Wednesday, December 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

चकवा : एक अंधश्रद्धा…!

रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सा...
Article

प्रत्येकाच्या सुख दुःखात, यशात सिंहाचा वाटा असणारी एस टी काळाच्या पडद्याआड जातांना…!

एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. आताशा एसटीचा फारसा प्रवास होत नाही पण लहानपणीच्या कितीतरी आठवणी एसटीभोवती गुंफल्या आहेत. एसटीचं रुपडं तरी किती सुंदर. अगदी लांबून उठून दिसणारा तिचा खास लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा. खिडक्यांचा रंग. सीटांचा हिरवा रंग. अगदी नऊवारी नेसणार्‍या प्रेमळ आजीची आठवण यावी. ज्या कोणी ही रंगसंगती शोधली त्याला सलाम.    लहानपणी एसटीचं सगळं जगच अदभूत वाटायचं. प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक टक आवाज करत तिकीटं विकणारा तो कंडक्टर. त्याची ती अल्युमिनियमची तिकीटपेटी. त्यावरचे वेगवेगळे तिकीटाचे पांढरे गठ्ठे. त्याचं ते तिकीट पंच करायचं ते यंत्र ! गळ्यात अडकवलेली पैसे ठेवायची कातडी बॅग. आपण गाव सांगितल्यावर पटापट दोन चार गठ्ठ्यातून तिकीटं फाडून ती योग्य ठिकाणी पंच करून ती आपल्या हातात जेव्हा तो द्यायचा तेव्हा जाम आदर वाटायचा त्याचा. सगळा हिशेब कसा करत असेल हा...
Article

सर्व सामावणारी ‘पिवशी’…

कवयित्री शितल राऊत यांच्या कवितासंग्रहाचे नाव 'पिवशी' वाचून तो वाचायची उत्सुकता निर्माण होते. मी या शब्दाचा अर्थ शोधला. तो वैदर्भीय बोलीतील शब्द आहे. कवयित्री शीतल राऊत यांनी लिहिलेल्या मनोगतात त्याची उकल झाली-'पिवशी' म्हणजे पूर्वी म्हाताऱ्या बायका आपल्या अगदीच मौल्यवान वस्तू त्यामध्ये जपून ठेवायच्या आणि ती 'पिवशी' सतत त्यांच्या कमरेला खोचलेली असायची आणि गरजेनुसार तो खजिना बाहेर यायचा...!   'पिवशी' कवितासंग्रह वाचताना कवयित्री शीतल राऊत यांच्याकडेही 'पिवशी' आहे हे लक्षात येते पण त्यातला खजिना आहे तो मात्र अस्सल कवितांचा. खरोखरी जपून ठेवावा असा. आता त्यांनी तो रसिकांसमोर उघड केलेला आहे. 'कंचोरी बिल्लोर', 'नम्रपणे झुकणारे क्षितिज', माप- ताप- पाप ओलांडणारा सागर, अशा कितीतरी वेगळ्या प्रतिमा- प्रतीकं- कल्पना त्यांच्या कवितांमध्ये आढळतात. वाचनानंद देतात. 'आपले सण', 'शेतकरी', 'आई', 'देशभक्ती', 'द...
Article

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव..!

*चालोरे डायसाणें होळीर...खेला! ================================ भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हाऊस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डपाच्या आवाजांनी होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात.    डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा, डफ धीरो...वजार .. डफड...
Article

आठवणीतील होळी..!

*आला गं आला  सण होळीचा* *अहंम, स्वार्थ,भस्टाचार व महागाई* *ह्या सर्वांना घालून पेटवूया होळी* *देशात सुख समाधान येऊ द्या बाई.*वर्षामागून वर्षे सरली तरी बालपणच्या होळीची आठवण प्रत्येक वर्षाच्या होळीच्या वेळी हमखास होतेच. त्यावेळी मला वाटतं मी जवळपास सात आठ वर्षांची असेन. आमच्या गावी वाडे असत. आमचा 'मानस वाडा' होता. म्हणजे गोव्याला आमचं भलं मोठं घर व आजूबाजूला फडते, झलमी, गावडे इत्यादी लोकाची वस्ती असे. एका वाडीत चार पाच मोठी ब्राम्हणांची घरे व इतर लोकांची वस्ती. त्यामुळे मित्र मैत्रिणी सुध्दा ह्या लोकांतलीच होती. आम्ही मुल मुली एकत्रच खेळ खेळत होतो. आमच्यात थोडी मोठी मुले मुली ही होत्या. ती सांगायची त्या प्रमाणे आम्ही करत असू. होळी म्हणजे मोठी आग करणे व जोर जोरात ओरडणे एवढेच माहीत होते. गावी प्रत्येक घराच्या मागील बाजूला चूलीकरता लाकडं लागायची ती रचून ठेवत (तेव्हा गॅस नव्हता)  मा...
Article

‘होयी’ अन ‘धुयमाती’ खेळा..! पण जरा सांभाळूनच..!

होळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वसंत ऋतूमधील हा आनंद आणि उत्साहाचा तसेच निसर्गाची बदलनारी अवस्था सुचवणारा हा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण शिमगा या नावाने सुध्दा ओळखला जातो. होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना जाळून राख करावे या गोष्टीचे प्रतिक आहे. या सणाला पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते, तर दुसर्‍या दिवशी एकमेकांवर रंग उडवून धुलिवंदन केले जाते.   शहरात प्रत्येक मोहल्ल्यात तसेच खेड्यापाड्यात ह्या सणाच्या निमित्ताने मोठमोठ्या होळ्यांची चढाओढ दिसुन येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. पर्यायाने वृक्षतोड होते, बरेचदा हिरवी झाडे सुध्दा तोडली जातात. काही ठिकाणी जंगलाना आगिसुध्दा लावल्या जातात. त्यामुळे वनस्पती व वन्यजिवाचे नुकसान होते. हवा दुषित होते.   संत तुकारामांनी ४०० वर्षांपूर्वी वृक्षवल्ली आम्हा स...
Article

आमच्या प्रेरणास्थानातील अग्रस्थान – डॉ.श्रीकर परदेशी सर

* डॉ.श्रीकर परदेशी सरांसारखे पारदर्शक अधिकारी कुणी होणारच नाही..! डॉ. श्रीकर परदेशी सरांचा जन्म सांगली शहरात झाला. त्यांचे वडील सांगलीला नोकरीला असल्यामुळे त्यांचे बालपण सांगली शहरातच गेले. अभ्यासात लहानपणापासूनच ते अतिशय हुशार होते. त्यामुळे शिक्षणाकरीता ते पुणेला गेले व पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व एमडी पूर्ण केले. त्यादरम्यान यूपीएससीकडे वळले आणि पहिल्याच प्रयत्नात चांगली रॅंक घेत गृह केडर मिळवले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी ठिकाणी काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची छाप पडलेली आहे. आजही त्यांनी काम केलेल्या प्रत्येक जिल्ह्यात परदेशी साहेबांचं नाव घेतल्या जाते.   यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्य करतांना हजारो बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न त्यांनी पूर्...
Article

युद्ध : का ? कशासाठी ?

"आज जग भयान अंधारलेल्या गर्द डोहात आहे. जगात मूठभर धनिकांचे आर्थिक आणि राजकीय साम्राज्य आहे. मानवी जीवनाच्या सर्व यंत्रणा मुठभर वर्गाच्या ताब्यात आहेत. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात या वर्गाची दहशत आहे. सूचनांच्या कत्तलखान्यात आपण आजही जगत आहोत .दहशतवादाचे जागतिकीकरण झाले आहे. कित्येक राष्ट्र आजही गुलामीच्या उंबरठ्यावर आहेत. मानवी जीवनाचा केव्हा हिरोशिमा-नागासाकी होईल ते सांगता येत नाही. आपण युद्धाच्या रणांगणावर आजही उभे आहोत. आपण अणुबॉम्बच्या दहशतीत आजही मरण यातना भोगत आहोत. आपण पहिले महायुद्ध पाहिले. दुसरे महायुद्ध ही अनुभवले.आता तिसरे महायुद्ध आपल्यापुढे चक्रीवादळापेक्षाही भयंकर राहणार आहे आणि हे महायुद्ध खून, धमक्या, बलात्कार महामारी यांचे राहणार आहे. हे तिसरे महायुद्ध आजही धगधग पेटत आहे. हे महायुद्ध भाकर आणि धर्माच्या नावाने पुढे आणखी निखा-यासारखे ज्वालाग्रही होणार आहे ."- दीपककुमा...
Article

मला काही सांगायचयं..!

बाळांनो मला तुमच्याशी बोलायचे आहे. आता गप्प बसून चालणार नाही. माझं मन मला मोकळं करू द्या. मला आता सहन होत नाही. माझा प्राण कंठाशी आलाय. बोलल्या शिवाय गत्यांतर नाही. माझीच मुले माझी लक्तरे तोडतात. मला आता मूग गिळून बसता येत नाही. सध्याची पिढी माझी खूपच अवेहलना करते, ते खूपच क्लेशदायक आहे. माझी थोरवी आजच्या पिढीला माहीत नसेल पण तुम्हाला आईवडिलांना तर माहीत आहे ना? मग माझी अशी विटंबना का करता?   भारतीय परंपरा जपणारी, भारतीय संस्कृतीचे जाण असलेली माय मवाळ मी मराठी भाषा. जाणता ना माझा इतिहास? मग आजच्या पिढीला ही कळू द्या ना तो थोडासा! मी मराठी एक सुंदर भाषा आहे. मला काना, मात्रा, वेलांटी अशा विविध दागिन्यांनी मढवलेली आहे. मी घरंदाज भाषा आहे. पण बाळांनो, आजच्या तुमच्या मुलांना माझा थोडा इतिहास कथन करून तरी दाखवा.   हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळ्गोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली माझ...
Article

मराठी शब्दांचे महत्त्व…

आज दि.२७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या " मराठी भाषा गौरव दिना" निमित्त "मराठी शब्दांचे महत्त्व" हा कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. -संपादक     आज दि. २७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना" विनम्र अभिवादन " आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना "हार्दिक शुभेच्छा !" मराठी शब्दांचे महत्त्व अनेक संतांनी सांगितलेले आहे. शब्दांमध्ये जे सामर्थ्य आहे ते कशातच नाही असेही म्हटले जाते कारण शब्द जसे शास्त्रज्ञान सांगून जीवन आनंदित करू शकतात तसेच हेच शब्द शस्त्रांचेही कार्य करू शकतात. संत कबीर शब्दांचा परिणाम वर्णन करताना म्हणतात की,   शब्द शब्द सब को ये काहे । शब्द के हात न पाँव । एक शब्द औषध करे ॥ एक शब्द करे घाव ॥ संत शिरोमणी तुकाराम महाराज शब्दांची पूजा करायला सांगताना म्हणतात की,   आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांच...