स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायकअमरावती | प्रतिनिधीअमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. विकासाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, हाच मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.Oplus_131072या प्रभागातून युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार संजय भगवान माऊलकर, ऍडव्होकेट सौ. प्रीती हर्षल रेवणे (बनारसे), सौ. अर्चना गणेश तालन व निखिल उर्फ छोटू आकोटकर यांनी घराघरांत जाऊन, गल्लोगल्ली संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आ...