१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा
RBI Rule for Digital Payment : मुंबई : डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ने डिजिटल पेमेंट नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गुरुवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रमाणीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला.डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२६ पासून द्वि-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) अनिवार्य करणार आहे.याअंतर्गत ग्राहकांना फक्त SMS OTP वर अवलंबून राहावे लागणार नाही. व्यवहार ओळखण्यासाठी आता पासवर्ड, फिंगरप्रिंट, फेस आयडी, बायोमेट्रिक्स अशा अनेक अतिरिक्त पद्धतींचा वापर करता येणार आ...

