Wednesday, January 14

Article

Article

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

  बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ...
Article

कुत्रा पाळायचाय…नियमही पाळा..!

कुत्रा हा इमान राखणारा प्राणी. ग्रामीण भागात कुत्र्याला शेतक-याचा मित्र मानले जाते. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात भटके कुत्रे नाहीत, असा भाग नाही. नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये भटक्या कुत्र्याने पाच वर्षीय बालकावर हल्ला केल्याचे प्रकरण घडल्यानंतर भटक्या कुत्र्यांची दहशत समोर आली.सकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला. त्याच्यावर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. कुत्र्यांच्या कळपाने पाच वर्षीय चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा रोज सकाळी मोठ्या बहिणीसोबत फिरायला जायचा. सकाळी तो घरातून बाहेर पडला. रस्त्याने जात असतानाच मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरले. कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केल्यानंतर बहीण जोरजोरात आरडाओरडा करत राहिली. लोक येतान...
Article

खापरखेडातील जादुई एटीएम मशीन ; खुल जा सिम सिमचा प्रकार

  एटीएम ला ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात अँटोमँटिक ट्रेनी मशीन असं म्हटल्या जाते. त्याला अशा प्रकारे ट्रेन केल्या जाते म्हणजे त्याची सिस्टम बनवल्या जाते की, तुम्हाला जेवढे पैसे काढायचे असते, तेवढ्याचा आकडा टाकल्यानंतर तो तुम्हाला तेवढेच पैसे देत असतो. पण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपूरातून समोर आला आहे. तिथे एटीएम मधून ५०० रुपये काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुप्पट, तिप्पट नाही तर चक्क पाचपट पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. एटीएम मधून ५०० रुपये विड्रॉल केल्यावर २५०० रुपये निघत असल्याचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.   काय आहे नेमकं प्रकरण? नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील एका एटीएम मधून ५०० रुपये विड्राल टाकल्यावर एटीएम मशीन मधून चक्क २ हजार ५०० रुपये ...
Article

अस्तित्व गमावलेली माणसे : नवी उमेदाची ऊर्जा देणारी कविता

  महेंद्र गायकवाड हे दोन दशकापासून आंबेडकरी कवितेच्या प्रांतात नित्यनेमाने कविता लिहित आहेत. त्यांची राहणी साधी असली तरी कवितेचे शब्द क्रांतीध्वज उंचावणारी आहेत. नुकताच त्यांचा अस्तित्व गमावलेली माणसे हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...! आंबेडकरी कविता ही क्रांतीच्या ठिणग्या निर्माण करणारी आहे. ही कविता शोषणाच्या सार्‍या मुळांना उघडून फेकते.आंबेडकरी कवी आपल्या मर्म चिंतनातून समाजाचा वेध घेत असतो. कविता ही समाजाला नवे वास्तव सांगत असते. आपले हित व अहीत यांची चर्चा करते. आंबेडकरी कवितेत काही कवी सोडले तर बाकीचे कवी हे आपले निरंतरतत्व सोडून बसले आहेत .पण काही कवी अजूनही सूर्यदीपत्वाची नवी ऊर्जा पेरत आहेत. त्यात महेंद्र गायकवाड हे सातत्याने समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या दारिद्र्याला ते गोंजारत नाही. आपली समस्याने ते मोडत नाही. तर ते समूह मनाची व्य...
Article

आईपणाला बहाल केलेला आत्मा ! म्हणजे आई म्हणते….

"आई म्हणते ....." आई म्हणजे ईश्वर आणि या ईश्वराचं म्हणणे ज्येष्ठ साहित्यिका डॉ .नयनचंद्र सरस्वते यांनी आपल्या 'आई म्हणते ... 'या काव्यसंग्रहात आपल्या लेखणीने प्रत्यक्षात उतरवले आहे. आईची महती जगतज्ञात आहे . तिच्या भोवतीचं लेकराचं सारं विश्व फिरत असते . प्रत्येकाची आई सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काही ना काही सारखं म्हणत असते. प्रेम, राग, सूचना, समज, कौतुक, लाड अशा कितीतरी भावना व्यक्त करत राहते. लेकरू ते ऐकत राहते. कधीकधी आई सारखं बोलत राहते म्हणून नेहमी दुर्लक्ष करणारी काही लेकरं असतात ,परंतु आईपासून थोडा वेळ जरी लांब गेली तरी त्यांच्या मनात , डोक्यात सारखं येत राहते आई म्हणते ... ! ही भावना कवयित्रींनी आपल्या कविता कवितासंग्रहात अतिशय सुंदररित्या कवितेतून मांडली आहे.   ओंजळीतले कुंकू तांबडे आई लावते भाळावरती आणि म्हणते माझी अंबिका मांड ठोकते काळावरती   काव्यसंग्रहाच्या पहिल्या रचनेत आ...
Article

हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा ? : अग्निज्वालांचे आक्रंदन..!

