कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!
कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयात-निर्यात व्यवहारात क्रांती घडवून आणली आहे. आजपासून महाराष्ट्रात कागदी बॉंड बंद करून ई-बॉंडची सुरुवात झाली असून, या नव्या प्रणालीमुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.ई-बॉंड प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहाय्याने सुरू करण्यात आली आहे. आता आयातदार व निर्यातदार वेगवेगळ्या कागदी बॉंडची गरज न करता, एकाच इलेक्ट्रॉनिक बॉंडद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतील.या नव्या प्रणालीचे महत्वाचे फायदे:प्रोव्हिजनल असेसमेंट, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग व मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेससाठी ई-बॉंड वापरता येईल.सर...
