Monday, December 1

Article

Article

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (भारतीय समाजसुधारक)

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (भारतीय समाजसुधारक)       *जन्म : ११ एप्रिल १८२७*         (खानवडी, पुणे,महाराष्ट्र)      *मृत्यू : २८ नोव्हेंबर  १८९०*               (पुणे, महाराष्ट्र)   टोपणनाव : जोतीबा, महात्मा संघटना : सत्यशोधक समाज प्रमुख स्मारके : भिडे वाडा,                         गंज पेठ ,पुणे धर्म : हिंदु प्रभाव : शिवाजी महाराज,थॉमस पेन प्रभावित : डॉ. बाबासाहेब आंबेडकर , नारायण मेघाजी लोखंडे , केशव सीताराम ठाकरे वडील : गोविंदराव फुले आई : चिमणाबाई फुले पत्नी : सावित्रीबाई फुले अपत्ये : यशवंत   प्रस्तावना:-  आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे.या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले व त्यांचा वारसा आजपर्यंत ग्रंथालयात पुस्तकं द्वारे ग्रंथांद्वारे काव्या द्वारे ते सम...
Article

प्रिय क्रांतीबा आजोबा,

रोज असता तुम्ही विचारात,जाणीवेत, कृतीतही , असलाच पाहिजे तुमच्यामुळेच तर आहे हा सारा आत्मविश्वासाचा वावर. आज देशातील समग्र महिलावर्गास लाभलेली सारी सुखं, स्वावलंबन, दृष्टी-दृष्टिकोन आणि विचार तुम्हीच दिलेत! तुम्हीच केल्यात विकसित आमच्या विचार आणि ज्ञानकक्षा...        क्रांतीबा आजोबा, त्या प्रतिकूल सनातन काळ्या करंट्या काळात कैक वर्ष पुढे बघण्याचे द्रष्टेपण, इथल्या मूलभूत प्रश्नाला भिडण्याचे, समतेसाठी ठाम उभे राहण्याचे, विचार कृतीत आणण्याचे, व्यवस्थेला हादरे देण्याचे, सारे सोसूनही मागे न हटण्याचे, घरापासून बदलाची सुरुवात करण्याचे, पुरुष असून मातृह्र्दयी पुरुष होण्याचे, काळाला आणि दुष्टांना झुकवण्याचे, अक्षर ओळख करून अवघ्या स्त्री वर्गाचा उद्धार करण्याचे, दांभिकाना पुरून उरण्याचे, असत्याचा मुखवटा टराटरा फाडण्याचे, सनातन वर्चस्वाला घाम फोडण्याचे, पुरुषसत्ताक अव्यवस्थेला बदलवण्याचे, पारंपरिक ...
Article

कौटुंबिक छळात पुरुषही पीडित…!

गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचाराबाबत आपल्या समाजातला एक वर्ग संवेदनशील झाला आहे. काही माध्यमेही या बाबत जागरूक झाली आहेत. त्यामुळे एखाद्या कुटुंबात विवाहित महिलेचा छळ होत असेल तर तिथे हे संवेदनशील लोकही धावून जातात आणि माध्यमेही अशा अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर छापून त्यांंना वाचा फोडतात.पत्नीच्या छळाला कंटाळून पुरुषांनी आत्महत्या केली तर माध्यमे व समाज उलटसुलट प्रतिक्रिया देतात.छळ स्त्रियांचाच होतो असं नसून अनेक कुटुंबात पत्नी नवऱ्याला मोठ्या प्रमाणात छळतात.काही प्रकरणे समोर येत असली तरी पत्नी पीडित पुरुषांना न्याय मिळेलच याची शास्वती नसते,अशा परिस्थितीत काही संवेदनशील पत्नी पीडित पुरुष आत्महत्या करून स्वतःला संपवून घेतात.    अशीच एक घटना नागपूर ला घडली.पत्नी व सासरच्या लोकांना कंटाळून एका डॉक्टरने चक्क स्वतःला भूल चे इंजेक्शन लावून घेत स्वतःला संपविले.पत्नी व सासरच्या लो...
Article

होय, जगातील सर्वांत मोठा न्यायी आणि प्रजाहीत दक्ष राजा म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोकाच…!

आजकाल बऱ्याच राजांना, महाराजांना, सम्राटांना चक्रवर्ती म्हणण्याची प्रथा पडली आहे. मात्र, अशोका हा जगातील खरा खुरा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे आणि खरं चक्रवर्ती पद हे फक्त अशोकाच्याच चरणावर विराजमान होते हे अनेक देशी विदेशी लेखकांनी मान्य केलेल्या पुराव्यावरून सिध्द करता येते. मि. व्हिन्सेंट स्मिथ सारख्या पाश्चात्य इतिहासकार सुध्दा अशोका बद्दल लिहितात की, "His (Asoka's) domination were far more extensive than British India of today, excluding Burma." (Ref.V.Smith's Asoka,3rd edition,Pg.81).अर्थात,आज ब्रिटीश भारत हे नाव ब्रम्हदेश वगळून जेवढ्या प्रदेशांना देण्यात येते, त्याहीपेक्षा जास्त विस्तृत प्रदेश अशोकाच्या सत्तेखाली होता.कारण अफगाणिस्तान व बलुचिस्तान हे ब्रिटीश भारतात मोडत नव्हते, पण अशोकाच्या वेळी ते अशोकाच्याच सार्वभौमत्वाखाली होते. त्यावेळी कॉल, पांड्य, योन, गांधार, पितनिक, आंध्र, कलि...
Article

चकवा : एक अंधश्रद्धा…!

रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सा...
Article

प्रत्येकाच्या सुख दुःखात, यशात सिंहाचा वाटा असणारी एस टी काळाच्या पडद्याआड जातांना…!

एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. आताशा एसटीचा फारसा प्रवास होत नाही पण लहानपणीच्या कितीतरी आठवणी एसटीभोवती गुंफल्या आहेत. एसटीचं रुपडं तरी किती सुंदर. अगदी लांबून उठून दिसणारा तिचा खास लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा. खिडक्यांचा रंग. सीटांचा हिरवा रंग. अगदी नऊवारी नेसणार्‍या प्रेमळ आजीची आठवण यावी. ज्या कोणी ही रंगसंगती शोधली त्याला सलाम.    लहानपणी एसटीचं सगळं जगच अदभूत वाटायचं. प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक टक आवाज करत तिकीटं विकणारा तो कंडक्टर. त्याची ती अल्युमिनियमची तिकीटपेटी. त्यावरचे वेगवेगळे तिकीटाचे पांढरे गठ्ठे. त्याचं ते तिकीट पंच करायचं ते यंत्र ! गळ्यात अडकवलेली पैसे ठेवायची कातडी बॅग. आपण गाव सांगितल्यावर पटापट दोन चार गठ्ठ्यातून तिकीटं फाडून ती योग्य ठिकाणी पंच करून ती आपल्या हातात जेव्हा तो द्यायचा तेव्हा जाम आदर वाटायचा त्याचा. सगळा हिशेब कसा करत असेल हा...
Article

सर्व सामावणारी ‘पिवशी’…

कवयित्री शितल राऊत यांच्या कवितासंग्रहाचे नाव 'पिवशी' वाचून तो वाचायची उत्सुकता निर्माण होते. मी या शब्दाचा अर्थ शोधला. तो वैदर्भीय बोलीतील शब्द आहे. कवयित्री शीतल राऊत यांनी लिहिलेल्या मनोगतात त्याची उकल झाली-'पिवशी' म्हणजे पूर्वी म्हाताऱ्या बायका आपल्या अगदीच मौल्यवान वस्तू त्यामध्ये जपून ठेवायच्या आणि ती 'पिवशी' सतत त्यांच्या कमरेला खोचलेली असायची आणि गरजेनुसार तो खजिना बाहेर यायचा...!   'पिवशी' कवितासंग्रह वाचताना कवयित्री शीतल राऊत यांच्याकडेही 'पिवशी' आहे हे लक्षात येते पण त्यातला खजिना आहे तो मात्र अस्सल कवितांचा. खरोखरी जपून ठेवावा असा. आता त्यांनी तो रसिकांसमोर उघड केलेला आहे. 'कंचोरी बिल्लोर', 'नम्रपणे झुकणारे क्षितिज', माप- ताप- पाप ओलांडणारा सागर, अशा कितीतरी वेगळ्या प्रतिमा- प्रतीकं- कल्पना त्यांच्या कवितांमध्ये आढळतात. वाचनानंद देतात. 'आपले सण', 'शेतकरी', 'आई', 'देशभक्ती', 'द...
Article

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव..!

*चालोरे डायसाणें होळीर...खेला! ================================ भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हाऊस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डपाच्या आवाजांनी होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात.    डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा, डफ धीरो...वजार .. डफड...
Article

आठवणीतील होळी..!

*आला गं आला  सण होळीचा* *अहंम, स्वार्थ,भस्टाचार व महागाई* *ह्या सर्वांना घालून पेटवूया होळी* *देशात सुख समाधान येऊ द्या बाई.*वर्षामागून वर्षे सरली तरी बालपणच्या होळीची आठवण प्रत्येक वर्षाच्या होळीच्या वेळी हमखास होतेच. त्यावेळी मला वाटतं मी जवळपास सात आठ वर्षांची असेन. आमच्या गावी वाडे असत. आमचा 'मानस वाडा' होता. म्हणजे गोव्याला आमचं भलं मोठं घर व आजूबाजूला फडते, झलमी, गावडे इत्यादी लोकाची वस्ती असे. एका वाडीत चार पाच मोठी ब्राम्हणांची घरे व इतर लोकांची वस्ती. त्यामुळे मित्र मैत्रिणी सुध्दा ह्या लोकांतलीच होती. आम्ही मुल मुली एकत्रच खेळ खेळत होतो. आमच्यात थोडी मोठी मुले मुली ही होत्या. ती सांगायची त्या प्रमाणे आम्ही करत असू. होळी म्हणजे मोठी आग करणे व जोर जोरात ओरडणे एवढेच माहीत होते. गावी प्रत्येक घराच्या मागील बाजूला चूलीकरता लाकडं लागायची ती रचून ठेवत (तेव्हा गॅस नव्हता)  मा...
Article

‘होयी’ अन ‘धुयमाती’ खेळा..! पण जरा सांभाळूनच..!

होळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वसंत ऋतूमधील हा आनंद आणि उत्साहाचा तसेच निसर्गाची बदलनारी अवस्था सुचवणारा हा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण शिमगा या नावाने सुध्दा ओळखला जातो. होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना जाळून राख करावे या गोष्टीचे प्रतिक आहे. या सणाला पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते, तर दुसर्‍या दिवशी एकमेकांवर रंग उडवून धुलिवंदन केले जाते.   शहरात प्रत्येक मोहल्ल्यात तसेच खेड्यापाड्यात ह्या सणाच्या निमित्ताने मोठमोठ्या होळ्यांची चढाओढ दिसुन येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. पर्यायाने वृक्षतोड होते, बरेचदा हिरवी झाडे सुध्दा तोडली जातात. काही ठिकाणी जंगलाना आगिसुध्दा लावल्या जातात. त्यामुळे वनस्पती व वन्यजिवाचे नुकसान होते. हवा दुषित होते.   संत तुकारामांनी ४०० वर्षांपूर्वी वृक्षवल्ली आम्हा स...