  डॉ. प्रकाश राठोड यांचा 'हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा?' हा मुलाखतींचा आणि वैचारिक लेखांचा संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. हा ग्रंथ निखळ परिवर्तनवादी आशयाचा व विचारअन्वयनयुक्त ग्रंथ आहे. हा ग्रंथ गोर बंजारा समाजाच्या मर्मबंधातील फसव्या विचारांची समीक्षा करणारा आहे. गोर बंजारा समाज हा उजेडलाटांचा महासूर्य कवेत न घेता, शोषणकारी राजतंत्राच्या व्यवस्थेचे गुलाम होत आहे आणि ही गुलाम होण्याची प्रक्रिया निरंतर चालू आहे. या गुलाम होण्याच्या प्रक्रियेला लगाम लावण्याचे आणि या समाजाला स्वतंत्र आणि स्वयंदीप करण्याचे काम डॉ. प्रकाश राठोड करीत आहेत. अग्निज्वाला त्यांच्या संशोधनपर वैचारिक लेखनाने आणि चिंतनशील स्वरूपाच्या मुलाखतीने गोर बंजारा समाजाला नव्या सत्वशील मूल्यजाणिवांचा परिचय करून देऊन तमाम अभावग्रस्तांच्या मनाच्या क्षितिजातून हरितक्रांतीचा सूर्योदय त्यांनी घडवून आणलेला आहे. या ग्रंथातील ध्येय...
Article

ऐक्यासाठी रक्तदान….

  रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे करुन “दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.   Donating blood is an act of solidarity. Join the effort and save live, असे जागतिक आरोग्य संघटनेचे यंदाच्या वर्षीचे रक्तदान दिनानिमित्तचे घोषवाक्य आहे. रक्तदानाबाबत जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा केला जातो.   संशोधक कार्ल लॅन्डस्टायनर यांचा १४ जून हा जन्म दिवस. त्यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला. ‘जागतिक रक्तदाता दिन’ प्रथम सन २००४ मध्ये साजरा करण्यात आला आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी हा दिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. रक्तदान करुन रुग्णांसाठी life saving gift दिलेले आहे अशा दात्यांचे व रक्तदान शिबीर संयोजक यांनी रक्...
Article

एमपीएससी व यूपीएससीमध्ये वारंवार अपयशाच्या वलयात अडकलेल्यांचं भाकीत

 * यूपीएससीत बिहारची चढण व महाराष्ट्राची घसरण का? दरवर्षी यूपीएससी अथवा एमपीएससीची तयारी करणा-यांची संख्या काही लाखांत असते. मात्र, यातून केवळ ५०० ते १००० च्या आसपास पदभरती होते. परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या व प्रत्यक्ष यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्रचंड मोठी दरी पाहायला मिळते. मग जे विद्यार्थी यशस्वी होत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पुढे आर्थिक, सामाजिक प्रश्न उभे ठाकतात. वारंवार अपयश येत असलेल्या विद्यार्थ्यांनी वास्तव्याचे भान ठेवून करिअरच्या आयुष्याची घडी सुरळीत बसवण्यासाठी दुसरा पर्याय निवडणे अत्यंत गरजेचे आहे. एमपीएससी परीक्षेला बसलेली विद्यार्थिसंख्या किती असते? राज्यभरातून १० ते १२ लाख विद्यार्थी विविध एमपीएससीच्या परीक्षा देत असतात. तांत्रिक तसेच अतांत्रिक पदांचा यामध्ये समावेश असतो. खासगीपेक्षा सरकारी नोकरी कधीही चांगली असते. तसेच समाजात मानसन्मान असणारी ...
Article

आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज

  नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0721-2661355 व 2662025 जतन करुन ठेवा पावसाळ्यातील संभाव्य पूर, वादळ, वीज कोसळणे, अतिवृष्टी, मनुष्य तसेच वित्तहानीसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि विविध विभागातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपातकालीतस्थितीत संपर्कासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन निवासी उपजिल्हाधिकारी यांची जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे दिवसा तसेच रात्रपाळीत कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती घडल्यास तात्काळ या घटनेची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयास कळविण्यात येते. तेथून इतर संबंधित यंत्रणेला याबाबत...
Article

दलित पॅंथरचे यश आणि अपयश…!

(29 मे 2022 ला दलित पॅंथर ला स्थापन होऊन पन्नास वर्षे होतात, 29 मे 1972 ला दलित पँथरची स्थापना झाली)   पॅंथर म्हणजे चित्ता किंवा बिबट्या आणि पँथरचा कार्यकर्ता म्हणजे ज्याच्या अंगी चित्त्यासम आक्रमकपणा, लढाऊबाणा, निर्भीडपणा, जशास तसे उत्तर देण्याची धमक, अरे ला कारे म्हणण्याची तयारी, तारुण्य कुर्बान करण्यास सज्ज, बोलण्यात जोश आणि वागण्यात होश, कृतीमधील तळमळ, अन्याया विरोधातील एकजूट, समतेचा नारा, स्वातंत्र्याची पहाट, मानव मुक्तीचा संघर्ष, दबले आणि दाबले गेलेल्या लोकांचा आवाज, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, या त्रिसूत्री नुसार आचरण करणारा, भविष्य घडवण्यासाठी इतिहासापासून धडा घेऊन वर्तमानात लढा देणारा भीमसैनिक म्हणजे दलित पँथर.   डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना झाली. बी. सी. कांबळे आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मतभेदानंतर...