Sunday, October 26

Tag: #Maharashtra Politics

११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!
News

११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!

११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मतदार यादीतील घोळांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (१४ ऑक्टोबर) मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बैठकीत मतदार यादीतील विसंगती, चुकीची नावे, पत्त्यांतील गोंधळ आणि अपूर्ण माहिती यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर तुफान हल्ला चढवला.जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मतदार यादीत इतका गोंधळ आहे की ११७ वर्षांच्या व्यक्तीला ४० वर्षांचा मुलगा दाखवला आहे. काही ठिकाणी एकाच घरात अनेक लोक दाख...
महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
News

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरेपुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आ...
ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल
News

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्नआंबेडकर म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी...