Sunday, October 26

Tag: बाबासाहेब

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं.  परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं दे...
ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर ---------------------------------------- भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्या नेत्रदिपक कार्यकर्तुत्वामुळे ज्या विद्वानाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेले व संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचे स्थान अग्रस्थानी आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रखर वाणी व धारदार लेखणीतून ज्यांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळावा, प्रत्येकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावे, यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्ची घातले त्या ज्ञान सूर्याचा आज जन्मदिवस.भारतीय संविधानाची निर्मिती करून या देशातील लोकांच्या जीवनात असलेल्या अंधाराला प्रकाशाकडे नेण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. ज्या महान व्यक्तीने आयुष्यभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष...
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं. परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं देवा घ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरआपल्या भारत देशाचा इतिहास महान आहे. ह्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशातील बांधवांसाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्या महान कार्याचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा त्या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला. रामजी वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्याने घरात ग्रंथसंग्रह होते. त्याच बरोबर मुलांना ही चांगली पुस्तके ते आणून द्यायचे. त्या कारणाने बाबासाहेबांना वाचनाची, अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागली असावी.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य ...
एकच साहेब बाबासाहेब
Article

एकच साहेब बाबासाहेब

एकच साहेब बाबासाहेब           ३१ जुलै १९५६ ची सायंकाळ. नानकचंद टपाल घेऊन बाबसाहेबांकडे आलेले. बाबासाहेब ओसरीत बसून स्टूलवरच्या उशीवर पाय ठेवून नानकचंद यांना डिक्टेशन देत होते. मधातच त्यांनी डोळे, डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवले आणि त्यांना झोप लागली. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा जाग आली. रत्तु यांनी वाचून दाखविलेल्या पत्रांची उत्तरे त्यांनी भराभर डिक्टेट केली. नंतर नानकचंद यांच्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातील पुस्तक गळून पडले. काही वेळ ते काहीच बोलले नाही. नानकचंद घाबरले. त्यांनी डोक्याला, पायांना मसाज केले. त्यामुळे बाबासाहेब थोडे शांत वाटत होते.गेल्या काही दिवसांपासून हे घडत होतं. शेवटी मोठया धाडसाने नानकचंद यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, "सर, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता ? अधूनमधून डोळ्...
द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर          जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पडले आहे. राजकारणाच्या स्वार्थी वृत्तीच्या फायद्यासाठी जगावर फार मोठे अरिष्ट लादल्या जात आहे. तिसरे महायुद्ध लढले जाईल का असा प्रश्न जगातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्फोटकांनी मानवाचा शाश्वत विकासाला उध्वस्त करण्याचे कुटील डाव जगामध्ये निर्माण होत आहेत. अहंकारी रानटी प्रवृत्ती अनेक नेत्यांच्या अंगात संचारली आहे .युद्ध व त्यांची किती गंभीर परिणाम असतात त्याची प्रचिती ज्यांनी द्वितीय महायुद्ध पाहिले त्यांना नक्कीच आले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेल्या भूमिकेचा परिणाम जागतिक परीप्रेक्षात पडलेला दिसतो. अनेक नेत्यांना त्यांच्या विचारापर्यंत पोचता आले नाही.       द्वितीय महायुद्धातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांच्या भारतीय स्वात...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…
Article

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं....! गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत.* आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारवाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्ये...
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. आंबेडकर हे केवळ संविधानाचे निर्मातेच नव्हे तर ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञही होते.डॉ.भीमराव आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना बनवण्यात तर महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून देशाच्या उभारणीतही मोलाचे योगदान दिले.डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव येताच भारतीय संविधानाचा उल्लेख आपोआप येतो. संपूर्ण जग त्यांना एकतर भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून किंवा भेदभाव करणाऱ्या जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणारे योद्धा म्हणून स्मरण करतात .या दोन्ही प्रकारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय भूमिकेला कमी लेखता येणार नाही. पण एक दिग्गज अर्थतज्ञ म्हणूनही डॉ.आंबेडकरांनी देशाच्या आणि जगाच्या पटलावर अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.डॉ.आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे देशा...