निवडणूका पारदर्शक होईल काय?
निवडणूका पारदर्शक होईल काय?गेल्या साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आता निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित केला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय वातावरण तापणार आहे यात प्रश्नच नाही बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता प्रभागा अंतर्गत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत मात्र एक प्रश्न यातून निर्माण होतो तो म्हणजे या निवडणुका पारदर्शक होईल काय? कारण मतदार याद्यातील घोळ ,दुबार मतदार चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधक करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.विरोधी पक्षांच्या आरोपांकडे थेट दुर्लक्ष करत निवडणूक आयोग...
