Monday, January 12

Article

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा
Article

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसादिवाळी हा भारतीय संस्कृतीत समृद्धी, आनंद आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. मात्र गोरबंजारा समाजातील ‘दवाळी’ ही फक्त एक सण म्हणून नव्हे तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणाचे संदर्भ विधी, लोकगीते आणि परंपरा, समाजाच्या भटक्या इतिहासाशी, निसर्गाशी आणि सामूहिक जीवनाशी घट्ट जोडले गेलेले आहेत.गोरबंजारांची ‘दवाळी’ दोन दिवसांची असली तरी तिचा आशय शतकानुशतकांचा सांस्कृतिक वारसा सांगतो. पहिल्या दिवशी कुमारिका मुली परंपरेनुसार घराघरांत जाऊन दिवा घेऊन ‘मेऱा’ च्या रुपाने थोरामोठ्यांचे शुभचिंतन करतात आणि पारंपरिक गीतांद्वारे समृद्धीचे आशीर्वचन मागतात. या विधीत समाजातील स्त्रीशक्ती आणि एकात्मतेची जाणीव स्पष्ट दिसते. दुसऱ्या दिवशी पार पडणारी ‘गोधन पूजा’ पशुधन आणि निसर्गाबद्दल गोरबंजारांचा कृतज्ञतेचा उत्सव ठरतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी होणारी ह...
अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश
Article

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेशदिवाळीत केवळ भौतिक दिवे न लावता प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम, करुणा आणि सौहार्दाची ज्योत पटवण्याचा हा सण आहे.दिवाळीचे खरे महत्त्व फक्त दिवे लावणे किंवा मिठाई खाणे एवढेच मर्यादित नाही. हा सण आपल्या जीवनात ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धी आणण्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये दिवाळीचे वर्णन अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा त्रिपक्षीय विजय म्हणून केले आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या मानसिक आणि सामाजिक जीवनात संतुलन आणि प्रेरणा आणणारा सण आहे. दिवाळीच्या वेळी आपल्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये दिसणारा तेज आणि उत्साह केवळ शारीरिक प्रकाश नसून आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि मानसिक प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे.या दिवाळीत "मानवतेची ज्योत पटवण्याचा" संकल्प करू या.हा स...
घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून
Article

घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून

घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर - वंशावळीच्या प्राचीन सरीतूनबाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणाऱ्या ओसाड पुरुषी माळरानाला अन् काळाच्या पाठीवर अख्खा जन्म सहनशीलतेने सारवून – लिंपून जगण्याचा पापुद्रा धरून आलेल्या बाई कुळाला… अशा गर्भित अर्थाने अर्पण केलेली “वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” ही नांदगाव जि नाशिक येथील कवयित्री प्रतिभा खैरनार यांची साहित्य काव्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. स्त्री जीवनाची वास्तवता मांडणारी ही कलाकृती साहित्य जगतात स्त्रीवादी लेखनातील मैलाचा दगड ठरावी इतकी दर्जेदार निर्मिती झाली आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर स्त्रीचा अर्धा पदराने झाकलेला चेहरा, माथ्यावर चोचीत गवताच्या काड्या घेऊन बसलेली चिमणी, हा संदर्भ पाहूनच स्त्रीच्या शालीनतेचे, सोशिकतेचे, सहनशीलतेचे, कुटुंबवत्सलपणाचे, स्त्रीसंस्कृतीचे दर्शन घडते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी साकारलेल्या मुक्त...
गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य
Article

