Monday, October 27

अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमखर्दा गावात रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे. गावातील नागरिकांना मागील दोन वर्षांपासून उखडलेल्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अक्षय साबळे या तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी थेट साडी नेसून गांधीगिरी आंदोलन करत अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.

दोन वर्षांपासून अपूर्ण पाइपलाइनचे काम

गावामध्ये ईगल इन्फ्रा कंपनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम करत आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी आजतागायत पूर्ण झालेले नाही. पाइपलाइन घालण्यासाठी खोदलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखल, घसरगुंडी आणि वाहतुकीची अडचण भोगावी लागत आहे.

ग्रामस्थांची दैन्यावस्था

गावातील शाळकरी मुले, शेतकरी, महिला व वयोवृद्धांना रोजच्या प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात रस्ते चिखलमय होऊन अपघाताचे प्रमाण वाढते. तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांच्या हालअपेष्टा वाढतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अक्षय साबळे यांचे विधान

अक्षय साबळे यांनी सांगितले की,
मागील अडीच वर्षांपासून एकोणसत्तर खेळवे नंतर आमचे रोड पूर्ण खोदले गेले आहेत. पण आजतागायत त्यांची दुरुस्ती झालेली नाही. कंपनीने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली होती, परंतु अद्यापपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे आम्हाला रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.”

गांधीगिरी आंदोलनाची चर्चा

साडी नेसून गांधीगिरी आंदोलन करण्याची ही कल्पना अनोखी ठरली. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा केवळ गावातच नाही तर संपूर्ण अकोला जिल्ह्यात रंगली आहे. ग्रामस्थांनीही या आंदोलनाचे समर्थन केले असून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

प्रशासनाकडे अपेक्षा

गावकऱ्यांच्या जीवनमानाशी निगडीत हा प्रश्न असल्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, ही मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून पुढील आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत.


हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज


नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR

Akola Protest : अकोल्यात खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती नाही …

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.