Tuesday, November 4

Tag: Amravati

फसवणूक…
Story

फसवणूक…

फसवणूक.."अहो, संकेत काय म्हणतोय एकलं का?" रमाने आपल्या नवऱ्याकडे पाहून विचारले." पेपर वाचण्यात दंग असलेल्या मनोहरने डोके वर न करताच विचारले, "काय म्हणतोय तुमचा लाडोबा?" "इथल्या पेक्षा तिथे परदेशात चांगली नोकरी मिळतेय, तिथे जायचं म्हणतोय" "हां! असे अचानक! काय रे, इथे नोकरी करणार होतास ना? टाटा कंपनीतून बोलावणं आलं म्हणून सांगत होतास ना? मग हे खूळ कसं बरं आलं?" "बाबा, इथे फार स्कोप नाही हो. इथे जे कमवायला दहा वर्षे लागतील ते मी अमेरिकेत दोन वर्षात कमवेन." एवढ्यात संकेतच्या बाबांचे मित्र, सुरेश आले. "काय रे  काय एवढा वार्तालाप चाललाय? घरात शिरताच त्यांनी विचारले.सुरेश आणि मनोहर बालमित्र. शाळा, कॉलेज आणि नोकरी सुध्दा दोघांनी एकाच कंपनीत केली. दोघांनी ठरवून पुण्यात आपली घरे ही जवळ जवळ घेतली. दोघांच्या बायका मात्र वेगवेगळ्या प्रदेशातल्या. एक कोकणातली मराठमोळी तर सुरेशची गुजराथी. एक झूणका, का...
मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत : बुद्ध विहारे
Article

मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत : बुद्ध विहारे

* धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष   "मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत: बुद्ध विहारे"           समग्र क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली पवित्र अशा नागपूरच्या पवित्र भूमीवर पिढ्यानं-पिढ्या निपचित पडलेल्या लाखो अनुयायासह  बौद्ध धम्माचा अंगीकार केला. जगाच्या इतिहासातील "न भूतो न भविष्यती " अशी ही घटना म्हणावी लागेल.अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेला अन शिक्षणापासून कोसो दुर असलेला हा परिवर्तित; शोषित, पिडीत,वंचित,अस्पृश्य समाज बौद्ध तत्त्वज्ञानाबाबत तितकाच अनभिज्ञ होता.या सकल समाज घटकाचा सर्वंकष उद्धाराचा ध्यास घेतलेल्या डॉ.बाबासाहेबावरच्या अगाध आस्थेपोटी तत्कालीन अस्पृश्य समाज बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला.धर्मांतरानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अल्पावधीतच महापरिनिर्वाण झाले. परिणामतः डॉ.आंबेडकराना बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार तसेच अपेक्षित असे तत्त्वज्ञान नवबौद्ध समा...
शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
Article

शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

शारीरिक शिक्षणाचे महत्त्वशिक्षणाचा अर्थ केवळ पुस्तकातून ज्ञान मिळवणे असा नसून, व्यक्तीच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासाकडेही लक्ष देणे हा शिक्षणाचा उद्देश आहे. आपल्यासाठी जसे शिक्षण महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे शिक्षणात खेळाचेही महत्त्व आहे, चांगल्या आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत, शिक्षणामुळे बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा विकास होतो आणि खेळामुळे आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते.मात्र आजकाल शाळांमध्ये खेळाला कमी प्राधान्य दिले जात असल्याने ज्यांना खेळाची विशेष आवड आहे तेच विद्यार्थी मैदानात जातात. प्रत्येक शाळेत अशा खेळांची व्यवस्था असावी ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी सहभागी होऊन त्याचा शारीरिक व मानसिक विकास करू शकेल.शारीरिक शिक्षणाचा थेट अर्थ म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक श्रमाला महत्त्व देणे. शारीरिक शिक्षण हा शब्द शरीराला सुदृढ बनवण्यासाठी केलेल्या क्रियाकलापांसाठी वापरला...
संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
Article

संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ जगभरातील विविध देशाच्या संविधाना पैकी भारतीय संविधान हे लोकशाही प्रधान असलेले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.विविध जाती,धर्म,पंथ बोलीभाषा आणि रूढी,प्रथा,परंपरा असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशातील समस्त नागरिकांना एका धाग्यात गुंफण्याची किमया ही भारतीय संविधानाने करून दाखवीली आहे.सात दशकांचा कालावधी उलटूनही भारतीय संविधान अबाधित आहे. घटनाकारांची दूरदृष्टी यासाठी कारणीभूत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून आणि अहोरात्र कष्ट उपसून ही सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना लिहिली.भारतीयासाठी ही एकप्रकारची अनमोल अशी देणगीच म्हणावे लागेल. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा विधिग्राह्य आणि नियमानुसार सुव्यवस्थितरित्या चालावा यासाठी भारतीय संविधानाचा अंगीकार करण्यात आला.भारतीय संविधान सभेमध्ये एकूण २९६ सदस्य आणि मसुदा समि...
Article

अस्तित्व गमावलेली माणसे : नवी उमेदाची ऊर्जा देणारी कविता

  महेंद्र गायकवाड हे दोन दशकापासून आंबेडकरी कवितेच्या प्रांतात नित्यनेमाने कविता लिहित आहेत. त्यांची राहणी साधी असली तरी कवितेचे शब्द क्रांतीध्वज उंचावणारी आहेत. नुकताच त्यांचा अस्तित्व गमावलेली माणसे हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...! आंबेडकरी कविता ही क्रांतीच्या ठिणग्या निर्माण करणारी आहे. ही कविता शोषणाच्या सार्‍या मुळांना उघडून फेकते.आंबेडकरी कवी आपल्या मर्म चिंतनातून समाजाचा वेध घेत असतो. कविता ही समाजाला नवे वास्तव सांगत असते. आपले हित व अहीत यांची चर्चा करते. आंबेडकरी कवितेत काही कवी सोडले तर बाकीचे कवी हे आपले निरंतरतत्व सोडून बसले आहेत .पण काही कवी अजूनही सूर्यदीपत्वाची नवी ऊर्जा पेरत आहेत. त्यात महेंद्र गायकवाड हे सातत्याने समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या दारिद्र्याला ते गोंजारत नाही. आपली समस्याने ते मोडत नाही. तर ते समूह मनाची व्य...
शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Article

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या तसेच जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असे स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनंत पैलूचे त्यांनी निरीक्षण केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांचे प्रेरणास्थान बनले आहे.शिक्षणाचे प्रेरणास्तंभ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानपुरुष ,निस्सीम ग्रंथप्रेमी,विचार स्वातंत्र्याचे खरे समर्थक,थोर समाज सुधारक,प्राख्यत अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंधाचे माहितगार,ऊर्जा व ज्ल संसाधनाचे नियोजक, अंधश्रद्धाचे कर्दनकाळ, सद्भावना सांप्रदायिक व सहिष्णुता प्रेरक, महिलाच्या समान हक्कासाठी संघर्षरत, शेतकरी/शेतमजूर व कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये,शांतता व अहिंसेचे समर्थक, बहुजन समाजाचे उद्धारक प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहे.गरीब वंचित,शोषित,पीडित, महिला, कामगार आणि सर...
आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज
Article

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरजभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापक नेते होते.विषमतावादी समाज रचना असलेल्या बहुजन समाजातील शोषित,पिडित,उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले महान कार्य अद्वितीय आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंज देत देश-परदेशात उच्च शिक्षण घेतले. अगाध बुद्धिमत्तेचा परिचय देत देश-विदेशातील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला. डॉ.आंबेडकर ज्ञानी होते.त्याची विद्वत्ता अद्वितीय होती.प्रखर देशभक्त,अंधश्रद्धेचे विरोधक,विज्ञाननिष्ठ, शिक्षणक्षेत्राचे प्रेरणास्रोत, संविधानाचे शिल्पकार,विचार स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते,बहुजन समाजाचे कैवारी, सांप्रदायिक सद्भावना,सहिष्णुतेचे प्रेरक, महिला सक्षमीकरणाचे कट्टर समर्थक, आर्थिक-सामाजिक व राजकीय विचारवंत,आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार, झुंजार पत्रकार,संपादक,लेखक लो...