लखनऊ : उत्तर प्रदेशमधील मिझार्पूरमधील सर्व मदरश्यांच्या प्रमुखांशी चर्चा करुन मुस्लिमांच्या लग्नात डीजे वाचवला जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लग्नामध्ये डीजे वाजवण्यात येतील किंवा निकाह ठरवण्यासाठी काझी गेले असता तिथे डिजेची व्यवस्था असेल तर काझी निकाहनामा वाचणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील मिझार्पूरमधील मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदने मदरसा अरबिया म्हणजेच मदरश्यांच्या प्रमुखांच्या बैठकीनंतर एक महत्वाचा फर्मान जारी केला आहे. या बैठकीदरम्यान एवढेच नाही तर डीजेची व्यवस्था असतानाही एखाद्या काझीने निकाहनामा वाचला तर त्याला समाजातून बहिष्कृत करण्यात येईल असेही बैठकीनंतर घोषित करण्यात आलेल्या निर्णयामध्ये म्हटले आहे.
मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष असणार्या मौलाना नजम अली खान यांनी मुस्लीम समाजातील लग्नांसंदभार्तील काही नियम ठरवण्यात आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. हुंडा मागणे, कार्यक्रमामध्ये उभे राहून जेवणे, डीजे वाजवणे तसेच लग्नामध्ये फटक्यांची आतिशबाजी करणार्यांविरोधात निकाह लावणार्या धर्मगुरुंनीच मोहीम सुरु केली असून याची सुरुवात मिझार्पूरपासून केली जात असल्याची माहिती मौलाना नजम अली खान यांनी दिली.
कमिटीने दिलेल्या माहितीनुसार आधी लोकांना शरीयतच्या नियमांनुसार निकाह करण्यासंदर्भात सांगण्यात येईल. मात्र त्यानंतरही त्यांनी नकार दिल्यास कोणतेच काझी निकाहनामा वाचणार नाहीत. जर एखाद्या ठिकाणी काझींना या व्यवस्थांसाठी सोय केल्याचे दिसले तर ते निकाह न लावताच तिथू निघून जातील असे सांगण्यात आले आहे. जर एखाद्या काझीने नियमांचे उल्लंघन करुन निकाह लावून दिला तर त्याला मुस्लीम समाजातून बहिष्कृत करण्यात येईल. शरीयत नियमांचे पालन केलं जावं आणि वायफळ खर्च कमी करण्यात यावा या हेतूने हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मौलानांनी दिली आहे. लग्नावर वायफळ खर्च करणं इस्लामच्या नियमांनुसार चुकीचे आहे असेही मौलाना खान यांनी स्पष्ट केले.