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्यनवरात्रं पार पडलं की दसरा दणदण करत यायचा.दसऱ्याच्या दिवसी घराला आंब्याच्या पानांची तोरणं दोऱ्यात ओवून बांधायची‌. चार,पाच झेंडूच्या फुलांईचा हार करायचा.आपटयाची पाने तोडायले जाऊन ती घरी आणायची.व संध्याकाळी जेवणं झाली म्हणजे घरातली म्हातारी माणसं प्रशस्त आंगनात सुताचा तडव आथरून दसऱ्याच्या सोनं देण्याची वाट बघायची. बाजूला पानपुळा सुपारी अडकित्ता असायचा.येणाऱ्या, जाणाऱ्यांची ख्यालीखुशाली ईचारून पानसुपारी खाण्याचा आग्रह करायची.किती दिलदार लोकं होती ही.दसरा पार पडला म्हणजे पंधरा दिवसावर दिवाई रोरो करत यायची.आमच्या गावाकडच्या दिवाईत मस्त व आगळीवेगळी मजा होती राजेहो. घरातल्या सगळ्या सातऱ्या वाकया,गोधडया धान्य, मिरच्या साजऱ्या उन्हात वाऊचिऊ घालायचं काम चालायचं.महिन्याभरा पूर्वीच गवंडयाच कुटार गारा करून त्यात तुडवून,कालवून साजरू मूरू द...
बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र
Article

बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र

बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्रआपल्या महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या मध्य ते उत्तरार्धादरम्यान पिढ्यानं पिढ्या चालत आलेली बारा बलुतेदार ही वस्तूविनिमय पद्धतीवर आधारलेली पद्धत ग्रामीण जीवनाचा अविभाज्य अंग होती.त्यात मुख्यत: वस्तू किंवा कामाच्या मोबदल्यात धान्याची देवाणघेवाण होत असे.कुंभार, लोहार, सुतार, चांभार, न्हावी, धोबी, महार, माळी, तेली, गुरव, कोळी, मातंग…असे ते बारा बलुतेदार होत.त्यांच्या व्यवसायानुरुप ही नावे पडलेली दिसतात. ज्यांनी मागील शतकात ग्रामीण जीवन अनुभवले आहे त्यांना ही पद्धत माहित आहे. ह्या व्यतिरिक्त ग्रामीण जीवनाचा भाग बनलेली काही व्यवसायिके होती.ती मात्र आपण लक्षात घेत नाही.त्याचाच आढावा घेणारा हा लेख.बेलदारबेलदार समाजातील ही मंडळी कुटुंबकबिल्यासह भटकंती करीत गावोगावी मातीची घरे बांधण्याची कामे करीत होती. मा...
भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!
Article

भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!

भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!भाषा विकासासाठी मराठी ग्रंथालयांची संख्या वाढवणे आवश्यक आहे कारण ते ज्ञान आणि माहितीचे केंद्र आहेत.मराठी भाषेची समृद्धता आणि संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका फार मोलाची आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वाचनामुळे लेखन कौशल्य मुलांना अवगत होते. ग्रंथालयामार्फत शालेय जीवनामध्ये चालवल्या जाणार्‍या वाचन चळवळीमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल होतात. त्यांची भाषाशैली व वैचारीक परिपक्वता सुधारते. ग्रंथालय चळवळ समृद्ध करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.भाषा संवर्धन आणि ग्रंथालये यांचा घनिष्ठ संबंध आहे, कारण ग्रंथालये भाषेचे जतन आणि विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ग्रंथालये माहिती आणि साहित्याचा संग्रह करून भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात, तसेच भाषेच्या अभ्यासासाठी व शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरवतात. यामध्ये सा...
फॅशनच्या नादात आरोग्य धोक्यात!
Article

फॅशनच्या नादात आरोग्य धोक्यात!

