Friday, May 1

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
डॉक्टर तुम्ही सुध्दा ?
Article

डॉक्टर तुम्ही सुध्दा ?

डॉक्टर तुम्ही सुध्दा ?      अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक जण माझे मित्र आहेत.. Highly qualified म्हणावं तर फक्त डीग्रीने पण विचाराने ?.. मी लैगिंकतेवर जितकी बोलते लिहीते तितकीच अध्यात्मावर लिहीते बोलते..  दोन्हीत नक्कीच आनंद आहे पण अध्यात्मातील आनंद हा शाश्वत आहे.. जिथे दुख अजिबात नाही आणि त्यासाठी संसार सोडायची गरज नाही..  मग काय सोडायचय तर वाईट विचार .. चांगलं राहुन उत्तम संसार करुन आपल्याला नेमुन दिलेलं काम करत आपण भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर नुकसान नाही उलट आनंदच आहे.. अध्यात्माने आपण आतुन शांत होतो.. समाधानी, आनंदी राहायला हरीनाम खूपच उपयोगी आहे...        काल मी माझ्या डॉक्टर मित्राला भेटले.. जवळपास तासभर आम्ही सोबत होतो.. आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यामुळे काही कॉमन विषय निघतात.. अनेक विषयांवर चर्चा होते .. कधी मला त्यांच्याकडून काही मिळतं , कधी ते माझ्याकडून क...
पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!
Article

पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!

पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!   "मला पडलेला प्रश्न , जे लोक स्वतःला सुशिक्षित समजतात कुत्रे वागवतात आणि सकाळी फिरायला निघतात आणि कोणाच्या घरासमोर , कोणाच्या दुकानासमोर ते कुत्र घाण करते, है योग्य आहे का , जर कुत्र वागवायची आवड आहे तर ते कुत्र्याला घाण सुद्धा स्वतःच्या घरातच करायला शिकवा, माझा हा विचार चुकीचा की बरोबर......"   समाजात संवेदनाशील लोक अजुनही आहेत. स्वतः बद्दलच्या इतकीच काळजी त्यांना समाजघटकाबद्दल असते. त्यांचे निरीक्षण अतिषय सूक्ष्म असते. समाजविघातक काही दिसले की काळजीपोटी ते उव्देगाने व्यक्त होत असतात. व्यक्त होण्याची भाषा वरदर्शनी मवाळ वाटत असली तरी एखाद्या किळस येणाऱ्या कृतीचा प्रचंड संताप आल्यावर ही ते संयमीत व्यक्त होत असतात. वरील पोस्ट कुणबी समाज बांधव, श्री. रविंद्र फाटे यांची आहे. त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. माहितीतल्या व्यक्तिंना ते चांगले ठाऊक आहेत...
झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल.!
Article

झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल.!

झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल...     आपली भारतीय संस्कृती अतिशय उत्तम आहे.. आहार ,सण यामधे प्रचंड वैविध्य आहे.. आपलं शास्त्र उत्तम आहे पण प्रचंड प्रमाणात अज्ञानही आहे .. प्रचंड प्रमाणात लोक  संस्कृती , संस्कार , लोक काय म्हणतील यात नको तितके जखडले गेल्याने हव्या असलेल्या आणि आयुष्यातील महत्वाच्या गोष्टीवर आपण भाष्य करत नाही.. यात अनेक उच्चशिक्षीत मंडळीही आहेत..जे झाकुन ठेवायचय ते झाकायचच आहे पण ते वस्त्रानी ..  विचारांनी ते उघडं करायलाच हवं हा विचारच आपल्या मानसिकतेत डोकावत नाही .. मी लैगिकतेवर काम करत असताना किवा लिहीत असताना .. काउन्सिलींग करत असताना ही गोष्ट इतकी प्रकर्षाने जाणवते की असं वाटतं की पुढील हजारो वर्षे या मानसिकतेत बदल व्हायचा नाही.. कधीकधी माझ्री चिडचिड होते.. लोकांच्या मागासलेपणाची किव येते..  चोरुन माझ्याशी संवाद साधताना त्यांना इतके सारे प्रश्न पडलेले असतात की त्यावेळी ...
टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.! 
Article

टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.! 

टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.!   टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. टोमॅटो शिवाय कोणताही पदार्थ बनवणे म्हणजे अपुरेच आहे. डाळ, भाजी, आमटी असे कोणतेही पदार्थ बनवायचे म्हटलं की टोमॅटो हा त्यातील एक महत्वाचा घटक मानला जातो.   टोमॅटो घातल्याने पदार्थांना आंबट गोड अशी चव येते. स्वयंपाक घरामधील कुठलीही भाजी किंवा रेसिपी करायचे असेल तर टोमॅटोची गरज भासतेच. त्यामुळे टॉमॅटोला स्वयंपाक घरातील बादशहा असे म्हटले जाते. टोमॅटो मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असतात. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या किचन मध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो कायम उपलब्ध असतातच. तसे कांदा, बटाटा, टोमॅटो वर्षाचे बाराही महिने बाजारात विकत मिळतात. सध्याचा दिवसात टोमॅटोचा विचार केला तर टोमॅटोचे दर हे गगनाला भिडलेले आहेत.   सामान्य माणसाला स...
वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!
Article

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!    अशा खूप कमी व्यक्ती असतील की, त्यांचे लक्ष वर्तमानपत्रात असणाऱ्या ४ ठिपक्यांकडे गेले असेल व त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे का असतात. आणि तुमचे लक्ष त्या ठिपक्यांकडे गेले तरी तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल. आज आम्ही तुमच्या माहितीसाठी माहिती देत आहोत या ठिपक्यांविषयी.   वर्तमानपत्रातील 4 ठिपक्यांचे महत्व : प्रत्येक वर्तमानपत्रात खाली ४ ठिपके एका ओळीमध्ये असतात. तुम्हाला वाटलेही असेल की तर ठिपके ट्राफिक सिग्नल सारखे असतील, पण असे नाही.   पण याचा काय अर्थ आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. या चार रंगाचे वर्तमानपत्रात खूप महत्व आहे. तुम्हाला माहिती असेलच की, मुख्य रंग तीनच आहे. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. या ठिपक्यामध्ये सुद्धा या 3 रंगाचा समावेश आहे आणि त्यात अजून एक काळा रंग ऍड झालेला आहे. या ठिप...
रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!
Article

रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!

रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!भारतातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात बहुतेक डाळ आणि भात बनवले जातात. रोजच्या जेवणात डाळ-भात सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने डाळ भात रुचकर असतो, तर आरोग्यासाठी डाळ-भात याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. तज्ज्ञांच्या मते डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.अशा परिस्थितीत मुलांना डाळ-भात खायला देण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ (वरण) मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असते. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा वजन कमी करायचे आहे, त्यांनीही डाळ-भाताचे सेवन करावे.* डाळी मध्ये आढळणारे पोषक तत्व हे आरोग्यासाठी एक खजिना आहेत. डाळी मध्ये फायबर, ब-जीवनसत्त...
आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य
Article

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य   १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस म्हणजे आमच्या उन्नतीचा नवायान होता . धवलमय धरतीवरील धम्मघोष निनादत  होता आणि अंधरूढीची सारी साखळदंड गळून पडले होते. मनूव्यवस्थेच्या पायावर उभ्या अशा हिंदू धर्मातला सोडून नव्या मनुष्यत्वाचा नवाबुद्ध माणूस तयार झाला होता. परिवर्तनाची सारी प्रभा आकाशावर कोरली गेली .कपोलकल्पित , ईश्वराधिष्ठ, अवैज्ञानिक विचारांना मूठमाती देऊन समतेचा धम्मसूर्य नव्याने तेजाळत होता. नागपूरच्या धम्मदीक्षेचा मंगलमय क्षण जगताच्या आकाशावर कोरला  होता .  तथागत गौतम बुद्ध यांचा बुद्ध धम्म हा मानवाची पुनर्रचना करणारा मानवतावादी धम्म आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रज्ञा शील, करुणा यांची महाऊर्जा देणारा, स्वयं दीप व्हा..! असा संदेश देणार आहे. बौद्ध धम्म हा ब्राह्मणीकरण्याच्या प्रक्रियेने लयास गेला होता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां...
महाराष्ट्रात बुद्रुक खुर्द अशी अनेक गावे….
Article

महाराष्ट्रात बुद्रुक खुर्द अशी अनेक गावे….

            महाराष्ट्र भर फिरत असताना तुम्ही अनेक नगरे महानगरे तसेच खेडी पाडी पाहिली असतील परंतु त्याचबरोबर तुम्हाला अशी देखिल गावे दिसली असतील ज्यांच्या नावापुढे बुद्रुक व खुर्द हे शब्द लावलेले असतात. उदाहरणार्थ : पिंपळगाव बुद्रुक-पिंपळगाव खुर्द,गोंदवले बुद्रुक-गोंदवले खुर्द,ऐतवडे बुद्रुक-ऐतवडे खुर्द,आरे बुद्रुक-आरे खुर्द इत्यादी.          मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत ज्यांच्या नावाअगोदर बुद्रुक व खुर्द लावलेले असते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अरेच्या ही बुद्रुक आणि खुर्द ही काय भानगड आहे. चला तर मग आज आपण जाणुन घेऊयात बुद्रुक आणि खुर्द यांचा इतिहास.             तर मित्रांनो शिवकाळापुर्वी आपल्या महाराष्ट्रात इस्लामी भाषेचा व सत्तेचा खुप मोठा अमल होता,त्यामुळे सगळीकडे उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषा बोलली जायची.आदिलशाही,कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असल...
मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!
Article

मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!

मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!   आपण कुणाला मदत करीत असतो. कशासाठी तर आपण कोणाचे तरी देणे लागतो. म्हणूनच आपण कुणाला मदत करीत असतो  उपकाराची भाषा करीत असतो. काही लोकं मात्र स्वार्थी असतात. ते कोणाकडून मदत तर घेतात. परंतु इतरांना मदत करतांना ते कोणत्याच स्वरुपाची मदत करीत नाहीत. ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांनाही मदत करीत नाहीत.   मदतीबाबत सांगायचं झाल्यास आपल्याला ज्या विधात्यानं जन्म दिलाय ना. त्या विधात्यानंच आपल्याला इतरांना मदत करण्यासाठी पाठवले आहे. आपला जन्म जेव्हा होतो, तेव्हा आपण आपल्या मुठ्ठी बांधून येतो. ते मुठ्ठी बांधून आपला जन्म होण्याचं कारण काय? असा विचार कोणी केल्यास त्याचं कारण आहे की मी सर्वकाही या मुठ्ठीत जगाला वा सृष्टीला काही देण्यासाठी आलोय हे जगाला सांगणं आणि जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण बंद मुठ्ठी करुन जात नाही. तेव्हा आपले हात हे पसरत असतात. याचाच अर्थ ...
डालड्याचा डब्बा..!
Article

डालड्याचा डब्बा..!

डालड्याचा डब्बा..! दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा  डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र......! एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा  छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल  मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची....! डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं  पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी...