📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती

On: September 17, 2025 5:32 PM
आम्हाला फॉलो करा:
आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती

गौरव प्रकाशन कल्याण (प्रतिनिधी) : “निसर्ग नियम हा आहे की अन्यायाची परिसीमा होते, तेव्हा विद्रोहाचा जन्म होतो. पिचलेला शोषित माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. तो प्रश्न विचारू लागला. याचा परिपाक असा झाला की आंबेडकरी साहित्य अविष्कारले. लेखक त्यातून माणसाची संवेदना मांडू लागला. समताधिष्ठित समाज रचना घडविणे आणि समतेची चळवळ चालविणे हेच आंबेडकरी साहित्य होय” असे प्रतिपादन चौथ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डाॅ चंद्रशेखर भारती यांनी केले.


प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, बुद्धभूमी फाउंडेशन, वालधुनी, कल्याणी येथे चौथे आंबेडकरी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे होते. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक निरंजन पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अण्णासाहेब रोकडे, ॲड. प्रकाश जगताप हे विचार मंचावर उपस्थित होते.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!


याप्रसंगी डीएमसीटी हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संमेलनाध्यक्ष निरंजन पाटील म्हणाले की, “नव्या प्रेरणा,नव्या जाणीवा, परिवर्तनशीलता, विज्ञाननिष्ठा, मानवांची गाणी गाणारी भूमिका ही आंबेडकरी साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. आंबेडकरी साहित्य आणि वैश्विक कुटुंबाला विचारांच्या आधारावर व्यवस्था परिवर्तनाशी जोडले आणि एका नव्या पुनर्रचनेच्या परिघावर उभे केले. तर उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले की, “आंबेडकरी तत्त्वज्ञान वैश्विक तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरी साहित्य मनोरंजनाचे साहित्य नाही तर, प्रबोधनाचा विचार माणसाच्या मेंदूत पेरणार हे साहित्य आहे. माणसाला माणूसपण मिळवून देणार हे तत्त्वज्ञान आहे.


या साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले, डी एल कांबळे, एन एस भालेराव, प्रा. आशालता कांबळे, कवी अरुण म्हात्रे, नवनाथ रणखांबे, गझलकार दत्ता जाधव, पाली भाषेचे विचारवंत अतुल भोसेकर, पत्रकार सुनील खोब्रागडे, डॉ. सुषमा बसवंत, प्रा. प्रेमरत्न चौकेकर, अरुण जावळे (सातारा) शाम भालेराव, डॉ. रेखा मेश्राम, डॉ. ग्रीष्म खोब्रागडे, किसन वराडे, मिलिंद जाधव, संदीप कांबळे,अक्षय भोईर, सुभाष आढाव, अनिल भालेराव, भटू जगदेव, प्रमोद बाविस्कर, प्रा. जगदीश घनघाव, वैभव काळखैर,उमेश गोटे, यशवंत बैसाणे, मनीषा मेश्राम, रविप्रकाश ठोंबरे आदी साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन कवियत्री शुभांगी भोसले यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार साहित्यिक प्रा. युवराज मेश्राम यांनी केले.

आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

दारव्हा तालुक्यातील कुपटी नदीच्या पुरात वाहून गेलेली अर्टिगा कार; बेपत्ता आई आणि दोन्ही मुलींचे मृतदेह

दारव्हा दुर्घटना : बेपत्ता आईसह दोन्ही मुलींचे मृतदेह अखेर सापडले; संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा

कॅन्सरशी झुंज देणारे वडील आपल्या लहान मुलाला जीवनाचा शेवटचा भावनिक संदेश देताना

वडिलांचा अखेरचा संदेश ऐकून लाखो लोक भावूक! ‘आईची काळजी घे, कधीही हार मानू नको’ म्हणत मुलाला दिला जीवनाचा धडा

लाडकी बहीण योजनेची अंतिम लाभार्थी यादी, e-KYC पूर्ण झाल्यानंतर 1.66 कोटी महिलांना ₹1500 हप्ता

लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा! e-KYC पूर्ण; 1.66 कोटी महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होण्याचा मार्ग मोकळा

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख आणि त्यांचे वडील अस्लम शेख यांच्या निधनासंदर्भातील बातमी

‘सैराट’ फेम अरबाज शेख यांच्यावर दुःखाचा डोंगर; वडील अस्लम शेख यांचे ब्रेन हॅमरेजनंतर निधन

CJP आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश देताना देवेंद्र फडणवीस – महाराष्ट्रातील मोठा निर्णय

CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! फडणवीसांचा मोठा निर्णय; आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी नंदुरबारमध्ये दाखल झालेले मुंबई CID चे पथक

औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाला वेग; मुंबई CID चे पथक नंदुरबारमध्ये, विविध ठिकाणी झाडाझडती.!

Leave a comment