फॅशनच्या नादात आरोग्य धोक्यात!फॅशन ही अशी गोष्ट आहे की लोक त्यासाठी सर्वकाही करतात. त्यांना हवामानाची किंवा त्यांच्या आरोग्याची पर्वा नाही. आता तुम्हाला वाटेल की फॅशनचा आरोग्याशी काय संबंध आहे. तथापि, आजच्या काळात फॅशनचा आरोग्याशी खूप संबंध आहे कारण फॅशन ट्रेंड तुमच्या आरोग्याला कसा तरी हानी पोहोचवत आहेत. फॅशन फॉलो करणे वाईट नाही, पण ते फक्त तेव्हाच योग्य आहे जेव्हा ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही. फॅशन फॉलो करताना, तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल विसरू नये. तथापि, काही लोक ट्रेंड फॉलो करण्याचे वेड लावतात आणि विसरतात की या गोष्टी त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.महिलांना किंवा पुरुषांना उंच टाचांचे किंवा स्टिलेटोचे खूप वेड असते. उंच टाचांच्या शूज घालण्यामुळे पाठदुखी, तसेच पाय दुखणे आणि सूज येऊ शकते. यामुळे संधिवात होण्याचा धोका असतो. टाचांच्या शूज घालण्यामुळे मणक्यावर नका...
शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजे.!
Article

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजे.!

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजेलैंगिक शिक्षण नववीपासून नव्हे तर बालवयापासूनच द्यायला हवे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले. अल्पवयीन आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायाधीश अलोक आराधे यांच्या खंडपीठाने लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले लैंगिक शिक्षण हे केवळ इयत्ता नववी ते बारावी पर्यंत मर्यादित न ठेवता लहान वयापासूनच शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.लैंगिक शिक्षणाबाबत भारतीय समाज अजूनही विरोधात आहे. याबाबतीत दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहे.जिथे जिथे लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यात आले, तिथे त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला, असा दावा कोठारी यांनी केला.तर काहींनी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिले पाहिजे,असे मत व्यक्त केले आहे.मुलांच्या शिक्षणासंबंधानं बोलताना बहुधा स...
सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!
Article

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!प्रति,मा. प्राचार्य,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,छ. संभाजीनगर,विषय- मागील गैरहजेरी माफ करून आणखी विशेष सुट्टी मिळणेबाबत ......अर्जदार- एस. जी. जाधव,संगणक शाखा,(तृतीय वर्ष )           सर, मी आपल्या महाविद्यालयातील तृतीय वर्षातील कंप्युटर शाखेतील विद्यार्थिनी आहे. सर, मागच्या आठ- दहा दिवसांपासून मी गावी गेल्यामुळे महाविद्यालयात उपस्थित राहू शकले नाही. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की, माझी ही गैरहजेरी मंजूर करावी. तसेच सर आणखी दोन आठवड्यासाठी विशेष सुट्टी मिळावी, हि विनंती. सर, तुम्हाला माहित आहे की, मागील दोन्ही वर्षात आपल्या महाविद्यालयात संगणक शाखेत मी प्रथम आलेली आहे आणि एका विषयात मला विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले आहे.       &...
तळेगावची धग…
Article

तळेगावची धग…

तळेगावची धग...मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ' धग ' कादंबरी माझ्या हातात पडली. खरं तर पाच वर्षांपासून मी ह्या पुस्तकाच्या शोधत होतो. पण सापडत नव्हते. त्याला कारणही तसेच होते. काय झाले की एकदा आई वडिलांचे खूप भांडण झाले. अधूनमधून ते व्हायचेच. असे भांडण झाले की वडील रागे भरत. मग त्यांचे जेवण बंद, म्हणजे उपोषण. अशी उपोषणं आणि सत्याग्रह घराघरातून सुरू असतातच. नवराबायकोचे भांडण झाले की दोघांपैकी एक रुसतो आणि दुसरा समजावत राहतो.वडील उपोषणाला बसले की त्यांना समजावण्याची जबाबदारी माझ्याकडे असे. खूप प्रयत्नानंतर ते उपोषण सोडायला राजी होत. आधी आईची खूप निंदा करत , मी हो ला हो लावत ऐकून घेई. मत प्रदर्शन मात्र करत नसे. कारण आईची बाजू घेतली तर त्यांचा राग अजूनच वाढण्याची भीती. आईच्या निंदेत सहभागी झालो तरीही पंचाईत. कारण आई स्वयंपाक खोलीच्या दाराआड बसून सारे ...