प्रमुख पाहुणी म्हणून येणार होती.शाळेचे मुख्याध्यापक, सारा शिक्षक वर्ग तसेच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाची कारंजी उसळत होती. रंगीबेरंगी पताका, फुलांच्या माळा, डोळे दिपवून टाकणारी प्रमुख पाहुणीच्या चित्राची सुशोभित रांगोळी तसेच सनईच्या मंजुळ स्वरांनी शालेय परिसर लग्न घरासारखाच वाटत होता.   नियमित शाळेत वेळेवर येणारी विद्यार्थिनी आज पाहूणी म्हणून आली ती सुध्दा वेळेच्या अगोदरच. त्यामुळे शिक्षकांसकट सर्वच चकित झाले. आगत स्वागत झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रथम यशश्री ...
Article

नाताळ सांताक्लॉजसंगे

जिंगल बेल्स जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे सांताक्लॉज इज कमिंग रायडिंग डाऊन धिस वेबालपणी शाळेतील इंग्रजीच्या तासाला म्हटलेल्या या कवितेची नाताळ दिवशी हमखास आठवण येते. नाताळ किंवा क्रिसमस हा ख्रिस्ती बांधवांचा सण. तो २५ डिसेंबरला जगभर साजरा केला जातो. कारण याच दिवशी ख्रिस्ती लोकांचे प्रभू येशूचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६ किंवा ७ जानेवारीला एपिफानी म्हणून साजरा करतात.नाताळ हा सण १२ दिवसांचा असतो. जगभरात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. काही ठिकाणी मध्यरात्री साजरा करतात. नाताळ हा शब्द मूळचा लॅटिन. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असे मानले जाते. प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. 'बेथलहेम' हे इस्त्राईल देशातील छोटेसे गाव आहे. याच गावात येशूचा जन्म झाला. त्या दिवशी इथून लोकं रात्रीच मिरवणूक काढतात अन पहाटेला जेरुसलेमला पोहोचतात.नाताळ सणांमध्ये भेटवस्तू द...