जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!
जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे रविवारी पहाटे खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आग लागल्यानंतर तब्बल २० मिनिटे कोणीही लक्ष दिलं नाही आणि वॉर्डबॉय तिथून पळून गेले.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, “जेव्हा धूर दिसायला लागला तेव्हा मी डॉक्टर आणि नर्सला सांगितलं. पण कुणीही काही केलं नाही. प्लॅस्टिकच्या ट्यूब जळत होत्या आणि धूर पसरत होता. वॉर्डबॉय सगळे पळून गेले. मीच माझ्या आईला आयसीयूतून बाहेर काढलं. तिची प्रकृती काय आहे, हेही कुणी सांगत नाही.”मात्र रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनुराग धाकड यांनी हे आरोप फेटाळले. ते म्हणाले, “घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये ११ रुग्ण होते. आमच...
