Monday, March 9

Article

११ मे रोजी झाले ज्योतिराव फुले ‘महात्मा’ पदवीने सन्मानित
Article

११ मे रोजी झाले ज्योतिराव फुले ‘महात्मा’ पदवीने सन्मानित

प्रत्येक दिवस हा काही ना काही नवीन घेऊन येत असतो व आपली छाप पाडून इतिहासामध्ये अजरामर होत असतो. म्हणून तर प्रत्येक दिवसाची दिन विशेष म्हणून एक नाविन्यपूर्ण नोंद केलेली असते. आपण सहज दिन विशेष कडे नजर टाकली तर काही ना काही नावीन्य व वेगळेपण दिसत असते. केवळ ह्या दिवसाच्या नावीन्यपुर्णाने आपण तो दिवस साजरा करत असतो. हा दिवस साजरा केल्यामुळे आपल्याला प्रेरणा, ऊर्जा, उत्साह व काही तरी नवीन शिकायला मिळून आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपली ज्ञानात अधिक भर पडत असते.असाच एक ऐतिहासिक दिवस आहे तो म्हणजे ११ मे १८८८ ह्या दिवशी शिक्षण महर्षी ज्योतिराव फुलेंना मुंबईतील मांडावी कोळीवाडा येथे "महात्मा" पदवी देऊन त्यांच्या चाळीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला होता. महात्मा ही पदवी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिराव फुले यांना दिली. बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड खुद्द क...
अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!
Article

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!नेहमीप्रमाणे काल मी एस. टी.ने प्रवास करत होतो.धाराशिव ते छत्रपती संभाजी नगर या बसने मी निघालो होतो.गाडीत गर्दीही बरीच होती. कंडक्टर साहेब तिकीट काढत होते.त्यांचा चेहरा त्रासलेला होता.उन्हामुळे गडी घामाघूम झालेला होता.अधून मधून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने घाम पुसत पुसत तिकीट काढण्याचे काम सुरूच होते...       गेल्या चार महिन्यापूर्वी एस. टी ने तिकीट दरात वाढ केलेली आहे.पण ही वाढ करताना एक मूर्खपणा केला आहे.आधी तिकीट दर राऊंड फिगर मध्ये असायचा.म्हणजे की जसे पंचावन्न रुपये,साठ रुपये असे..पण आता वाढ झाल्यापासून सत्तावन रुपये त्रेसष्ट रुपये असा दर लागतो.यामुळे सुट्टे पैसे यावरून भरपूर वाद होतात.आणि असा वाद घालत घालत कंडक्टर तिकीट काढत होता. बऱ्याच लोकांकडे वरचा एक रुपया दोन रुपया अशी चिल्लर नसल्यामुळे कंडक्टर वाद घालून वरचा एक दोन...
प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !
Article

प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !

प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित नवल वाटेल. पण ती वस्तुस्थिती आहे. हा माणूस आहे खरा आहे उद्योजक .पण प्राध्यापकाच्या ठिकाणी अपेक्षित सर्व गुण त्याच्या ठिकाणी आहेत आणि आणि म्हणूनच अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये या माणसाचे चांगले नाव आहे. खऱ्या अर्थाने भगवान महावीराचा संदेश केवळ अमरावतीतच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पोहोचण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे.   सुदर्शन जैन हे नाव आता अमरावतीकरांना अपरिचित राहिलेले नाही. तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर त्यांची भव्य दिव्य अभ्यासिका व ग्रंथालय पाहून तुम्ही चकित व्हाल. स्वतंत्र मजल्यावर मोठ्या सभागृहामध्ये त्यांचे ग्रंथालय व अभ्यासिका आहे. मुद्दाम त्यांनी ती घराच्या वरच्या म...
‘कामगाराच्या श्रमाला तोड नाही’
Article

‘कामगाराच्या श्रमाला तोड नाही’

'कामगाराच्या श्रमाला तोड नाही'"श्रम हे भांडवलाच्या आधीचे आणि तसेच स्वतंत्र आहे. भांडवल हे केवळ श्रमाचे फळ आहे आणि जर श्रम आधी अस्तित्वात नसते तर ते कधीही अस्तित्वात आले नसते. श्रम हे भांडवलापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते अधिक उच्च विचारास पात्र आहे. - अब्राहाम लिंकन"आज जिकडे तिकडे सहज नजर टाकली तर आपल्याला सर्वत्र मोठं मोठ्या इमारती, पुल, फ्लाय ओव्हर, मॉल व भव्यदिव्य इमारती दिसतात. विमानतळांची, रेल्वे स्थानकांची संख्या व विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचा आढळतो आहे. कुठल्याही शहरात प्रवेश करतांना आपल्याला बायपास तर मोठ्या शहरात एक्सप्रेस वे दिसतो. प्रवास करतांना मग रेल्वे, बस, कार, आणि विमानातून असो आपल्याला सर्व शेती अगदी हिरवीगार पिकांसह डोलतांना आढळते. हे सर्व चित्र बघितल्या नंतर असं वाटत की ह्या पृथ्वीतलावर नंदनवन थाटलेले आहे आणि ही पृथ्वी सुजलाम सुफलाम आहे. सर्व नागरिक अगदी आनंदाने ...
ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती
Article

ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती

ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंतीगावा गावासि जागवा | भेदभाव हा समूळ मिटवा || उजळा ग्रामोन्नतीचा दिवा | तुकड्या म्हणे ||आज 30 एप्रिल म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती. माझी जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करा असा आग्रह धरणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म यावली मधील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर तर आईचे नाव मंजुळा देवी होते. वडील शिवणकाम करून तर आई दळणकांडन करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. महाराजांचे जन्म नाव माणिक होते. बाल माणिक इतर मुलांप्रमाणे खेळ न खेळता एकतारी व खंजिरी भजने म्हणून ईश्वर दर्शनाची तळमळ त्यांच्या मनामध्ये दिसून येत होती. प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर महाराज शाळेऐवजी शिवमंदिरात, नदीत किंवा शेतात ध्यान पूजन करण्यासाठी वारंवार धाव घेत होते. आणि इथूनच राष्ट्र...
शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर
Article

शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर

अमरावती जिल्ह्यातील नम्रता ठाकरेशेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टरएका शेतकऱ्याच्या मुलीने मनापासून सातत्याने अविरत प्रयत्न केले तर ती देखील कलेक्टर होऊ शकते हे नम्रता ठाकरे यांनी सिद्ध करून दाखविलेले आहे. अमरावती पासून जवळपास 115 किलोमीटरवर तिचे गाव आहे . म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर.अमरावती ते वरुड आणि वरुड ते हातुर्णा असा प्रवास करावा लागतो.नुकत्याच जाहीर झालेल्या आयएएस या परीक्षेमध्ये नम्रता ठाकरे यांनी सुयश संपादन केलेले आहे. तिच्या यशाची बातमी खासदार डॉ. अनिल बोंडे यांना कळताच त्यांनी मुंबईवरून मला फोन केला आणि माझ्या वतीने तुम्ही हातुर्णा येथे जाऊन नम्रताचे अभिनंदन करा व तिला अमरावतीला दोन तारखेला सायंकाळी पाच वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभाचे निमंत्रण द्या असे सुचवले.मी आमचे वरुडचे पत्रकार मित्र श्री गिरीधर देशमुख यांना फोन के...
बिरदेवची चित्तरकथा.!
Article

बिरदेवची चित्तरकथा.!

बिरदेवची चित्तरकथानुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची.प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिन...
कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टर
Article

कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टर

कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टरमंगरूळपीर तालुक्यातील अश्विनीची यशोगाथा खरं म्हणजे आजकाल अत्रतत्र सर्वत्र स्पर्धा परीक्षा जे डबल इ नीट या परीक्षांचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होत आहे. मुलांची धाव कोचिंग क्लासकडे आहे. पण विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कोणताही क्लास न लावता कलेक्टर झालेली आहे. त्या मुलीचे नाव आहे अश्विनी धामणकर.अश्विनीने आपल्या आजोबाचे स्वप्न आय ए एस होऊन पूर्ण केले आहे. आपल्या नातीने आयएएस व्हावे असे आजोबांना वाटत होते. आणि त्यांचे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनीने जीवाचे रान केले. तिचे शिक्षण वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथेच नाथ विद्यालयात झाले. पुढे बारावी करण्यासाठी ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा महात्मा गांधी विद्यालय मध्ये गेली .तिथे तिने बारावी केली. पदवी परीक्षा पास केल्यानंतर ...
पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी 
Article

पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी 

पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयामध्ये त्यांचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ.श्रीकर परदेशी हे संपूर्ण सनदी अधिकाऱ्यांमध्ये एक पारदर्शक सनदी अधिकारी म्हणून परिचित आहेत. मुंबईच्या मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातच आपण मुख्य सचिव श्री विकास खारगे प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांनी ते उपमुख्यमंत्री असतानाच दिल्लीच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पी एम ओ कार्यालयात कार्यरत असणारे डॉ. श्रीकर परदेशी यांना मुंबईला मंत्रालयात आपल्या कार्यालयात सचिव म्हणून बोलावून घेतले.        डॉ. श्रीकर परदेशी यांचा माझा पहिला परिचय ते जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा पास झाले तेव्हा झाला. आम्ही2000 या वर्षापासून दरवर्षी आय ए एस झालेल्या अधिकाऱ्...
तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील 
Article

तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील 

तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील श्री विश्वास नांगरे पाटील आयपीएस  यांच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या गावात माझी गाडी शिरल्याबरोबर आम्ही समोर दिसणाऱ्या व्यक्तीला विचारले .विश्वास नांगरे पाटलांचे घर कोणते आहे ?  त्यांनी आम्हाला योग्य ती दिशा दाखवली. आमची गाडी त्यांच्या कुंपणाजवळ जाऊन थांबली. श्री विश्वास नांगरे पाटलांचे बंधू आमचे स्वागत करायला आले. तेव्हा त्यांचे  वडील घरीच होते .आम्ही त्यांचा चरण स्पर्श घेतला. ज्या चर्चा रंगल्या. या गोष्टी झाल्या. जेवण झाले. आमचे  M H 27 ही गाडी पाहून काही आजूबाजूचे लोक पण साहेबांच्या वाड्यावर आले. मला भेटले.      श्री विश्वास नागरे पाटलांनी जा ग्रंथालयात अभ्यास केला ते ग्रंथालय पाहण्याची आमची इच्छा होती. ती त्यांचे बंधू त्यांनी पूर्ण केली. आमदार श्री शिवाजीराव देशमुख यांनी विश्वास ...